माझे आई बाबा शाळेत होते तेंव्हा सातवी पास म्हणजे मॅट्रिक आणि सातवी पास झालेल्यानां सरकारी नोकरीसाठी ओढून नेत आणि आम्ही इंजिनियर झाल्यानंतर एक वर्ष काही मिळेल ते काम करत होतो. त्यावेळी निवृत्तीला आलेल्या समस्त जनतेचे "आमच्या वेळी असे नव्हते" असे उदगार पुन्हा एकदा ऐकू आले. हल्ली कोणी पळून जाऊन लग्न केले किंवा रजिस्टर लग्न केले तरी (मानपान हुकलेली) काही टाळकी "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून नाराजी व्यक्त करतात. माझे काका इंग्रजांच्या काळात पोलिस सेवेत होते. त्यावेळी सायबाच्या कडक शिस्तीत काम केलेले. कामासाठी मैलोन मैल चालत फिरलेले. ते हल्लीच्या पोलिसांचा फिटनेस आणि कारभार पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे बरेचदा म्हणत.

पुर्वी म्हणजे अगदी १९९५ पर्यंत म्हणा, मुंबईला असलेल्या काका आणि भावाची खुषालीची पत्रे यायची. आमच्याकडे तेंव्हा टेलिफोन ही नव्हता. तेंव्हा टेलिफोन हा ठराविक लोकांकडे किंवा पूर्ण गावात एक-दोन जाणांकडे असे. टेलिफोन म्हणजे चैनीची वस्तूचं होती. नंबर लावल्यानंतर घरी यायला काही वर्षे लागायची.


तसही हल्ली "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणायला दोन पिढ्यांचे अंतर किंवा वयाने फार मोठे असणे जरूरी राहीले नाही. हल्लीच्या झटपट (सबकुछ ट्वेंटी-ट्वेंटी) युगात जनरेशन-गॅप देखील झपाट्याने कमी झालीय. वीस वर्षात केवळ ५२ कसोटी सामने खेळणारे सर डॉन ब्रॅडमन आज वीस वर्षात सचिन तेंडुलकरला १५९ सामने खेळताना बघून "आमच्या वेळी असे नव्हते" असे नक्कीच म्हणाले असते. हेल्मेटशिवाय विंडिजच्या तोफखान्याचा सामना केलेले सुनील गावसकर आजच्या सुविधा पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत असतील. कींबहुना कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळून आज ट्वेंटी-ट्वेंटीचा थरार पाहता सचिन, गांगूली आणि द्रविड "आमच्या वेळी असे नव्हते" असे मनातल्या मनात म्हणत असतील. फार कशाला आम्ही जेंव्हा इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेंव्हा आम्हाला सेमिस्टरला ८ असे वर्षाला १६ विषय होते. पण आम्ही शेवटच्या वर्षाला गेलो आणि अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यावर्षी १६ ऐवजी १० विषय झाले. त्यावेळी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा "आमच्या वेळी असे नव्हते" हा डायलॉग मारला होता.
हल्ली सगळं वह्या-पुस्तके, दप्तर, अभ्यासक्रम, मोबाइल(आमच्यावेळी खिशात फणी असायची तसा हल्लीच्या शाळकरी मुलांकडे मोबाइल असतो), फॅशन इतक्या भराभर बदलतं की २ वर्षाचं अंतर असणार्या भावंडामध्ये जनरेशन गॅप दिसते. जरा मोठं भावंड दुसर्याकडे पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणते. मी स्व:त देखील माझ्या लहानपणी आमच्या गावात जी मज्जा केली,

काजू-कैर्या-करवन्दं पाडून खाल्ल्या, दिवाळीत किल्ले बांधले, तासाला १ रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन शिकलो, समुद्र किनारी वाळूत किल्ले बांधले, कुर्ल्या पकडल्या अश्या एक ना अनेक उचापती केल्या,

aamchya veli he blog-big ch fad navht re baba, aamhi kaagdaavarach lihat asu ... :)
ReplyDeleteहा हा अगदी खरंय!!! आमच्या वेळी पण असा नव्हता...
ReplyDelete