tag:blogger.com,1999:blog-45329747538706109552024-02-07T13:43:35.204-08:00माझ्या गजाल्यासिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comBlogger50125tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-13443086463425955112014-10-22T02:09:00.000-07:002014-11-03T00:15:12.037-08:00मेकिंग ऑफ आकाशकंदिल<p></p><p></p>
शाळेत असताना सहामाही परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की धांदल उडे. सहामाहीचा शेवटचा पेपर आणि दिवाळीचा पहिला दिवस यात 3-4 दिवस मिळत. त्या 3-4 दिवसात किल्ला आणि कंदील बनवणे ही दोन महत्वाची कामे असायची. स्वयंपाक घरात लाडू, करंजी, चकली अश्या पदार्थांची तयारी सुरू असायची आणि अंगणात आम्ही किल्ल्यासाठी माती कालवून बसायचो. दुपारी उन डोक्यावर यायच्या आत किल्ल्याचे काम करायचे. त्याच बरोबर चिवड्याचे पोहे आणि इतर जिन्नस वाळवण्यासाठी अंगणात ठेवले जायचे त्यावर पहारा द्यायचा. दुपारी भर उन्हात बाहेर जायला मनाई असायची म्हणून त्या वेळात आकाशकंदिलाचे काम करायचे. संध्याकाळी उन्हे कलली की पुन्हा किल्ला मोहिम आणि रात्री परत आकाशकंदिल असे दरवर्षीचे वेळा पत्रक असायचे. पुढे शाळा संपल्यापासून किल्ल्याचे काम पुढील पिढीच्या हाती सोपवल्यामुळे केवळ आकाशकंदिल हे मुख्य काम राहीले आहे. यथावकाश स्वयंपाक घरात प्रवेश मिळाला आणि चकली, करंजी आणि शंकरपाळी विभागात हातभार लागू लागला. पोटापाण्याला लागल्यावर देखील दिवाळीच्या आधी दोन दिवस आकाशकंदिल हाच मुख्य प्रोजेक्ट असतो. सेवानिवृत्त झाल्यापासून बाबानीं देखील या कामात लक्ष घालण्यात सुरूवात केलीय. कंदिलाची मुख्य कलाकुसर तेच करतात. त्याचीच एक सचित्र झलक.
आज ही आम्ही पारंपारीक त्रिकोणी-चौकोनी बाजू असलेला आणि लांबलच्चक शेपटीवाला आकाशकंदिल बनवतो. त्यासाठी बांबूच्या काड्यांचा एक साचा तयार करून ठेवलेला आहे. कंदिलाचे कागद आणि पर्यायाने कंदिलाचा रंग हाच मुख्य आणि एकमेव बदल दरवर्षी असतो. दिवाळी झाली की कंदिल माळ्यावर जपून ठेवणे आणि पुढील दिवाळीच्या आधी "स्वच्छ घर" मोहिमे दरम्यान तो साफ करून खाली काढणे हे पहिले काम.
<p></p><p></p>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER> साफ केलेला कंदिलाचा साचा. </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsCvORJT4essEAbNM6UFDhFexIAFV4-WAFDWYtAZy4LzpirUMaqC-Z2uoXxdTcPRp-FEulPIFf_w1SA0uNz-nwPhMAhH64gge3RsWclUAxyywSV3cuEpVQFVr69IvSWLO8K3KrdpYdHr8/s1600/DSC04500.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsCvORJT4essEAbNM6UFDhFexIAFV4-WAFDWYtAZy4LzpirUMaqC-Z2uoXxdTcPRp-FEulPIFf_w1SA0uNz-nwPhMAhH64gge3RsWclUAxyywSV3cuEpVQFVr69IvSWLO8K3KrdpYdHr8/s320/DSC04500.JPG" /></a></div>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER>
कंदिलाच्या कोरीव कामासाठी बाबानीं 2-3 वेगवेगळ्या आकाराचे खीळे टोकाकडून तासून एक छोटेसे Tool Kitच बनवले आहे. त्याचा वापर करून कंदिलाच्या त्रिकोणी आणि चौकोनी बाजूचे कोरीव काम करताना. </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhi0dJWWWp5uoPK2KWKh3r5Nu-LEyupHdE2iCWEeEXcV_Zm9GWCr6kxYiAzXRdP9A7gYnrlyefaVgXmJO8Qrbjh0LLupgF5Tw6IQnuwpHt3jWggxk3_gGuBrCk6evhzSqHSnokJJEki9Io/s1600/DSC04502.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhi0dJWWWp5uoPK2KWKh3r5Nu-LEyupHdE2iCWEeEXcV_Zm9GWCr6kxYiAzXRdP9A7gYnrlyefaVgXmJO8Qrbjh0LLupgF5Tw6IQnuwpHt3jWggxk3_gGuBrCk6evhzSqHSnokJJEki9Io/s320/DSC04502.JPG" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyKwAm_Pm2A1B9Tvpe_i0qXGdUhmH7zffI8Mj1aTzYM75yEoX5UmfpbZt0a4PngigdHBwPzCBN1gWbe5q2ec_fz1WjVngvQlOiWDrUbijB1BohNcOXZE4gv0eVSKe0gKtQ6kgqMykHmO0/s1600/DSC04504.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyKwAm_Pm2A1B9Tvpe_i0qXGdUhmH7zffI8Mj1aTzYM75yEoX5UmfpbZt0a4PngigdHBwPzCBN1gWbe5q2ec_fz1WjVngvQlOiWDrUbijB1BohNcOXZE4gv0eVSKe0gKtQ6kgqMykHmO0/s320/DSC04504.JPG" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBeDaGsswwyToEmvD5kUDAFjiq5ummiKMaoAXG-eu0ztl9ECBaw3CHgSF02knKi_Ggz2kY2hIjjl1jD11mSquZBO2CPW4SVPAWE9YcEyg6Kordlpm3NV7f6iSrLxDe3axSclYLFKWHoL0/s1600/DSC04501.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBeDaGsswwyToEmvD5kUDAFjiq5ummiKMaoAXG-eu0ztl9ECBaw3CHgSF02knKi_Ggz2kY2hIjjl1jD11mSquZBO2CPW4SVPAWE9YcEyg6Kordlpm3NV7f6iSrLxDe3axSclYLFKWHoL0/s320/DSC04501.JPG" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKjv8Nrj6DUHJUUXtQC-h7x8mcyi2IHUhokO3GG6BNt9XY4Xg4gAHOt0pP0muRuWjw8Rlb3rO-4W6FYcy4wfCPE42ZahsZj8II267hKOc2F_Jt1s985nmtQLZYfQdCUBVeBt0Ta_YHeN0/s1600/DSC04505.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKjv8Nrj6DUHJUUXtQC-h7x8mcyi2IHUhokO3GG6BNt9XY4Xg4gAHOt0pP0muRuWjw8Rlb3rO-4W6FYcy4wfCPE42ZahsZj8II267hKOc2F_Jt1s985nmtQLZYfQdCUBVeBt0Ta_YHeN0/s320/DSC04505.JPG" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgK3DYKMiC5oj1mOXM-tj8EdCF0tBEHXWcMQ3VLod3s_tTeC4MwXBm83tszJiqn4NI9NNdZPez_2nX011j3Apl2ESjl3iQIJFuZoaHkaY2ocTzewgHv0m6jJHDeLFtE0Dqt73PDRlEvRqk/s1600/DSC04506.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgK3DYKMiC5oj1mOXM-tj8EdCF0tBEHXWcMQ3VLod3s_tTeC4MwXBm83tszJiqn4NI9NNdZPez_2nX011j3Apl2ESjl3iQIJFuZoaHkaY2ocTzewgHv0m6jJHDeLFtE0Dqt73PDRlEvRqk/s320/DSC04506.JPG" /></a></div>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER> कंदिलाला लावण्यासाठी करंज्या </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDhk3F29CahE2FtAq_ef2Hct-sIXb86-DKLL4f_ZS6QAOvbtLihRbYQ0qarHzsgPQ-GVPD56bSqaEaLXObxjsOWeFYRCUE7rt8q-rhR57zP-cOyXCwgGpsJ6L3Ji2P-DtGHDeAMrf_mU0/s1600/DSC04507.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDhk3F29CahE2FtAq_ef2Hct-sIXb86-DKLL4f_ZS6QAOvbtLihRbYQ0qarHzsgPQ-GVPD56bSqaEaLXObxjsOWeFYRCUE7rt8q-rhR57zP-cOyXCwgGpsJ6L3Ji2P-DtGHDeAMrf_mU0/s320/DSC04507.JPG" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcWqgWaCQkGLu5bxkLELMZef7tS4o7kRPPuU3olL1zAUfeWOXWx_2vmQkpZagzXIZMI0DsHDD5JEIKCinZoS8gfVsgRrzqnF3NlrrjAf_chcy9bBm_Tw4kWW_Nf-mqswjgF8dP_8YiStI/s1600/DSC04508.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcWqgWaCQkGLu5bxkLELMZef7tS4o7kRPPuU3olL1zAUfeWOXWx_2vmQkpZagzXIZMI0DsHDD5JEIKCinZoS8gfVsgRrzqnF3NlrrjAf_chcy9bBm_Tw4kWW_Nf-mqswjgF8dP_8YiStI/s320/DSC04508.JPG" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiV7aOShraSoE29AaatUg-zu6jKxsWZ_Fg6IBdMTUVQhYqgMLPOa7QRPlufC8XLMkqYM062VEfe-6o4KdD8uUKA3ekPJ5u0chQA3OOH_YroT_TlaYrjp2AG7zpCjxVPd6QJ4tkfYTiqD68/s1600/DSC04509.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiV7aOShraSoE29AaatUg-zu6jKxsWZ_Fg6IBdMTUVQhYqgMLPOa7QRPlufC8XLMkqYM062VEfe-6o4KdD8uUKA3ekPJ5u0chQA3OOH_YroT_TlaYrjp2AG7zpCjxVPd6QJ4tkfYTiqD68/s320/DSC04509.JPG" /></a></div>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER> कंदिलाच्या कोपर्यानां लावण्यासाठी फुले </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7u4MY5-SotmXHaEqXMVLIekmrroKqLecYT8QBOQFuggOyYq8laYo5VzvkNfx_9puV6Fct0zRD1n6zG_f0AjbS3Pqk-LfYotwCSCiyGPhPH_jNxAnu3BB_B5CP_M6nqCseiMILpLCrNZo/s1600/DSC04510.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7u4MY5-SotmXHaEqXMVLIekmrroKqLecYT8QBOQFuggOyYq8laYo5VzvkNfx_9puV6Fct0zRD1n6zG_f0AjbS3Pqk-LfYotwCSCiyGPhPH_jNxAnu3BB_B5CP_M6nqCseiMILpLCrNZo/s320/DSC04510.JPG" /></a></div>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER> कंदिल बिटा वर्जन ;-) </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibZnpFlbh-NMmMmSvllpxyIiP3uJOBZcpLgcIXITnsWqUblmEVDWiY9tlmC8c8XF3C7PBIxR1E8Pt9-dqOrEo9CLUwTzLjg-MVJf4XWrVWmfuEEtMu19JEbYAo5YWOpTXlVzWOkdR0gSs/s1600/DSC04512.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibZnpFlbh-NMmMmSvllpxyIiP3uJOBZcpLgcIXITnsWqUblmEVDWiY9tlmC8c8XF3C7PBIxR1E8Pt9-dqOrEo9CLUwTzLjg-MVJf4XWrVWmfuEEtMu19JEbYAo5YWOpTXlVzWOkdR0gSs/s320/DSC04512.JPG" /></a></div>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER> धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgOgHzu9wGHVRyOu-3LJGNjXV7OMnWuoAWj_g3LIqeCyCjbs3RZjAk0lJvQo5S1uDietCyaNGglcHv1gHUeCvI3DADK2XP_UQIllYQ1k5YIsKGyTgxtVmTP8CssRiIx1Jo80xELymesHjY/s1600/Kandil.bmp" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgOgHzu9wGHVRyOu-3LJGNjXV7OMnWuoAWj_g3LIqeCyCjbs3RZjAk0lJvQo5S1uDietCyaNGglcHv1gHUeCvI3DADK2XP_UQIllYQ1k5YIsKGyTgxtVmTP8CssRiIx1Jo80xELymesHjY/s640/Kandil.bmp" /></a></div>
<p></p><p></p><DIV ALIGN=CENTER>मोठ्या कंदिलाला कंपनी म्हणून लावयच्या छोट्या छोट्या कंदिलांची जबाबदारी अस्मादिकांची. त्याचा हा एक कोलाज. </DIV><p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiVOXOaZ4E0qK-wye91KAOQVqIliNZ-GcmhwW17O3gaS8I4JStfzZBtt7kkf6UZ5asWZM3eyVK67YN1pL9SOqtgcNYwIfGtcRtnnRRYrf7zyoWD9T7iLPRRODU8uIxqreQxHMRv5PysBi8/s1600/Happy+Diwali.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiVOXOaZ4E0qK-wye91KAOQVqIliNZ-GcmhwW17O3gaS8I4JStfzZBtt7kkf6UZ5asWZM3eyVK67YN1pL9SOqtgcNYwIfGtcRtnnRRYrf7zyoWD9T7iLPRRODU8uIxqreQxHMRv5PysBi8/s320/Happy+Diwali.png" /></a></div><p></p><p></p>
<DIV ALIGN=CENTER>|| शुभ दीपावली ||</DIV>
<p></p><p></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgB_GiP4qSunVjuScFydp4l8_AbMAz2CBSTaYdMO2JpFpbFsxypfc0y-VieAa49zHczuvVNC05KuY0HQwxdwFkHCvUj_3zV8lDkk7CO9XBRSOmtesrzRmJHKU7zIOngWdQxECUxYbjNovg/s1600/Diwali.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgB_GiP4qSunVjuScFydp4l8_AbMAz2CBSTaYdMO2JpFpbFsxypfc0y-VieAa49zHczuvVNC05KuY0HQwxdwFkHCvUj_3zV8lDkk7CO9XBRSOmtesrzRmJHKU7zIOngWdQxECUxYbjNovg/s400/Diwali.JPG" /></a></div>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-62052772816662418812013-09-08T07:19:00.001-07:002013-09-08T07:24:43.086-07:00लगबग...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /></div>
काय रे झाली काय तयारी. मखराचे पडदे नीट बांधा. समया, निरांजन आणि बाकी पूजेची भांडी लख्ख घासून पुसून घ्या.<br /><br />
आबांनी बाजारातून येऊन सामानाच्या पिशव्या खाली ठेवत ओटीवर बसल्या बसल्या चौकशी कम सूचना सुरू केल्या. आबांचा लेक सदा आणि पुण्याहून आलेले त्याचे दोन चुलत भाऊ देवघरात गणपतीसाठी मखर तयार करीत होते. तिथे बारीक चुका, खिळे, टेकस, कात्री, हातोडी, पक्कड, वायरी, टेस्टर, स्क्रु-ड्रायवर, फेविकल कॉल, सजावटीचे रंगीत कागद आणि काय काय असे सगळे सामान पडलेले होते. लहान मुले तिथे लुडबूड करायला बघत होती त्यामुळे अधूनमधून माजघरातून एखादा हात येऊन त्या चिल्ल्या-पिल्यांची गठली उचलून त्यांना आत नेत होता. पण गप्प बसतील ती चिल्ली-पिल्ली कसली. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सगळीकडून त्यांच्या नावाने कल्ला सुरू होता. पडवीत आबांचे वडील नाना आराम खुर्चीत रेलुन पुन्हा पुन्हा तीच वर्तमान पत्रे आणि पुरवण्या चाळीत होते. नानी शाळेत जाणार्या नातवंडांबरोबर बसून दुर्वा नीट करीत होती. आजीने नीट केलेल्या दुर्वा मोजून नातवंडे बरोब्बर २१ दुर्वांची एक अश्या जुड्या बांधून त्या टवटवीत रहावया म्हणून तांब्याच्या पाणी भरलेल्या पेल्यात नीट उभ्या करून ठेवत होतीत. आबा येताच नातीने हातातील दूर्वाच्या जुडीचे काम झाल्यावर उठून सगळ्या पिशव्या माजघरात मोठ्या काकूकडे म्हणजे आबांच्या बायकोकडे म्हणजे वासंती काकूकडे नेऊन दिल्या. तिकडे माजघरात जावा जावा आणि त्यांच्या हाताखाली लेकी सुना राबत होत्या. घरात गॅस-सिलेंडर असला तरी माणसे वाढल्यामुळे माजघरातील चूलदेखील पेटलेली होती. त्यावर भात आणि आमटीचे टोप ठेवलेले होते. नविन आणि शहरी सुनांना चुलीची सवय नसल्याने चूल संभाळण्याचे काम अर्थातच वासंती काकूकडे होते.<br /><br />
<b>आबा:</b> तात्याची गाडी कुठपर्यंत आली?<br /><br />
<b>सदा:</b> मघाशी फोन केला तेंव्हा कशेळी घाटात होते म्हणजे येवा चिपळूणपर्यंत आले असतील.<br /><br />
<b>आबा:</b> अरे मुंबै सोडून आठ तास उलटून गेले नां त्यांना? अजुन चिपळूणातच. येवा घरात पोचूक हवो होतो. मखराचा सामान आणि लायटिंग घेवन येतोय तो. आत्ता सजावट करणार कधी?<br /><br />
<b>सदा:</b> ओ तात्या म्हायत हाय नां तुम्हाला? त्याका आधीच सांगितला होता की शुक्रवारी रात्रीच निघ नायतर शनवारी सकाळी तरी. पण नाय. हा आज रविवारी सकाळी निघाला. आज हायवे फुल्ल जाम. गेल्या वर्षी पिंट्या आणि मंडळी आदल्या दिवशी निघालेली ती गणपतीची स्थापना होऊन रात्रीची आरती झाली तरी आली नव्हतीत. मग रात्री चंद्र दिसेल म्हणून माना खाली घालून घरात आलीत. <br /><br />
<b>आबा:</b> मग हे तात्याला म्हायत नाय? जाव दे... तुम्ही मखर पुरा करून ठेवा. चौरंग मांडून घ्या. मग तात्या आला की काय ता लायटिंग लावा. <br /><br />
<b>सदा:</b> ओ तात्या कुणाचा ऐकता काय कधी? सगळीकडे आपला ता खरा. पुणेकरा कशी आंबा घाट उतरून शनवारी सकाळी हजर. मुंबैच्या लोकांक कोण सांगूक जायल. तरी नशीब आत्ता गाडी हाय त्याच्या धुंगणाखाली. नायतर दरवर्षी हा जायपर्यंत यसटी आणि रेल्वेचो बुकिंग फुल्ल झालेला असायचा आणि मग प्रायवेट नायतर ज्यादा गाडी पकडून चेंगरून यायचा. <br /><br />
<b>आबा:</b> मुंबैकरा लै शाणी. पडीचो हापूस साशे रुपये डझन घेवन् खातत. पण तात्याकं काय बोलूचा तर तो नानीचो लाडको लेक. आपण काय बोलणार. बरा ता जाव दे. भटाला किती वाजता बोलावलात हाय? आणि ढोलताशेवाल्याक सांगितला हायस नां. काय हाय, भट आणि वाजंत्रीवाले, उद्या दोघांच्या पण धंद्याचो दिवस. त्यांना पयला सांग. बाकी बघून घेता येता.<br /><br />
<b>सदा:</b> होय तर... भटाकं सकाळी धा वाजता बोलावलंय. ताशेवाला पेंटरच्या घराशी येतंय.<br /><br />
<b>आबा:</b> बरा आठवला. जमला तर संध्याकाळी पेंटरकडे एक फेरी मारुन येतो. गणपती तयार हाय की नाय बघूक हवो नाय तर गेल्यावर्षी सारखो नको. चतुर्थीला आपण गणपती आणूक गेलो तरी पेंटरचो पुतणो आपलो उंदीर रंगवताय.<br /><br />
<b>नानी:</b> सकाळी लवकर उठा. मी चार वाजता बंब पेटवन ठेवतो. आपला आणि आपापल्या कॅलेंडरांचा पटापट आवरा. आठच्या आत पेंटरकडे पोचूक हवा. आणि मिरवणूक काढा काय ती पण धाच्या आत घरी येऊक हवो. नायतर गेल्या वर्षी भट घरात वाट बघीत बसलेलो आणि तुम्ही घाटीत नाचित होतात. तुमची मिरवणुकीची हौस काय ती विसर्जनाच्या दिवशी भागवा. उद्या सगळा टायमात होऊक हवा. मिरवाणूकीसाठी गाड्या आणूक वाडीतली पोरा कधी जातायत् ता बघ.<br /><br />
<b>सदा:</b> गाड्या आणतो आम्ही पण तात्या म्हणीत होता की त्याच्या नवीन गाडीतून गणपती आणायचा म्हणून.<br /><br />
<b>आबा:</b> खुळावलाय काय तो? नविन गाडी घेतलान म्हणून बुजवताय वर्षभर. अरे आपल्या गणपतीचो पाट तरी त्याच्या गाडीच्या दरवाजातून आत जायल काय?<br /><br />
<b>सदा:</b> ता त्यास तुम्ही सांगा. गाडी घेवन येव दे त्यास म्हणजे तुम्ही तात्या आणि बापू अशी तिघा भावंडा तुमचे दुखरे गूढगे, मणके आणि मोतिबिंदू घेऊन त्यात बसून मिरवणुकीच्या मागंन या. नायतरी घाटी चढवत नाय तुमच्यान.<br /><br />
<b>आबा:</b> पेकटात लाथ घालीन माझ्या गूढग्याक काय बोललस तर. तुम्ही आपला बघा. दशावताराची आणि सत्यनारायणाची आरती सुरू झाली की नाल (आरतीच्या वेळी वाजवायचे ढोलके ) वाजवताना तुमच्या चडड्या पिवळ्या होतात. "घालिन लोटांगण" सुरू व्हायच्या आधी तुम्ही लोटांगण घातलेला असता.<br /><br />
<b>सदा:</b> लाथ घालायच्या फंदात पडू नका नायतर परत गूढगा धरून बसायला लागेल... ( देवघरातून तिघांच्या ख्या ख्या ख्या चा आवाज येतो ) <br /><br />
<b>नाना:</b> तोंडाकडन् पुढे गेलीत कार्टी...<br /><br />
<b>आबा:</b> जाव दे नाना. काय बोलणार. आपल्याकडे बघूनच शिकलीत ती. (देवघराच्या दिशेने पहात) आणि रात्रीच्या आरत्यांना जास्ती उशीर करू नका. कोणाकडे कधी सत्यनारायण आहे ते विचारून भजनाचा ठरवा. नंतर लोकांची कीटकीट नको. आपल्याकडे गुरुवारी पूजा धरलेली आहे. बापूचा लेक आणि नवीन सूनबाई बसू दे पूजेला. काय नाना, बरोबर नाय?<br /><br />
हो हो... नवीन जोडाच बसू दे पूजेला... नानांची संमती.<br /><br />
अहो आणि बापू आला की त्याला आणि नातवाला सांगून टाका की पुढच्या गणपतीत अंगणात गोधड्या आणि लंगोट वाळताना दिसले पाहिजेत. ता काय ता प्ल्यानिंग बिनिंग करीत बसू नका... नानीने नातवासाठी डेडलाईन जाहीर करून टाकली.<br /><br />
<b>आबा:</b> होय ता पण बराबर. पुढच्या श्रावणात तुमचा सहस्त्र-चंद्रदर्शन सोहळा करायचा आहेच त्यात पणतू दर्शन कार्यक्रम पण करून टाकु. (सदाला उद्देशून देवघराच्या दिशेने पहात) बाकी पूजेचा सामान मी आणून ठेवलंय. उद्याच्या पूजेची तयारी चोख करून ठेवा, उगाच भटासमोर मला तोंड सोडायला लाव नका. पोरांना पाठव वाडीत आणि दुर्वा, शमी आणून ठेव. बाळा आणि राणीला सांगून ठेवलंय मी. रोज सकाळी लवकर उठून दुर्वा, शमी आणि पारिजातकाची फुले पुजेला आणून ठेवायची. दुर्वा नीट करून जुड्या करून ठेवा रोजच्या रोज. मी रोज सकाळी पूजेला बसलो की सगळ्या गोष्टी तयार हव्यात. हे दे ते दे नको. सगळं जागच्या जागी असु दे. <br /><br />
माजघरच्या दिशेने बघत... अहो सगळा जिन्नस आहे नां भरलेला? अगदी पापड लोणच्यापर्यंत सगळं एकदा तपासून पहा. नानी तू तांदूळ धुवून सुकवून दिले होतेस त्याचे पीठ आले का गिरणीतून. त्या बाजारच्या पीठाचे मोदक काही धड होत नाहीत.<br /><br />
<b>नानी:</b> हो रे बाबा. मोदक आणि घावण्याचा पीठ तयारा असा. मुंबैकरा आणि पुणेकरा रविवारी निघतील तेंव्हा त्यांच्यासाठी वड्याचा पीठ पण करून ठेवलाय. वडे सागूती खावन श्रावण सोडून जाव दे पोरा माझी.<br /><br />
<b>नाना:</b> ती श्रावण सोडायची राह्यलीत काय अजुन... <br /><br />
<b>नानी:</b> असू दे ओ. आत्ता आठवडाभर तरी उपास करतीलच नां. रविवारी सकाळ्ळच जेटीवर जा आणि ताजा फडफडीत म्हावरा घेवन ये. माझ्या धाकट्या नातवाक चुलित भाजलेलो बांगडो आवडता.<br /><br />
<b>आबा:</b> होय गो. ते पुढच्या रविवारचो बघू नंतर. आत्ता पासून म्हावर्याचो विषय नको. आत्ता सध्या मोदकाचा पीठ महत्वाचा. आणि लेकी सुनांना जरा मऊ हातान मोदक कसे करायचे ते शिकव. त्यांच्या हातचे ते राक्षसी मोदक खावत नायत. देवाच्या नेवेद्याच्या पानात तू केलेले मोदकच लाव.<br /><br />
पुन्हा एकदा माजघराच्या दिशेने... अहो परवाच्या ऋषिच्या भाजीसाठी बाजारातून मिळतील तितक्या भाज्या आणल्या आहेत. कणसे आणि शेंगापण मिळाल्या. उद्या घरोघरी गणपती बसणार त्यामुळे बाजारात भाजी पण भेटताना मुश्कील.<br /><br />
<b>नानी:</b> सगळ्या भाज्या कशाला आणल्यास. वासंतीने परसात वाली, अळु, पडवळ, भेंडा, कारली, दोडकी असा भाजीपाला केला आहे. यंदा पाऊस पण चांगला झाला त्यामुळे भाजीपाला, दुर्वा, शमी, फुले यांना तोटा नाही.<br /><br />
<b>आबा:</b> हो घरची भाजी वापरा. मी पण आपली आणून ठेवली बाजारातून. आत्ता एवढी सगळी मंडळी येणार. ऋषिच्या भाजीत नाही तर दुसर्या दिवशीला होईल.<br /><br />
<b>वासंती काकू:</b> सगळं आहे व्यवस्थित. फक्त लेक येणार आहे सासरहून आणि तिचे हौसे आहेत यंदा. त्यासाठी सुपल्या आणि बाकीचे साहित्य आणायचे आहे. आज संध्याकाळी आणून ठेवा. नानी सांगतील काय काय आणायचे आहे ते.<br /><br />
<b>आबा:</b> अरे हो. ता राह्यलाच. गेल्यावर्षी हौसे नव्हते त्यामुळे लेकिचे लग्नानंतर पहिल्या वर्षीचे सगळे सण झाले तरी हा कार्यक्रम बाकी आहे. बरं त्यात तुमच्या जावयाचे काही लाड करायचे नाहीत नां? काय गो नानी? <br /><br />
<b>नानी: </b>नाय रे. जावयाला काय देऊचा नसता.<br /><br />
<b>आबा:</b> नाय मी आपला विचारून घेतला. आमच्या वेळी माज पण काय मिळालो नव्हतो. तरी पण जावयाचो काय मान असात तर मी पण माझ्या सासरी वसुलीकं गेलो असतो.<br /><br />
<b>नानी:</b> जल्ला... तुझा आपला काय तरीच...<br /><br />
<b>आबा:</b> चला. तर सगळी तयारी झाली. आत्ता उद्या मंगल मूर्तीचे आगमन झाले की पुढचे पाच दिवस कसे मंगलमय आणि आनंदाचे जातील.<br /><br />
<b>नानी:</b> होय रे बाबा. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया...<br /><br />
=========================================================<br /><br />
उद्या गणेश चतुर्थी. कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव. कोकणातील बहुतेक सगळ्या घरात पुण्या-मुंबईचा चाकरमानी पोहोचतोय. मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आलीय. घराघरातील ही सगळी लगबग आणि उत्साह शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न...सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-42240097348258170552012-10-07T21:27:00.000-07:002012-10-08T02:54:12.170-07:00भाजीपालासाधारण जूनचे पहिले दोन आठवडे चांगला पाऊस पडून गेला की बाबा उन्हाळ्यात सुकवून ठेवलेलं बी-बियाण बाहेर काढतात. त्यात फुले, फळे, भाजीपाला अश्या सगळ्या प्रकारचे बी असते. नातेवाईक मित्रमंडळीपासून ते आजुबाजूच्या शेतकर्यापर्यंत, असे सगळ्याकडून वर्षभर जमवून ठेवलेले. कुठे कुठला भाजीपाला पेरायचा, नवीन फूलझाडे आणि फळझाडे कुठे लावायची हे सगळे त्यांनी आधीच ठरवलेले असते. मग एकाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा पावसाने जरा उघडीप दिली की हातात पारय (पहार) घेऊन पावसाने नरम झालेल्या मातीत मारायची आणि त्या खड्ड्यात एक-एक बी टाकायचे. पावसाळा सुरू होण्याआधीच पडवळ, दुधी-भोपळा, तोंडली, कारली अश्या भाज्यांसाठी मांडव तयार असतो. काकडी, चिबूड, भोपळ्याच्या वेली पसरण्यासाठी नीट उताराची जागा केलेली असते. भेंडा, वाली, वांगी, मिरच्या आणि पालेभाजीसाठी छोटे छोटे वाफे तयार करून ठेवलेले असतात. सुरुवातीच्या पावसामुळे त्या वाफ्यातील मातीत असलेले बीज म्हणजे गवत आणि तण आधीच उगवलेले असते. ते साफ करून टाकले की पुन्हा त्या मातीत रानगवत उगवण्याची शक्यता नसते. भाजीपाला लावायला वाफा तयार. अळूवडी आणि फतफत्याच्या भाजीसाठी सालाबादप्रमाणे ठरलेल्या जागी अळूदेखील उगवतो. शेवग्याचे झाड तर असतेच. <br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjhRIQiD30HNZV5tvjbpFMbCsvifyZiTol3anxMouBhskoPC2kkbaTj-gQr6kZerSQ2OcXUAbf4eD1-c-hPw-y71RUCqE0I0jhvVqcuohyJ8M8FNBBpBYQrHRwq9ZG3EawnKaCdordIn5o/s1600/1.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="234" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjhRIQiD30HNZV5tvjbpFMbCsvifyZiTol3anxMouBhskoPC2kkbaTj-gQr6kZerSQ2OcXUAbf4eD1-c-hPw-y71RUCqE0I0jhvVqcuohyJ8M8FNBBpBYQrHRwq9ZG3EawnKaCdordIn5o/s400/1.bmp" /></a></div>
<b><center>पडवळ</b></center><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfVao9_8s17NbwyUrafVTYVbS5uSzhKKr6hZinOKBIWbwXvGdTQOl1IujqWF_cBi7DJHD7o92m8jS5Sx_yeM-hAosbNahDtzvV72R_0oX1wZqdluXx-PRXM4pRyGdL0-kPMcrP3JnyFdI/s1600/2.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="263" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfVao9_8s17NbwyUrafVTYVbS5uSzhKKr6hZinOKBIWbwXvGdTQOl1IujqWF_cBi7DJHD7o92m8jS5Sx_yeM-hAosbNahDtzvV72R_0oX1wZqdluXx-PRXM4pRyGdL0-kPMcrP3JnyFdI/s400/2.bmp" /></a></div>
<b><center>दुधी-भोपळा</center></b>
<br /><br />अशी सगळी पेरणी झाली की मग महिनाभर फार काही काम नाही. फक्त बी रुजून आले की त्यावर लक्ष ठेवायचे. अधून-मधून रोपांच्या वाढीला जोम यावा म्हणून खताचा डोस द्यायचा तो देखील अगदी चिमुटभर. मुळाशी मुंग्या लागू नये म्हणून पावडर मारायची. पुरेसे पाणी मिळावे म्हणून मुळाशी नीट आळी करायची. पाऊस मध्येच गायब झाला तर ह्या वेलांनां आणि नव्या झाडानां पाणी घालायचे तसेच पावसाचा जोर जास्ती असेल तर पाण्याचा नीट निचरा होतो आहे की नाही त्याकडे लक्ष द्यायचे. नाहीतर खास करून भाज्यांच्या वेली अती पाण्याने कुसण्याची भीती असते. शेतीची कामे सुरू असताना विहिरीवर पाणी आणायला येणारे शेतकरीदेखील अधून-मधून पहाणी करून जातात. त्यांच्या डोळ्याला काही तण, गवत दिसले तर काढून टाकतात. पानाला किड दिसली तर पाने खुडून टाकतात.<br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxWibojhFv1y9Wr14JReKo2i6_ui5R5dUTvJoWx7d0c-iEhE29Wrc8YHmnogAf9vI7o7uxvAq22lVNo8NAtej_7uoVpdfq_cthVegDECAbosziNSXSDJNcu6vZB2GIdUgQsp4jo2g8svQ/s1600/4.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="237" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxWibojhFv1y9Wr14JReKo2i6_ui5R5dUTvJoWx7d0c-iEhE29Wrc8YHmnogAf9vI7o7uxvAq22lVNo8NAtej_7uoVpdfq_cthVegDECAbosziNSXSDJNcu6vZB2GIdUgQsp4jo2g8svQ/s400/4.bmp" /></a></div>
<b><center>चिबडाचे फूल</center></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWImQPgcx4Hh2MO99p-nq1N68CiQnJURiVWhJ7NnbJ4wRy9qtNmueOeM-IXDyJXOjoZdFHjIuU5YEgvXTfsXMAFy4zNFnsg7fLBFCfaDv8_XbsYtGZyCdu967hoIVdhpFKA0Lym5Pi-FQ/s1600/6.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="236" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWImQPgcx4Hh2MO99p-nq1N68CiQnJURiVWhJ7NnbJ4wRy9qtNmueOeM-IXDyJXOjoZdFHjIuU5YEgvXTfsXMAFy4zNFnsg7fLBFCfaDv8_XbsYtGZyCdu967hoIVdhpFKA0Lym5Pi-FQ/s400/6.bmp" /></a></div>
<b><center>चिबूड</center></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigN93AyT_bIfJlEWxsfHzdmZxlTAd1xbrAX7dw35rvWWZTL87FiCgMdtJn3NkyrgcJsho4eJbe0BdodkFoVHo4JzUoEryodqReCAOo3kkNaoKcNUwmr-PjUidH0ZchnG3MFrNYc6a4ms4/s1600/5.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="236" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigN93AyT_bIfJlEWxsfHzdmZxlTAd1xbrAX7dw35rvWWZTL87FiCgMdtJn3NkyrgcJsho4eJbe0BdodkFoVHo4JzUoEryodqReCAOo3kkNaoKcNUwmr-PjUidH0ZchnG3MFrNYc6a4ms4/s400/5.bmp" /></a></div>
<b><center>चिबूड</center></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKNN770s50zBKuqFBVfdOw1diu1gCIMFg_iwlQwSLzFC4-LZuQrcWp1V6NlzvTpQa5Vhc0BS7EFtlPrilT3dePsefzRwQMFrw8vFvSu-Y89t1lWl-bdzMBENF0UnlglRbtdflxjgZQfxQ/s1600/7.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="235" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKNN770s50zBKuqFBVfdOw1diu1gCIMFg_iwlQwSLzFC4-LZuQrcWp1V6NlzvTpQa5Vhc0BS7EFtlPrilT3dePsefzRwQMFrw8vFvSu-Y89t1lWl-bdzMBENF0UnlglRbtdflxjgZQfxQ/s400/7.bmp" /></a></div>
<b><center>तयार चिबूड</center></b>
<br />श्रावणाची चाहूल लागली की नवीनच खेळ सुरू होतो. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ त्या झाडे वेलींकडे बारकाईने पाहण्याचा. मग एखाद्या दिवशी भेंड्याच्या झाडाचा पानाचा देठ आणि झाडाच्या खोडामधून एक छोटीशी कळी दिसून येते. भोपळा, कारली, चिबूड, पडवळांचे वेलदेखील पांढर्या पिवळ्या फुलांनी डवरतात. भेंड्याचे एक बरे असते. एकदा कळी आली की हमखास भेंडा लागतो पण बाकीचे वेल मात्र असंख्य फुले देत असले तरी ठराविक फुलेच गळून जाण्यापुर्वी देठाशी फळ सोडून जातात. त्यामुळे ही फुले पूर्ण फुलली की प्रत्येक फुलाचा देठ बारकाईने पाहावा लागतो. त्याच्या देठाशी जर का बारीक मण्याएवढा फुगवठा दिसला की समजायचे ह्यातून फळ मिळणार. मग वेलाचा तो भाग लक्षात ठेवायचा, खास करून चिबूड, काकडी आणि भोपळ्याचा वेळ असेल तर कारण ते वेल जमिनीवर पसरलेले असतता. पडवळ, दुधी, कारली वैगरे मांडवावर असल्याने भाजी वाढीस लागली की हमखास दिसून येते पण चिबूड, काकडी, भोपळा जमिनीवर असल्याने ती फळे वजनाने खाली मातीला टेकतात. वेलाखाली लपून बसतात. ह्या वेलांची पाने देखील मोठी त्यामुळे चिबूड, भोपळा मोठा फोफावला तरी दिसून येत नाही. त्यामुळे ह्या वेलांवर नीट लक्ष ठेवावे लागते.<br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgm_lp792iNTFqp6fDtp8orMrpdoNWnY-6Z3MkuDeKwfrEq9TCT85CMRRTwz1yN4IU_3YGeCUM3SnmCofS73bVZoycsvLjWVINcHum_NkaASSoLb9A9E-psRIk9bEkWtD4YI3LQn-gF5AE/s1600/8.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="400" width="267" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgm_lp792iNTFqp6fDtp8orMrpdoNWnY-6Z3MkuDeKwfrEq9TCT85CMRRTwz1yN4IU_3YGeCUM3SnmCofS73bVZoycsvLjWVINcHum_NkaASSoLb9A9E-psRIk9bEkWtD4YI3LQn-gF5AE/s400/8.bmp" /></a></div>
<b><center>वाली</center></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgijSw5qllGfs9AKRJR5sc8JRev2sVJ464aZhOj3bPIUFtKol5tonmbFe-4NrYpC5rly0bxiooaDZOZ6ojPnFIB7lemmejpBuXfOAjuzxJm4qhckvcddLfpDohjIRwTmfNgPTbM92uh0nI/s1600/9.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="400" width="299" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgijSw5qllGfs9AKRJR5sc8JRev2sVJ464aZhOj3bPIUFtKol5tonmbFe-4NrYpC5rly0bxiooaDZOZ6ojPnFIB7lemmejpBuXfOAjuzxJm4qhckvcddLfpDohjIRwTmfNgPTbM92uh0nI/s400/9.bmp" /></a></div>
<b><center>भेंडा</b></center>
<br />ही नवीन फळे शोधण्यात देखील गंमत असते. आम्ही शाळेत होतो तेंव्हा मज्जा असायची. फुलाला लागलेला भोपळा, चिबूड सगळ्यात आधी कुणी पाहिला? ज्याने पाहिला तो इतरांना सांगणार. भोपळ्याचा/चिबडाचा त्या वर्षीचा काउंट एकाने वाढणार. फळ पहिल्यांदा जो पाहील त्याच्याकडे त्या फळाची जबाबदारी आपोआप जाते मग तो भोपळा असो, काकडी असो वा पडवळ, कारली. ते फळ दिसल्यापासून ते घरात आणेपर्यंत मधल्या वेळात त्याची वाढ नीट होते आहे की नाही, जमिनीवर त्याला किड-मुंगी तर लागली नाही, पावसाने कुसत तर नाही वा उन्हाने करपत तर नाही अश्या बारीकसारिक कामांची जबाबदारी. भेंडे, वांगी, मिरच्या जून व्हायच्या आत वेळच्या वेळी काढायाच्या. काकड्या नीट कोवळ्या बघून घ्यायच्या... इत्यादी, इत्यादी. <br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNesKhmXc-ZREVWHuY5O8E4_oJ33XRRHWVk5FiF09HeDz7SR5gXbg2Iml_3_HACy0D076-Ejm4i6XYTBY06Xt73mhc1d9aAeJAlaoNTSPPPqszK6bUyiw91eZKhIYatwiBerEyA3cxRM8/s1600/3.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="235" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNesKhmXc-ZREVWHuY5O8E4_oJ33XRRHWVk5FiF09HeDz7SR5gXbg2Iml_3_HACy0D076-Ejm4i6XYTBY06Xt73mhc1d9aAeJAlaoNTSPPPqszK6bUyiw91eZKhIYatwiBerEyA3cxRM8/s400/3.bmp" /></a></div>
<b><center>मिरच्या</center></b>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7K9RoU1plXAkaP_ctauj7G38lFsCucNApckqu0G2rz6JOHyXBPePqZ5E-lsegCK9XZJHdbtwDh-aOTJ46l9ta9J0t-FVGbzzlOPOxJppMpD6XOaKyHmtkAcLtdNYrvRSkAo1IwP-nLJ0/s1600/10.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="237" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7K9RoU1plXAkaP_ctauj7G38lFsCucNApckqu0G2rz6JOHyXBPePqZ5E-lsegCK9XZJHdbtwDh-aOTJ46l9ta9J0t-FVGbzzlOPOxJppMpD6XOaKyHmtkAcLtdNYrvRSkAo1IwP-nLJ0/s400/10.bmp" /></a></div>
<b><center>वांगी</b></center>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6ZGAgGNMbLoenpY_eB2XVMqF_hf9_Qjhj2TrIEXlixfTfEh0caXA7GucuNZ0Ru1YczqlRcFhh3eifAucPTwFnkPEJ88suNHrg8ZKmnpd51QfBdsK-Blt0EM-ebp6v77OZTAehnmG_6Qs/s1600/11.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="266" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6ZGAgGNMbLoenpY_eB2XVMqF_hf9_Qjhj2TrIEXlixfTfEh0caXA7GucuNZ0Ru1YczqlRcFhh3eifAucPTwFnkPEJ88suNHrg8ZKmnpd51QfBdsK-Blt0EM-ebp6v77OZTAehnmG_6Qs/s400/11.bmp" /></a></div>
<b><center>अळू</center></b>
<br />भाज्या तयार झाल्या की मग मॅनेजमेंट. एक एक भाजी तयार झाली की घरच्या भाजीचे नवं करायचे. चिबूड, काकडी चवीने खायची. ह्या भाज्या एकदा पडायला (तयार व्हायला) लागल्या की मग नियमीत लक्ष ठेवून वेळच्या वेळी तोडून घरात आणायच्या. मग त्यात सख्या शेजार्याचा, नातेवाईकांचा वाटा करायचा. बीयाणे दिलेल्या शेतकर्याला आठवणीने भाजी पाठवायची. आत्येला, मावशीला, सासरी गेलेल्या ताईला त्यांच्या दारात स्वस्त भाजी मिळत असली तरी रिक्षाला जास्ती पैसे घालून आपल्या दारातील भाजी कौतुकाने त्यांच्याकडे पोचती करायची. बाजारात सगळ्या भाज्या मुबलक मिळत असल्या तरी गणपतीत ऋषिपंचमी दिवशी ऋषिच्या भाजीत परसात पिकवलेली प्रत्येक भाजी असेल अश्या रीतीने भाजी झाडावर शिल्लक ठेवायची. आणि महत्वाचे म्हणजे सगळ्या प्रकारातील एक-एक फळ तसेच झाडावर ठेवायचे. ते उन्हात पूर्ण सुकले की त्यातील बी काढून पुढच्या वर्षी रुजत घालण्यासाठी.<br /><br />सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-54918877491438567972012-08-07T23:56:00.000-07:002012-08-08T04:15:34.110-07:00साला एक मच्छर...नेहमीप्रमाणेच एक इश्यू आला आणि पाहता पाहता डोक्यावर बसला. कस्टमरचा डेटा Encrypt होत नव्हता म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा मुख्य उद्देश धाब्यावर बसवला गेल्यामुळे आणि त्यात तो कस्टमर म्हणजे एक इंटरनॅशनल बॅंक असल्याने हा इश्यू अगदी मॅनेजर लोकांच्या पण बापांपर्यंत जाऊन पोहोचला होता. आमचे डेटा एनक्रीप्ट/डिक्रीप्ट करणारे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या WinZip/UnZip सारखेच पण डेटाची सेक्यूरिटी हा मुख्य उद्देश आणि त्यात ते कस्टमरला विकले जात असल्याने जरा "लै भारी" प्रकारातले. प्रॉब्लेम असा होता की कस्टमरचा एनक्रीप्टेड डेटा USB पेन ड्राइव्ह लावून कॉपी करता येत होता. कुणीही ऐरा गैरा माणूस ती सगळी महत्वाची माहिती वाचू शकत होता. त्यात हा डेटा बॅंकेचा म्हणजे प्रश्न अधिकच नाजूक.<br /><br />
नेमका हा इश्यू शुक्रवारी मध्यरात्री रिपोर्ट केला गेल्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी फोनाफोनी होऊन आमची सगळी टीम हाफिसात. दुपारपर्यंत सोल्यूशन मिळाले. टेस्टिंग टीममधील विभोरला टेस्ट सेटअप तयार करायाला सांगून मी बिल्ड सुरू केले. बिल्ड पूर्ण व्हायला तासभर तरी लागणार होता. ऐन विकांतात सकाळ पासून दगदग झाल्याने म्हणून मी जरा आरामातच खुर्चीत मागे रेलून मॉनिटरवर लक्ष ठेवून होतो. उगाच बिल्ड फेल झाले तर लगेच कळेल, त्यात आणखी वेळ जायला नको म्हणून. बिल्ड आणि स्टेटस रिपोर्टची वाट पाहाणारे अनेक जण होते त्यामुळे सगळे डिटेल्स भरायला सुरूवात केली. रिपोर्ट लिहीत असतानाच अचानक डाव्या हाताला काहीतरी टोचले. पहातो तर डास. मस्तपैकी रक्त शोषित बसला होता. वातानुकुलित वातावरणात मध्येच हा डास कुठून आला मला कळेना. रिपोर्ट पूर्ण करायची गडबड असल्याने मी फार विचार देखील करीत बसलो नाही. नुसताच हात झटकून त्याला पळवून लावला आणि यूनिट टेस्टमध्ये काय काय टेस्ट्स रन केल्या आहेत याची माहिती भरू लागलो..<br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpJmaP-lCXHrUjZnBZ5AhNE_Awq60I88Kpbx4ur9w3WPdUHV-rPbXeBOmhJ5GiFbo1qQZZqnW8w5eUdEsDDuaEhwDxZbeTPOHBIv3dAPohqpUwb2a1r6yL76UeZTf0V8hO-lSWoXkqWzo/s1600/Das.bmp" imageanchor="1" style="clear:left; float:left;margin-right:1em; margin-bottom:1em"><img border="0" height="246" width="293" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpJmaP-lCXHrUjZnBZ5AhNE_Awq60I88Kpbx4ur9w3WPdUHV-rPbXeBOmhJ5GiFbo1qQZZqnW8w5eUdEsDDuaEhwDxZbeTPOHBIv3dAPohqpUwb2a1r6yL76UeZTf0V8hO-lSWoXkqWzo/s400/Das.bmp" /></a></div>
त्या टेस्ट केसेस लिहिताना अचानका माझ्या लक्षात आले की जरी कस्टमरचा इश्यू फिक्स झाला असला तरी आत्ताच एका साध्या डासाने आपला कोड ब्रेक केला. आपले एनक्रीप्टेड रक्त आपले प्रॉडक्ट न वापरता डिक्रीप्ट करून एक डास शोषून गेला. आपले प्रॉडक्ट फेल गेले. इतकी साधी टेस्ट केस आपल्या लक्षात आली नाही. याचा अर्थ हा बग पूर्णपणे फिक्स झालेला नाही. जर हे बिल्ड पास करून आपण कस्टमरला दिले असते आणि हा इश्यू जर कस्टमरला पुन्हा सापडला असता तर काही खरे नव्हते. डायरेक्टर, व्हीपी आणि कुणी कुणी अश्या वरच्या लेवलच्या माणसापर्यंत आपली तक्रार गेली असती. आमच्या कंपनीमधील एक साधा डास तुमच्या इंजिनियरने लिहालेला प्रोग्रॅम ब्रेक करू शकतो अश्या शब्दात कस्टमरने टेक-सपोर्टला सुनावले असते आणि टेक-सपोर्टने असला भिकार फीडबॅक पार CEOच्या कानावर घातला असता. कंपनीचे शेअर्स धाडकन खाली पडले असते. आणि आपली तर पार नोकरीतून हाकलपट्टीच. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर साला एक मच्छर....<br /><br />
नुसत्या विचारानेच मला दरदरुन घाम फुटला. घशाला कोरड पडली. मी समोरच डेस्कवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली पण हे काय??? मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत? टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती? टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला? एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला "सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना." मी त्याला म्हटले "अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है." हे ऐकून विभोर पण एकदम
टरकून म्हणाला "अरे क्या बात कर राहा है?".<br /><br /><br /><br />
"अरे क्या बात कर राहा है? बिल्ड रेडी हुवा की नाही?" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता? मी खडबडून जागा झालो आणि विभोरला म्हटले "दो बग और है. मेजर इश्यू हुवा है" विभोर म्हणाला "कौन से बग? मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये? और तेरे को ईतना पसिना क्यू छूट रहा है बे? ले पानी पिले." असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर? ... असा विचार करीत करीत मी घाबरत घाबरत मी ती बाटली तोंडाला लावली तर पुन्हा तेच. मी ते एनक्रीप्ट केलेले पाणी पिऊ शकत नव्हतो. म्हणजे हे स्वप्न नक्कीच नव्हते. आमचे प्रॉडक्ट खरोखरीच ते पाणी डिक्रीप्ट करू शकत नव्हते. "देखा देखा. पानी डिक्रीप्ट नहीं हो रहा है रे" बाटली उलटी करून बाटलीकडे बोट दाखवून मी विभोरला म्हटले. विभोर पहिल्यापेक्षाही विचित्र नजरेने आणि त्रासिक चेहर्याने माझ्याकडे पहात म्हणाला "अबे ढक्कन, बोतल का ढक्कन तो खोल..."<br /><br />
अरेच्च्याsss... म्हणजे मी बाटलीचे बुच्च न काढताच ते 'सो कॉल्ड' एनक्रीप्टेड पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होतो तर... मी पुन्हा शांतपणे सगळा विचार केला आणि सगळ्याचा उलगडा झाला. मला माझेच हसू आले. ती बिल्ड होताना खुर्चीत आरामात रेलून बसल्याने मला छोटीशी डुलकी लागली आणि ते भीतीदायक स्वप्न पडले होते. स्टेटस पाहिले तर बिल्ड रेडी झाले होते. विभोर अजुन ही वेड्यासारखाच माझ्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहून हा सगळा घटनाक्रम, स्वप्न आणि प्रॉडक्टमध्ये नसलेले बग हे सगळे समजावून त्याला अजुन गोंधळात टाकण्यापेक्षा मी त्याला म्हटले "अरे कोई नहीं. बिल्ड रेडी हो गया है. मैं अभी मेल भेज देता हूँ. तुम रिलीज टेस्टिंग शुरू कर दो."<br /><br />
विभोरला देखील मी काहीतरी बरळत होतो हे कळले म्हणून जाता जाता तोही बोलला .<br /><br />
"आप एक काम करो. एक बार यह बिल्ड आ जाए तो फिर आप एखाद हप्ते की छुट्टी लेके अपने गाँव हो आओ. वहाँ समंदर के एनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :D "
<br /><br />
=========================================================<br /><br />
<b>Image Courtesy : Google Images <br /><br /></b>
ता.क. - ही पोस्ट काम धंद्यावर आधारित असल्याने काही संदर्भाबाबतीत जरा जडावली आहे. त्यातून "आमी लैई भारी" वैगरे भासवण्याचा अजिब्बात उद्देश नाही. :-)सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-78841559733847677652012-06-03T22:42:00.002-07:002012-06-04T06:27:13.932-07:00कोंबडी-बोकड चषक<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /></div>
काय म्हणतावं मंडळी?<br /><br />
गंपूशेटनी मामाच्या हाटेलात शिरता शिरता जमलेल्या लोकांना प्रश्न टाकला.<br /><br />
रविवारी रात्री जेवण खाण आटोपून सगळे म्हणजे बाबू तोडणकर, गेंगण्या, मास्तर आणि दोन चार इरसाल टाळकी मामाच्या हाटेलात बसली होती.<br /><br />
<b>मामा :</b> काय गंपूशेट आज लै म्हणजे लैच दिवसांनी आलात. म्हयनाभर तरी थोबाड दिसला नव्हतो. खै कडमडलो होतास?<br /><br />
<b>गेंगण्या :</b> ओ मामा, खै कडमडलो होतो म्हणजे? अवो गंपूशेटचो क्रिकेट प्रेम तुम्हाक म्हायत नसा? IPL सुरु असताना असलो फर्मास मनोरंजन सोडून गंपूशेट तुमच्या हाटेलात कशाक येल? <br /><br />
<b>बाबू तोडणकर :</b> नाय तर काय? मनोरंजन ता मनोरंजन आणि वरतून छक्को-चौको पडलो की नाचणाऱ्या त्या बाया पण असतात. असो सगळो टायम पास सोडून हयसर काय तुझ्या हाटेलातली झापा बघूक येतंय गंपूशेट? खानाची टीम जिंकली त्याची पार्टी करून आज आठवडाभरान गंपूशेट आपल्या अड्ड्यावर आलो.<br /><br />
ए गप्प बसा कि जरा. काय IPL IPL लावलाव हाय? माज क्रिकेट आवडता पण म्हणून काय IPL म्हणजे क्रिकेट नव्हे बघीत बसायला. खानाला एक कचकचीत शिवी हासडून गंपूशेट तोंड वाकडा करीत बोलले.<br /><br />
काय तरी काय बोलताव गंपूशेट?<br /><br />
काय तरी काय म्हंजे? जल्ला पैशाचा बाजार ता. कोण कोणाबरोबर आणि कोण कोणाविरुद्ध खेळताय हे कळेल तर शप्पथ. <br /><br />
गंपूशेट येवढा होता मग कशाक IPL बघूक होतात? गेंगण्या आपला ताच खरा धरून बसलेलो.<br /><br />
मी खै IPL बघीत होतो? माज काय कामा नसात? डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट? गंपूशेट करवादले.<br /><br />
खेळाडू विकत घेताल्यांनी म्हणून काय झाला? क्लब क्रिकेट ता. तिकडे असाच असता. आत्ता आपण नाय काय, कळीत नसला तरी अधनंमधनं ता इंग्लिश प्रिमिअर लीग म्हणजे खरोखुरो IPL बघाताव? तिकडे काय वेगळा असता? मामानं IPLची बाजू घेतालान.<br /><br />
हो. आणि आपल्या मोदीनं सुरु केलेले IPL पण त्या खऱ्याखुऱ्या IPL वरच आधारित आहे. मास्तरांनी अधिक माहिती पुरवली.<br /><br />
त्या फुटबॉल प्रिमिअर लीगबरोबर आपल्या IPLची तुलना करू नका मास्तर. त्याची बात वेगळीच असा.<br /><br />
कशी वेगळी बात. तिकडे पण खेळाडूचो लिलाव होता. तुका इंग्लिश चालते पण देशी नको? बाबू तोडणकरा आंगठा तोंडाजवळ नेत बोललो.<br /><br />
<b>गेंगण्या :</b> मेलो बेवडो आलो परत बाटली वर.<br /><br />
बाबू अरे इंग्लिश आणि देशीची कसली तुलना करतास? इंग्लिशचो स्टॅंडर्ड खै आणि देशीचो खै हे मी तुका सांगूक नको. गंपूशेटनी बाबूला झेपेल असा प्रश्न विचारालांनी. <br /><br />
ता बाकी बराबर बोललास. बाबू मनातल्या मनात कधी काळी ढोसलेल्या इंग्लिशची आठवण काढीत बोललो.<br /><br />
अस कसं गंपूशेट? अहो फक्त खेळ बदलला पण साचा तोच नां? तिकडे पण खेळाडू संघ बदलतात. जिथे जास्ती पैसे मिळतील त्या संघाबरोबर खेळतात. मास्तर आपल्या मुद्द्याला चिकटून.<br /><br />
हो मास्तर पण फरक आहेच ओ. आत्ता बघा तुम्ही जेम्स बॉंडचे पिक्चर बघाताव. आत्ता बॉंड हिरो म्हटल्यावर तो कैच्याकै कारनामे करतो. अगदी काय पण. ते सगला आपण लै भारी म्हणून कौतुकानं बघाताव कि नाय. होय कि नाय सांगा? गंपूशेटने आपला मुद्दा मांडण्यासाठी स्टार्ट घेतला.<br /><br />
हो हो.<br /><br />
पण तेच कारनामे आपलो देशी 'येजंट विनोद' करतो तेंव्हा ते इनोदी का वाटतात? गंपूशेटनी यॉर्कर टाकला.<br /><br />
अवो प्रत्येक गोष्टीचो एक स्टॅंडर्ड असता. बाबू अजूनही इंग्लिशच्या आठवणीतच रमला होता.<br /><br />
ता पण बराबर. बाबूच्या पाठोपाठ गेंगण्यानं गंपूशेटला पाठींबा दिलान.<br /><br />
गंपूशेटचा यॉर्कर ढेंगातून जावून आपल्या यष्ट्या उध्वस्त करून गेला आहे हे मास्तरांना कळून चुकले आणि अलीकडेच केबलवर लागलेला एजंट विनोद सिनेमा पाहून आपण चॅनेल बदलल्याचे झटकन आठवल्यामुळे मास्तरदेखील पुढे काही जास्ती बोलले नाहीत.<br /><br />
एव्हाना गंपूशेटनां आपली लाईन आणि लेंथ सापडली होती. ते फुल्ल फॉर्ममध्ये आले.<br /><br />
अवो तिकडे क्लब असले तरी त्यांनी खेळाचे नियम नाय बदलालांनी. फुटबॉल लीगमुळे मेन खेळाची मजा कधी कमी नाय झाली. फुटबॉल एक खेळ म्हणून आपल्या जागी अजून मोठोच असा. माडी-बिडी विकणारो कोण पण लुंगो-सुंगो पैशाच्या जोरावर तिकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूकं कसा पण वागवीत नाय. मॅची संपल्या कि ते खेळाडू पण रेव्ह पार्टीत सापडीत नायत. आपली टीम जिंकली तर टीमचो मालक पैशाचो माज घेवन शिवीगाळ करीत, बिड्या फुकीत स्टेडीयमवर उंडारक्या नाय करीत. आधी मेजर राडे करून आणि मग चुक कबूल करून माफी मागण्याऐवजी "आमी मायनर, आमी मायनर" अश्या बोंबा मारीत फिरत नायत. गंपूशेट एकदम तावातावाने बोलले.<br /><br />
<b>मामा :</b> खरा असा रे गंपू.<br /><br />
<b>गेंगण्या :</b> पण हि एवढी फेमस खेळाडू लोकां. साला ह्या दिडदमडीच्या लोकांकडन अपमान कशाक करूक घेतंत? मी माझो लिलाव होवूक देणार नाय असो एक जण पण नाय बोललो. अगदी गेल्या वर्षी काळ्या कुत्र्यांन पण ह्यांका विचारल्यान नाय तरी हे परत पुढच्या वर्षी शोभा करून घेवक हजर.<br /><br />
<b>बाबू तोडणकर :</b> मंग नाय तर काय? सोताच सोताची लंगोटी अशी दुसऱ्याच्या हातात दिली कि दुसरा काय होणार? होती नव्हती ती इज्जत पण जाते.<br /><br />
<b>गंपूशेट :</b> काय नाय ओ साले पैशेवाल्यांचे नाय ते धंदे. अवो ह्या IPL आत्ता पाच वर्षापूर्वी आला. आमचो कोंबडी-बोकड चषक गेली कित्येक वर्ष सुरु असा. IPL पेक्षा भारी. <br /><br />
होय रे गंपू. आपलो कोंबडी-बोकड चषक म्हणजे लैच भारी. मामाचा दुजोरा.<br /><br />
क्काय? कोंबडी-बोकड चषक? हि काय नविन भानगड?<br /><br />
हि भानगड नाय मास्तर. कोंबडी-बोकड चषक म्हंजे क्रिकेटचीच स्पर्धा. आपल्याच गावात भरते. ती समुद्राजवल खलाशी लोकांची वस्ती हाय नां तिकडे भरते स्पर्धा. टेनिसबॉल क्रिकेट. मामान माहिती पुरवलानानं.<br /><br />
होय कि काय? कधी असते हि स्पर्धा.<br /><br />
<b>गंपूशेट :</b> मास्तर, फेब्रुवारी-मार्चमध्ये शिमग्याच्या आसपास तुम्ही वार्षिक परीक्षेचे पेपर छापायची तयारी करीत असता नां तेंव्हा शाळेतली बरीचशी पोरा शाळा चुकवन् समुद्राजवल सुकटा सुकिवतात नां त्या मैदानावर कोंबडी-बोकड चषक बघूक जमलेली असतात. काय समजलाव?<br /><br />
<b>मास्तर :</b> अरेच्चा. हे मला माहितीच नव्हते. हा काय प्रकार आहे?<br /><br />
<b>मामा :</b> अहो कोंबडी-बोकड चषक म्हणजे IPL सारखीच स्पर्धा. वीस-वीस ओवरची. <br /><br />
<b>गेंगण्या :</b> आणि हिची खासियत अशी कि नावाप्रमाणे कोंबडी आणि बोकड बक्षिस दिला जातो. म्हणजे विजेत्या टीमला अख्खो बोकड आणि उपविजेत्या टीमला कोंबड्या. <br /><br />
कोंबड्या म्हणजे ११ कोंबड्या. प्रत्येक प्लेअरला एक. बाबूनं अचूक माहिती दिलान.<br /><br />
<b>मास्तर :</b> हे भारीच आहे.<br /><br />
<b>गंपूशेट :</b> भारी आहेच ओ पण हि कोंबडी-बोकड चषक IPL पेक्षा पण भारी असते. कारण हिकडे एका टीमकडनं खेळणारा माणूस कायम त्याच टीमकडनं खेळताना दिसल. उगाच चार आठ आणे जास्ती मिळतंत म्हणून कोण टीम बदलणार नाय.<br /><br />
<b>बाबू तोडणकर :</b> कोणाची बिशाद हाय टीम बदलायची. आणि कोणी टीम बदललान तर लोकां टोमणे मारून मारून त्याचो जीना हराम नाय करतील?<br /><br />
<b>मामा :</b> अवो आणि IPLमध्ये कसो जास्ती छक्के मारल्यावर आणि लै भारी कॅच घेतली कि वेगळो अवार्ड असता तसा इथे पण वेगळो अवार्ड असता.<br /><br />
<b>गेंगण्या :</b> आणि ता पण प्रत्येक छक्या-चौक्याकं असता. काय असलं ओळख बघू मास्तर?<br /><br />
काय असते? मास्तर स्पर्धेचे स्वरूप ऐकून आधीच हबकले होते.<br /><br />
<b>गेंगण्या :</b> अवो प्रत्येक छक्या चौक्याकं आणि घेतलेल्या झेलाकं एक-एक कवाट बक्षिस मिळता.<br /><br />
<b>गंपूशेट :</b> कवाट म्हणजे काय ता मास्ताराक कळूचो नाय.<br /><br />
<b>बाबू तोडणकर :</b> मास्तर अवो कवाट म्हणजे अंडो. कोंबडीचो अंडो.<br /><br />
<b>गंपूशेट :</b> म्हणजे विचार करा. फायनल मारलाव तर मटणाची पार्टी!!!<br /><br />
<b>गेंगण्या :</b> आणि एकदा का टीम फायनलला गेली कि किमान कोंबडीची पार्टी नक्की. वरतून कवटा मिळतील ती वेगळीच.<br /><br />
आणि ह्या सगळ्याच्या जोडीला भन्नाट कोकणी कॉमेंट्री. यंव रे यंव.
मास्तर अजूनही ह्या सगळ्याची कल्पनाच करीत होते.<br /><br />
मग काय म्हणतावं मास्तर? पुढच्या वर्षी IPL बघणार कि कोंबडी-बोकड चषक?<br /><br />
अर्थातच कोंबडी बोकड चषक. इति मास्तर...<br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgX6QjxljeIBd0WdyXKLeNTjg8tRuJrKNKFV79kTs5RrkJhQbihYIAvVvtdEaSa1woGoSnDfNywjZChfPFBVOWyRJyAtaN7kpwO3dh6Evql9tAY6tF5ea0OIj2d7N2mp6shbBU7UcZIFaU/s1600/%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%2582%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580-%25E0%25A4%25AC%25E0%25A5%258B%25E0%25A4%2595%25E0%25A4%25A1+%25E0%25A4%259A%25E0%25A4%25B7%25E0%25A4%2595.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="186" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgX6QjxljeIBd0WdyXKLeNTjg8tRuJrKNKFV79kTs5RrkJhQbihYIAvVvtdEaSa1woGoSnDfNywjZChfPFBVOWyRJyAtaN7kpwO3dh6Evql9tAY6tF5ea0OIj2d7N2mp6shbBU7UcZIFaU/s400/%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%2582%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580-%25E0%25A4%25AC%25E0%25A5%258B%25E0%25A4%2595%25E0%25A4%25A1+%25E0%25A4%259A%25E0%25A4%25B7%25E0%25A4%2595.jpg" /></a></div>
<br /><br />सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com18tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-14880776729927789502012-01-17T00:53:00.000-08:002012-02-28T05:53:37.913-08:00उत्तरायण...<br>
<p>हुश्श्श्शsssssssss</p>
<p>गेले दोन महिने नाही नाही तब्बल साडेसात वर्षे ज्या दिवसाची वाट पहात होतो तो एकदाचा उजाडला. बंगलोरमध्ये आल्या दिवसापासूनच इथून परत पुण्याला कधी जाणार ह्याचाच विचार सुरु होता. बघता बघता साडेसात वर्षे गेली. शेवटी एकदा १५ नोव्हेंबरला, माझ्या आईच्या वाढदिवशी सगळे फायनल झाले आणि हातात ऑफर यायच्या आधीच तिला वाढदिवसाची भेट म्हणून पुणे परतीची खुष खबर दिली. अर्थात मधल्या काळात पुण्याला जायला मिळणार अश्या आशा खूप वेळा निर्माण झाल्या होत्या, पण जम्याच नही. पुण्याला यायला मिळावे म्हणून "मल्टी कलर सनफ्लॉवर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी पण जॉईन केली पण त्यांनी तर नुसत्या हुलकावण्या दिल्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये तर पुण्याला प्रोजेक्ट मिळून देखील जाऊ दिले नाही. शेवटी जूनमध्ये एक वर्ष वाट पाहून "मल्टी कलर सनफ्लॉवरला" सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. सगळे जमून येईपर्यंत नोव्हेंबर उजाडलाच. हो नाही करीत करीत राजीनामा मंजूर झाला. तरी हलकट बॉस एवढा प्रोजेक्ट संपू दे (कधी ते माहीत नाही), मी स्वतः तुला पुण्यात प्रोजेक्ट मिळवून देतो, ते नाही तर निदान जानेवारी संपेपर्यंत थांब, निदान २६ जानेवारीचे झेंडा वंदन करून जा... एक ना दोन... कसला दीनवाणा चेहरा करून यायचा. लाईन चुकली बिचाऱ्याची. कुठल्याही सिग्नलवर नाव काढेल अशी (चेहऱ्याची) प्रोफाईल आहे. दीनवाणे प्रकार करून झाल्यावर अतिशय हीनवाणे प्रकार देखील झाले. असो त्यावर एक वेगळी पोस्ट लिहून मी पोस्टचा काऊंट वाढवेन :D. शेवटी हो ना करता करता मी दोन महिन्याचा कायदेशीर नोटीस पिरेड पूर्ण करून काल मोकळा झालो.</p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdZdNQTz-ZkHmh0x3kamXzUpyr7HAtbJXkmEz1xKCCBqRelsAcObL2OMBQ11M7sotTKqLw4uxGk2kadxfHKFSPKdLKBIIm6cubgpdY6maSSpF5Ehlr8OEsrnUUOCedf1lfP0HqZZaOm8I/s1600/Bangalore-Pune-Ratnagiri.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="355" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdZdNQTz-ZkHmh0x3kamXzUpyr7HAtbJXkmEz1xKCCBqRelsAcObL2OMBQ11M7sotTKqLw4uxGk2kadxfHKFSPKdLKBIIm6cubgpdY6maSSpF5Ehlr8OEsrnUUOCedf1lfP0HqZZaOm8I/s400/Bangalore-Pune-Ratnagiri.jpg" /></a></div>
<br>
<p>कितीही कंटाळलो असलो तरी आत्ता माझ्या आयुष्यातील एखादा कोपराच नाही तर चांगली मोठी खोलीच बंगलोरने व्यापली आहे. माझ्या आजच्या वयाचा विचार करता माझ्या जीवनातला चक्क एक चतुर्थांश भाग मी बंगलोरमध्ये काढलाय हे मला खरे वाटत नाही. (माझ्या वयाचा हिशोब करणे बंद करा, हि स्कॉलरशिपची बुद्धीमत्ता चाचणी नव्हे). मुन्नाभाई एम.बी.बी.एस. मधला सर्किटच्या तोंडी एक महान संवाद आहे "लाईफ में बहुत कुछ पहली बार होता है मामू"... तसेच काहीसे माझ्या आयुष्यातले बहुत कुछ पहली बारचे (तुमचा चार यारवाला बसायचा "बार" नव्हे) क्षण बंगलोरमध्ये आले. MNC कंपनीची पहिली ऑफर (आणि अर्थातच पहिला राजीनामा :D), पहिला विमान प्रवास, पहिला परदेश प्रवास. इंजिनीअरिंगमध्ये स्वतःची बाईक असण्याची पूर्ण झालेली इच्छा, दक्षिणेकडची भटकंती... एक ना अनेक गोष्टी. खादडीचे म्हणाल तर बंगलोरला येण्यापूर्वी दोन दशके मिळून न खाल्लेला भात बंगलोरमधल्या पहिल्या दोन वर्षात खावा लागला होता आणि हो दहीभात हा प्रकार देखील आयुष्यात पहिल्यांदा बंगलोर मध्येच खाल्ला. आत्ता मात्र आंध्रा रेस्टॉरंटमधला द्राक्ष, डाळिंबाचे दाणे टाकून मोहरीची फोडणी दिलेला दहीभात प्रचंड आवडतो. अस्मादिकांच्या पाक-कौशल्याला बहर देखील बंगलोरलाच आला. बाहेरच्या खाण्याला कंटाळून विकेंडला आमची पाककला पिठले, बटाट्याची भाजी अश्या गोष्टींपासून सुरु होवून थेट थालीपीठ, मासे, सी-फूड, बिर्याणी, चिकन, मटण, सुकटापर्यंत बहरली. चपाती बनवणे मात्र जमले नाही. दरवेळी नजर हटी, दुर्घटना घटी. पण इतर यशस्वी प्रयोग बरेच झाले. कधी पिझ्झ्यात टाकतात त्याप्रमाणे नाही नाही ते पदार्थ Toppings म्हणून ओम्लेटवर विराजमान झाले तर कधी पिठले शिजताना त्या बरोबर अंडीदेखील उकडली गेली (इंधन बचत). एकदा मसाला चायची हुक्की आली तेंव्हा नाना मसाले चहात टाकून पहिल्याच घोटात स्वतःचा आणि रूम पार्टनरचा घसा जाळण्याची घटना सोडता बाकी इतर सर्व प्रकार सामुदायिकरित्या पचवले गेले. बाकी बाहेर <a href="http://en.wikipedia.org/wiki/Infinite_loop">while(1)</a> बोले तो अन लिमिटेड (भात) साऊथ इंडीयन मिल्स ह्या प्रकारात प्रथमच उकडलेल्या/शिजवलेल्या गाजर आणि बीटची भाजी देखील प्रथमच खाण्यात (आणि बंगलोरच्या उर्वरित मुक्कामात टाळण्यात) आली. आणि हो महत्वाचे राहिलेच... माझ्या ब्लॉगचा जन्मदेखील बंगलोरचाच.</p>
<p>तर मधल्या काळात खूप बरे वाईट अनुभव आले. वेगवेगळी <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post_30.html">माणसे</a> भेटली. आत्ता ह्या क्षणाला खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. नक्की काय लिहू ते कळत नाही. पोस्ट भरकटतेय... इलाज नाही. एअरपोर्टला न्यायला येणाऱ्या कॅबची वाट पहातोय. संध्याकाळी पुण्यात पोहोचेन. आत्ता यापुढे रत्नागिरीला जाण्यासाठी १८-१८ तासांचा प्रवास करावा लागणार नाही. दोन दोन बस बदलाव्या लागणार नाहीत. बायको तिला वाटेल तेंव्हा एकटी रत्नागिरीला जाऊ शकेल. रत्नागिरीहून निघताना दुपारचेच काय पण रात्रीदेखील पोटभर जेवून (पक्षी: मासे हाणून) निघता येईल. लॉंगविकेंड आला तर तडक घरी जाता येईल. प्रवासात ब्रेकफास्टला कांदापोहे, वडापाव, कांदाभजीदेखील मागवता येईल. बाकरवडी खाण्यासाठी पुण्याहून कुणी येतंय का याची वाट पहावी लागणार नाही. (दुपारी १ ते ४ मध्ये बाकर वाडी खावी वाटली तर मात्र इडलीच खायची तयारी ठेवली पाहिजे). ब्लॉगर मित्रमंडळी भेटतील. ट्रेकच्या अपलोडेड फोटोंमध्ये मी देखील असेन.</p>
<p>थोडक्यात काय तर थोड्याच वेळात घडणाऱ्या बंगलोर ते पुणे प्रवासामुळे, मकरसंक्रांतीनंतर दोन दिवसांनी का होईना, पण माझ्या आयुष्यातील दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होतेय...</p>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-20140741160763198712011-12-30T08:11:00.000-08:002012-02-28T05:54:16.290-08:00मसाला चाय...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxQn1sFyEc7ZAt7F58xochN_g-Z7CPqb24iWx2NZqbM9sqqEOOSBWpEmo5j4HgU1B1Tjr0XVO0exM9ZgTTySWJE611DW2FzWs5uNz1J9Voz0sHEomi7u55wanjUmJ2oTsmmP_Kknz-xUk/s1600/Masala+Tea.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="265" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxQn1sFyEc7ZAt7F58xochN_g-Z7CPqb24iWx2NZqbM9sqqEOOSBWpEmo5j4HgU1B1Tjr0XVO0exM9ZgTTySWJE611DW2FzWs5uNz1J9Voz0sHEomi7u55wanjUmJ2oTsmmP_Kknz-xUk/s400/Masala+Tea.jpg" /></a></div>
<p>
गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2011/02/blog-post.html"> ट्राफिकमधला गारवा</a>. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रांगून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...</p>
<p>मसाला चहाची कृती एकदम सोप्पी...</p>
<p>
<b>साहित्य :-</b> एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.</p>
<p><b>कृती :-</b> नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)</p>
<p>तर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागलेली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.</p>
<div class="separator" style="clear: both; text-align: left;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiSrBwle4ZDgcGXPsWhCh8hDnPCyfH66ebaglVyovDDzwJAl_y7eJuZI7YnqR7HV-nTV6vYTg1AExnaf0JTE9fBugLp_YH3pU7JCBBvi6yPiBh0ZTEJW0ohyphenhyphen7ccB-NGA3IjuZOA1WwoLzE/s1600/Masala+Tea+2.jpg" imageanchor="1" style="clear:left; float:left;margin-right:1em; margin-bottom:1em"><img border="0" height="375" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiSrBwle4ZDgcGXPsWhCh8hDnPCyfH66ebaglVyovDDzwJAl_y7eJuZI7YnqR7HV-nTV6vYTg1AExnaf0JTE9fBugLp_YH3pU7JCBBvi6yPiBh0ZTEJW0ohyphenhyphen7ccB-NGA3IjuZOA1WwoLzE/s400/Masala+Tea+2.jpg" /></a></div>
<p>चमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.</p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj06szLu8Tij-mT-YHzUkGlHrYGgm068-73PYfK2ia9xMZkmVArVkdFFl3NiQI-hJZT9Otmdg5ETQS55JLTt8KiEBpJrubVYn2rm6B6GfiPGrinPMVH3m5n4Sg55Ej1Z61bEIsEhhduPB4/s1600/Masala+Tea+3.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="263" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj06szLu8Tij-mT-YHzUkGlHrYGgm068-73PYfK2ia9xMZkmVArVkdFFl3NiQI-hJZT9Otmdg5ETQS55JLTt8KiEBpJrubVYn2rm6B6GfiPGrinPMVH3m5n4Sg55Ej1Z61bEIsEhhduPB4/s400/Masala+Tea+3.jpg" /></a></div>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-9414405784468734512011-11-23T00:04:00.001-08:002012-02-28T05:54:47.855-08:00एकशिपी<span style="font-weight:bold;">साहित्य </span>:- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.
<br /><br /><span style="font-weight:bold;">कृती </span>:- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhK8jJJhpMxpmbssPtjecHJ01KjMj0uajxbvZMrWJ_ygkFdP8enhsthkfFGioIbQ_mg4jhyQ8LTCVYPdEjcqi_IkYGb9tEc4rnbep_Crj5f5gONd7IhLfzpIm8EQIg1R1RNbgpnHRXSjNY/s1600/1.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="265" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhK8jJJhpMxpmbssPtjecHJ01KjMj0uajxbvZMrWJ_ygkFdP8enhsthkfFGioIbQ_mg4jhyQ8LTCVYPdEjcqi_IkYGb9tEc4rnbep_Crj5f5gONd7IhLfzpIm8EQIg1R1RNbgpnHRXSjNY/s400/1.jpg" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfD7VIVLs9-Lyx9bnVS7aIveEqCo3Hwbm4aM_AblpRVaz37Vk-N3RLF5mR9Z6fhZ4-g-VPwwubEpYFlJSZgHSKXBNqDeNMH_BUeHdSMjNpS6Ryn2kHGFrxF3QfUKrdkswyyoT39reRVxA/s1600/2.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="266" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfD7VIVLs9-Lyx9bnVS7aIveEqCo3Hwbm4aM_AblpRVaz37Vk-N3RLF5mR9Z6fhZ4-g-VPwwubEpYFlJSZgHSKXBNqDeNMH_BUeHdSMjNpS6Ryn2kHGFrxF3QfUKrdkswyyoT39reRVxA/s400/2.jpg" /></a></div>
त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.
<br /><br /><iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dy9fNOh89hvQsQ7UoF2YhAeQOz87yLi99_RaxXsBRe6--rPSOS09cF4mcu9m1Rska0XFVIZmNVWr6BYzsJgpg' class='b-hbp-video b-uploaded' frameborder='0'></iframe><br /><br />
कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWLcgT5DjGQdpsJ-9l6c6LHMt7G8E7Vx9ozkDZHFw-AkJkUMA0PCSyZN9vYadJm2bMDJt04o9uC2L_teuQCCN8GiDneJt1m-qxOX3IkwxtNHB503p8IdYa6j7XbZQ7RO5RyPQYp1m-Na0/s1600/3.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="266" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWLcgT5DjGQdpsJ-9l6c6LHMt7G8E7Vx9ozkDZHFw-AkJkUMA0PCSyZN9vYadJm2bMDJt04o9uC2L_teuQCCN8GiDneJt1m-qxOX3IkwxtNHB503p8IdYa6j7XbZQ7RO5RyPQYp1m-Na0/s400/3.jpg" /></a></div>
परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7KlGPweUQI52pG2Ac4_SLZ_5LjUA8VtkkkW8Rz2t6Qs-PA4jVCX-lTRVLe9u-QovK6GKz_YzrK0c9cTsUzZ0dMiei9nMYy5SjzwJouZqO1k4ThLSJEoucIy2Pw2P014DfA2wv-rh80WY/s1600/4.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="268" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7KlGPweUQI52pG2Ac4_SLZ_5LjUA8VtkkkW8Rz2t6Qs-PA4jVCX-lTRVLe9u-QovK6GKz_YzrK0c9cTsUzZ0dMiei9nMYy5SjzwJouZqO1k4ThLSJEoucIy2Pw2P014DfA2wv-rh80WY/s400/4.jpg" /></a></div>
<br /><br />शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे<br /><br /><span style="font-weight:bold;">ता.क.</span> - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpShaNK7cCQ5alSEXY1cPDjMv58TuWAJZJcBRdAwOopGiGrZYA2cPGnm9XSYQWmMW86jzWWgViWrD7Ox-MwV49yhwVb8tIrgylIgk-VtwUvf0c7GbtvaXRStDuCC3Nu-Gbl-Fs17g9Mpw/s1600/5.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="266" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpShaNK7cCQ5alSEXY1cPDjMv58TuWAJZJcBRdAwOopGiGrZYA2cPGnm9XSYQWmMW86jzWWgViWrD7Ox-MwV49yhwVb8tIrgylIgk-VtwUvf0c7GbtvaXRStDuCC3Nu-Gbl-Fs17g9Mpw/s400/5.jpg" /></a></div>
'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात <a href="http://mfda2011.blogspot.com/2011/10/ekshipi.html">पूर्वप्रकाशित</a>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-3153712706889087152011-09-24T00:41:00.001-07:002011-09-29T20:00:08.761-07:00पैचान कौन? (भाग-१)<span style="font-weight:bold;">टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.<br /></span><br /><br />आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.<br /><br />तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.<br /><br />चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.<br /><br />तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत. <br /><br />सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.<br /><br />तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.<br /><br /><span style="font-weight:bold;">क्रमशः</span><br /><br />(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-82420920406681268942011-07-30T12:04:00.000-07:002011-07-31T22:51:43.588-07:00बब्याचो बंदोबस्तबब्या महाडिक... ह्याच्या अंगात लहानपणापासनच हाडका कमी आणि काल्याकांड्या जास्ती. वय वाढलो, मिसरूड फुटलो तशी तोंडाक बाटली लागली अन् ह्याचो अजूनच डोक्यास ताप झालो. आख्ख्या गावात ह्याच्याबद्दल कोण चांगला बोलील तर शप्पथ. ह्याचे घरचे लोकं पण ह्याच्या विरुद्धच असतले. बब्या खै गेलो आणि राडे केलान नाय असा फार कमी वेळा झालो असेल. गावच्या देवळातले पूजा नायतर हरिनामसप्ता असे कार्यक्रम सोडले तर बाकी सगळीकडे हा हजर. बरेचदा टाम् असात म्हणून की देवाक घाबरता म्हणून, पण बब्या तसो देवळात पाऊल नाय टाकणार. पण पालखी बाह्यर पडली की ह्यो आलो ढोल ताशे घेवन. बाकी पूर्वी पासन गावासाठी काय उपयोगाचो काम केलान असेल तर ढोल बनवायचो. बकऱ्याची कातडी आणून सुकवन् त्याचे ढोल ताशे बनवायचो. मग काय शिमाग्याक बब्या म्हणजे हिरो. कोणाक् ढोल ताशे वाजवायचो असाल तर बब्याक् कटवूक लागायचो. बब्या सांगेल त्याचो पयलो चान्स. अगदी झेपा जात आला तरी ढोला जवलन् हलणार नाय. धा वर्षापूर्वी त्यानं बापाच्या नावान् गावच्या देवळाकं नविन स्टायलचे ढोल घेवन देलान.<br /><br />बब्याचो बाप मास्तर महाडिक. दुसरी तिसरीतच लेकाची प्रगती बघून आपला पोर काय दिवे लावायचो नाय म्हणून मास्तरान गावाची पोरा शिकवता शिकवता आपल्या पोराला, बब्याला मात्र पाचवीत जायच्या आधीच शाळेतना भायर काढलान् आणि सरळ दोन म्हशी घेतालान. पहाटे उठून दूध काढून गावात विकायचा आणि दिवसभर म्हशीकां चरायंक् न्यायाचा, गोठा साफ करायचा अशी कामा बब्याच्या मांग लागली. म्हशी चरवता चरवता गाव भटकूकं मिळायचो म्हणून बब्या पण खुष. मास्तर सोताच्या पोरांक अगदी नीट वळखून होता. बब्या मोठा झालो तसा त्याचा लगीन लावन् दिलान आणि बरोबर हापूसची धा कलमं पण घेवन दिलान. बब्याच्या अंगात किती पन् काल्या कांड्या असल्या तरी मास्तर बापापुढे बब्या वचकून असायचो. मास्तरान पण जीता असे पर्यंत बब्याच्या हातात कधी व्येवार दिलान नाय. मास्तर मजुरी दिल्यासारखा बब्याला आठवड्याला चार-पाच रुपये द्यायचा आणि बब्यापन् गप्-गुमान आपली विडीकाडी त्यात भागवायचा. मास्तर असेपर्यंत गावाकपण बब्याचो तसो त्रास कधी नव्हतो. पण चांगली तीस-बत्तीस वर्षा पेन्शन खावंन् मास्तर खपलो आणि बब्यान् पण कात टाकल्यान. जणू मास्तर आणि बब्या दोघांचे आत्मे कसे एकदम मोकळे झाले. एकीकडं मास्तरान् जाता जाता बब्याच्या उरलेल्या आयुष्याची पन् सोय लावलान् होती. बब्याकं पन् त्याची जाणीव होती पण मास्तराच्या रूपात एक प्रकारचा धाक-दडपन् होता, ता गेला म्हणून बब्याकं कसो मोकळा मोकळा वाटला. आत्ता मास्तराच्या उपकाराची जाणीव म्हणा की तो खपल्याचा आनंद म्हणून म्हणा, पण मास्तर खपल्या खपल्या बब्यान् आधी मास्तराच्या नावान् गावच्या देवळाला ढोल देलान्.<br /><br />मास्तर अगदी जुन्या हाडाचो त्यामुळे तो खपेपर्यंत बब्यान् पण पन्नाशी पार केलान् होती. नोकरीक् अस्ता तर बब्या पेन्शनीत गेला असता. मास्तरानं अख्खो आयुष्य पांढरा शर्ट आणि खाकी हाफ प्यांट घालून काढलान्. म्हातारपणी डोळ्याला चष्मा आणि आधाराकं घेतलेली काठी हीच काय ती चैन केलान् असेल. करमणूक म्हणजे रोजचो रत्नांग्री टायम्स मोठ्यान वाचायचो. नाय म्हणायाला मास्तरान नंतर ब्लाक अन् व्हाईट टीवी घेतालान पण केबलबिबल घ्यायच्या भानगडीत न् पडता दूरदर्शनवरच भागावाल्यान. म्हावरा बब्याच गरवन आणायचो समुद्रावरून. सांगायचा मुद्दा काय तर घरात पैसा असून सुदिक म्हाताऱ्यामुळे बब्याक् त्याचो कधी उपभोग घेवूक मिळालो नसा. त्यामुळे मास्तर खपल्या खपल्या उभ्या आयुष्यभर सायकलवर फिरून दारोदार दूध घातलेला, चार-पाच रुपयात सगळी चैन भागवलेला बब्या रातोरात राजा झाला. उशिरा का व्हयनां पण बब्याच्या हातात पैसा आला. मग काय बब्यान् आधी दुधाचा धंदा आणि कलमाची कामा करायसं दोन गडी लावलान् आणि आपण सोता इतकी वर्षे आत दाबून ठेवलेल्या काल्याकांड्यांची जादू गावाक् दाखवायक् बाह्यर पडला. घरात कलर टीवी आली, सायकलच्या ऐवजी बुडाखाली फटफटी आली आणि पूर्वी शिमग्याला, गटारीला मिळणारी पहिल्या धारेची आत्ता रोजची झाली. बब्या गावाबाहेरच्या खोपटाचा रोजचा गिऱ्हायक आणि त्याच बरोबर गावातल्या लोकांक् एक नविन ताप झालो.<br /><br />शिमग्यातले राडे काय गावाक् नविन नवते. शिमग्यात गाऱ्हानां घालायचो काम कैक वर्ष मास्तरांन केलेला त्यामुळे मास्तराच्या पाटी गाऱ्हानां घालायचो मान बब्यास हवो होतो. मन्या गुरवानं अगदी कडकडून विरोध केलान. गावकऱ्यांनी कसो बसो आवरल्यानी बब्याक्. पुऱ्या गावासमोर मन्या गुरवानं केलेल्या विरोधाचा बदला म्हणून बब्यान् हापूसचा सिझन यायच्या आतच आपले गडी लावन् गुरुवाच्या कलमावर लागलेल्या सगळ्या तयार झालेल्या कैऱ्या काढून रातोरात लोणची करणाऱ्या व्यापाऱ्याला जावन् विकलान्. आत्ता हे काम बब्याचाच हे गुरवाला आणि गाववाल्यांना पण ठावक होता पण पुरावा नसल्याने बब्याच्या नादी कोन लागणार म्हणून सगळे गप्प बसले. त्यानंतर बब्यान् पुढचो किडो रंगपंचमीस केलान. रंगपंचमीस गावातली पोरा रंग घेवन गावभर फिरतात आणि जो भेटील त्यास रंगवितात. बब्यान् काय केलान तर तेच्या घरासामोरच्या म्हशीनां पाणी पिवूच्या हौदात चार दिवस आधीपासना शेण कालवन् ठेवल्यान. अगदी सारवान घालायला करतात तसो आणि रंगपंचमीक् जवा गावातली पोरा बब्याच्या घरा समोरून जावक् लागली तेवा अचानक पाटन् येवन पटकन तिघा चौघांना उचलून त्या शेणाच्या हौदात टाकल्यान. बेवडो आणि दिसायाक किडकिडीत, काटक असलो तरी लहानपणी पासन् अंगमेहनतीची कामा करून बब्यात ताकत चांगलीच होती. त्याच्यासमोर पोरा दिसायला वजनदार असली तरी शेवटी वडापाव-मिसळपाव खाल्लेली पोरा ती. त्यांच्यान् काय बब्या आवरला नाय. दोघजण बब्याक पकडूक् गेले आणि आयते त्याच्या तावडीत गावले. बब्यान् त्या दोघांक् पण उचलून हौदात टाकल्यान. पोरांचे अवतार बघवत नव्हते. चांगला चार दिवस कुसवलेला शेण ता, पाच पाच वेळा आंघोळी करून पण पोरांच्या अंगाचो वास जायत नव्हतो.<br /><br />नंतर बब्याचो अवतार दिसलो दहीकाल्यास्. ह्या वेळी बब्यान् हंडी बांधल्यान पण दोरी दोनीकडे पक्की न बांधता दुसऱ्या बाजूला सोता दोरीचो एक टोक हातात धरून झाडावर जावन् बसलो. पोरा हंडी फोडायस् आली, मनोरा रचल्यांनी. जशी पोरा हंडीच्या जवल जायची बब्या दोरी ताणून हंडी वर घ्यायचो. पोरा पडली की परत हंडी खाली. लै झुंजवल्यान् पोरांना. शेवटी पोरा कंटाळून गेली मग बब्यान् हंडी खाली करून अगदी दुसरी-तिसरीतल्या बारक्या बारक्या पोरांकडन् फोडून घेतल्यान् आणि वर मोठ्या बाप्या लोकांनां "बारक्या पोरांनी हंडी फोडलांनी पण तुमच्या बुडात दम नाय. थू तुमच्यावर" असो बोंबलत गावभर फिरलो. <br /><br />हळू हळू बब्याचो तरास वाढू लागलो. पूर्वी पौर्णिमा अमावास्येला म्हणजे अधनंमधनं ह्याच्या अंगात यायचो, पण नंतर जवळपास रोजचाच झाला. त्याचो तरास ह्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनां आणि घरच्यांना जरा जास्तीच होता. बब्यान् म्युजिक सिष्टीम घेतलान् आणि मग कधी मनात येल तेवा मोठ्या आवाजात गाणी लावन् डोस्की फिरवायला लागला. शेजारीच काय तर आख्ख्या वाडीतल्या लोकांचे कान किटले. पोरांना अभ्यास करणे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना दुपारी वामकुक्षी आणि रात्रीची झोप कठीण होवून बसली. ह्या सगळा कमी की काय म्हणून बब्यान् रोज झिंगून आल्यावर वाटेत पारावर बसलेल्या पोरांना शिव्या द्यायस् सुरुवात केलेली. पोरा बिचारी दिवसभर कामधंद्या वरून आल्यावर जेवन-खावंन् जरा पारावर गजाल्या मारायास बसायची तर हा तिकडे जावन् त्यांच्या कुरापती काढायचा. सगळे बब्याला वैतागले होते. शेवटी पोरांनी बब्याचा गेम करायचाच असा ठरवल्यांनी. पप्या मांडवकराच्या डोक्यात एक आयडिया आली, पोरा पण तयार झाली.<br /><br />रत्नांग्रीत रेल्वे आली पण त्याच्याबरोबर रेल्वे स्टेशनच्या भागात चोऱ्या पण वाढल्या. रेल्वेस्टेशन जवळची घरफोडी, दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या फोडून चोर रातोरात रेल्वेनेच पसार व्हायचे. गावातली पोरा आत्ता अशीच एखादी चोरी होतेय का त्याची वाट बघीत होते. सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली होती. आता सगळी पोरा फक्त योग्य संधीची वाट बघीत बसली होतीत. तशी संधी महिना भरात मिळाली पण. कोणीतरी रेल्वेस्टेशन जवळची चायनीजची गाडी फोडलान्. तशी किरकोळ चोरी होती, नुकसान जास्त झाला नव्हता. पैसा अडका चोरीला गेला नव्हता केवळ भांड्याकुंड्यावर निभावले होते. पोरांना पण असाच कायतरी हवा होता जेणेकरून पोलिसांची भानगड जास्ती नसेल. चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोरं संध्याकाळपासून बब्यावर पाळत ठेवून होतीत. बब्यानेहमी प्रमाणे संध्याकाळी टामकावायाला गावाबाहेर गेला आणि दोघे जण थोड्या वेळानं त्याच्या मागावर गेले. बब्या एकटोच पायी चालत जायचो त्यामुळे अजून कोण बघील अशी काही भीती नव्हती. बब्या टामकवून झाल्यावर झेपा टाकत यायला निघाला तसा एका ठिकाणी झाडी बघून पोरांनी पाटना येवन बब्यावर घोंगडं टाकलानी आणि तो बोंबलायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून तिकडेच आत रानात आडवाटेला ठेवून दिलांनी. रात्रीची जेवणा आटपून पप्या मांडवकर, सुन्या, दादू असे दोघे तिघे बब्याचा बोचका घेवन् नानाच्या रिक्षान् रेल्वे-स्टेशनला गेले. बब्या टाम् होताच त्यामुळे त्यान काय जास्ती त्रास दिलान नाय. रेल्वेस्टेशनवर जावन् पप्या आणि दादू त्या चायनीजवाल्याला भेटले आणि तुमची गाडी फोडलान् तो चोरटा आमच्याच गावातला असा, त्याका घेवन् इलोय असा सांगितल्यानी. तो तसो भुरटो चोर असा, म्हणून पोलिसात न् देता तुमच्या ताब्यात द्यायला आलो. आम्ही गेल्यावर तुम्ही काय ती वसुली करा असे सांगून पोरा परत घरी आली आणि शांत झोपली.<br /><br />तिकडे चायनीजवाल्याकं पण चोरी करणारा कोन तो भेटला नव्हताच. पोरा काय खरा-खोटा सांगून गेली ते बघुया आणि अगदीच काय नाय तर हा जो कोन भुरटा चोर हाय त्याच्याकडून निदान भांडी तरी घासून घेवया म्हणून त्यानं बब्याचो बोचको सोडल्यान. तोपर्यंत बब्याची पण जरा उतरली होती. हे काम गावातल्याच पोरांचे हे बब्याला माह्यत होता त्यामुळे घोंगड्याच्या बाह्यर आल्या आल्या बब्यान् समोर कोन हाय कोन नाय ते न् बघता घोंगडं काढणाऱ्या चायनीजवाल्याच्याच कानाखाली एक सणसणीत ठेवन् दिल्यान्. वरतून तोंडातन् नाय नाय त्या शिव्या सुरु होत्याच. आत्ता मघापासनं हा माणूस कोन हाय, ह्याने चोरी केलान हाय की नाय अश्या सगळ्याच बाबतीत संभ्रम असलेला चायनीजवाला बाकायदा कानाखाली खाल्ल्यामुळे पिसाळला. मग त्याने आणि आजूबाजूच्या गाडीवाल्यांनी बब्याला असा काय कुटलानी की बास रे बास. पावसाळी दिवस त्यात त्यांनी बब्याला धुतल्यावर त्याचे कपडे काढून हाफ प्यांटवर सोडून दिलानी. आत्ता अश्या अवस्थेत परत घरी जायचा तर रिक्षाला पैसे पण नाहीत. एवढ्या रात्री चालत जायचा तर शरीराचो जो भाग हलतो तो ठणकत होतो, अशा अवस्थेत मार खावंन् सुजलेल्या बब्यान् उघड्या अंगाने तिकडेच एका बस स्टापवर भिकाऱ्यांच्या बाजूला पुरी रात्र कुडकुडत काढलान् आणि दुसऱ्या दिवशी मेनरोड सोडून आडवाटेनं, कातळावरून, शेतीच्या बांधांच्या आडोशाला लपत बब्या कसाबसा दुपारी घरी आला. मुको मार तर इतको पडलो होतो की बब्याक बरा होवूक आटवडो लागलो. झाल्या प्रकारानं बब्यानं गावातल्या पोरांची अशी काही धास्ती घेतलानं की बाहेर जावन् कोणाला जाब विचारायची पण त्याची हिंमत व्हत नव्हती आणि हिंमत व्हयल तरी कशी कारण त्या गाडीवाल्याच्या ताब्यात द्यायचा आधी, पप्या घोंगडीत बांधलेल्या बब्याच्या कानात पुटपुटला होतो...<br /><br /><span style="font-weight:bold;">"आज नुसतीच तुका कुटायची सुपारी दिलीय, पण परत फिरून काल्याकांड्या करशील तर पुढच्या वेळी किल्ल्यावरच्या लाईट हावसवर नेवन् दरीत ढकलून देव. काय समजलास?" </span>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-38012785239634135372011-06-07T04:30:00.000-07:002011-06-07T07:08:04.427-07:00७ जूनच्या आठवणीआज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे. <br /><br />शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे. तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.<br /><br />बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.<br /><br />खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.<br /><br />त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.<br /><br />पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.<br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNg45rpBe9-8hmJ0BV_FtWdXIgtlDfNCuSOfUs4v9OGww2k9qcyfWpUGarRTIkAl2g0at89fCStJsNW0d_U_zk5KxJhbNKQWez7_yZPyDNNdv6JopN-PaCFepB4N-wZQAULZBrxhddFMo/s1600/Gulmohor.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 314px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNg45rpBe9-8hmJ0BV_FtWdXIgtlDfNCuSOfUs4v9OGww2k9qcyfWpUGarRTIkAl2g0at89fCStJsNW0d_U_zk5KxJhbNKQWez7_yZPyDNNdv6JopN-PaCFepB4N-wZQAULZBrxhddFMo/s400/Gulmohor.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5615439617128368562" /></a>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com17tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-29569938822176076812011-04-22T12:17:00.001-07:002011-04-24T11:00:24.698-07:00देव दिवाळी<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtpwLkgqvdoH-PzThJX2LZzcz9EsN9KZaB8H80yfmqmgJIhdVfvwTXP6UPXsPMnzaYr2CLlO3rigCLWoY2q2se7T95uKMZG7gMOFXsNbGaC-NVi2Y0et8vMHZeKihNU37pWRm4lbHbnKo/s1600/Sir+Sachin.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 343px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtpwLkgqvdoH-PzThJX2LZzcz9EsN9KZaB8H80yfmqmgJIhdVfvwTXP6UPXsPMnzaYr2CLlO3rigCLWoY2q2se7T95uKMZG7gMOFXsNbGaC-NVi2Y0et8vMHZeKihNU37pWRm4lbHbnKo/s400/Sir+Sachin.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5598669267225947618" /></a><br /><br />गेल्या आठवड्यातच नायगावकर काका एका कार्यक्रमात म्हणाले की रमेश तेंडुलकरांनी देखील कधीतरी सचिनला म्हटले असेल "फटके दिले पाहिजेत" आणि तो इतका आज्ञाधारक की एवढा मोठा झाला तरी फटके देतोच आहे. अरे बहुतेक त्यांना "तुला फटके दिले पाहिजेत" असे म्हणायचे होते असेल रे पण तू फोडत बसलास गोलंदाजांना. लहानपणी शिवाजी पार्कवरचे चिल्ली पिल्ली गोलंदाज फोडणे ठीक आहे रे, पण अब्दुल कादिरपासून सुरूवात करून वकार, वसिम, वॉर्न, ली, मुरली ह्यांना पण फोडायचे? इथे पाचच लिहाले आहेत कारण नाही म्हटले तरी आमच्या सारख्यांनी पाहिलेले पहिले पाच उत्तम, दर्जेदार गोलंदाज म्हणायला हरकत नाही. बाकी तू हेन्री ओलोंगा वैगरेला (तोच तो हल्ली प्रेज़ेंटेशन सेरेमेनीमध्ये प्रश्न विचारत असतो तो) पण फोडला होतास. त्याची चुक काय तर ओळख नसताना (म्हणजे गोलंदाज म्हणून त्याला कुणी ही ओळखत नसताना) एका मॅचमध्ये त्याने तुझी विकेट काढली आणि मॅचनंतर प्रौढीच्या पिपाण्या वाजवल्या. मग काय पुढच्याच मॅचमध्ये तू त्याला फोडलास. असा तसा नाही तर उण्यापूर्या १९६ धावांचा पाठलाग करताना तू शतक ठोकलं होतसं. आयुष्यात पहिल्यांदा तू फोडलेल्या गोलंदाजांची मला दया आली होती. त्यामुळेच तर तो अजुन आमच्यासारख्यांच्या लक्षात. आजवर असे अनेक लुंगेसुंगे आपले लेंगे तुझ्याकडून ओले करून धुवून घेऊन गेले. त्यावेळी ठीक होतं रे, तू तरुण होतास म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर होतास, रक्त सळसळतं होतं. आजच्याच दिवशी तू एकट्याने कांगारूंना शारजाच्या वाळवंटात करपवलं होतंस आणि आपला वाढदिवस साजरा केला होतास. पण आज जवळपास १४ वर्षे झाली तरी वॉर्नने कितीही नाही म्हटलं तरी हल्लीच्या ताज्या फडफडीत लिज़ हुर्ले किंवा तत्सम स्वप्नसुंदरीआधी तू त्याच्या स्वप्नात जात असशील हे नक्की.<br /><br />फार कमी गोष्टी अश्या आहेत की ज्याच्याबाबत मी ठाम आहे किंवा असेन. आत्ता धर्म, देश वैगरे बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून त्या आपण सोडून देऊ. पण सध्या काम करीत असलेला प्रॉजेक्ट म्हणा, दर महिना पगार देणारी कंपनी म्हणा फार कशाला अगदी करियर म्हणा मी कश्याच्याही बाबतीत ठाम आहे असे मला तरी वाटत नाही. आमच्या धंद्यात तसे कुणीच ठाम नसते त्यामुळे ते सोडा. पण स्वता:ची अक्कल वापरायला लागल्यापासून केवळ तुझ्या बाबतीत मी ठाम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. टेनिसला मराठीत बॅडमिंटन म्हणतात एवढी समज असलेल्या वयात केवळ तुला पीट सँप्रास आवडतो म्हणून तो माझाही आवडता टेनिस खेळाडू होता. आत्ता मोठेपणी टेनिस आणि बॅडमिंटन मधला फरक कळायला लागल्यावर आपल्या दोघांनाही फेडरर आवडतो हा योगायोगच म्हणायचा. थोडक्यात काय मला पण टेनिसमधलं बर्यापैकी कळू लागलं आहे. पूर्वी अतिरेकी खुळ्यासारखे जिहाद ह्या एका शब्दासाठी दुसऱ्याचा जीव घेतात कसा आणि आपला जीव देतात कशाला हे कळायचे नाही पण तुझा धर्म स्वीकारला आणि कट्टरता म्हणजे काय हे कळले. तुझ्या धर्मात आल्यामुळे तुझ्याविरुद्ध सॉरी आपल्याविरुद्ध बोलणारे नेहमी भेटटातच. आधी लय राडे व्हायचे, अगदी जिहाद. सुरुवात झाली ती शाळेत असताना शेजारच्या गोकुळबरोबर. पुर्वी गोकुळला मी त्यांच्या वयाला मान देऊन काका वैगरे म्हणायचो पण ते आपल्या धर्माच्या उगीचच विरोधात आहेत हे कळल्यापासून मी खाजगीत त्यांचा उल्लेख एकेरीत करतो. तर हा गोकुळ भारी खाजीव माणूस. तू भन्नाट खेळतोस तेंव्हा हा तुझ्याबद्दल चांगले चार शब्द न काढता समोरची गोलंदाजी कशी कचखाऊ होती ते बोंबलत बसतो. पण एकदा का तू आउट झालास की मात्र तू तो चेंडू कव्हर्सच्या ऐवजी सरळ किंवा थर्डमॅनच्या दिशेने कसा खेळायला हवा होतास हे अगदी साभिनय दाखवत बसतो. साला ह्या गोकुळला आपल्या घराच्यापाठी असलेल्या संडासचा पाइप कुठल्या दिशेला सोडला तर ते पाणी आपल्याच अंगणात येणार नाही हे गेली कित्येक वर्षे कळलेले नाही तो कव्हर्स, गली आणि थर्डमॅनबद्दल कसा बोलू शकतो हेच मला समजत नाही. <br /><br />असे कित्येक गोकुळ भेटतात. काही जणांची त्यात देखील खासियत आहे बरं. त्यांच्या मते तू शतक लावलंस की भारत हरतो. बहुतेक तू शतक लावल्यानतर भारत ७०% सामने जिंकला आहे हे त्यांना माहीत नाही किंवा त्यांच्या गणिती ज्ञानानुसार ३०% म्हणजे उर्वरित ७०% पेक्षा मोठा भाग असावा. आत्ता ह्या लोकांना फुललेली कमळं पहाण्यापेक्षा चिखलात डुंबणे जास्त पसंत असेल तर नाईलाज आहे. अगदी परवा देखील टी-२० मध्ये तू पहिलंवहीलं शतक झळकावलस आणि मुंबई हरली तर ही जमात सुरू झाली, तू शतक केलं म्हणून मुंबई हरली. अरे मेल्यांनो मुंबई घ्या नाहीतर भारतीय संघ, तू शतक लावल्यावर उरलेली दहा लोकं काय माधुकरीचे वार लावल्यासारखे फुकटचे गिळायला ठेवलेले आहेत काय? अरे तुझ्या शतकानंतर देखील आपण हरत असु तर तो तुझा नाही तर इतर दहा जणांचा दोष आहे हे साधं सोप्प समीकरण मंद लोकांना कसं कळतं नाही कुणास ठाऊक. बाकी हल्ली ही विरोधी पक्षाची लोकं आपण विश्वकप जिंकल्यापासून जरा गप्प आहेत. आत आग-आग होतं असेल पण काय करणार? त्यात तू धावा काढण्यात पण आपल्या सगळ्यात पुढे त्यामुळे त्यांची पुरी बुच्च बसली आहे.<br /><br />बाकी यंदाची देव दिवाळी अगदी स्पेशल आहे हे सांगायला नको. इतकी वर्षे वाट पाहायला लावून शेवटी विश्वकप तुझ्या हाती पहायला मिळाला. साखळी सामने सुरु असताना तू बाद झाल्यावर बाकीचे फलंदाज All Out लावल्यावर जसे डास मरतात तसे All Out होत होते ते पाहून यंदा पण येरे माझ्या मागल्या होणार आणि आपण उप-उपांत्य किंवा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळणार हे स्पष्ट दिसत होते. राहून राहून २००७ मध्ये विश्वचषकातून बाहेर पडलो तेंव्हाचे तुझे पाणावलेले डोळे समोर दिसत होते. त्यावेळी निदान २०११ मध्ये तू पुन्हा खेळशील ही आशा होती. ह्यावेळी तू खेळत होतास. नुसता खेळत नव्हतास तर गेली २-३ वर्षे तू विश्वचषक हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेळत होतास हे ही कळत होतं. वर्षभरापूर्वीच एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावून तू आपला फॉर्मपण दाखवून दिलास. तरी देखील बाकीच्या दहा लोकांवर भरोसा नव्हता. त्यात उप-उपांत्य फेरीतच समोर कांगारू. कांगारू नेहमीच्या औकातीत नसले तरी आपल्या लोकांचाच मला भरोसा नव्हता. पण सुदैवाने २००३ च्या अंतिम फेरीचा बदला उप-उपांत्य फेरीत घेतला गेला. नंतर पाकडे. पाकला विश्वचषकात आपण नेहमी कुटले असले तरी ते पाकडे आणि नाही म्हटलं तरी ते देखील जबरी खेळत होते पण २००३ मध्ये अक्रमच्या गोलंदाजीवर तुला एक जीवदान देवून त्यांचे समाधान झाले नव्हते त्यामुळे ह्यावेळी तुला पाच जीवदाने देवून ढेकर देत ते परत गेले. <br /><br />शेवटी अंतिम सामान्यासाठी मुरली, मलिंगा, मेंडीस, मॅथ्युज हा 'M' Factor होताच पण आपल्या बाजूनेदेखील मोटेरा, मोहाली आणि मुंबई असा 'M' Factor असल्याने चिंता थोडी कमी होती. तरी देखील अंतिम सामन्याच्या दिशेने आपण जसे एक-एक पाऊल टाकत होतो तसतशी बेचैनी वाढत होती. उगीचच डॉन ब्रॅडमनचे शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद होवून १०० च्या सरासरीपासून वंचित रहाणे किंवा पीट सँप्रासने शेवटपर्यंत फ्रेंच ओपन जिंकू न शकणे असल्या गोष्टी सतत आठवत होत्या. तू प्रयत्नांमध्ये काही कसर सोडली नसलीस तरी नियतीची भीती वाटत होती. एक विश्वचषक सोडून तुझ्याकडे सगळं काही आहे आणि नियती तो तुझ्या हातून हिरावून तर घेणार नाही अशी धास्ती मनात सतत होती. त्यात माजोरी जात तू टी-२० विश्वचषकात न खेळल्यामुळे आपण जिंकलो होतो आणि आत्ता तुझ्यामुळे हरणार अश्या पुड्या सोडत बसलेली होतीच. आठवडाभर धड झोप लागली नव्हती. इंजिनिरिंगला असताना Engineering Mechanicsचा पेपर तीनदा दिला होता पण तिन्ही वेळा पेपरच्या आदल्या रात्री Mechanicsचा पेपर सोड पण पूर्ण अभ्यासक्रमातली साधी २ मिलीमीटरची आकृतीदेखील कधी माझ्या झोपेची तटबंदी भेदू शकली नव्हती.(Mechanicsचा पेपर चार वर्षातून एकदा येण्याऐवजी निर्लज्जासारखा दर सहा महिन्यांनी येत असल्यामुळे असेल कदाचित) पण तुझ्यासाठी मात्र ही जवळपास शेवटचीच संधी होती. विश्वचषक जिंकायचा जसा तुला ध्यास लागला होता तसा तो तुझ्या हाती पहायचा ध्यास आम्हाला लागला होता. शेवटी दीड वर्षापूर्वी म्हांराजाला घातलेलं <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_14.html">गार्हाणं</a> म्हांराजानं ऐकलान आणि आपण जिंकलो. तुझ्या हाती विश्वचषक पाहिला तेंव्हा मात्र केवळ समाधान सोडून इतर काहीच वाटलं नाही. मनातल्या मनात तो विश्वचषक तुझ्या हाती अनेक वेळा पाहिल्यामुळे असेल कदाचित. तुझ्यासाठी अभिनंदनाची पोस्ट लिहिणार होतो पण काही सुचलंच नाही. संपूर्ण समाधान आणि तृप्तीचे असे ते क्षण होते. मनात साठवून ठेवले आहेत. आयुष्यभरासाठी...<br /><br />लहानपणापासून मराठी पंचांगाप्रमाणे वर्षभरात सगळ्यात शुभ असे साडेतीन मुहूर्त असतात असे ऐकून होतो. गेल्या काही वर्षापासून माझ्यासाठी ते साडेचार मुहूर्त झालेत. आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्यामध्ये येणारा अजुन एक शुभ मुहूर्त. आमच्यासाठी देव दिवाळी. लहानपणी काही वर्षे फटाके म्हणजे दिवाळीतच वाजवायचे असतात अशी संकुचित विचारसरणी होती. पण तुझ्यामुळे आम्ही भर शिमग्यातच नव्हे तर सणासूदीचे दिवस नसताना देखील दिवाळीच नाही तर विजयादशमी देखील फटाके लावून साजरी केली. आज तुझा वाढदिवस. तुला मी काय शुभेच्छा देणार? उलट मीच तुझ्याकडे मागणे मागेन की माझ्या नशिबात कधी भाग्योदय लिहलेला असेल तर त्यात एखादा दिवस तरी तुला तुझ्या आवडीच्या कोलंबी, कुर्ल्यांचा नैवेद्य दाखवण्याचे भाग्य मला लाभू दे.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-89015548528823744962011-03-13T07:27:00.001-07:002011-06-07T07:01:54.829-07:00रत्नागिरीतला शिमगा - लहान होळीशिमगा आणि गणेशोत्सव म्हणजे कोकणातले दोन मुख्य सण. सध्या शिमगा सुरू आहे. आज होळी. मुंबई तसेच उत्तर भारतात होळी म्हणजे रंगांची उधळण पण कोकणात रंगाचा सण रंगपंचमीला म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. लहानपणी माझी मुंबईची भावंडे होळी दिवशीच रंगपंचमी खेळलो, गच्चीतून फुगे फेकून मारले असे सांगायचीत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. मग मी खुळ्यासारखे अरे रंगपंचमीला वेळ आहे अजून असे म्हणायचो. आम्हाला होळी, धुलीवंदन (धूळवड्) आणि मग पाच दिवसांनी रंगपंचमी अश्या आठवड्यात मस्त ३ दिवस सुट्ट्या मिळत. आजची पोस्ट शिमगा स्पेशल. कोकणात शिमगा म्हणजे मस्त बोंबाबोंब. खरोखरच्या चोर्या. चोर्या म्हणजे लाकूडफाटा वैगरे. अगदीच पोचलेले टवाळ असतील तर डायरेक्ट कोंबडासुद्धा चोरायला कमी नाही करत.<br /><br />कोकणात शिमगा निरनिराळ्या पद्धतीने साजरा होतो. प्रत्येक गावागावात वेगळी पद्धत पण मुख्यत: बर्याच गावात पालखी असते. रत्नागिरीचे ग्राम दैवत म्हणजे देव भैरी. होळीच्या दिवशी भैरी पालखी बाहेर पडते आणि पाच दिवस आजूबाजूच्या मुख्य वाड्यांमध्ये फिरून रंगपंचमीपर्यंत झाडगावात सहाणेवर बसते. तिथे सूरमाडाची होळी असते. ह्या काळात निरनिराळ्या गावाचे मानकरी येऊन पालखी नाचवण्याचा कार्यक्रम असतो. कधी दोन लोकं तर कधी एकटा माणूस डोक्यावर ती भली मोठी पालखी घेऊन नाचवतो. मज्जा येते पहायला. पुढे कधी तरी शिमग्यात सुट्टी काढून ह्या सगळ्याचे रेकॉर्डिंग केले पाहिजे. दूरदर्शनच्या काळात जयू भाटकरांनी रत्नागिरीमधला शिमग्यावर एक कार्यक्रम करून प्रक्षेपित केला होता.<br /><br />आमच्या गावात मात्र शिमगा होळीच्या दहा दिवस आधीपासून सुरू होतो. गावात लहान मुलांची आणि मोठ्या लोकांची होळी चक्क वेगवेगळी असते. होळीच्या होमाची एक ठरलेली जागा आहे. तिथे दोन खड्डे पाडले जातात. त्या बाजूला होलदेवाच्या (होळीचा देव) मूर्त्या मांडलेल्या असतात. होळीचा सण झाला की पाडव्या दिवशी हे होलदेव पुन्हा त्या खडड्यांमध्ये ठेवून खड्डे पुन्हा पुढच्या होळीपर्यंत बुजवले जातात. लहान मुलांच्या होळीचा खडडा गूढगाभर खोल तर मोठ्या (गावाच्या) होळीचा खडडा चांगला पुरूषभर खोल असतो. होळीच्या सणाच्या दहा दिवस आधी लहान मुलांची होळी सुरू होते. इथे खडडा खणण्यापासून सगळी कामे लहान मुलेच करतात. लहान म्हणजे ६-७ पर्यंत कारण गावातली शाळा सातवीपर्यंतच आहे. आठवीसाठी शहरातल्या शाळेत जावे लागते आणि शहरातल्या शाळेत जाणारी मुले लहान मुलांच्यात जास्त मिक्स होत नाहीत. थोडक्यात गावातली शाळा आणि होळी एकदमच सुटते. तर लहान मुलांची होळी म्हणजे रोज शाळा सुटली की गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून एरंडाचे एखादे झाड तोडून आणायचे. होळी आणाताना 'हाय रे हाय आणि xxxच्या जिवात काय नाय रे' आणि इथे देता येणार नाहीत अश्या फाका घालायचे.<br /><br />एरंडाचेच झाड का? ह्याबद्दल काही माहिती नाही पण बहुतेक ही झाडे पुष्कळ आहेत आणि दुसरे म्हणजे हे कुणाच्याही आवारातून परवानगी शिवाय तोडून आणले तरी चालते. अजुन एक म्हणजे पाचवी-सहावीच्या मूलानां हे तोडून खांद्यावरुन मिरवत आणण्यासारखे असते. कधी कधी मुले जास्त असतील किंवा लहानांची होळी आणायचा शेवटचा दिवस असेल तर मजबूत असे एरंडाचे झाड निवडले जाते. ते घेऊन पूर्ण गावभर 'होळी ओ' करत, मिरवत अगदी काळोख पडून गेल्यावर होमाच्या ठिकाणी आणून ते एरंडाचे झाड खड्ड्यात मधोमध उभे केलं जातं. मग आजूबाजूचा किंवा गावातून जमवून आणलेला झाडांचा सुकलेला पाचोळा (पातेरा), झावळ्या, काटक्या असं काय मिळेल ते सगळं त्या खड्ड्यात भरून होम केला जातो. गावात सागाची आणि माडाची खूप झाडे असल्याने रोज बसल्या जागी ४-५ टोपल्या पातेरा, झावळ्या सहज मिळायचा. अजुन ही मिळतो. पुर्वी म्हणजे अगदी १०-१२ वर्षापूर्वी देखील बरीचशी लोकं चुलीवरच जेवण करायची. आज ही गावातल्या उत्सवांच्यावेळी किंवा लग्नकार्यात गाव जेवणासाठी लाकूड फाटाच वापरला जातो.<br /><br />होमाच्यावेळी तथाकथित मोठी झालेली म्हणजे आठवी-नववीतील मुले (ज्यांना मोठे आपल्यात घेत नसत) देवळातून ढोल-ताशे घेऊन यायचे आणि मोठ्या होळीच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशे वाजवण्याची जोरदार प्रॅक्टिस चालायची. मी लहान होतो म्हणजे पाचवी सहावीपर्यंत घरचे मला गावातल्या इतर मुलांबरोबर होळी आणायला पाठवत नसत. तोपर्यंत मी इतर मुले होळी आणेपर्यंत पातेरा गोळा करून ठेवण्याचे काम इमानेइतबारे बजावले होते. मी पाचवी आणि सहावीत असताना २ वर्षे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान मुलांच्या होळीत पूर्ण सहभागी होतो. सहावी पास झाल्यावरच मी हायस्कूलला प्रवेश घेतल्यामुळे सहाजिकच मी एक वर्ष आधीच 'मोठा' झालो त्यामुळे आपोआपच लहान होळीची मज्जा एक वर्ष कमी झाली. तेंव्हा होळी कुठून आणायची, एरंडाचे कुठले झाड निवडायचे, होळी आणाताना शेंड्याकडे कोण? मुद्याकडे (खोडाकडे) कोण? हे ठरवणारी मुले म्हणजे आमच्यासाठी हीरो असायची. अर्थात सगळ्यात अंगापींडाने जो जास्त दणकट आणि त्यात शाळेत नापास वैगरे झालेला असतो त्यालाच हा मान आपोआप मिळतो. मी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मागासलेला असल्याने मी नेहमी हुकुमाची अंमलबजावणी करणार्यांमध्ये राहिलो. मला त्यातल्या त्यात मानाचे काम म्हणजे होळी तोडण्यासाठी बरोबर नेलेला कोयता सांभाळणे हेच असायचे कारण बाकीच्या अवलादिंच्या हाती कोयता वैगरे देणे म्हणजे जिकीरीचे असायचे.<br /><br />होम लागेपर्यंत साधारण सात-साडेसात वाजायचे. त्याचवेळी कामधंद्याला बाहेर गेलेली लोकं पण परत येत असायची मग कधी सगळ्या मुलांना जवळच्या गादीवरच्या लिमलेटच्या गोळ्या किंवा तळलेल्या पिवळ्या नळ्या असा खाऊ मिळायचा. इथे पुन्हा माझ्या अंगच्या प्रामाणिकपणामुळे खाऊवाटपामधले संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी ते काम बहुतेक वेळा मीच करायचो. पण काही असो मज्जा यायची. होळी आणणे असो की पातेरा जमवणे, कोयता सांभाळणे असो किंवा खाऊवाटप, आपण एक जबाबदारीचे काम पार पाडतोय असं एक प्रकारचे समाधान असायचे जे आत्ता मोठेपणी खूप दुर्मिळ झाले आहे.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-30873105202313281332011-02-28T02:31:00.001-08:002011-02-28T19:16:03.444-08:00ट्रॅफिकमधला गारवाकाल सकाळी ३५ मिनिटांचा रस्ता पार करून ऑफीसला पोहोचायला तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागला. गाडी चालू बंद करून करून कंटाळा आला. अश्याच एका निवांत क्षणी मोबाईलवर गाणी लावून ईअर् फोन कानात घातले आणि पहिलच गाणं लागलं ते म्हणजे मिलिंद इंगळेचे गारवा. त्यातल्या पहिल्याच "ऊन जरा जास्तच आहे" ह्या ओळी कानावर पडल्या आणि पुढचं विडंबन सुचले. तसं पाहिलं तर कविता करणे, कवितेचा आस्वाद घेणे (अर्थात संदीप खरेच्या कविता आणि बझ्झवरच्या चारोळ्या, दिपोळ्या, आपोळ्या असे काही सन्माननीय अपवाद वगळता) वैगरे दूरच पण यमक जुळवणेदेखील मुश्कील अशी माझी अवस्था. त्यामुळे भर उन्हात त्या ट्रॅफिकमधल्या परिस्थितीला गांजून माझ्यातल्या कोकणी भाषेला 'भ'हर आलेला असताना सुचलेला हा ट्रॅफिक मधला गारवा तुमच्यासाठी. तसं पाहायला गेलं तर हे विडंबन ब्लॉगवर पोस्ट करण्याच्या लायकीचं नाही तरी माझ्यासारख्या पद्य विभागातल्या माठ माणसाकडून त्या रखरखीत परिस्थीत का होईना चुकुन जुळले गेलेले यमक (जे पुन्हा घडण्याची तीळमात्र शक्यता नाही) तुमच्या समोर यावे म्हणून हा खटाटोप. <br /><br /><span style="font-style:italic;">मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत. <br /></span><br /><br /><blockquote> ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,<br />भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,<br />लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,<br />गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,<br />तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,<br />ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,<br />गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,<br />न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,<br />क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,<br />पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,<br />मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,<br />पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.</blockquote><br /><br /> तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-11988156648823244762011-01-14T04:09:00.001-08:002011-02-06T22:07:25.561-08:00टाइम मॅनेजमेंट<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPtSatpYKJZuE6SzEOP1ZXfnv2GUWSy3ZduZ_5libRhx8P0oT4m_tltuaATqSW35nNGwZp_HU51q_9TVKbM3FMBnR2E8yJyt6FyACj8yGJxFFBYF4tMsUROGHwduns2SoWQdPpTs7oh3Q/s1600/Time+Management.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 267px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPtSatpYKJZuE6SzEOP1ZXfnv2GUWSy3ZduZ_5libRhx8P0oT4m_tltuaATqSW35nNGwZp_HU51q_9TVKbM3FMBnR2E8yJyt6FyACj8yGJxFFBYF4tMsUROGHwduns2SoWQdPpTs7oh3Q/s400/Time+Management.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5569804116139544466" /></a><br /><br />एखादी जॉब प्रोफाइल वाचताना टाइम/टास्क मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग वैगरे शब्द हमखास वाचायला मिळतात. मिळालेली वेळ कामांचे महत्व पहाता त्या त्या कामांना विभागून देऊन त्यानुसार काम पुरे करणे ही झाली टाइममॅनेजमेंटची ऑफीसमधली व्याख्या. अगदी परफेक्ट नसेल. सांगायचा मुद्दा हा की ऑफीसमध्ये टाइम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट वैगरे गोष्टी प्रॉजेक्ट प्लॅनिंगचा एक हिस्सा असतात. काम नेमुन देण्यासाठी आणि दिलेले काम होतं आहे की नाही हे पहाण्यासाठी मॅनेजर असतो. पण प्रॉजेक्ट म्हणजे टीमवर्क आलंच. इथे काही प्रॉब्लेम असतील, काही मदत हवी असेल तर टीम असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग सिस्टमची निरनिराळी सॉफ्टवेअरस् वापरुन सगळी कामं (बहुतेकवेळा) नीट पार पडली जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफमध्ये तरी डेड लाईन या ना त्या प्रकारे पाळली जाते किंबहुना काम करणार्या लोकांकडून (झक मारुन का होईना) पाळून घेतली जाते.<br /><br />टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न सुरू होतो तो ऑफीस मधून बाहेर पडल्यावर. वैयक्तिक आयुष्यात आपण किती वेळा कामे आखून त्या नुसार काम करतो? माझ्या मते मी आत्ता आपण म्हणणे थांबवावे. मी माझ्यापासून सुरूवात करतो. ऑफीसच्या बाहेर किती कामे मी आखून त्या नुसार ती पार पाडतो? नक्की नाही सांगता येत. नक्की नाही म्हणजे आखणी होते. बहुतेक सगळ्या कामांची आखणी ही होतेच. ऑफीसप्रमाणे अगदी पद्धतशीर कागदोपत्री प्लॅनिंग नाही पण मनात कुठे तरी काही गोष्टी ठरवल्या जातात. अमुक तमुक गोष्ट करायची. आणि त्यासाठी एक ढोबळ वेळ/तारीख/महिना निश्चित करायचा. अजुन तरी मी कधी वर्ष वैगरे निश्चित नाही केलेलं कारण तेवढी दूरदृष्टी नाही. आधीच वेळ/तारीख/महिना असे जे काही मनात ठरवतो ते ढोबळ असते. हा ढोबळ शब्दच घात करतो.<br /><br />जेंव्हा एखादी गोष्ट पुढे ढकलली तरी चालून जाते तेंव्हा ती गोष्ट माझ्या हातून कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळ्या सुविधा असतात पण जोवर ती करायचीच असा मनात ठाम निर्णय होत नाही तोवर हातून काहीच होत नाही. आत्ता टॅक्स सेव्हींग. हा दरवर्षीचा प्रकार आहे. दरवर्षी ठरवतो की डिसेंबरपर्यंत सगळी गुंतवणूक पूर्ण करून कागदपत्र तयार ठेवायची. एचआरचा मेल आला रे आला की दिली. पण नाही. मेल आला की शेवटची तारीख बघायची. मग त्याच्या आधीच्या वीकेंडला जाऊन पैसे भरायचे आणि पावत्या आणायच्या. बरं सगळी कागदपत्र तयार आहेत तर जमा करेन तर तेही नाही. दोन दिवस आधी एचआरचा Gentle Reminder म्हणून एक प्रेमळ मेल येतो पण आपण अगदी शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहायची. तो दिवस आला तरी अगदी संध्याकाळ होण्याची वाट बघा. दुपारी जेवून वैगरे आलं की प्रिंटआऊट काढा आणि मग एकदाचा घरी जाता जाता एचआर कडे जायचे. तिथे आपली भावंडे उभी असतातच. एकदम कामाचा लोड पडू नये म्हणून त्या बिचार्या एचआरने महिनाभर आधी तारीख दिलेली असते तर माझ्यासारखी लोकं अगदी ती तारीख म्हणजे एक एकच आणि शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी संध्याकाळी हजर. काही लोकं तर कुठे काही माहिती भरून आणतात. शेवटच्या दिवशी ह्यांच्या हजार शंका. नशिबाने मी इतका गया गुजरा नसल्याने ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर ;-)<br /><br />टॅक्स सेव्हींगचे उदाहरण हे वार्षिक श्रेणीमध्ये मोडते. मासिकश्रेणीमध्ये लाईटबिल येते. लाईटबिल साधारण दर महिन्याच्या ४-५ तारखेला हातात पडते. बरं इथे बिल भरण्याची शेवटची तारीख १८ असते. बिल भरण्याचे ठिकाण देखील ५ मिनिटांवर आणि रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे पण बिल हातात मिळाल्यापासून वीकेंडला भरू, वीकेंडला भरू असे करता करता १७ तारीख उजाडते. वीकेंडला आठवण असते, नाही असे नाही पण सकाळी वाटते आत्ता गेलो तर गर्दी असेल. लोकं उन्हातून बाहेर पडत नाही तेंव्हा आपण १२-१२:३०च्या आसपास जाऊ पण दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही. १७ तारखेला नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला उशीर झालेला असतो त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे ह्या भरोश्यावर बिल भरायला १८ तारीख उगवतेच. आत्ता १८ शेवटची तारीख असल्याने दंड भरावा लागू नये म्हणून झक मारत त्या दिवशी बिल भरायला जावं तर नेमका त्या दिवशी तिथे प्रिंटर बिघडलेला असतो. आणि बहुतेक प्रत्येक महिन्यात १८ लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने आपली 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'देखील त्याच दिवशी गर्दी करून रांगेत उभी असतात. पण गर्दी पाहून दुपारी/संध्याकाळी येऊ म्हणाव तर शक्य नसतं त्यामुळे तिथे रांगेत उभं राहून वीकेंडला आलो असतो तर बर झालं असतं असं वाटून जातं. आत्ता बिल मिळालं की पहिल्याच वीकेंड्ला भरून टाकायचे असं ठरवतो पण हाच निश्चय पुन्हा पुढच्या महिन्यात १७-१८ तारखेला केला जातो.<br /><br />ही झाली दोन ठळक उदाहरणे. पण सध्या बर्याचश्या गोष्टी ह्या अश्या ढोबळ कारभारावर सुरू आहेत. काही ठिकाणी गोष्टी अडून बसल्या आहेत तर काही ठिकाणी सगळ्या चाव्या माझ्या हाती असून केवळ नियोजनाचा अभाव आणि कंटाळा ह्यामुळे मी स्व:त सगळ्या गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. जेवढ्या लवकर टाइम मॅनेजमेंटच्या घड्याळात मी सेल्फ स्टार्टची चार्ज झालेली बॅटरी टाकेन तितक्या लवकर गोष्टी टिक-टिक करीत पुढे सरकतील.<br /><br />फोटो गूगलवरुन साभारसिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-70599400862885006552011-01-10T05:58:00.001-08:002011-06-07T07:01:42.524-07:00देवबाग बीच रिसॉर्ट३१ डिसेंबर विकांताला लागून येत असल्याने कुठेतरी बाहेर जायचे हे नक्की ठरवले होते. केरळला जायचे कधी पासून मनात होते म्हणून कोट्टयाम-आलप्पी येथे हाउसबोटवर ३१ची रात्र घालवण्याचा प्लॅन केला. पण ख्रिसमस आणि वर्षअखेर असल्याने केरळचे बुकिंग ४ महिने आधीच फुल्ल होते. आत्ता कुठे जायचे असा विचार सुरू होता. एका मित्राकडून देवबाग बीच रिसॉर्टबद्दल ऐकून होतो. तिथेदेखील हाउसबोट उपलब्ध असते असे कळले पण केरळच्या बॅक-वॉटर इतकी मज्जा नाही पण प्रत्यक्ष बीच रिसॉर्टचा रिव्यू चांगला होता. बुकिंग तसं महाग होतं आणि त्यात हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारद्वारा चालवले जाते म्हणून कसं असेल ह्याबद्दल मन जरा साशंकच होतं. नेट वर पाहिलं तर रिव्यू चांगला होता. अर्थात काही ठिकाणी under utilize असा उल्लेख होता पण बहुतेक सर्व लोकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली होती. म्हटलं तसं ही काही मिळत नाही तर करून टाकु बुकिंग. ऑनलाइन बुकिंग सेवा आहे आणि अगदी तत्पर. मी तिथे चौकशीची नोंद केल्यावर काही तासात त्यांनी फोन करून शेवटची काही कॉटेज शिल्लक आहेत असं कळवलं. मी पण फार आढे वेढे न घेता त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं.<br /><br />ठरल्याप्रमाणे ३०च्या रात्री बंगलोरहून आम्ही निघालो. देवबाग कारवारमध्ये आहे. दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही कारवारला पोहोचलो. चेकईन दुपारी बारा वाजताचे होते. आत्ता इतका वेळ काय करायचे हा प्रश्न. मला वाटले होते की कारवार बर्यापैकी मोठे शहर असेल. सकाळी फ्रेश होऊन आजूबाजूला काही भटकण्यासारखे असेल तर चक्कर मारू. पण कसलं काय? तिथे धड बस स्टॅंड देखील नव्हता. ब्रेकफास्ट करावा तर धड नीट हॉटेल नाही. शेवटी एक बर्यापैकी हॉटेल दिसले तिथे टिपिकल डोसा वैगरे खाऊन घेतला. तिथे जवळपास काही बघण्यासारखे आहे का अशी चौकशी केली तर कारवार बीच सोडून दुसरं काही ऐकू आले नाही. आत्ता इतक्या सकाळी बीचवर खो-खो खेळायला बसलेली लोकं थोडीच पाहायची होतीत?<br /><br />दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून सरळ देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला फोन लावला. तर त्यांनी ऑफीसला या असे सांगितले. म्हटले चला इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा सरकारी कचेरीतल्या बाकड्यावर बसून मख्ख चेहरे पाहत बसू. मग रिक्षा करून देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला गेलो. शहरापासून ५-६ किलोमीटर आहे. तिकडे पोहोचल्यापासून एक एक सुखद अनुभव यायला सुरूवात झाली. त्यांचे ऑफीस कारवारबीच जवळ एका बंगल्यात होते. आजूबाजूला मस्त नारळ पोफळीची झाडे. आत गेलो तर सकाळ असून ऑफीसची पुरेशी लोकं होती. चौकशी केल्यावर समजलं की ते लोकं शिफ्टमध्ये काम करतात आणि ऑफीस कायम उघडे असते. आमचे वाऊचर पाहून आधी आमची आल्याची नोंद केली आणि लगेचच आम्हाला बारा वाजेपर्यंत रहाण्यासाठी त्याच बंगल्यात वरच्या मजल्यावरची एक सुसज्ज रूम दिली. चेक-ईन/चेक-आउट हे दुपारी बारा वाजता असल्याने आणि शहरातील असुविधांचा विचार करून पर्यटकांसाठी ही सोय केलेली होती. जाताना देखील दुपारपासून ते रात्री तुमची बस/ट्रेनची वेळ होईपर्यंत तुम्ही इथे आराम करू शकता. आधीच रात्री बसमध्ये झोप नीट झाली नव्हती त्यात सरकारी कचेरीतल्या बाकड्या ऐवजी बेड मिळाल्यावर आम्ही मस्त ताणून दिली. दोन-अडीज तास झोप पूर्ण केल्यानंतर आंघोळ वैगरे करून आम्ही रिसॉर्टला जायला तयार झालो. तोवर इतर लोकं देखील आली होती. मग तिथून बोटीत बसून आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट म्हणजे तसं पूर्ण बेटावर वसलेलं नाही. एका बाजूने जमिनीला जोडलेले आहे. पण शहराच्या दिशेने पाहिलं की दर्शनी भागाकडून ते पाण्यात आहे असे वाटते. त्यात बोटराइडचा आनंद मिळावा म्हणून पर्यटकांना बोटीने रिसॉर्टला घेऊन जातात. १५-२० मिनिटांच्या बोटराइड नंतर आम्ही तिकडे पोहोचलो.<br /><br />बोटीतून खाली उतरल्या उतरल्या सुरुची दाट झाडी सुरू होते. सुरुवातीलाच जंगल लॉजेस अँड रिसॉर्टचा फलक आहे. सुरूच्या बनातून एक पायवाट आत जाते. समुद्रावरचा वारा सुरुच्या झाडामधून वाट काढत सूss सूss आवाज करत जात होता. आजूबाजूचे वातावरण पाहाता सगळे अपेक्षेपेक्षा चांगले अनुभवायला मिळत होते. ८-१० वर्षा पुर्वी रत्नागिरीलादेखील भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या नारळ संशोधनकेंद्रासमोर समुद्रावरुन येणार सोसाट्याचा वारा अडावा म्हणून दाट सुरूची झाडी होती. पण तिथे येणार्याजाणार्यावर बंधन नसल्याने ती हळू हळू कमी झाली. येणारे जाणारे ह्यामध्ये सुरुबनात चाळे करायला येणार्या लोकांचाच जास्त भरणा होता. त्यात पावसाळ्यात वादळाने पडलेली झाडे जवळपासची लोकं जळणासाठी लाकूडफाटा म्हणून वापरु लागली. पुढे पुढे तर लोकांनी जळणासाठी झाडे तोडून देखील नेली पण पुन्हा झाडे लावण्याचे कुणाच्या मनात आलेले नाही. त्या दृष्टीने कर्नाटक सरकारने देवबागला सुरुबनाचा पर्यटनासाठी खूप चांगला वापर करून घेतला आहे. असो...<br /><br />१०-१५ मिनिटे चालल्यानंतर कॉटेज दिसू लागली. सुरुवातीला काही चिरेबंदी कॉटेज लागली. ती बहुतेक नवीन बांधलेली दिसत होती. तिथे एकूण १५ कॉटेज आहेत. सर्व एसी. पुढे गेलो तशी पुर्वी बांधलेली, जमिनीपासून उंचावर असलेली लाकडी कॉटेज होती. प्रत्येक कॉटेजसमोर सुरूच्या झाडामध्ये बांधलेला झुला. आमच्या सुदैवाने आम्हाला वुडन फ्लोअर असलेलं लाकडी कॉटेज मिळालं. कॉटेज देखील आतमधून एकदम प्रशस्त आणि सुसज्ज. सगळी सोय बघून इथे येण्याचा खेळलेल्या जुगारातून जॅकपॉट लागल्याचे समाधान मिळाले. बरं बायकोला नेहमीप्रमाणे काहीच न सांगितले असल्याने तिच्यासाठी तर मस्त सरप्राइज होते. खरं तर मला देखील आधी काय आणि कसं असेल ह्याची काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठीसुद्धा मोठे सरप्राइजच होते.<br /><br />कॉटेजमध्ये फ्रेश होऊन आजुबाजूला काय काय आहे त्यावर नजर टाकतो तोच जेवणाची वर्दि घेऊन एक जण आला. अरे हो एक सांगायाचेच राहीले. इथले लोकं कोंकणी भाषा बोलतात. कन्नड पण चालते पण आम्ही सकाळपासून लोकांचे बोलणे ऐकत होतो ते यंडूगुंडू नव्हते. बर्यापैकी कळत होते. त्यांना पण आम्ही आपापसात काय बोलतो ते थोडे फार कळत होते. कॉटेज दाखवायला जो मुलगा आमचे सामान घेऊन आला आमच्या बरोबर आलेला तोच पुन्हा जेवाणाचा निरोप घेऊन आलेला. आम्हाला मराठीत बोलताना ऐकले असल्याने त्याने सरळ "१ वाजल्या पासून गोलघरमध्ये जेवण सुरू होते" असा शुद्ध मराठीत निरोप दिला. सुरूबनात मधोमध गोलघर आहे. नावाप्रमाणेच गोलबांधणीचे. तिथे डायनिंगची सोय आहे. सगळं बुफे पद्धतीने. दुपारचे जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स/चहापाणी गोलघरमध्ये. स्नॅक्सनंतर समुद्रात तासाभराची बोटराइड, रात्री बार्बीक्यू, ड्रिंक्स आणि जेवण समुद्रकिनारी वाळूत कॅंपफायरमध्ये. भल्या सकाळी ६:३० वाजता Nature Walk आणि त्यानंतर पुन्हा गोलघरमध्ये ब्रेकफास्ट आणि दुपारी चेकआउट असा २४ तासांचा कार्यक्रम होता जो दुपारच्या जेवणापासून सुरू होतो.<br /><br /><embed type="application/x-shockwave-flash" src="http://picasaweb.google.com/s/c/bin/slideshow.swf" width="400" height="300" flashvars="host=picasaweb.google.com&hl=en_US&feat=flashalbum&RGB=0x000000&feed=http%3A%2F%2Fpicasaweb.google.com%2Fdata%2Ffeed%2Fapi%2Fuser%2Fnasatiuthathev%2Falbumid%2F5560893857338969217%3Falt%3Drss%26kind%3Dphoto%26hl%3Den_US" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer"></embed><br /><br />भुका लागल्याच होत्या. नॉनव्हेज मेनुमध्ये फिश् फ्राय आणि मटण होते. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि मंगलोर, कारवारमध्ये काही फरक नाही. फक्त मंगलोर, कारवार कर्नाटकात येत असल्याने भाषा सोडली तर जेवणाखाण्याच्या पद्धती बर्याचश्या सारख्या आहेत. निदान फिश्-फ्राय, माश्याचे कालवण ई प्रकार तरी अगदी रत्नागिरी सारखे. इथली लोकं देखील तांदळाची भाकरी खातात, तांदळाच्या भाकरीला अक्की रोटी म्हणतात इतकचं. देवबाग समुद्र किनारीच मग काय मासा एकदम ताजा होता. भुकेच्या गडबडीत कॉटेज सोडताना कॅमेरा विसरलो. तसं ही मच्छी पुढयात आली की फोटो वैगरे काढायचे लक्षात राहात नाही. जेवाणात इतरही प्रकार होते पण नेटवरच्या रिव्यूप्रमाणे जेवणात (नॉनव्हेज सोडता) जरा सुधारणा करायला वाव आहे. आम्ही सगळ्याची थोडी थोडी चव घेऊन मुख्य:त फिश्-फ्राय आणि चपात्या हाणल्या. जेवण जरा जडच झाले म्हणून आजूबाजूला फेर फटका मारायला निघालो. गोल घराला लागूनच टीव्ही रूम आहे. ती देखील गोल घरासारखीच गोल. एकीकडे टीव्ही आणि समोर गोलाकार मांडलेल्या खुर्च्या. गोलघर आणि टीव्हीरूम लाकडी पुलाने जोडलेली आहे. टीव्ही पहात जेवायची सवय असेल तर जेवण घेऊन इथे बसू शकता.<br /><br />जवळच काही अंतरावर टेंट ठोकलेले दिसले. जेंव्हा कॉटेज फुल्ल होतात किंवा जे कुणी ८-१० च्या ग्रूपने येतात त्यांची सोय टेंटमध्ये केली जाते. हे टेंट देखील अगदी सुसज्ज आहेत. आतमध्ये डबल बेड, छोटे टेबल, सामान ठेवायला खण. तीन बेड असलेले देखील २-३ टेंट होते. ह्या टेंटचा दुसरा उपयोग म्हणजे दुपारी १२ वाजता चेक-आउट केल्यानंतर जर का तुम्हाला संध्याकाळपर्यंत बीचवर वेळ घालवायचा असेल तर कॉटेज मधून तुम्हाला टेंटमध्ये शिफ्ट करून देतात. तेदेखील विनामूल्य.<br /><br />बीचवर काही वेळ भटकून आम्ही पुन्हा कॉटेजवर परतलो. ४ वाजता चहा घेऊन बोटराइडचा प्लान होता. तासाभराच्या बोटराइडमध्ये बीचजवळ समुद्रात आत ३ छोटी बेटे आहेत त्याला फेरी मारुन आणतात. त्या बेटांच्या थोडं पुढे खोल समुद्रात डॉल्फिनचे दर्शन देखील होते. मधूनच पाण्यावर येणारे काही डॉल्फिन दिसायचे पण 'तो बघ', 'तिकडे बघ' असे म्हणे पर्यंत ते पटकन गायब व्हायचे. बरेचदा सूर मारल्यानंतरच्या त्यांच्या शेपट्याच दिसायच्या. बरोबर गाईड होता. तो इंग्रजी, हिंदी, कन्नड अश्या प्रत्येकाच्या सोयीनुसार सगळ्या भाषेत माहिती देत होता. जर कधी वारे जोरात वहात असतील तर ही बोटराइड दुसर्या दिवशी सकाळी ठेवतात किंवा रद्द देखील करतात. आमच्या नशिबाने त्या वेळी वातावरण खूप छान होते. बोटराइड वरुन परत आल्यावर आम्ही पुन्हा बीचच्या दिशेने निघालो. येणार्या जाणार्या लोकांवर निर्बंध असल्याने बीच एकदम स्वच्छ आहे. कुठे ही फोडलेल्या बाटल्या, प्लास्टिक, समुद्रातून वहात आलेला कचरा नाही. सरकारी काम असलं तरी सगळी व्यवस्था चोख होती. कॉटेज आणि गोल घर ही बांधकामे सोडली तर तिथे बाकी काही विशेष बदल केलेले नाहीत. त्यामुळे च तिथे त्या नैसर्गिक वातावरणाचा जास्त आनंद मिळतो. उगीचच उंट घोडे आणून, पाळणे लावून तिथे कमर्शियलगिरी केलेली नाही. मी समुद्र किनारीच लहानचा मोठा झाल्याने बीच वैगरे गोष्टींचे मनाला फार कौतुक वाटत नाही पण तरीदेखील व्यापारीकरणापासून अलिप्त असा तो शांत आणि स्वच्छ देवबाग बीच भावला एवढे मात्र नक्की.<br /><br />२०१० च्या शेवटच्या सुर्यास्ताचा आनंद घ्यायला सगळे किनार्यावर जमले होते. बहुतेक सगळ्या फॅमिलीज होत्या. थोड्याच वेळाने मघाशीच फिरून आलेल्या त्या छोट्या छोट्या बेटांच्या पाठीमागे सुर्यनारायण मावळतीला आला. १०-१५ मिनिटे सूर्यास्ताच्या मस्त वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. सूर्यास्तानंतर किनार्यालगत एका ठिकाणी कॅम्पफायरची तयारी सुरू झाली. बाजूलाच बार्बीक्यूसाठी निखारे फुलू लागले होते. दुपारचे जेवण अजुन जिरले नव्हते पण बार्बीक्यूची तयारी पाहून पुन्हा हाणायला तयार होण्यासाठी आम्ही त्या संधीप्रकाशात पुन्हा बीचवर भटकून घेतले. फेरफटका मारुन परत आलो तर कॅंपफायर धगधगत होते. आजुबाजूला गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. स्नॅक्स तयार होता. ज्यांना ड्रिंक्स हवीत त्यांच्यासाठी एका बाजूला वेगळी सोय होती. एकंदरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त माहौल तयार झाला होता.<br /><br />तश्या सगळ्या फॅमिलीज असल्याने ३१ डिसेंबरच्यावेळी असतो तसा फार धांगड धिंगा नव्हता. एकमेकांशी फार ओळख नसल्याने सगळेजण आपल्या आपल्या ग्रूपमध्ये होते. लवकरच मिक्स भजी, चिकन चिली, व्हेज ६५ असा रुचकर आणि अप्रतिम स्नॅक्स सर्व्ह केला गेला. हळू हळू गारठा वाढु लागला तस तसे सगळे खुर्च्या ओढून कॅम्पफायरच्या जवळ येऊ लागले. जवळच समुद्राच्या लाटांचा संथ आणि लयबद्ध आवाज येत होता. एकदम परफेक्ट अशी संध्याकाळ आम्ही अनुभवत होतो. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने तिथे काही वेगळे होते अश्यातला भाग नाही. तिथल्या कर्मचार्यासाठी तो रूटिनचा भाग होता. एका अर्थी सरकारी आळस किंवा निष्क्रियाता का काय ती थोडीफार जाणवली. कदाचित ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर नेहमी दिसणारा झगमगाट आणि गोंधळ तेथे नव्हता म्हणून देखील असं वाटलं असण्याची शक्यता आहे. अधून मधून ते कॅम्पफायरमध्ये लाकडे लावून जात होते. चांदणे फार नव्हते त्यामुळे कॅंप फायरच्या उजेडातच सगळे व्यवहार सुरू होते. थोड्यावेळाने काही लोकं आपापल्या कॉटेजच्या दिशेने पांगली आणि कपडे वैगरे बदलून पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी तिथेच एकत्र जमली. जेवण दुपारपेक्षा छान होते. आलू-पालक तर अप्रतिम होता. कदाचित दुपार पासून यथेच्छ नॉनव्हेज खाऊन झाले असल्याने आम्हाला तो पालक रुचकर लागला असेल. असो जेवणानंतर पुन्हा बीचवर जवळच फेर फटका मारुन नंतर कॅम्पफायरमधली लाकडे वर खाली करत शेकोटी करीत बसलो होतो. कॅम्प फायरची मज्जा लुटण्याचे खूप जुने स्वप्न पूर्ण झाले होते. कोकणातले शिमग्याचे दिवस, समुद्र, काळोख आणि घनदाट सुरूबन यावरून लहानपणीच्या भुताखेतांच्या गोष्टी असे करता करता बारा वाजले. नाही म्हणायला त्या दिवशी देवबाग बीचवर देखील थोडी आतषबाजी केली गेली. हॅपी न्यू ईअरचा नारा झाला. फोनाफोनी सुरू झाली. त्या शांततेत वेगवेगळ्या रिंगटोनचे आवाज येऊ लागले. बीचवरुन समोरच कारवार शहरातून आकाशात सोडले जाणारे फटाके दिसत होते. ती रोषणाई बघून साधारण १ च्या सुमारास आम्ही सगळे आपापल्या कॉटेजवर परतलो. सकाळी लवकर उठून सुर्योदयाबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करायचे होते नां!!!सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-64812637491516282972010-12-31T07:03:00.000-08:002014-10-29T05:47:29.020-07:00२०१० जाता जाता...सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचे स्वागत करायला कारवारला देवबाग बीचवर आलोय. २०१० ची सुरूवात स्कंधगिरीवरुन <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post.html">सूर्योदय </a>पाहून केली होती त्यामुळे २०१० चा शेवट सूर्यास्ताने. बाकी यंदा जास्त फिरणे झाले नाही म्हणून आत्ता २०११ चा पहिला विकांत देवबाग आणि मुरुड़ेश्वर फिरून साजरा करणार. परतलो की पोस्ट लिहायचा विचार आहे पण ईग्रहांची महादशा अजुन संपली नसल्याने आजकाल ब्लॉगिंग पूर्णपणे थंडावले आहे. संकल्प सोडत नाही पण निदान २०११ मध्ये तरी लिखाण नियमीत सुरू व्हावे असे मनापासून वाटते. पाहू...<br /><br />२०१० चा निरोप घेऊन मावळलेला सुर्यनारायण... <br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7ObNk2epQ_vMnldA5fct0Rv8A4WpFhq1xEAzWpi_SzeJy0SEe6O0NdPIDPhGmDBqZ5rqhzjJNLyyrOZ24qJIDzR631iil43FP74uakMRnLVTziUOr60QHDJ8L8-iKEn0uz-Kf52kmrwg/s1600/2010+Sunset.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7ObNk2epQ_vMnldA5fct0Rv8A4WpFhq1xEAzWpi_SzeJy0SEe6O0NdPIDPhGmDBqZ5rqhzjJNLyyrOZ24qJIDzR631iil43FP74uakMRnLVTziUOr60QHDJ8L8-iKEn0uz-Kf52kmrwg/s400/2010+Sunset.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556863289141006098" /></a><br /><br />जाता जाता नवीन वर्षासाठी म्हांराजाकं गार्हानं घालतायं. <br /><br /><span style="font-weight:bold;">रे म्हांराजा !!!!!<br />बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्हाणं घालतायं रे म्हांराजा !!!<br /><br />ह्या सरत्या साला बरोबर हे भ्रष्टचारी, त्यांचे घोटाले, महागाई पण नष्ट होऊदें...<br />व्हयं म्हांराजा !!!<br /><br />लोकांच्या ईडा-पीडा त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाइतक्याच टिकूदें...<br />व्हयं म्हांराजा !!!<br /><br />कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...<br />व्हयं म्हांराजा !!!<br /><br />सगळ्यांका चांगली बुद्धी आणि आरोग्य लाभूदें...<br />व्हयं म्हांराजा !!!<br /><br />आणि येता नवीन वर्ष सगळ्यांका सुखसमृद्धी आणि भरभराटीचो जावंदे...<br />व्हयं म्हांराजा !!!</span>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-418248488647586102010-09-21T04:19:00.000-07:002010-09-22T21:33:12.494-07:00ई ग्रहांची महादशागेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> हॅलो<br /><span style="font-weight:bold;">पलीकडून:</span> साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.<br /><span style="font-weight:bold;">मी:</span> हू ईज़ धिस?<br /><span style="font-weight:bold;">पलीकडून:</span> साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?<br /><br />आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी. <br /><span style="font-weight:bold;">पलीकडून:</span> साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?<br /><span style="font-weight:bold;">मी:</span> हां हां मैने अप्लिकेशन किया था.<br /><span style="font-weight:bold;">पलीकडून:</span> हा करेक्ट साssssर.<br /><span style="font-weight:bold;">मी:</span> कब मिलेगा कनेक्शन?<br /><span style="font-weight:bold;">पलीकडून:</span> अब्बी. <br /><span style="font-weight:bold;">मी:</span> अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ. <br /><span style="font-weight:bold;">पलीकडून:</span> आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.<br /><br />नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.<br /><br />सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली<br /><br /><span style="font-weight:bold;">श्रीनिवास :</span> "साssर, केबल नही है".<br /><span style="font-weight:bold;">मी:</span> क्या??? केबल नही? <br /><span style="font-weight:bold;">श्रीनिवास :</span> हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.<br /><br />मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.<br /><br />हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?<br /><span style="font-weight:bold;">पीडीत:</span> हां <br /><span style="font-weight:bold;">मी:</span> इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?<br /><br />इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.<br /><br />मग श्रीनिवासकडे वळून<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?<br /><br />त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.<br /><br />पुन्हा श्रीनिवासकडे वळून<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> ठीक है ना?<br /><br />ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.<br /><br /><span style="font-weight:bold;">श्रीनिवास:</span> साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.<br /><br />मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.<br /><br /><span style="font-weight:bold;">मी:</span> क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.<br /><span style="font-weight:bold;">श्रीनिवास:</span> (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.<br /><span style="font-weight:bold;">मी:</span> तो अब क्या? मैं क्या करू?<br /><span style="font-weight:bold;">श्रीनिवास:</span> क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.<br /><span style="font-weight:bold;">मी:</span> (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.<br /><br />एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.<br /><br />तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?<br /><br />असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com25tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-61075105931648779342010-08-25T03:24:00.001-07:002011-06-07T07:01:29.320-07:00श्रावण, शाकाहार आणि आम्हीसोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो. <br /><br /> हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.<br /><br /> यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-56590900660115051912010-06-14T08:27:00.000-07:002010-06-14T08:47:17.895-07:00सुट्टी संपली!!!<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzjpcUsq1Q8RlAKQ7tbh2OYmGj_WHSLB6UHGhH96zQEsSOCSEersDIbZuDfAPCAX1BgD5T-l2igVpLl2sqoyLU8ce1v3_e0Xv-Wm23Sl-sbqm6x8yqy9c2Y6LSfqkWn5nmtnsiJD7nuY4/s1600/IMG_0141.JPG"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzjpcUsq1Q8RlAKQ7tbh2OYmGj_WHSLB6UHGhH96zQEsSOCSEersDIbZuDfAPCAX1BgD5T-l2igVpLl2sqoyLU8ce1v3_e0Xv-Wm23Sl-sbqm6x8yqy9c2Y6LSfqkWn5nmtnsiJD7nuY4/s400/IMG_0141.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5482653737331084402" /></a><br /><br />तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या... <br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJt4QwQVZFcrsb4kWEtt9VYIv64gXVwxRJVGdQKa54HD4SdWzK36YlfZuXCHRhE2yrBkdH6CWee9dwlfKAHbI8QO9C2rudTiPoUVno2atUPREnUYDp-pBE0C9UIcOtx35UUj8fwCNMXI0/s1600/IMG_0323.JPG"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJt4QwQVZFcrsb4kWEtt9VYIv64gXVwxRJVGdQKa54HD4SdWzK36YlfZuXCHRhE2yrBkdH6CWee9dwlfKAHbI8QO9C2rudTiPoUVno2atUPREnUYDp-pBE0C9UIcOtx35UUj8fwCNMXI0/s400/IMG_0323.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5482655525968516898" /></a><br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMwe8qHC7SN7sFwP7HshqgQh07bI3RH3tiV__uluFkWozdyOnSz24XlcdoeRYSNhM65k0NXoJwZe81krzr03bFcGDL7-GfkjS-Ht5ENRN82xDW91JOvPhlSplUKuTGH-yvphqnE0fQOs4/s1600/IMG_0321.JPG"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMwe8qHC7SN7sFwP7HshqgQh07bI3RH3tiV__uluFkWozdyOnSz24XlcdoeRYSNhM65k0NXoJwZe81krzr03bFcGDL7-GfkjS-Ht5ENRN82xDW91JOvPhlSplUKuTGH-yvphqnE0fQOs4/s400/IMG_0321.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5482655519881812130" /></a>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-34015018340138209852010-04-30T05:59:00.001-07:002011-06-07T07:01:16.457-07:00फसलेली खादडीआजपर्यंत बर्याच खादडिच्या पोस्ट वाचल्या आणि तोंडाला पाणी सुटलं. किती ही निषेध नोंदवला गेला तरी तो निषेध म्हणजे प्रोत्साहन समजून जनतेने फोटोसकट खादडी महात्म्य सुरुच ठेवले. आज मी माझी खादडीची एक आठवण लिहितोय ज्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटले नाही पण तोंडचे पाणी पळाले होते. <br /><br />झालं काय तर अमेरिकेत असताना दर दुपारी जेवायला बाहेर जायचो. भारतातून गेलेले आम्ही दोघे, मी आणि चंद्रु, नेहमीच दुपारी बाहेर जायचो. दररोज टॅकोबेल, चिलीज्, पिझ्झाहट, बर्गर-किंग, चिपोटले, कधी चायनीज तर कधी जापनीज अश्या ठराविक ठिकाणी आलटून पालटून भेटी दिल्या जायच्या. शुक्रवारी ऑफीसचे इतर लोक देखील घरून लंचबॉक्स न आणता बाहेरच येत असतं. अश्याच एका शुक्रवारी आमच्या बरोबर आमच्या टीम मधले ३-४ अमेरिकन निघाले जेवायला. कुठे जायचं कुठे जायचं करता करता Joe's या इटालियन रेस्तोरंटला जायचे असे ठरले. तो पर्यंत मेक्सिकन, जापनीज चाखुन झालेच होते. आम्ही पण म्हटले चला आत्ता इटालियन होऊन जाऊ दे. Joe's ला गेलो. आत गेल्या गेल्या शोले स्टाइलमध्ये कितने आदमी है वैगरे विचारून झाल्यावर आम्ही सगळे मावू असे टेबल दिलं गेलं. मी, चंद्रु आणि टॉम असे तिघे बसलो. टॉम वेगन होता. हे वेगन लोकं म्हणजे नॉनव्हेज सोडाच पण दुधापासून बनलेले पदार्थ पण खात नाहीत. फक्त नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी घासपुस आणि त्यापासून बनणारे पदार्थ खातात म्हणे. इतर अमेरिकन जसे सकाळ संद्याकाळ कॉफीचा एक मोठा मग नाहीतर कोल्डड्रिंकचा टीन घेऊन फिरताना दिसायचे तिथे हा पठ्ठ्या केवळ पाणी प्यायचा. ऑफीसपार्टीला देखील डोनट सोडून कुठल्या चीज-बर्गर अश्या पदार्थांना देखील शिवायचा नाही. आधी टॉम वेगन आहे म्हणून हे सगळं खात नाही असं मला कळलं तेंव्हा वेगन म्हणजे काहीतरी रोग असावा असं मला वाटलं होतं पण वेगन हा रोग नसून तो डाएट आहे हे मला नंतर कुणीतरी सांगितलं. त्यात विकीपिडियावर वेगनबद्दल पहिल्या ओळीतच हा काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्णपणे विरुद्ध जीवनशैलीचा प्रकार आहे हे समजताच मी ते पेज बंद केलं. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही तिथला पत्ता कशाला शोधा... असो. तर असा हा टॉम (बिच्चारा!!! व्यर्थ ते जीवन) त्याच्या ह्या वेगन डाएटमुळे म्हणे त्याचे विमान प्रवासात हाल व्हायचे आणि ह्या एकाच कारणामुळे तो कधी अमेरिकेबाहेर गेला नव्हता.<br /><br />तर मूळ मुद्दा असा की मला आणि चंद्रुला दोघांना ही काय ऑर्डर कारायचं काहीच माहीत नव्हतं. इतर वेळी रेस्तोरंटमध्ये जायच्या आधी आम्ही <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_23.html">लिंडाला</a> विचारून अमुक अमुक ठिकाणी काय मागायचं ते विचारून जायचो आणि हाणून यायचो. आज बरोबर टीममधली लोकं असल्याने आम्ही लिंडाला काही न विचारता आलेलो. त्यामुळे सहाजिकच टॉमला तूच आमच्यासाठी (काहीतरी नॉनव्हेज) ऑर्डर दे असं सांगितलं. त्याप्रमाणे टॉमने सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. साधारण १५-२० मिनिटांनी तो वेटर एका प्लेटमध्ये पालापाचोळा आणि एका परडीमध्ये बरेचसे पाव घेऊन आला. ते बघून आम्ही आधी "ह्याने काय होणार" या अर्थी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि टॉमला तू सगळ्यांसाठी एकच डिश ऑर्डर केलीस का? असे विचारले. नंतर आम्हाला कळले की इटालियन रेस्तोरंट मध्ये गेलं की हा घास पूस प्रकार येतोच. मग आम्ही आपले चीज लावून दोन दोन पाव आणि ती कोवळी पाने खाल्ली आणि उरलेली भूक मुख्य ऑर्डरसाठी राखून ठेवली. थोड्या वेळाने वेटर उरलेले पाव आणि आमच्या रिकाम्या डिश घेऊन गेला आणि दुसर्याने ऑर्डर प्रमाणे प्रत्येका समोर मेन मेनू आणून ठेवला. आमच्या दोघांसाठी टॉमने पास्ता ऑर्डर केला होता. चंद्रुसाठी पेन्ने रिगाते आणि माझ्यासाठी असच एक अगम्य नाव असलेली डिश. चंद्रुची डिश निदान दिसायला तरी देखणी आणि आकर्षक होती. टॉमच्या पुढयात मात्र मागाच्याच घासपूसप्रमाणेच पण जरा अधिक चांगली दिसणारी डिश होती. पण माझ्या पुढयातील प्रकार पाहण्यालायक देखील नव्हता. माझ्यासाठी टॉमने काहीतरी चिकनची डिश ऑर्डर केलेली. चरबी किंवा पातळ मऊ रबराचा शोभेल असा एक सेंटिमीटर जाडीचा कसलासा थर होता, तो चमच्याने भोसकला तर रक्त यावं तसा लाल लाल जरा जरा घट्ट असा (टोमॅटो??) सॉस बाहेर आला. आत चमच्याने ढोसून पाहिलं तर काही तुकडे असावेत असा अंदाज आला. बहुतेक तेच चिकन असावं. स्मगलिंग केल्यासारखं चिकन त्या अगम्य थराखाली लपवून ठेवलं होतं. रेस्तोरंटमध्ये शिरल्या पासून जो एक प्रकारचा आंबट वास येत होता तो त्या सॉसचाच होता ह्याची खात्री पटली. जसं दुसर्याची बायको चांगली दिसते (असं म्हणतात बुवा, आम्हासनी काय बी ठावं नाय) तसं मला दुसर्यांच्या पुढयातल्या डिश चांगल्या वाटू लागल्या. चंद्रुच्या डिशमध्ये पिवळ्या रंगाच्या रेघा-रेघांच्या एक दीड इंच लांबीच्या लांब नळ्या होत्या. त्या पण रबरीच दिसत होत्या. काही माणसे कशी स्वभाव कळण्या अगोदरच प्रथम दर्शनीच मनातून उतरतात तशीच माझ्या पुढयातील डिशदेखील चाखण्याआधीच माझ्या जिभेवरून उतरली होती. पहिल्या प्रथम मी तो थर फाडून बाहेर आलेला चमचा भर सॉस घेतला. जसजसा तो तोंडाजवळ नेत गेलो तसतसा त्याचा वास (दर्प) अधिकच जाणवला. जिभेवर ठेवताच डिश जशी दिसते तशीच आहे ह्याची खात्री पटली. मी चंद्रुकडे पाहिलं तर तो काट्या-चमच्यामध्ये त्या नळ्या पकडून गिळण्यात रमला होता. मला वाटलं नळ्या दिसतात त्या प्रमाणे चांगल्या असाव्या. टॉम नेहमीप्रमाणे प्रसन्न वदनाने वदनी केवळ पाला पाचोळा घेत होता. बहुतेक माझाच गेम झालाय असं मला वाटलं आणि मी पण माझं थोबाड् शक्य तितकं प्रसन्न ठेवत आणखी दोन चमचे ओरपले. गिळायला होईना. त्या सॉसचा वास तर नाकात घुमत होता. शेकडो मैल दूर असून देखील मला अचानक कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये आंबा घाट लागल्यावर मुलं ओकली की जो वास येतो तो आठवला आणि अजुन कसतरीच झालं. मग पटकन पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सॉस गिळला. मग म्हटलं चला काहीच नाही तर चिकनचे तुकडे हाणू म्हणून सॉसमध्ये चमच्याने शोधाशोध करून दोन तुकड्यामध्ये चमचा खुपसला आणि मोठ्या अपेक्षेने स्वाहा केले तर इथेही त्या तुकड्यानां लागलेला सॉस आपली चव पुन्हा उतरवून गेला. चिकन देखील चिकन नसून कसल्याश्या कंदमुळाचे उकडलेले तुकडे असावे असे वाटले. इथेही पचका. जिथे भरोश्याच्या चिकनने ऐनवेळी घात केला तिथे त्या रबरी थराकडून काडीची देखील अपेक्षा नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे ती खरी केली. बहुतेक मैद्याचा थर असावा, मला तो घास गिळल्यावर आठवडाभर दररोज १-२ किमी धावलो तरच हा थर आपल्या पोटातून निघून जाईल असे वाटले. एखाद्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात (मुंबई इंडियन्स फाइनल हारल्यावर सच्चुपण असचं म्हणाला होता) तसा माझ्या आयुष्यातला तो दिवस होता. <br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEix2xw6FX2N-vodlDqnAIXA1mNlZmjl-PPrdbxOUVAXqRbP4Y6womPCDWig49TyvE2g4w-hpf5W7qPv6tsMaAwPbbpwbJdM8Qe-hvnTxmRq1oWceAOgRnIg3qHQqMCBR0Y0jUx_gljWfIk/s1600/Penne+Rigate.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 325px; height: 288px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEix2xw6FX2N-vodlDqnAIXA1mNlZmjl-PPrdbxOUVAXqRbP4Y6womPCDWig49TyvE2g4w-hpf5W7qPv6tsMaAwPbbpwbJdM8Qe-hvnTxmRq1oWceAOgRnIg3qHQqMCBR0Y0jUx_gljWfIk/s400/Penne+Rigate.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5466611425605399618" /></a><br /><br />चंद्रुदेखील आधी आवडीने खातो आहे असं मला वाटलेलं पण तो देखील जरा थंडावला होता. पण त्याने कसं बसं का होईना बर्याचश्या नळ्या घश्याखाली उतरवल्या होत्या. मी त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण पण डोळे मिटून गिळून टाकु म्हणून पुन्हा माझ्या डिशकडे वळलो आणि सॉस, चिकन, रबर असे जे काय मिळेल ते एकत्र चमच्यात उचललं आणि मुखी लावलं. म्हटलं एक एक डिश खाण्याची ठराविक पद्धत असते, हे सगळं एकत्र चांगलं लागत असेल. जशी म.रा.प.म.च्या बस स्टॅंडवर सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्यावर रस्सा ओतला की कशी मिसळ बनते आणि समस्त जनता ती कशी आवडीने खाते. तिथेही जर एक एक टाकाऊ पदार्थ वेगळा खायला गेलं तर त्याला घंटादेखील चव नसते पण बाकीच्या टाकाऊ पदार्थंबरोबर कसं 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' होतं. म्हटलं तसं करून पाहू पण नाही. तिथे ही आधी सॉसचा वास, मग सॉसची चव आणि मग कंदमुळं अश्या क्रमाने पुन्हा सगळं पाण्याच्या घोटाबरोबर माझ्या पोटात गेलं. त्या रबराला रंग रूप सोडलं तर वास, चव आणि इतर काहीच गुणधर्म नव्हते. त्या क्षणी टॉमकडे पाहून मलादेखील आपण वेगन बनून पालापाचोळा खावा असे वाटून गेले. बहुतेक टॉमने लहानपणी हीच डिश खाल्ली असावी आणि त्या घटनेने त्याला आयुष्यभरासाठी वेगन डाएटची दीक्षा घेण्यास प्रवृत्त केले असावे. <br /><br />एव्हाना आज उपाशी राहावं लागणार हे समजून चुकलं होतं. भूक तर काहीच भागलेली नव्हती. मनातून सारखं त्या वेटर ला बोलावून "अरे ते माघाचचे पाव घेऊन ये रे जरा" असे सांगावेसे वाटत होते. टॉमदेखील माझ्या डिशकडे "Sid didn't like it huh?" पाहून असं म्हणाला. मी कसबसा हसलो. कारण नाही नाही, मला आवडली, ठीक आहे असं काही म्हणणं शक्य नव्हतं. चार पाच चमचे सोडले तर ती डिश जशीच्या तशी होती. मी देखील प्रथमच असं अन्न टाकून उठनार होतो. पण काही इलाज नव्हता, मी माझ्या परीने प्रयत्न केला होता. वेटरने देखील पॅक करून देऊ का? असं विचारलं. मी नको म्हटलं आणि आम्ही बिल वैगरे भरून तीकडून बाहेर पडलो. ऑफीसला आल्यावर जवळची सगळी चिल्लर वेंडिंग मशीन मध्ये टाकून वेफर्स, कूकीज, चॉक लेट्स असं जे मिळेल ते खाल्लं आणि वरुन पाणी प्यायलो. त्या दिवसापासून संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ऑफीसच्या बॅगेत मॅगीचं एक पॅकेट ठेवू लागलो. लिंडाला देखील माझा कसा पोपट झाला ते सांगितलं पण झालं भलतचं. तिला इटालियन खूप आवडायचं आणि ती आत्ता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जाते असं म्हणाली. गेम झाला. लिंडाला नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही Joe'sच्या वारीला गेलो. ह्या वेळी मात्र भविष्यातली गुंतवणूक म्हणून मी आधीच ५-६ पाव आणि सगळा पाला पाचोळा साफ करून टाकला. मागच्या वेळी चंद्रु "इतक्या काही खास नसतात पण गिळण्यालायक असतात" असं म्हणाला होता म्हणून मी त्याच्या अनुभवावरून ह्या वेळी त्या पिवळ्या नळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्याने सांगितल्या प्रमाणे त्या नळ्या गिळण्याइतपतच बर्या होत्या आणि ऑफीसमध्ये मॅगीचे पॅकेट असल्याने चिंता नव्हती. पण तेंव्हापासुन कानाला खडा लावला आणि पुन्हा कधी इटालियन रेस्तोरंटचं नाव देखील काढलं नाही.<br /><br />तर ही होती माझ्या फ़सलेल्या खादडीची कहाणी. <br /><br />(ता. क. भारतात परत येताना फ़्लाइटमध्ये एअरहोस्टेसने जेवणासाठी माझ्यापुढे पास्ता धरला त्याच वेळी माझ्या MP3 प्लेअरवर "भय इथले संपत नाही" हे गाणं सुरु झालं हा योगायोग असावा.)सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-80825164389162711532010-03-29T09:56:00.000-07:002011-02-06T22:06:51.809-08:00एक क्षण मोहाचागेले काही महिने रोज सकाळी हा मोहाचा क्षण येतो. रोज रात्री झोपताना न चुकता सकाळी सहा साडे-सहाचा गजर लावतो. का तर सकाळी उठून जॉगिंगला जायचे. कमरेभोवती साइकलचा टायर झालाय. म्हटलं त्याची स्कूटर आणि नंतर सुमो किंवा ट्रॅक्टरच्या टायरपर्यंत पदोन्नती व्हायच्या आत काही हालचाल करायला हवी. कोंबडी-बोकडाच्या रूपाने कॅलरी नित्यनेमाने शरीरात प्रवेश करत असतात आणि वर आम्ही निर्लजपणे दिवसभर कचेरित क्लिकक्लिकाट करीत बसलेले. त्यात शुक्रवार हा चिकन बिर्याणी आणि शोरमा रोल खाल्ल्याशिवाय जात नाही. असो ही पोस्ट खादडीवर नसून खादडीच्या दुष्परिणामांवर आहे त्यामुळे तोंड आवरतं घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की सकाळी गजर झाला की हात आपसूक ताणला जातो आणि गजर बंद करण्यात येतो. रोज वेगवेगळी कारणं असतात. गुरुवार ते रविवार "आज कुठे सोमवार पासून जाऊ", सोमवारी "वीकेंडला जागरण झालाय. झोप पूर्ण करू. आज पासून पुन्हा काम करायचं आहे". मंगळवार बुधवार मनात येईल ते काही कारण. महिन्याच्या २० तारखेनंतर "अरे आत्ता कुठे १ तारखेपासून जाऊ." तरी नशीब मी पोर्णिमा-आमावस्या बघत नाही. डिसेंबर मध्ये नवीन वर्षाचा संकल्प करू असं म्हणून टाळलं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर "आत्ता नवीन वर्षाच्या संकल्पवाल्यांची गर्दी असेल" म्हणून टाळलं. स्व:तच स्व:तला द्यायची असली तरी कारणे कशी स्व:तच्या मनाला पूर्णपणे पटतील अशी. उगीचच "आज कंटाळा आलाय", "आज नको उद्या जाऊ" अशी थातुर मातुर कारणे कधी नाही दिली. <br /><br />तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.<br /><br />दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार? <br /><br />बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?<br /><br />असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-38895720493145118292010-02-24T06:04:00.001-08:002011-06-07T07:00:56.235-07:00किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEje-k41eIAXdqeQOg2t1OchWvcIKPa3fuIzdsmsHSYThfUh4GoMOZ_grX9TJYEcDkRjfap52lYwaXRDywKmTPn3zKi2gSILIJQiEiH1EcFZCDB6nOPY9jftF0bV00OYgUG9awdVEAxUw74/s1600-h/Sachin.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 288px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEje-k41eIAXdqeQOg2t1OchWvcIKPa3fuIzdsmsHSYThfUh4GoMOZ_grX9TJYEcDkRjfap52lYwaXRDywKmTPn3zKi2gSILIJQiEiH1EcFZCDB6nOPY9jftF0bV00OYgUG9awdVEAxUw74/s400/Sachin.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5441821120093247410" /></a><br /><br />वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. अन्वरने हा रेकॉर्ड भारता विरुद्धच केलेला. त्यामुळे तो घाव ही अनेक वर्ष आपल्या उरावर होता. सेहवाग कधीतरी ह्या जखमेवर मलम लावेल ह्याची खात्री होती. पण आज सचिनने ते करून दाखवले. मग २०० कधी होणार? मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. चेंडू कमी कमी होऊ लागले आणि तिकडे धोणी पेटला. नुसते चौके छक्के. म्हटलं काय रे बाबा.... पण नाही शेवटी तो क्षण आला. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार हाणून धोणीने दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सचिनला स्ट्राइक दिला. सचिन १९९ नाबाद. मग वेळ न काढता, उत्कंठा न वाढवता सचिनने पुढाचाच चेंडू एका धावेसाठी तटावून एक दिवशीय क्रिकेटमध्ये २०० धावा करण्याचा विक्रम केला. नेहमीप्रमाणे हेल्मेट काढून आकाशाकडे पहात बॅट उंचावली. ऐन शिमग्यात देशभर दिवाळी सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या सचिनने एकदिवशीय क्रिकेट मध्ये प्रथम २०० धावा करण्याचा मान मिळवला. आज अगणित रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अहो फार कशाला तो एक धाव करून आउट झाला तरी ती धाव विश्व विक्रमीच असते. २०० केले त्यापेक्षा अन्वरचा रेकॉर्ड मोडला ह्याचा जास्त आनंद आहे. ह्या एका माणसाने गेली २० वर्षे जे काही केलं आहे त्याला तोड नाही. मी काय बोलणार त्याबद्दल. फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेला माणूस. परवाच्याच मॅचचं घ्या. भारत एका धावेने जिंकला आणि त्याधीच्या षटकामध्ये सचिनने जी डाइव मारुन चौकार अडवला ते पाहून १५-२० वर्षाच्या मुलांनी पण तोंडात बोटं घातली असतील. कोण म्हणतं होतं ते ३ वर्षापूर्वी की सचिन ने आत्ता रिटायर व्हायला हवे. आज या आणि बोला. <br /><br />मला नाही वाटतं की कुणी आत्ता भारत दक्षिण आफ्रिकेची जी उरलेली मॅच सुरू आहे ती बघत असेल. न्यूज़ चॅनेल तर फक्त सचिन सचिन आणि सचिन. आजतकने तर नेहमी प्रमाणे अब्दुल कादिरला फोन करून १९८९ मध्ये सचिनने केलेल्या जखमांवरची खपली काढली. अब्दुल कादिरला पुन्हा अल्ला आठवला. जाता जाता अब्दुल कादिर सचिनला शुभेच्छा देताना म्हणाला की "यह रेकॉर्ड सिर्फ सचिन को शोभा देता है, शायद इसिलिये आज तक २०० के इतने करिब जाने के बाद भी कोई २०० को छू नही सका". खरं आहे गेला बाजार हेडन, गिलख्रिस्त आणि आत्ता सेहवाग, गेल आणि असे कितीतरी स्फोटक खेळाडू असताना २० वर्षांनंतर सचिननेच एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वप्रथम २०० धावा केल्या ह्यातच सर्व आले. ब्रायन लाराने कसोटी मध्ये सर्वप्रथम ४०० धावा केल्या त्यामुळे आत्ता कुणीही ४०० चा टप्प ओलांडला तरी लाराने पहिल्यांदा तो ओलांडला असल्याने लाराचं कौतुक कायम राहाणार. तसेच आज आपल्या सचिनने एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २०० चा टप्पा ओलांडाल्यामुळे उद्या कुणीही २०० चा टप्पा ओलांडला तरी आपला सचिनच लक्षात राहाणार. या आधीच अनेक वेळा सचिनला <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_14.html">मानाचा मुजरा</a> करून झालाय.आत्ता काय काय लिहु अजुन. आज इतकं तृप्त वाटत य की काय सांगू. आज मला माझा स्वत:चाच हेवा वाटतोय की मी सचिनला २०० धावा करताना याची देही याची डोळा पाहिले. काही काही गोष्टी न मागता मिळतात. आजची ही सचिनची खेळी त्यापैकीच एक...<br /><br />~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~<br />याच विषयी आधी <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/08/blog-post.html">नवज्योतसिंग सिद्धूची मला सर्वात भावलेली कॉमेंट</a><br />~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~<br /><br />.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-78690912794517964572010-02-13T22:01:00.000-08:002012-02-13T22:03:51.076-08:00मेरा पहेला प्यार!!!कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.<br /><br />तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.<br /><br />आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDE9j6zY7QPP76TfSkZ2dCOZrt1PV8uWr4Tjf4vWfHBY-4UHMOP9HMfyIOQ8HmqySVUMNujRyXGd32w9-x6XxeBxud9SpRHwsG5xCMNOx_MnEPLFPSHmCPDx3fH012a7rYFXk6SneXjsc/s1600/Fish+Fry.bmp" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="238" width="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDE9j6zY7QPP76TfSkZ2dCOZrt1PV8uWr4Tjf4vWfHBY-4UHMOP9HMfyIOQ8HmqySVUMNujRyXGd32w9-x6XxeBxud9SpRHwsG5xCMNOx_MnEPLFPSHmCPDx3fH012a7rYFXk6SneXjsc/s400/Fish+Fry.bmp" /></a></div>सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-62296867451133857252010-01-30T20:39:00.000-08:002011-06-07T07:00:37.169-07:00क्षत्रिय कुला"वसंत"वसंत नावाचा माझा एक मित्र. पुण्यात असताना ह्या दिव्य व्यक्तीशी माझी ओळख झाली. एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आपल्या घराण्याचा फार अभिमान होता त्याला. कधी काळी पणजोबा खापर पणजोबांनी कुठे राजेशाही अनुभवली होती पण लौकिक अर्थाने राजेशाही गेली तरी पणजोबा खापर पणजोबांचे रक्त मात्र आज ही ह्यांच्या धमन्यांमधून वाहतं आहे. हल्लीच्या युगात देखील ह्यांच्या घरी मानपान, घराण आणि तत्सम राजेशाही थाट टिकून आहेत. पण 'राजविलासी आणि घोडे पलंगाशी' अशा पार्श्वभुमीतून डाइरेक्ट आमच्या सारख्या सामान्य मावळ्यांमध्ये येऊन पडल्यामुळे त्याची 'न घर का ना घाट का' अशी परिस्थिती झालेली. त्याचे जगण्याचे आणि जगाबाद्दलचे फंडे वेगळेच होते आणि शिक्षण संपल्यावर प्रथमच घराबाहेर पडल्यावर खरोखराच्या जगात आपले फंडे संभाळाताना त्याचे हाल झाले.<br /><br />जे लोकं आम्हा दोघांना ओळखतात आजसुद्ध मला प्रत्यक्ष किंवा फोन वर भेटल्यानंतर पहिल्यांदा "त्याची" चौकशी करतात. "तो" काय म्हणतो किंवा "त्या" चे नवीन पराक्रम (आमच्या भाषेत गेम) याबाबत विचारणा आधी होते. अर्थात "त्या"ला भेटलेला "त्या"च्या सोबत चार "गोष्टी" बोललेला, त्याचे जगावेगळे फंडे ऐकलेला माणूस त्याला विसरणे अशक्य. व्यक्तिमत्वच असे आहे. एखादी सरळ साधी गोष्ट बेकायदेशीररित्या करण्यात ह्याला परमानंद मिळतो. मग ते काही असो. आमची जेंव्हा सुरुवातीला ओळख झाली तेंव्हा माणूस मरणाचा कन्फ्यूज़ होता. विषय काही असो, ह्याचे काही ठराविक फंडे. त्याच्या चौकटीमध्ये काही बसल नाही की माणूस खचला. त्यावेळी आम्हा सगळ्यानाच जॉबची घाई होती. कधी कधी कोणा मित्राला जॉब मिळाल्याची खबर येई. मग तो कुठल्याही डोमेन मधला असो. ज्याला जॉब मिळेल त्याची लाईन चांगली. कोणाला नेटवर्किंग मध्ये जॉब मिळाला की हा सुरू झाला, "अबे तो कोर्स साही आहे. xyz ला Offer लेटर मिळाला आहे, त्याचा Format घेऊ. अमुक अमुक ठिकाणी Experience लेटर बनवून मिळतात. आपण तस करू, १-२ Fake Project टाकु. मस्त जॉब लागून जाईल." बाकी मार्कशीट, लेटरहेड आणि तत्सम प्रकार कुठे छापून मिळतात हे ह्याला माहीत. मला तर वाटते ह्याने मोठा झाल्यावर आपले २-३ फेक जन्मदाखले बनवून घेतले असतील. ना जाणो उद्या जॉब च्या वेळी वय आडवे आले तर लगेच २ वर्षानी माणूस लहान. वय, अनुभव, आणि जे काही बदलता येईल ते सगळ शक्य. कुठेही कसली डिपेंडेन्सी नाय पाहिजे. हा इंजिनियरिंग पास झाला तेंव्हा खुद्द ह्याच्या आजोबांनी "हे पोट्ट पहिल्याच फटक्यात पास झालं म्हणजे दाल मे कुछ काला है" असे कौतुकाचे उद्गार काढले होते. ड्यूप्लिकेट चाव्या बनवणे हा आणखी एक आवडता उद्योग. बेकायदेशीर गोष्टींचा पुरस्कर्ता. एकाचे पासपोर्टचे काम सुरू होते. सगळे व्यवस्थित पार पडले होते. ज्याचे काम होते त्याने सगळे चौकटीमध्ये केले होते. पण हे साहेब काही मान्य करायला तयार नाहीत. "अबे तू पोलिसाना काहीतरी द्यायला हवे. नाहीतर ते तुला कुठेतरी अडकवतील. तुला द्यायचे नसतील तर नको देऊ, मी देतो." जणू काही कोप होईल आणि पासपोर्ट पचणार नाही. पण नाही... अशी कामे कायदेशीर होऊच शकत नाहीत. झाली तरी मी होऊ देणार नाही. हल्ली Dual सिम कार्डचे मोबाइल मिळतात, पण ह्या सदगृहस्थाकडे ही सिस्टम ४ वर्षापूर्वी अस्तित्वात होती. कुठून काळ्या कांड्या करून ह्याने तो सिम कार्ड स्विच आपल्या मोबाइल मध्ये अक्षरश: घुसुवन बसवला होता. बर दोन वेगळे नंबर असण्याची काही गरज नव्हती, पण...<br /><br />झोल करायची इतकी आवड की मध्ये टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये जागा भरायच्या होत्या. चांगली मोठी पोस्ट होती. साहेबाना कुठून तरी खबर लागली. भरला फॉर्म. त्यामध्ये नेमणुकीसाठी तीन पसंतीची ठिकाणे द्यायची होती. साहेबानी पहिली पसंती बिहारला दिली. का तर तिथे बेकायदीशीर कामा शिवाय काहीच होत नाही. क्रिकेट खेळणारा माणूस जसे लॉर्ड्स वर खेळण्याचे स्वप्न पाहत असेल तसे हे बिहार मध्ये जाउन भ्रष्टाचार करायला उतावळे झालेले.<br /><br />कला क्रीडा साहित्य ह्या विभागांमध्ये अत्यानंद. कोणाची शेपूट कोणाला लावेल ह्याचा पत्ता नाही. मध्यंतरी ब्रायन लाराने ४०० धावा करून विश्वविक्रम नोंदवला. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. साहेब पण आमच्या बरोबर होते. डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे किडे वळवळ करत होते. आमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष्य नव्हते. पण मध्येच काही तरी आपला सहभाग दाखवावा म्हणून "काय केले लारा दत्ता ने ?" असा प्रश्न टाकून दिला. उद्या अभिनव बिन्द्राने सचिन तेंडुलकरचा क्रिकेट मधला विक्रम ओलिंपिक मध्ये मोडला हे संगितल तरी तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघणार नाही, उलट हे व्यवस्थित लक्ष्यात ठेवून उद्या दुसर्या कोणाला तरी ठसका लावेल ह्याची खात्री आहे. तसा तो कला क्रीडा साहित्या ह्या विभागामध्ये मलाच काय पण कुणालाही नडणार नाही. कारण ह्याला साप्ताहिक/मासिक/पेपर मध्ये भविष्य आणि पेज थ्री बातम्या आणि काही आकर्षक फोटो हे सोडून बाकी कश्याशी पडलेली नसते. राजकारणात थोडेफार स्वारस्य आहे पण ते राजकारणात नसून राजकारणामुळे मिळणार्या गोलमाल करण्याच्या ताकदीत आहे हे वेगळं सांगायला नको.<br /><br />आत्ता पोरीबाबत. ह्या बाबतीत ह्यानी आध्यात्मिक पातळी गाठलेली. M G रोड वर आढळणार्या सगळ्या पोरी xxx हा नियम. एखादी मुलगी ही मैत्रीण वैगरे असूच कशी शकते? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले म्हणजे केवळ "लफडं"च असू शकते. त्याला दुसरे नाव असूच शकत नाही. पोरी बरोबर मैत्री करून काय करणार? हा वरती भाबडा (?) प्रश्न. वरतीअमुक एक मुलगा एका मुलीबरोबर बोलतो तरी पण त्या दोघांमध्ये "तसलं" काही नाही मग काय आहे? दुसर असूच काय असु शकत? बरं आमची पण कोणी खास मैत्रीण नव्हती, त्यामुळे आम्हीही कधी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. तसही उत्तर देऊन काही फरक पडणार नाही ह्याची खात्री अजूनही आहे. नशीब माणसाने "दोस्ताना" नाही पहिलाय. आम्ही कोणी त्याला बघावा म्हणून आग्रह ही करणार नाही. ह्याची केमिस्ट्री बदलून "गे"मिस्ट्री व्हायला नको. आमचे जिणे मुश्कील होऊन जाईल. ह्याचे फंडे बदलले म्हणजे ह्याच्या समोर मित्राबरोबर जायची/फिरायाची पण चोरी होईल. रूम पार्ट्नर बरोबर पण रहता येणार नाही. हा माणूस सगळ्याना वाळीत टाकेल. अजुन एक आठवल. वळू पिक्चर बद्दल बोलणे सुरू होते. मध्येच एकाने ह्याला खोचकपणे विचारले "वळू म्हणजे काय माहीत आहे?" उत्तर: "अबे हा वळू धड बैल ही नसतो धड गाय ही नसते... मधलाच असतो... काही कामाचा नसतो मग त्याला सोडून देतात गावभर, त्याला वळू म्हणतात..." साहेबाना सर्वसामान्य स्त्रीलिंग व्यर्ज आहे. त्यांच्यासाठी तीन लिंग. पुल्लिंग, डार्लिंग आणि नपूसक लिंग.<br /><br />हे सगळे फंडे असून माणूस शेवटी एक दिवस प्रेमात पडला. पडला म्हणजे कोसळला. पोरीबद्दल जे फंडे होते ते विसरला. पोरगी बरोबर लफडं सोडून नुसतं प्रेम देखील करू शकतो हे साहेबाना समजले. सध्या साहेब प्रेमात गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे जरा नॉर्मलला आलेले आहेत. पण आमचे वांदे झालेत. आमच्या आयुष्यातली मज्जा निघून गेली आहे. बघू प्रकरण किती आणि कसे पुढे जाते. <br /><br />हा माणूस म्हणजे आमच्या अळणी आणि बेचव आयुष्यामधले मीठ आहे. ह्याच्यामुळे कित्येकदा आम्ही मनापासून खळखळून हसलो आहोत. एकदा एकदा सगळ्याना वाटता ह्याचे फंडे समजले. आत्ता हा माणूस आपल्याला कळला पण नाही. साहेबाकडे फंडे अनलिमिटेड. ह्याच्याबद्दल लिहावं असं कधीपासून मनात होत. शेवटी लिहलं एकदाचं. काय काय आणि किती लिहावं कळतं नव्हतं. काही गोष्टी आठवल्या पण नाहीत. ह्या माणसाला कागदावर उतरवणे सोप नाही.<br /><br />~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~<br />अशीच काही <a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_23.html">मला भेटलेली माणसं</a><br />~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com12