<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955</id><updated>2012-01-24T03:26:09.594-08:00</updated><category term='आवडी-निवडी'/><category term='गाणे'/><category term='मनोगत'/><category term='अमेरिका'/><category term='दहशतवाद'/><category term='झोप'/><category term='इंटरनेट'/><category term='आळस'/><category term='भ्रष्टाचार'/><category term='ऑफीस'/><category term='बंगलोर'/><category term='चोर'/><category term='शिमगा'/><category term='IT Industry'/><category term='आठवणी'/><category term='कथा'/><category term='महाभारत'/><category term='नवं वर्ष'/><category term='ट्रेक'/><category term='विनोदी'/><category term='स्कंधगिरी'/><category term='शाळा'/><category term='खादडी'/><category term='चोरी'/><category term='वाढदिवस'/><category term='बी.एस्.एन्.एल्.'/><category term='लता मंगेशकर'/><category term='सूर्योदय'/><category term='दिवाळी'/><category term='शहीद'/><category term='रत्नागिरी'/><category term='राजनीति'/><category term='मला भेटलेली माणसं'/><category term='मी'/><category term='जनरेशन गॅप'/><category term='बालपण'/><category term='मस्त्याहार'/><category term='गजाल्या'/><category term='सण'/><category term='धुकं'/><category term='कोकण'/><category term='काम'/><category term='नाताळ'/><category term='महादशा'/><category term='स्वप्न'/><category term='बीच'/><category term='प्रेम'/><category term='हापूस आंबे'/><category term='सचिन तेंडुलकर'/><category term='शुभेच्छा'/><category term='लेखन'/><category term='व. पु. काळे'/><category term='सूर्यास्त'/><category term='चित्रपट'/><category term='पहाट'/><category term='सुट्टी'/><category term='लेखक'/><category term='भटकंती'/><category term='भारतरत्न'/><category term='गूगल'/><category term='सवय'/><category term='श्रावण'/><category term='क्रिकेट'/><category term='मित्र'/><category term='स्वगत'/><category term='पोलिस'/><title type='text'>माझ्या गजाल्या</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>45</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-1488077672992778950</id><published>2012-01-17T00:53:00.000-08:00</published><updated>2012-01-24T03:26:09.609-08:00</updated><title type='text'>उत्तरायण...</title><content type='html'>&lt;br&gt;&lt;p&gt;हुश्श्श्शsssssssss&lt;/p&gt;&lt;p&gt;गेले दोन महिने नाही नाही तब्बल साडेसात वर्षे ज्या दिवसाची वाट पहात होतो तो एकदाचा उजाडला. बंगलोरमध्ये आल्या दिवसापासूनच इथून परत पुण्याला कधी जाणार ह्याचाच विचार सुरु होता. बघता बघता साडेसात वर्षे गेली. शेवटी एकदा १५ नोव्हेंबरला, माझ्या आईच्या वाढदिवशी सगळे फायनल झाले आणि हातात ऑफर यायच्या आधीच तिला वाढदिवसाची भेट म्हणून पुणे परतीची खुष खबर दिली. अर्थात मधल्या काळात पुण्याला जायला मिळणार अश्या आशा खूप वेळा निर्माण झाल्या होत्या, पण जम्याच नही. पुण्याला यायला मिळावे म्हणून "मल्टी कलर सनफ्लॉवर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी पण जॉईन केली पण त्यांनी तर नुसत्या हुलकावण्या दिल्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये तर पुण्याला प्रोजेक्ट मिळून देखील जाऊ दिले नाही. शेवटी जूनमध्ये एक वर्ष वाट पाहून "मल्टी कलर सनफ्लॉवरला" सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. सगळे जमून येईपर्यंत नोव्हेंबर उजाडलाच. हो नाही करीत करीत राजीनामा मंजूर झाला. तरी हलकट बॉस एवढा प्रोजेक्ट संपू दे (कधी ते माहीत नाही), मी स्वतः तुला पुण्यात प्रोजेक्ट मिळवून देतो, ते नाही तर निदान जानेवारी संपेपर्यंत थांब, निदान २६ जानेवारीचे झेंडा वंदन करून जा... एक ना दोन... कसला दीनवाणा चेहरा करून यायचा. लाईन चुकली बिचाऱ्याची. कुठल्याही सिग्नलवर नाव काढेल अशी (चेहऱ्याची) प्रोफाईल आहे. दीनवाणे प्रकार करून झाल्यावर अतिशय हीनवाणे प्रकार देखील झाले. असो त्यावर एक वेगळी पोस्ट लिहून मी पोस्टचा काऊंट वाढवेन :D. शेवटी हो ना करता करता मी दोन महिन्याचा कायदेशीर नोटीस पिरेड पूर्ण करून काल मोकळा झालो.&lt;/p&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-aTVA8N5VjgA/TxSVagxiGTI/AAAAAAAABZg/kccVHx9-f5Q/s1600/Bangalore-Pune-Ratnagiri.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="355" width="400" src="http://3.bp.blogspot.com/-aTVA8N5VjgA/TxSVagxiGTI/AAAAAAAABZg/kccVHx9-f5Q/s400/Bangalore-Pune-Ratnagiri.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br&gt;&lt;p&gt;कितीही कंटाळलो असलो तरी आत्ता माझ्या आयुष्यातील एखादा कोपराच नाही तर चांगली मोठी खोलीच बंगलोरने व्यापली आहे. माझ्या आजच्या वयाचा विचार करता माझ्या जीवनातला चक्क एक चतुर्थांश भाग मी बंगलोरमध्ये काढलाय हे मला खरे वाटत नाही. (माझ्या वयाचा हिशोब करणे बंद करा, हि स्कॉलरशिपची बुद्धीमत्ता चाचणी नव्हे). मुन्नाभाई एम.बी.बी.एस. मधला सर्किटच्या तोंडी एक महान संवाद आहे "लाईफ में बहुत कुछ पहली बार होता है मामू"... तसेच काहीसे माझ्या आयुष्यातले बहुत कुछ पहली बारचे (तुमचा चार यारवाला बसायचा "बार" नव्हे) क्षण बंगलोरमध्ये आले. MNC कंपनीची पहिली ऑफर (आणि अर्थातच पहिला राजीनामा :D), पहिला विमान प्रवास, पहिला परदेश प्रवास. इंजिनीअरिंगमध्ये स्वतःची बाईक असण्याची पूर्ण झालेली इच्छा, दक्षिणेकडची भटकंती... एक ना अनेक गोष्टी. खादडीचे म्हणाल तर बंगलोरला येण्यापूर्वी दोन दशके मिळून न खाल्लेला भात बंगलोरमधल्या पहिल्या दोन वर्षात खावा लागला होता आणि हो दहीभात हा प्रकार देखील आयुष्यात पहिल्यांदा बंगलोर मध्येच खाल्ला. आत्ता मात्र आंध्रा रेस्टॉरंटमधला द्राक्ष, डाळिंबाचे दाणे टाकून मोहरीची फोडणी दिलेला दहीभात प्रचंड आवडतो. अस्मादिकांच्या पाक-कौशल्याला बहर देखील बंगलोरलाच आला. बाहेरच्या खाण्याला कंटाळून विकेंडला आमची पाककला पिठले, बटाट्याची भाजी अश्या गोष्टींपासून सुरु होवून थेट थालीपीठ, मासे, सी-फूड, बिर्याणी, चिकन, मटण, सुकटापर्यंत बहरली. चपाती बनवणे मात्र जमले नाही. दरवेळी नजर हटी, दुर्घटना घटी. पण इतर यशस्वी प्रयोग बरेच झाले. कधी पिझ्झ्यात टाकतात त्याप्रमाणे नाही नाही ते पदार्थ Toppings म्हणून ओम्लेटवर विराजमान झाले तर कधी पिठले शिजताना त्या बरोबर अंडीदेखील उकडली गेली (इंधन बचत). एकदा मसाला चायची हुक्की आली तेंव्हा नाना मसाले चहात टाकून पहिल्याच घोटात स्वतःचा आणि रूम पार्टनरचा घसा जाळण्याची घटना सोडता बाकी इतर सर्व प्रकार सामुदायिकरित्या पचवले गेले. बाकी बाहेर &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Infinite_loop"&gt;while(1)&lt;/a&gt; बोले तो अन लिमिटेड (भात) साऊथ इंडीयन मिल्स ह्या प्रकारात प्रथमच उकडलेल्या/शिजवलेल्या गाजर आणि बीटची भाजी देखील प्रथमच खाण्यात (आणि बंगलोरच्या उर्वरित मुक्कामात टाळण्यात) आली. आणि हो महत्वाचे राहिलेच... माझ्या ब्लॉगचा जन्मदेखील बंगलोरचाच.&lt;/p&gt;&lt;p&gt;तर मधल्या काळात खूप बरे वाईट अनुभव आले. वेगवेगळी &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post_30.html"&gt;माणसे&lt;/a&gt; भेटली. आत्ता ह्या क्षणाला खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. नक्की काय लिहू ते कळत नाही. पोस्ट भरकटतेय... इलाज नाही. एअरपोर्टला न्यायला येणाऱ्या कॅबची वाट पहातोय. संध्याकाळी पुण्यात पोहोचेन. आत्ता यापुढे रत्नागिरीला जाण्यासाठी १८-१८ तासांचा प्रवास करावा लागणार नाही. दोन दोन बस बदलाव्या लागणार नाहीत. बायको तिला वाटेल तेंव्हा एकटी रत्नागिरीला जाऊ शकेल. रत्नागिरीहून निघताना दुपारचेच काय पण रात्रीदेखील पोटभर जेवून (पक्षी: मासे हाणून) निघता येईल. लॉंगविकेंड आला तर तडक घरी जाता येईल. प्रवासात ब्रेकफास्टला कांदापोहे, वडापाव, कांदाभजीदेखील मागवता येईल. बाकरवडी खाण्यासाठी पुण्याहून कुणी येतंय का याची वाट पहावी लागणार नाही. (दुपारी १ ते ४ मध्ये बाकर वाडी खावी वाटली तर मात्र इडलीच खायची तयारी ठेवली पाहिजे). ब्लॉगर मित्रमंडळी भेटतील. ट्रेकच्या अपलोडेड फोटोंमध्ये मी देखील असेन.&lt;/p&gt;&lt;p&gt;थोडक्यात काय तर थोड्याच वेळात घडणाऱ्या बंगलोर ते पुणे प्रवासामुळे, मकरसंक्रांतीनंतर दोन दिवसांनी का होईना, पण माझ्या आयुष्यातील दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होतेय...&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-1488077672992778950?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/1488077672992778950/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=1488077672992778950&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1488077672992778950'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1488077672992778950'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='उत्तरायण...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-aTVA8N5VjgA/TxSVagxiGTI/AAAAAAAABZg/kccVHx9-f5Q/s72-c/Bangalore-Pune-Ratnagiri.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-2014074116076319871</id><published>2011-12-30T08:11:00.000-08:00</published><updated>2011-12-31T19:59:18.320-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><title type='text'>मसाला चाय...</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-EPRhYAq7RO8/Tv_aCzU5DsI/AAAAAAAABYo/G2Wt-X70tpE/s1600/Masala%2BTea.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="265" width="400" src="http://2.bp.blogspot.com/-EPRhYAq7RO8/Tv_aCzU5DsI/AAAAAAAABYo/G2Wt-X70tpE/s400/Masala%2BTea.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;p&gt;गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2011/02/blog-post.html"&gt; ट्राफिकमधला गारवा&lt;/a&gt;. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रांगून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...&lt;/p&gt;&lt;p&gt;मसाला चहाची कृती एकदम सोप्पी...&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;b&gt;साहित्य :-&lt;/b&gt; एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;b&gt;कृती :-&lt;/b&gt; नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्‍या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)&lt;/p&gt;&lt;p&gt;तर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागलेली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.&lt;/p&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: left;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-pITYBqR775g/Tv3hB38lbgI/AAAAAAAABYQ/Oj2RqfVH-94/s1600/Masala%2BTea%2B2.jpg" imageanchor="1" style="clear:left; float:left;margin-right:1em; margin-bottom:1em"&gt;&lt;img border="0" height="375" width="400" src="http://4.bp.blogspot.com/-pITYBqR775g/Tv3hB38lbgI/AAAAAAAABYQ/Oj2RqfVH-94/s400/Masala%2BTea%2B2.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;p&gt;चमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.&lt;/p&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-jEq_lg5YmpI/Tv3hnMbPS8I/AAAAAAAABYc/Fqdr_YjBWOY/s1600/Masala%2BTea%2B3.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="263" width="400" src="http://3.bp.blogspot.com/-jEq_lg5YmpI/Tv3hnMbPS8I/AAAAAAAABYc/Fqdr_YjBWOY/s400/Masala%2BTea%2B3.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-2014074116076319871?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/2014074116076319871/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=2014074116076319871&amp;isPopup=true' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2014074116076319871'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2014074116076319871'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='मसाला चाय...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-EPRhYAq7RO8/Tv_aCzU5DsI/AAAAAAAABYo/G2Wt-X70tpE/s72-c/Masala%2BTea.jpg' height='72' width='72'/><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-941440578446873451</id><published>2011-11-23T00:04:00.001-08:00</published><updated>2011-11-23T09:17:45.848-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मस्त्याहार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><title type='text'>एकशिपी</title><content type='html'>&lt;span style="font-weight:bold;"&gt;साहित्य &lt;/span&gt;:- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;कृती &lt;/span&gt;:- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये. &lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-4Mw30EHLUag/Ts0LNEkMvFI/AAAAAAAABSs/0zsdD8uU13c/s1600/1.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="265" width="400" src="http://4.bp.blogspot.com/-4Mw30EHLUag/Ts0LNEkMvFI/AAAAAAAABSs/0zsdD8uU13c/s400/1.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-bqP0uLrJ0Bc/Ts0Op4mzLTI/AAAAAAAABTo/vxbqzbghYoU/s1600/2.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="266" width="400" src="http://2.bp.blogspot.com/-bqP0uLrJ0Bc/Ts0Op4mzLTI/AAAAAAAABTo/vxbqzbghYoU/s400/2.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt; त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object width="320" height="266" class="BLOG_video_class" id="BLOG_video-116482421558f1e3" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/get_player"&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF"&gt;&lt;param name="allowfullscreen" value="true"&gt;&lt;param name="flashvars" value="flvurl=http://v12.nonxt1.googlevideo.com/videoplayback?id%3D116482421558f1e3%26itag%3D5%26app%3Dblogger%26ip%3D0.0.0.0%26ipbits%3D0%26expire%3D1330365143%26sparams%3Did,itag,ip,ipbits,expire%26signature%3D864003D0BD9B6650BBCCB22A6B7368A044A3A7BB.72798984989C2F287A9664DC16A5027794E932E6%26key%3Dck1&amp;amp;iurl=http://video.google.com/ThumbnailServer2?app%3Dblogger%26contentid%3D116482421558f1e3%26offsetms%3D5000%26itag%3Dw160%26sigh%3D0TzzBux_7scdeOrlqwcmRqTe_V8&amp;amp;autoplay=0&amp;amp;ps=blogger"&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/get_player" type="application/x-shockwave-flash"width="320" height="266" bgcolor="#FFFFFF"flashvars="flvurl=http://v12.nonxt1.googlevideo.com/videoplayback?id%3D116482421558f1e3%26itag%3D5%26app%3Dblogger%26ip%3D0.0.0.0%26ipbits%3D0%26expire%3D1330365143%26sparams%3Did,itag,ip,ipbits,expire%26signature%3D864003D0BD9B6650BBCCB22A6B7368A044A3A7BB.72798984989C2F287A9664DC16A5027794E932E6%26key%3Dck1&amp;iurl=http://video.google.com/ThumbnailServer2?app%3Dblogger%26contentid%3D116482421558f1e3%26offsetms%3D5000%26itag%3Dw160%26sigh%3D0TzzBux_7scdeOrlqwcmRqTe_V8&amp;autoplay=0&amp;ps=blogger"allowFullScreen="true" /&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे. &lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-Wwz5oW2_8DI/Ts0LNa6HGhI/AAAAAAAABS8/DerndPUDnC0/s1600/3.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="266" width="400" src="http://4.bp.blogspot.com/-Wwz5oW2_8DI/Ts0LNa6HGhI/AAAAAAAABS8/DerndPUDnC0/s400/3.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-tscFMGX2cT4/Ts0NBqIxopI/AAAAAAAABTc/KGgwMiwNPDU/s1600/4.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="268" width="400" src="http://3.bp.blogspot.com/-tscFMGX2cT4/Ts0NBqIxopI/AAAAAAAABTc/KGgwMiwNPDU/s400/4.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;ता.क.&lt;/span&gt; - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-8cXiDRz1FP0/Ts0K9gyyL-I/AAAAAAAABSg/2wut_lf8neM/s1600/5.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"&gt;&lt;img border="0" height="266" width="400" src="http://4.bp.blogspot.com/-8cXiDRz1FP0/Ts0K9gyyL-I/AAAAAAAABSg/2wut_lf8neM/s400/5.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात &lt;a href="http://mfda2011.blogspot.com/2011/10/ekshipi.html"&gt;पूर्वप्रकाशित&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-941440578446873451?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/941440578446873451/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=941440578446873451&amp;isPopup=true' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/941440578446873451'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/941440578446873451'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='एकशिपी'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-4Mw30EHLUag/Ts0LNEkMvFI/AAAAAAAABSs/0zsdD8uU13c/s72-c/1.jpg' height='72' width='72'/><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-315371270688908715</id><published>2011-09-24T00:41:00.001-07:00</published><updated>2011-09-29T20:00:08.761-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>पैचान कौन? (भाग-१)</title><content type='html'>&lt;span style="font-weight:bold;"&gt;टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील  त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह  सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;क्रमशः&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-315371270688908715?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/315371270688908715/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=315371270688908715&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/315371270688908715'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/315371270688908715'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/09/blog-post.html' title='पैचान कौन? (भाग-१)'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-8242092040668126894</id><published>2011-07-30T12:04:00.000-07:00</published><updated>2011-07-31T22:51:43.588-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मला भेटलेली माणसं'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गजाल्या'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रत्नागिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>बब्याचो बंदोबस्त</title><content type='html'>बब्या महाडिक... ह्याच्या अंगात लहानपणापासनच हाडका कमी आणि काल्याकांड्या जास्ती. वय वाढलो, मिसरूड फुटलो तशी तोंडाक बाटली लागली अन् ह्याचो अजूनच डोक्यास ताप झालो. आख्ख्या गावात ह्याच्याबद्दल कोण चांगला बोलील तर शप्पथ. ह्याचे घरचे लोकं पण ह्याच्या विरुद्धच असतले. बब्या खै गेलो आणि राडे केलान नाय असा फार कमी वेळा झालो असेल. गावच्या देवळातले पूजा नायतर हरिनामसप्ता असे कार्यक्रम सोडले तर बाकी सगळीकडे हा हजर. बरेचदा टाम् असात म्हणून की देवाक घाबरता म्हणून, पण बब्या तसो देवळात पाऊल नाय टाकणार. पण पालखी बाह्यर पडली की ह्यो आलो ढोल ताशे घेवन. बाकी पूर्वी पासन गावासाठी काय उपयोगाचो काम केलान असेल तर ढोल बनवायचो. बकऱ्याची कातडी आणून सुकवन् त्याचे ढोल ताशे बनवायचो. मग काय शिमाग्याक बब्या म्हणजे हिरो. कोणाक् ढोल ताशे वाजवायचो असाल तर बब्याक् कटवूक लागायचो. बब्या सांगेल त्याचो पयलो चान्स. अगदी झेपा जात आला तरी ढोला जवलन् हलणार नाय. धा वर्षापूर्वी त्यानं बापाच्या नावान् गावच्या देवळाकं नविन स्टायलचे ढोल घेवन देलान.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बब्याचो बाप मास्तर महाडिक. दुसरी तिसरीतच लेकाची प्रगती बघून आपला पोर काय दिवे लावायचो नाय म्हणून मास्तरान गावाची पोरा शिकवता शिकवता आपल्या पोराला, बब्याला मात्र पाचवीत जायच्या आधीच शाळेतना भायर काढलान् आणि सरळ दोन म्हशी घेतालान. पहाटे उठून दूध काढून गावात विकायचा आणि दिवसभर म्हशीकां चरायंक् न्यायाचा, गोठा साफ करायचा अशी कामा बब्याच्या मांग लागली. म्हशी चरवता चरवता गाव भटकूकं मिळायचो म्हणून बब्या पण खुष. मास्तर सोताच्या  पोरांक अगदी नीट वळखून होता. बब्या मोठा झालो तसा त्याचा लगीन लावन् दिलान आणि बरोबर हापूसची धा कलमं पण घेवन दिलान. बब्याच्या अंगात किती पन् काल्या कांड्या असल्या तरी मास्तर बापापुढे बब्या वचकून असायचो. मास्तरान पण जीता असे पर्यंत बब्याच्या हातात कधी व्येवार दिलान नाय. मास्तर मजुरी दिल्यासारखा बब्याला आठवड्याला चार-पाच रुपये द्यायचा आणि बब्यापन् गप्-गुमान आपली विडीकाडी त्यात भागवायचा. मास्तर असेपर्यंत गावाकपण बब्याचो तसो त्रास कधी नव्हतो. पण चांगली तीस-बत्तीस वर्षा पेन्शन खावंन् मास्तर खपलो आणि बब्यान् पण कात टाकल्यान. जणू मास्तर आणि बब्या दोघांचे आत्मे कसे एकदम मोकळे झाले. एकीकडं मास्तरान् जाता जाता बब्याच्या उरलेल्या आयुष्याची पन् सोय लावलान् होती. बब्याकं पन् त्याची जाणीव होती पण मास्तराच्या रूपात एक प्रकारचा धाक-दडपन् होता, ता गेला म्हणून बब्याकं कसो मोकळा मोकळा वाटला. आत्ता मास्तराच्या उपकाराची जाणीव म्हणा की तो खपल्याचा आनंद म्हणून म्हणा, पण मास्तर खपल्या खपल्या बब्यान् आधी मास्तराच्या नावान् गावच्या देवळाला ढोल देलान्.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मास्तर अगदी जुन्या हाडाचो त्यामुळे तो खपेपर्यंत बब्यान् पण पन्नाशी पार केलान् होती. नोकरीक् अस्ता तर बब्या पेन्शनीत गेला असता. मास्तरानं अख्खो आयुष्य पांढरा शर्ट आणि खाकी हाफ प्यांट घालून काढलान्. म्हातारपणी डोळ्याला चष्मा आणि आधाराकं घेतलेली काठी हीच काय ती चैन केलान् असेल. करमणूक म्हणजे रोजचो रत्नांग्री टायम्स मोठ्यान वाचायचो. नाय म्हणायाला मास्तरान नंतर ब्लाक अन् व्हाईट टीवी घेतालान पण केबलबिबल घ्यायच्या भानगडीत न् पडता दूरदर्शनवरच भागावाल्यान. म्हावरा बब्याच गरवन आणायचो समुद्रावरून. सांगायचा मुद्दा काय तर घरात पैसा असून सुदिक म्हाताऱ्यामुळे  बब्याक् त्याचो कधी उपभोग घेवूक मिळालो नसा. त्यामुळे मास्तर खपल्या खपल्या उभ्या आयुष्यभर सायकलवर फिरून दारोदार दूध घातलेला, चार-पाच रुपयात सगळी चैन भागवलेला बब्या रातोरात राजा झाला. उशिरा का व्हयनां पण बब्याच्या हातात पैसा आला. मग काय बब्यान् आधी दुधाचा धंदा आणि कलमाची कामा करायसं दोन गडी लावलान् आणि आपण सोता इतकी वर्षे आत दाबून ठेवलेल्या काल्याकांड्यांची जादू गावाक् दाखवायक् बाह्यर पडला. घरात कलर टीवी आली, सायकलच्या ऐवजी बुडाखाली फटफटी आली आणि पूर्वी शिमग्याला, गटारीला मिळणारी पहिल्या धारेची आत्ता रोजची झाली. बब्या गावाबाहेरच्या खोपटाचा रोजचा गिऱ्हायक आणि त्याच बरोबर गावातल्या लोकांक् एक नविन ताप झालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिमग्यातले राडे काय गावाक् नविन नवते. शिमग्यात गाऱ्हानां घालायचो काम कैक वर्ष मास्तरांन केलेला त्यामुळे मास्तराच्या पाटी गाऱ्हानां घालायचो मान बब्यास हवो होतो. मन्या गुरवानं अगदी कडकडून विरोध केलान. गावकऱ्यांनी कसो बसो आवरल्यानी बब्याक्. पुऱ्या गावासमोर मन्या गुरवानं केलेल्या विरोधाचा बदला म्हणून बब्यान् हापूसचा सिझन यायच्या आतच आपले गडी लावन् गुरुवाच्या कलमावर लागलेल्या सगळ्या तयार झालेल्या कैऱ्या काढून रातोरात लोणची करणाऱ्या व्यापाऱ्याला जावन् विकलान्. आत्ता हे काम बब्याचाच हे गुरवाला आणि गाववाल्यांना पण ठावक होता पण पुरावा नसल्याने बब्याच्या नादी कोन लागणार म्हणून सगळे गप्प बसले. त्यानंतर बब्यान् पुढचो किडो रंगपंचमीस केलान. रंगपंचमीस गावातली पोरा रंग घेवन गावभर फिरतात आणि जो भेटील त्यास रंगवितात. बब्यान् काय केलान तर तेच्या घरासामोरच्या म्हशीनां पाणी पिवूच्या हौदात चार दिवस आधीपासना शेण कालवन् ठेवल्यान. अगदी सारवान घालायला करतात तसो आणि रंगपंचमीक् जवा गावातली पोरा बब्याच्या घरा समोरून जावक् लागली तेवा अचानक पाटन् येवन पटकन तिघा चौघांना उचलून त्या शेणाच्या हौदात टाकल्यान. बेवडो आणि दिसायाक किडकिडीत, काटक असलो तरी लहानपणी पासन् अंगमेहनतीची कामा करून बब्यात ताकत चांगलीच होती. त्याच्यासमोर पोरा दिसायला वजनदार असली तरी शेवटी वडापाव-मिसळपाव खाल्लेली पोरा ती. त्यांच्यान् काय बब्या आवरला नाय. दोघजण बब्याक पकडूक् गेले आणि आयते त्याच्या तावडीत गावले. बब्यान् त्या दोघांक् पण उचलून हौदात टाकल्यान. पोरांचे अवतार बघवत नव्हते. चांगला चार दिवस कुसवलेला शेण ता, पाच पाच वेळा आंघोळी करून पण पोरांच्या अंगाचो वास जायत नव्हतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर बब्याचो अवतार दिसलो दहीकाल्यास्. ह्या वेळी बब्यान् हंडी बांधल्यान पण दोरी दोनीकडे पक्की न बांधता दुसऱ्या बाजूला सोता दोरीचो एक टोक हातात धरून झाडावर जावन् बसलो. पोरा हंडी फोडायस् आली, मनोरा रचल्यांनी. जशी पोरा हंडीच्या जवल जायची बब्या दोरी ताणून हंडी वर घ्यायचो. पोरा पडली की परत हंडी खाली. लै झुंजवल्यान् पोरांना. शेवटी पोरा कंटाळून गेली मग बब्यान् हंडी खाली करून अगदी दुसरी-तिसरीतल्या बारक्या बारक्या पोरांकडन् फोडून घेतल्यान् आणि वर मोठ्या बाप्या लोकांनां "बारक्या पोरांनी हंडी फोडलांनी पण तुमच्या बुडात दम नाय. थू तुमच्यावर" असो बोंबलत गावभर फिरलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हळू हळू बब्याचो तरास वाढू लागलो. पूर्वी पौर्णिमा अमावास्येला म्हणजे अधनंमधनं ह्याच्या अंगात यायचो, पण नंतर जवळपास रोजचाच झाला. त्याचो तरास ह्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनां आणि घरच्यांना जरा जास्तीच होता. बब्यान् म्युजिक सिष्टीम घेतलान् आणि मग कधी मनात येल तेवा मोठ्या आवाजात गाणी लावन् डोस्की फिरवायला लागला. शेजारीच काय तर आख्ख्या वाडीतल्या लोकांचे कान किटले. पोरांना अभ्यास करणे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना दुपारी वामकुक्षी आणि रात्रीची झोप कठीण होवून बसली. ह्या सगळा कमी की काय म्हणून बब्यान् रोज झिंगून आल्यावर वाटेत पारावर बसलेल्या पोरांना शिव्या द्यायस् सुरुवात केलेली. पोरा बिचारी दिवसभर कामधंद्या वरून आल्यावर जेवन-खावंन् जरा पारावर गजाल्या मारायास बसायची तर हा तिकडे जावन् त्यांच्या कुरापती काढायचा. सगळे बब्याला वैतागले होते. शेवटी पोरांनी बब्याचा गेम करायचाच असा ठरवल्यांनी. पप्या मांडवकराच्या डोक्यात एक आयडिया आली, पोरा पण तयार झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रत्नांग्रीत रेल्वे आली पण त्याच्याबरोबर रेल्वे स्टेशनच्या भागात चोऱ्या पण वाढल्या. रेल्वेस्टेशन जवळची घरफोडी, दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या फोडून चोर रातोरात रेल्वेनेच पसार व्हायचे. गावातली पोरा आत्ता अशीच एखादी चोरी होतेय का त्याची वाट बघीत होते. सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली होती. आता सगळी पोरा फक्त योग्य संधीची वाट बघीत बसली होतीत. तशी संधी महिना भरात मिळाली पण. कोणीतरी रेल्वेस्टेशन जवळची चायनीजची गाडी फोडलान्. तशी किरकोळ चोरी होती, नुकसान जास्त झाला नव्हता. पैसा अडका चोरीला गेला नव्हता केवळ भांड्याकुंड्यावर निभावले होते. पोरांना पण असाच कायतरी हवा होता जेणेकरून पोलिसांची भानगड जास्ती नसेल. चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोरं संध्याकाळपासून बब्यावर पाळत ठेवून होतीत. बब्यानेहमी प्रमाणे संध्याकाळी टामकावायाला गावाबाहेर गेला आणि दोघे जण थोड्या वेळानं  त्याच्या मागावर गेले. बब्या एकटोच पायी चालत जायचो त्यामुळे अजून कोण बघील अशी काही भीती नव्हती. बब्या टामकवून झाल्यावर झेपा टाकत यायला निघाला तसा एका ठिकाणी झाडी बघून पोरांनी पाटना येवन बब्यावर घोंगडं टाकलानी आणि तो बोंबलायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून तिकडेच आत रानात आडवाटेला ठेवून दिलांनी. रात्रीची जेवणा आटपून पप्या मांडवकर, सुन्या, दादू असे दोघे तिघे बब्याचा बोचका घेवन् नानाच्या रिक्षान् रेल्वे-स्टेशनला गेले. बब्या टाम् होताच त्यामुळे त्यान काय जास्ती त्रास दिलान नाय. रेल्वेस्टेशनवर जावन् पप्या आणि दादू त्या चायनीजवाल्याला भेटले आणि तुमची गाडी फोडलान् तो चोरटा आमच्याच गावातला असा, त्याका घेवन् इलोय असा सांगितल्यानी. तो तसो भुरटो चोर असा, म्हणून पोलिसात न् देता तुमच्या ताब्यात द्यायला आलो. आम्ही गेल्यावर तुम्ही काय ती वसुली करा असे सांगून पोरा परत घरी आली आणि शांत झोपली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिकडे चायनीजवाल्याकं पण चोरी करणारा कोन तो भेटला नव्हताच. पोरा काय खरा-खोटा सांगून गेली ते बघुया आणि अगदीच काय नाय तर हा जो कोन भुरटा चोर हाय त्याच्याकडून निदान भांडी तरी घासून घेवया म्हणून त्यानं बब्याचो बोचको सोडल्यान. तोपर्यंत बब्याची पण जरा उतरली होती. हे काम गावातल्याच पोरांचे हे बब्याला माह्यत होता त्यामुळे घोंगड्याच्या बाह्यर आल्या आल्या बब्यान् समोर कोन हाय कोन नाय ते न् बघता घोंगडं काढणाऱ्या चायनीजवाल्याच्याच कानाखाली एक सणसणीत ठेवन् दिल्यान्. वरतून तोंडातन् नाय नाय त्या शिव्या सुरु होत्याच. आत्ता मघापासनं हा माणूस कोन हाय, ह्याने चोरी केलान हाय की नाय अश्या सगळ्याच बाबतीत संभ्रम असलेला चायनीजवाला बाकायदा कानाखाली खाल्ल्यामुळे पिसाळला. मग त्याने आणि आजूबाजूच्या गाडीवाल्यांनी बब्याला असा काय कुटलानी की बास रे बास. पावसाळी दिवस त्यात त्यांनी बब्याला धुतल्यावर त्याचे कपडे काढून हाफ प्यांटवर सोडून दिलानी. आत्ता अश्या अवस्थेत परत घरी जायचा तर रिक्षाला पैसे पण नाहीत. एवढ्या रात्री चालत जायचा तर शरीराचो जो भाग हलतो तो ठणकत होतो, अशा अवस्थेत मार खावंन् सुजलेल्या बब्यान् उघड्या अंगाने तिकडेच एका बस स्टापवर भिकाऱ्यांच्या बाजूला पुरी रात्र कुडकुडत काढलान् आणि दुसऱ्या दिवशी मेनरोड सोडून आडवाटेनं, कातळावरून, शेतीच्या बांधांच्या आडोशाला लपत बब्या कसाबसा दुपारी घरी आला. मुको मार तर इतको पडलो होतो की बब्याक बरा होवूक आटवडो लागलो. झाल्या प्रकारानं बब्यानं गावातल्या पोरांची अशी काही धास्ती घेतलानं की बाहेर जावन् कोणाला जाब विचारायची पण त्याची हिंमत व्हत नव्हती आणि हिंमत व्हयल तरी कशी कारण त्या गाडीवाल्याच्या ताब्यात द्यायचा आधी, पप्या घोंगडीत बांधलेल्या बब्याच्या कानात पुटपुटला होतो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;"आज नुसतीच तुका कुटायची सुपारी दिलीय, पण परत फिरून काल्याकांड्या करशील तर पुढच्या वेळी किल्ल्यावरच्या लाईट हावसवर नेवन् दरीत ढकलून देव. काय समजलास?" &lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-8242092040668126894?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/8242092040668126894/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=8242092040668126894&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8242092040668126894'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8242092040668126894'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='बब्याचो बंदोबस्त'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-3801278523963413537</id><published>2011-06-07T04:30:00.000-07:00</published><updated>2011-06-07T07:08:04.427-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शाळा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुट्टी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रत्नागिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकण'/><title type='text'>७ जूनच्या आठवणी</title><content type='html'>आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे  शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्‍हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे.  तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/-kaCrIp3C428/Te4MlHSXibI/AAAAAAAAA9s/6b3kqAnfqn4/s1600/Gulmohor.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 314px;" src="http://4.bp.blogspot.com/-kaCrIp3C428/Te4MlHSXibI/AAAAAAAAA9s/6b3kqAnfqn4/s400/Gulmohor.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5615439617128368562" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-3801278523963413537?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/3801278523963413537/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=3801278523963413537&amp;isPopup=true' title='17 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3801278523963413537'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3801278523963413537'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='७ जूनच्या आठवणी'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-kaCrIp3C428/Te4MlHSXibI/AAAAAAAAA9s/6b3kqAnfqn4/s72-c/Gulmohor.jpg' height='72' width='72'/><thr:total>17</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-2956993882217607681</id><published>2011-04-22T12:17:00.001-07:00</published><updated>2011-04-24T11:00:24.698-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन तेंडुलकर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वप्न'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वाढदिवस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>देव दिवाळी</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/-UidqbdjECpk/TbJ4CRfmLeI/AAAAAAAAAzo/547_VfKwIqk/s1600/Sir%2BSachin.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 343px;" src="http://4.bp.blogspot.com/-UidqbdjECpk/TbJ4CRfmLeI/AAAAAAAAAzo/547_VfKwIqk/s400/Sir%2BSachin.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5598669267225947618" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या आठवड्यातच नायगावकर काका एका कार्यक्रमात म्हणाले की रमेश तेंडुलकरांनी देखील कधीतरी सचिनला म्हटले असेल "फटके दिले पाहिजेत" आणि तो इतका आज्ञाधारक की एवढा मोठा झाला तरी फटके देतोच आहे. अरे बहुतेक त्यांना "तुला फटके दिले पाहिजेत" असे म्हणायचे होते असेल रे पण तू फोडत बसलास गोलंदाजांना. लहानपणी शिवाजी पार्कवरचे चिल्ली पिल्ली गोलंदाज फोडणे ठीक आहे रे, पण अब्दुल कादिरपासून सुरूवात करून वकार, वसिम, वॉर्न, ली, मुरली ह्यांना पण फोडायचे? इथे पाचच लिहाले आहेत कारण नाही म्हटले तरी आमच्या सारख्यांनी पाहिलेले पहिले पाच उत्तम, दर्जेदार गोलंदाज म्हणायला हरकत नाही. बाकी तू हेन्री ओलोंगा वैगरेला (तोच तो हल्ली प्रेज़ेंटेशन सेरेमेनीमध्ये प्रश्न विचारत असतो तो) पण फोडला होतास. त्याची चुक काय तर ओळख नसताना (म्हणजे गोलंदाज म्हणून त्याला कुणी ही ओळखत नसताना) एका मॅचमध्ये त्याने तुझी विकेट काढली आणि मॅचनंतर प्रौढीच्या पिपाण्या वाजवल्या. मग काय पुढच्याच मॅचमध्ये तू त्याला फोडलास. असा तसा नाही तर उण्यापूर्‍या १९६ धावांचा पाठलाग करताना तू शतक ठोकलं होतसं. आयुष्यात पहिल्यांदा तू फोडलेल्या गोलंदाजांची मला दया आली होती. त्यामुळेच तर तो अजुन आमच्यासारख्यांच्या लक्षात. आजवर असे अनेक लुंगेसुंगे आपले लेंगे तुझ्याकडून ओले करून धुवून घेऊन गेले. त्यावेळी ठीक होतं रे, तू तरुण होतास म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर होतास, रक्त सळसळतं होतं. आजच्याच दिवशी तू एकट्याने कांगारूंना शारजाच्या वाळवंटात करपवलं होतंस आणि आपला वाढदिवस साजरा केला होतास. पण आज जवळपास १४ वर्षे झाली तरी वॉर्नने कितीही नाही म्हटलं तरी हल्लीच्या ताज्या फडफडीत लिज़ हुर्ले किंवा तत्सम स्वप्नसुंदरीआधी तू त्याच्या स्वप्नात जात असशील हे नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फार कमी गोष्टी अश्या आहेत की ज्याच्याबाबत मी ठाम आहे किंवा असेन. आत्ता धर्म, देश वैगरे बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून त्या आपण सोडून देऊ. पण सध्या काम करीत असलेला प्रॉजेक्ट म्हणा, दर महिना पगार देणारी कंपनी म्हणा फार कशाला अगदी करियर म्हणा मी कश्याच्याही बाबतीत ठाम आहे असे मला तरी वाटत नाही. आमच्या धंद्यात तसे कुणीच ठाम नसते त्यामुळे ते सोडा. पण स्वता:ची अक्कल वापरायला लागल्यापासून केवळ तुझ्या बाबतीत मी ठाम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. टेनिसला मराठीत बॅडमिंटन म्हणतात एवढी समज असलेल्या वयात केवळ तुला पीट सँप्रास आवडतो म्हणून तो माझाही आवडता टेनिस खेळाडू होता. आत्ता मोठेपणी टेनिस आणि बॅडमिंटन मधला फरक कळायला लागल्यावर आपल्या दोघांनाही फेडरर आवडतो हा योगायोगच म्हणायचा. थोडक्यात काय मला पण टेनिसमधलं बर्‍यापैकी कळू लागलं आहे. पूर्वी अतिरेकी खुळ्यासारखे जिहाद ह्या एका शब्दासाठी दुसऱ्याचा जीव घेतात कसा आणि आपला जीव देतात कशाला हे कळायचे नाही पण तुझा धर्म स्वीकारला आणि कट्टरता म्हणजे काय हे कळले. तुझ्या धर्मात आल्यामुळे तुझ्याविरुद्ध सॉरी आपल्याविरुद्ध बोलणारे नेहमी भेटटातच. आधी लय राडे व्हायचे, अगदी जिहाद. सुरुवात झाली ती शाळेत असताना शेजारच्या गोकुळबरोबर. पुर्वी गोकुळला मी त्यांच्या वयाला मान देऊन काका वैगरे म्हणायचो पण ते आपल्या धर्माच्या उगीचच विरोधात आहेत हे कळल्यापासून मी खाजगीत त्यांचा उल्लेख एकेरीत करतो. तर हा गोकुळ भारी खाजीव माणूस. तू भन्नाट खेळतोस तेंव्हा हा तुझ्याबद्दल चांगले चार शब्द न काढता समोरची गोलंदाजी कशी कचखाऊ होती ते बोंबलत बसतो. पण एकदा का तू आउट झालास की मात्र तू तो चेंडू कव्हर्सच्या ऐवजी सरळ किंवा थर्डमॅनच्या दिशेने कसा खेळायला हवा होतास हे अगदी साभिनय दाखवत बसतो. साला ह्या गोकुळला आपल्या घराच्यापाठी असलेल्या संडासचा पाइप कुठल्या दिशेला सोडला तर ते पाणी आपल्याच अंगणात येणार नाही हे गेली कित्येक वर्षे कळलेले नाही तो कव्हर्स, गली आणि थर्डमॅनबद्दल कसा बोलू शकतो हेच मला समजत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असे कित्येक गोकुळ भेटतात. काही जणांची त्यात देखील खासियत आहे बरं. त्यांच्या मते तू शतक लावलंस की भारत हरतो. बहुतेक तू शतक लावल्यानतर भारत ७०% सामने जिंकला आहे हे त्यांना माहीत नाही किंवा त्यांच्या गणिती ज्ञानानुसार ३०% म्हणजे उर्वरित ७०% पेक्षा मोठा भाग असावा. आत्ता ह्या लोकांना फुललेली कमळं पहाण्यापेक्षा चिखलात डुंबणे जास्त पसंत असेल तर नाईलाज आहे. अगदी परवा देखील टी-२० मध्ये तू पहिलंवहीलं शतक झळकावलस आणि मुंबई हरली तर ही जमात सुरू झाली, तू शतक केलं म्हणून मुंबई हरली. अरे मेल्यांनो मुंबई घ्या नाहीतर भारतीय संघ, तू शतक लावल्यावर उरलेली दहा लोकं काय माधुकरीचे वार लावल्यासारखे फुकटचे गिळायला ठेवलेले आहेत काय? अरे तुझ्या शतकानंतर देखील आपण हरत असु तर तो तुझा नाही तर इतर दहा जणांचा दोष आहे हे साधं सोप्प समीकरण मंद लोकांना कसं कळतं नाही कुणास ठाऊक. बाकी हल्ली ही विरोधी पक्षाची लोकं आपण विश्वकप जिंकल्यापासून जरा गप्प आहेत. आत आग-आग होतं असेल पण काय करणार? त्यात तू धावा काढण्यात पण आपल्या सगळ्यात पुढे त्यामुळे त्यांची पुरी बुच्च बसली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी यंदाची देव दिवाळी अगदी स्पेशल आहे हे सांगायला नको. इतकी वर्षे वाट पाहायला लावून शेवटी विश्वकप तुझ्या हाती पहायला मिळाला. साखळी सामने सुरु असताना तू बाद झाल्यावर बाकीचे फलंदाज All Out लावल्यावर जसे डास मरतात तसे All Out होत होते ते पाहून यंदा पण येरे माझ्या मागल्या होणार आणि आपण उप-उपांत्य किंवा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळणार हे स्पष्ट दिसत होते. राहून राहून २००७ मध्ये विश्वचषकातून बाहेर पडलो तेंव्हाचे तुझे पाणावलेले डोळे समोर दिसत होते. त्यावेळी निदान २०११ मध्ये तू पुन्हा खेळशील ही आशा होती. ह्यावेळी तू खेळत होतास. नुसता खेळत नव्हतास तर गेली २-३ वर्षे तू विश्वचषक हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेळत होतास हे ही कळत होतं. वर्षभरापूर्वीच एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावून तू आपला फॉर्मपण दाखवून दिलास. तरी देखील बाकीच्या दहा लोकांवर भरोसा नव्हता. त्यात उप-उपांत्य फेरीतच समोर कांगारू. कांगारू नेहमीच्या औकातीत नसले तरी आपल्या लोकांचाच मला भरोसा नव्हता. पण सुदैवाने २००३ च्या अंतिम फेरीचा बदला उप-उपांत्य फेरीत घेतला गेला. नंतर पाकडे. पाकला विश्वचषकात आपण नेहमी कुटले असले तरी ते पाकडे आणि नाही म्हटलं तरी ते देखील जबरी खेळत होते पण २००३ मध्ये अक्रमच्या गोलंदाजीवर तुला एक जीवदान देवून त्यांचे समाधान झाले नव्हते त्यामुळे ह्यावेळी तुला पाच जीवदाने देवून ढेकर देत ते परत गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी अंतिम सामान्यासाठी मुरली, मलिंगा, मेंडीस, मॅथ्युज हा 'M' Factor होताच पण आपल्या बाजूनेदेखील मोटेरा, मोहाली आणि मुंबई असा 'M' Factor असल्याने चिंता थोडी कमी होती. तरी देखील अंतिम सामन्याच्या दिशेने आपण जसे एक-एक पाऊल टाकत होतो तसतशी बेचैनी वाढत होती. उगीचच डॉन ब्रॅडमनचे शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद होवून १०० च्या सरासरीपासून वंचित रहाणे किंवा पीट सँप्रासने शेवटपर्यंत फ्रेंच ओपन जिंकू न शकणे असल्या गोष्टी सतत आठवत होत्या. तू प्रयत्नांमध्ये काही कसर सोडली नसलीस तरी नियतीची भीती वाटत होती. एक विश्वचषक सोडून तुझ्याकडे सगळं काही आहे आणि नियती तो तुझ्या हातून हिरावून तर घेणार नाही अशी धास्ती मनात सतत होती. त्यात माजोरी जात तू टी-२० विश्वचषकात न खेळल्यामुळे आपण जिंकलो होतो आणि आत्ता तुझ्यामुळे हरणार अश्या पुड्या सोडत बसलेली होतीच. आठवडाभर धड झोप लागली नव्हती. इंजिनिरिंगला असताना Engineering Mechanicsचा पेपर तीनदा दिला होता पण तिन्ही वेळा पेपरच्या आदल्या रात्री Mechanicsचा पेपर सोड पण पूर्ण अभ्यासक्रमातली साधी २ मिलीमीटरची आकृतीदेखील कधी माझ्या झोपेची तटबंदी भेदू शकली नव्हती.(Mechanicsचा पेपर चार वर्षातून एकदा येण्याऐवजी निर्लज्जासारखा दर सहा महिन्यांनी येत असल्यामुळे असेल कदाचित) पण तुझ्यासाठी मात्र ही जवळपास शेवटचीच संधी होती. विश्वचषक जिंकायचा जसा तुला ध्यास लागला होता तसा तो तुझ्या हाती पहायचा ध्यास आम्हाला लागला होता. शेवटी दीड वर्षापूर्वी म्हांराजाला घातलेलं &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_14.html"&gt;गार्‍हाणं&lt;/a&gt; म्हांराजानं ऐकलान आणि आपण जिंकलो. तुझ्या हाती विश्वचषक पाहिला तेंव्हा मात्र केवळ समाधान सोडून इतर काहीच वाटलं नाही. मनातल्या मनात तो विश्वचषक तुझ्या हाती अनेक वेळा पाहिल्यामुळे असेल कदाचित. तुझ्यासाठी अभिनंदनाची पोस्ट लिहिणार होतो पण काही सुचलंच नाही. संपूर्ण समाधान आणि तृप्तीचे असे ते क्षण होते. मनात साठवून ठेवले आहेत. आयुष्यभरासाठी...&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानपणापासून मराठी पंचांगाप्रमाणे वर्षभरात सगळ्यात शुभ असे साडेतीन मुहूर्त असतात असे ऐकून होतो. गेल्या काही वर्षापासून माझ्यासाठी ते साडेचार मुहूर्त झालेत. आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्यामध्ये येणारा अजुन एक शुभ मुहूर्त. आमच्यासाठी देव दिवाळी. लहानपणी काही वर्षे फटाके म्हणजे दिवाळीतच वाजवायचे असतात अशी संकुचित विचारसरणी होती. पण तुझ्यामुळे आम्ही भर शिमग्यातच नव्हे तर सणासूदीचे दिवस नसताना देखील दिवाळीच नाही तर विजयादशमी देखील फटाके लावून साजरी केली. आज तुझा वाढदिवस. तुला मी काय शुभेच्छा देणार? उलट मीच तुझ्याकडे मागणे मागेन की माझ्या नशिबात कधी भाग्योदय लिहलेला असेल तर त्यात एखादा दिवस तरी तुला तुझ्या आवडीच्या  कोलंबी, कुर्ल्यांचा नैवेद्य दाखवण्याचे भाग्य मला लाभू दे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-2956993882217607681?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/2956993882217607681/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=2956993882217607681&amp;isPopup=true' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2956993882217607681'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2956993882217607681'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='देव दिवाळी'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-UidqbdjECpk/TbJ4CRfmLeI/AAAAAAAAAzo/547_VfKwIqk/s72-c/Sir%2BSachin.jpg' height='72' width='72'/><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-8901554852882374496</id><published>2011-03-13T07:27:00.001-07:00</published><updated>2011-06-07T07:01:54.829-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिमगा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रत्नागिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकण'/><title type='text'>रत्नागिरीतला शिमगा - लहान होळी</title><content type='html'>शिमगा आणि गणेशोत्सव म्हणजे कोकणातले दोन मुख्य सण. सध्या शिमगा सुरू आहे. आज होळी. मुंबई तसेच उत्तर भारतात होळी म्हणजे रंगांची उधळण पण कोकणात रंगाचा सण रंगपंचमीला म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. लहानपणी माझी मुंबईची भावंडे होळी दिवशीच रंगपंचमी खेळलो, गच्चीतून फुगे फेकून मारले असे सांगायचीत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. मग मी खुळ्यासारखे अरे रंगपंचमीला वेळ आहे अजून असे म्हणायचो. आम्हाला होळी, धुलीवंदन (धूळवड्) आणि मग पाच दिवसांनी रंगपंचमी अश्या आठवड्यात मस्त ३ दिवस सुट्ट्या मिळत. आजची पोस्ट शिमगा स्पेशल. कोकणात शिमगा म्हणजे मस्त बोंबाबोंब. खरोखरच्या चोर्‍या. चोर्‍या म्हणजे लाकूडफाटा वैगरे. अगदीच पोचलेले टवाळ असतील तर डायरेक्ट कोंबडासुद्धा चोरायला कमी नाही करत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोकणात शिमगा निरनिराळ्या पद्धतीने साजरा होतो. प्रत्येक गावागावात वेगळी पद्धत पण मुख्यत: बर्‍याच गावात पालखी असते. रत्नागिरीचे ग्राम दैवत म्हणजे देव भैरी. होळीच्या दिवशी भैरी पालखी बाहेर पडते आणि पाच दिवस आजूबाजूच्या मुख्य वाड्यांमध्ये फिरून रंगपंचमीपर्यंत झाडगावात सहाणेवर बसते. तिथे सूरमाडाची होळी असते. ह्या काळात निरनिराळ्या गावाचे मानकरी येऊन पालखी नाचवण्याचा कार्यक्रम असतो. कधी दोन लोकं तर कधी एकटा माणूस डोक्यावर ती भली मोठी पालखी घेऊन नाचवतो. मज्जा येते पहायला. पुढे कधी तरी शिमग्यात सुट्टी काढून ह्या सगळ्याचे रेकॉर्डिंग केले पाहिजे. दूरदर्शनच्या काळात जयू भाटकरांनी रत्नागिरीमधला शिमग्यावर एक कार्यक्रम करून प्रक्षेपित केला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या गावात मात्र शिमगा होळीच्या दहा दिवस आधीपासून सुरू  होतो. गावात लहान मुलांची आणि मोठ्या लोकांची होळी चक्क वेगवेगळी असते. होळीच्या होमाची एक ठरलेली जागा आहे. तिथे दोन खड्डे पाडले जातात. त्या बाजूला होलदेवाच्या (होळीचा देव) मूर्त्या मांडलेल्या असतात. होळीचा सण झाला की पाडव्या दिवशी हे होलदेव पुन्हा त्या खडड्यांमध्ये ठेवून खड्डे पुन्हा पुढच्या होळीपर्यंत बुजवले जातात. लहान मुलांच्या होळीचा खडडा गूढगाभर खोल तर मोठ्या (गावाच्या) होळीचा खडडा चांगला पुरूषभर खोल असतो. होळीच्या सणाच्या दहा दिवस आधी लहान मुलांची होळी सुरू होते. इथे खडडा खणण्यापासून सगळी कामे लहान मुलेच करतात. लहान म्हणजे ६-७ पर्यंत कारण गावातली शाळा सातवीपर्यंतच आहे. आठवीसाठी शहरातल्या शाळेत जावे लागते आणि शहरातल्या शाळेत जाणारी मुले लहान मुलांच्यात जास्त मिक्स होत नाहीत. थोडक्यात गावातली शाळा आणि होळी एकदमच सुटते. तर लहान मुलांची होळी म्हणजे रोज शाळा सुटली की गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून एरंडाचे एखादे झाड तोडून आणायचे. होळी आणाताना 'हाय रे हाय आणि xxxच्या जिवात काय नाय रे' आणि इथे देता येणार नाहीत अश्या फाका घालायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एरंडाचेच झाड का? ह्याबद्दल काही माहिती नाही पण बहुतेक ही झाडे पुष्कळ आहेत आणि दुसरे म्हणजे हे कुणाच्याही आवारातून परवानगी शिवाय तोडून आणले तरी चालते. अजुन एक म्हणजे पाचवी-सहावीच्या मूलानां हे तोडून खांद्यावरुन मिरवत आणण्यासारखे असते. कधी कधी मुले जास्त असतील किंवा लहानांची होळी आणायचा शेवटचा दिवस असेल तर मजबूत असे एरंडाचे झाड निवडले जाते. ते घेऊन पूर्ण गावभर 'होळी ओ' करत, मिरवत अगदी काळोख पडून गेल्यावर होमाच्या ठिकाणी आणून ते एरंडाचे झाड खड्ड्यात मधोमध उभे केलं जातं. मग आजूबाजूचा किंवा गावातून जमवून आणलेला झाडांचा सुकलेला पाचोळा (पातेरा), झावळ्या, काटक्या असं काय मिळेल ते सगळं त्या खड्ड्यात भरून होम केला जातो. गावात सागाची आणि माडाची खूप झाडे असल्याने रोज बसल्या जागी ४-५ टोपल्या पातेरा, झावळ्या सहज मिळायचा. अजुन ही मिळतो. पुर्वी म्हणजे अगदी १०-१२ वर्षापूर्वी देखील बरीचशी लोकं चुलीवरच जेवण करायची. आज ही गावातल्या उत्सवांच्यावेळी किंवा लग्नकार्यात गाव जेवणासाठी लाकूड फाटाच वापरला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;होमाच्यावेळी तथाकथित मोठी झालेली म्हणजे आठवी-नववीतील मुले (ज्यांना मोठे आपल्यात घेत नसत) देवळातून ढोल-ताशे घेऊन यायचे आणि मोठ्या होळीच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशे वाजवण्याची जोरदार प्रॅक्टिस चालायची. मी लहान होतो म्हणजे पाचवी सहावीपर्यंत घरचे मला गावातल्या इतर मुलांबरोबर होळी आणायला पाठवत नसत. तोपर्यंत मी इतर मुले होळी आणेपर्यंत पातेरा गोळा करून ठेवण्याचे काम इमानेइतबारे बजावले होते. मी पाचवी आणि सहावीत असताना २ वर्षे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान मुलांच्या होळीत पूर्ण सहभागी होतो. सहावी पास झाल्यावरच मी हायस्कूलला प्रवेश घेतल्यामुळे सहाजिकच मी एक वर्ष आधीच 'मोठा' झालो त्यामुळे आपोआपच लहान होळीची मज्जा एक वर्ष कमी झाली. तेंव्हा होळी कुठून आणायची, एरंडाचे कुठले झाड निवडायचे, होळी आणाताना शेंड्याकडे कोण? मुद्याकडे (खोडाकडे) कोण? हे ठरवणारी मुले म्हणजे आमच्यासाठी हीरो असायची. अर्थात सगळ्यात अंगापींडाने जो जास्त दणकट आणि त्यात शाळेत नापास वैगरे झालेला असतो त्यालाच हा मान आपोआप मिळतो. मी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मागासलेला असल्याने मी नेहमी हुकुमाची अंमलबजावणी करणार्‍यांमध्ये राहिलो. मला त्यातल्या त्यात मानाचे काम म्हणजे होळी तोडण्यासाठी बरोबर नेलेला कोयता सांभाळणे हेच असायचे कारण बाकीच्या अवलादिंच्या हाती कोयता वैगरे देणे म्हणजे जिकीरीचे असायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;होम लागेपर्यंत साधारण सात-साडेसात वाजायचे. त्याचवेळी कामधंद्याला बाहेर गेलेली लोकं पण परत येत असायची मग कधी सगळ्या मुलांना जवळच्या गादीवरच्या लिमलेटच्या गोळ्या किंवा तळलेल्या पिवळ्या नळ्या असा खाऊ मिळायचा. इथे पुन्हा माझ्या अंगच्या प्रामाणिकपणामुळे खाऊवाटपामधले संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी ते काम बहुतेक वेळा मीच करायचो. पण काही असो मज्जा यायची. होळी आणणे असो की पातेरा जमवणे, कोयता सांभाळणे असो किंवा खाऊवाटप, आपण एक जबाबदारीचे काम पार पाडतोय असं एक प्रकारचे समाधान असायचे जे आत्ता मोठेपणी खूप दुर्मिळ झाले आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-8901554852882374496?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/8901554852882374496/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=8901554852882374496&amp;isPopup=true' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8901554852882374496'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8901554852882374496'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='रत्नागिरीतला शिमगा - लहान होळी'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-3087310520231328133</id><published>2011-02-28T02:31:00.001-08:00</published><updated>2011-02-28T19:16:03.444-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बंगलोर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गाणे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मी'/><title type='text'>ट्रॅफिकमधला गारवा</title><content type='html'>काल सकाळी ३५ मिनिटांचा रस्ता पार करून ऑफीसला पोहोचायला तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागला. गाडी चालू बंद करून करून कंटाळा आला. अश्याच एका निवांत क्षणी मोबाईलवर गाणी लावून ईअर् फोन कानात घातले आणि पहिलच गाणं लागलं ते म्हणजे मिलिंद इंगळेचे गारवा. त्यातल्या पहिल्याच "ऊन जरा जास्तच आहे" ह्या ओळी कानावर पडल्या आणि पुढचं विडंबन सुचले. तसं पाहिलं तर कविता करणे, कवितेचा आस्वाद घेणे (अर्थात संदीप खरेच्या कविता आणि बझ्झवरच्या चारोळ्या, दिपोळ्या, आपोळ्या असे काही सन्माननीय अपवाद वगळता) वैगरे दूरच पण यमक जुळवणेदेखील मुश्कील अशी माझी अवस्था. त्यामुळे भर उन्हात त्या ट्रॅफिकमधल्या परिस्थितीला गांजून माझ्यातल्या कोकणी भाषेला 'भ'हर आलेला असताना सुचलेला हा ट्रॅफिक मधला गारवा तुमच्यासाठी. तसं पाहायला गेलं तर हे विडंबन ब्लॉगवर पोस्ट करण्याच्या लायकीचं नाही तरी माझ्यासारख्या पद्य विभागातल्या माठ माणसाकडून त्या रखरखीत परिस्थीत का होईना चुकुन जुळले गेलेले यमक (जे पुन्हा घडण्याची तीळमात्र शक्यता नाही) तुमच्या समोर यावे म्हणून हा खटाटोप. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत. &lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt; ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,&lt;br /&gt;भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,&lt;br /&gt;लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,&lt;br /&gt;गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,&lt;br /&gt;तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,&lt;br /&gt;ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,&lt;br /&gt;गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,&lt;br /&gt;न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,&lt;br /&gt;क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,&lt;br /&gt;पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,&lt;br /&gt;मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,&lt;br /&gt;पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;    तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-3087310520231328133?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/3087310520231328133/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=3087310520231328133&amp;isPopup=true' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3087310520231328133'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3087310520231328133'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='ट्रॅफिकमधला गारवा'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-1198815664882324476</id><published>2011-01-14T04:09:00.001-08:00</published><updated>2011-02-06T22:07:25.561-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऑफीस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सवय'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आळस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मी'/><title type='text'>टाइम मॅनेजमेंट</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TUvrVWMBj5I/AAAAAAAAAnI/xIwe3-o63Bk/s1600/Time%2BManagement.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 267px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TUvrVWMBj5I/AAAAAAAAAnI/xIwe3-o63Bk/s400/Time%2BManagement.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5569804116139544466" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखादी जॉब प्रोफाइल वाचताना टाइम/टास्क मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग वैगरे शब्द हमखास वाचायला मिळतात. मिळालेली वेळ कामांचे महत्व पहाता त्या त्या कामांना विभागून देऊन त्यानुसार काम पुरे करणे ही झाली टाइममॅनेजमेंटची ऑफीसमधली व्याख्या. अगदी परफेक्ट नसेल. सांगायचा मुद्दा हा की ऑफीसमध्ये टाइम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट वैगरे गोष्टी प्रॉजेक्ट प्लॅनिंगचा एक हिस्सा असतात. काम नेमुन देण्यासाठी आणि दिलेले काम होतं आहे की नाही हे पहाण्यासाठी मॅनेजर असतो. पण प्रॉजेक्ट म्हणजे टीमवर्क आलंच. इथे काही प्रॉब्लेम असतील, काही मदत हवी असेल तर टीम असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग सिस्टमची निरनिराळी सॉफ्टवेअरस् वापरुन सगळी कामं (बहुतेकवेळा) नीट पार पडली जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफमध्ये तरी डेड लाईन या ना त्या प्रकारे पाळली जाते किंबहुना काम करणार्‍या लोकांकडून (झक मारुन का होईना) पाळून घेतली जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न सुरू होतो तो ऑफीस मधून बाहेर पडल्यावर. वैयक्तिक आयुष्यात आपण किती वेळा कामे आखून त्या नुसार काम करतो? माझ्या मते मी आत्ता आपण म्हणणे थांबवावे. मी माझ्यापासून सुरूवात करतो. ऑफीसच्या बाहेर किती कामे मी आखून त्या नुसार ती पार पाडतो? नक्की नाही सांगता येत. नक्की नाही म्हणजे आखणी होते. बहुतेक सगळ्या कामांची आखणी ही होतेच. ऑफीसप्रमाणे अगदी पद्धतशीर कागदोपत्री प्लॅनिंग नाही पण मनात कुठे तरी काही गोष्टी ठरवल्या जातात. अमुक तमुक गोष्ट करायची. आणि त्यासाठी एक ढोबळ वेळ/तारीख/महिना निश्चित करायचा. अजुन तरी मी कधी वर्ष वैगरे निश्चित नाही केलेलं कारण तेवढी दूरदृष्टी नाही. आधीच वेळ/तारीख/महिना असे जे काही मनात ठरवतो ते ढोबळ असते. हा ढोबळ शब्दच घात करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेंव्हा एखादी गोष्ट पुढे ढकलली तरी चालून जाते तेंव्हा ती गोष्ट माझ्या हातून कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळ्या सुविधा असतात पण जोवर ती करायचीच असा मनात ठाम निर्णय होत नाही तोवर हातून काहीच होत नाही. आत्ता टॅक्स सेव्हींग. हा दरवर्षीचा प्रकार आहे. दरवर्षी ठरवतो की डिसेंबरपर्यंत सगळी गुंतवणूक पूर्ण करून कागदपत्र तयार ठेवायची. एचआरचा मेल आला रे आला की दिली. पण नाही. मेल आला की शेवटची तारीख बघायची. मग त्याच्या आधीच्या वीकेंडला जाऊन पैसे भरायचे आणि पावत्या आणायच्या. बरं सगळी कागदपत्र तयार आहेत तर जमा करेन तर तेही नाही. दोन दिवस आधी एचआरचा Gentle Reminder म्हणून एक प्रेमळ मेल येतो पण आपण अगदी शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहायची. तो दिवस आला तरी अगदी संध्याकाळ होण्याची वाट बघा. दुपारी जेवून वैगरे आलं की प्रिंटआऊट काढा आणि मग एकदाचा घरी जाता जाता एचआर कडे जायचे. तिथे आपली भावंडे उभी असतातच. एकदम कामाचा लोड पडू नये म्हणून त्या बिचार्‍या एचआरने महिनाभर आधी तारीख दिलेली असते तर माझ्यासारखी लोकं अगदी ती तारीख म्हणजे एक एकच आणि शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी संध्याकाळी हजर. काही लोकं तर कुठे काही माहिती भरून आणतात. शेवटच्या दिवशी ह्यांच्या हजार शंका. नशिबाने मी इतका गया गुजरा नसल्याने ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर ;-)&lt;br /&gt;&lt;br /&gt;टॅक्स सेव्हींगचे उदाहरण हे वार्षिक श्रेणीमध्ये मोडते. मासिकश्रेणीमध्ये लाईटबिल येते. लाईटबिल साधारण दर महिन्याच्या  ४-५ तारखेला हातात पडते. बरं इथे बिल भरण्याची शेवटची तारीख १८ असते. बिल भरण्याचे ठिकाण देखील ५ मिनिटांवर आणि रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे पण बिल हातात मिळाल्यापासून वीकेंडला भरू, वीकेंडला भरू असे करता करता १७ तारीख उजाडते. वीकेंडला आठवण असते, नाही असे नाही पण सकाळी वाटते आत्ता गेलो तर गर्दी असेल. लोकं उन्हातून बाहेर पडत नाही तेंव्हा आपण १२-१२:३०च्या आसपास जाऊ पण दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही. १७ तारखेला नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला उशीर झालेला असतो त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे ह्या भरोश्यावर बिल भरायला १८ तारीख उगवतेच. आत्ता १८ शेवटची तारीख असल्याने दंड भरावा लागू नये म्हणून झक मारत त्या दिवशी बिल भरायला जावं तर नेमका त्या दिवशी तिथे प्रिंटर बिघडलेला असतो. आणि बहुतेक प्रत्येक महिन्यात १८ लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने आपली 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'देखील त्याच दिवशी गर्दी करून रांगेत उभी असतात. पण गर्दी पाहून दुपारी/संध्याकाळी येऊ म्हणाव तर शक्य नसतं त्यामुळे तिथे रांगेत उभं राहून वीकेंडला आलो असतो तर बर झालं असतं असं वाटून जातं. आत्ता बिल मिळालं की पहिल्याच वीकेंड्ला भरून टाकायचे असं ठरवतो पण हाच निश्चय पुन्हा पुढच्या महिन्यात १७-१८ तारखेला केला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही झाली दोन ठळक उदाहरणे. पण सध्या बर्‍याचश्या गोष्टी ह्या अश्या ढोबळ कारभारावर सुरू आहेत. काही ठिकाणी गोष्टी अडून बसल्या आहेत तर काही ठिकाणी सगळ्या चाव्या माझ्या हाती असून केवळ नियोजनाचा अभाव आणि कंटाळा ह्यामुळे मी स्व:त सगळ्या गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. जेवढ्या लवकर टाइम मॅनेजमेंटच्या घड्याळात मी सेल्फ स्टार्टची चार्ज झालेली बॅटरी टाकेन तितक्या लवकर गोष्टी टिक-टिक करीत पुढे सरकतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फोटो गूगलवरुन साभार&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-1198815664882324476?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/1198815664882324476/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=1198815664882324476&amp;isPopup=true' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1198815664882324476'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1198815664882324476'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/01/blog-post_14.html' title='टाइम मॅनेजमेंट'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TUvrVWMBj5I/AAAAAAAAAnI/xIwe3-o63Bk/s72-c/Time%2BManagement.jpg' height='72' width='72'/><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-7059940086288500655</id><published>2011-01-10T05:58:00.001-08:00</published><updated>2011-06-07T07:01:42.524-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नवं वर्ष'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बीच'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सूर्यास्त'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भटकंती'/><title type='text'>देवबाग बीच रिसॉर्ट</title><content type='html'>३१ डिसेंबर विकांताला लागून येत असल्याने कुठेतरी बाहेर जायचे हे नक्की ठरवले होते. केरळला जायचे कधी पासून मनात होते म्हणून कोट्टयाम-आलप्पी येथे हाउसबोटवर ३१ची रात्र घालवण्याचा प्लॅन केला. पण ख्रिसमस आणि वर्षअखेर असल्याने केरळचे बुकिंग ४ महिने आधीच फुल्ल होते. आत्ता कुठे जायचे असा विचार सुरू होता. एका मित्राकडून देवबाग बीच रिसॉर्टबद्दल ऐकून होतो. तिथेदेखील हाउसबोट उपलब्ध असते असे कळले पण केरळच्या बॅक-वॉटर इतकी मज्जा नाही पण प्रत्यक्ष बीच रिसॉर्टचा रिव्यू चांगला होता. बुकिंग तसं महाग होतं आणि त्यात हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारद्वारा चालवले जाते म्हणून कसं असेल ह्याबद्दल मन जरा साशंकच होतं. नेट वर पाहिलं तर रिव्यू चांगला होता. अर्थात काही ठिकाणी under utilize असा उल्लेख होता पण बहुतेक सर्व लोकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली होती. म्हटलं तसं ही काही मिळत नाही तर करून टाकु बुकिंग. ऑनलाइन बुकिंग सेवा आहे आणि अगदी तत्पर. मी तिथे चौकशीची नोंद केल्यावर काही तासात त्यांनी फोन करून शेवटची काही कॉटेज शिल्लक आहेत असं कळवलं. मी पण फार आढे वेढे न घेता त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ठरल्याप्रमाणे ३०च्या रात्री बंगलोरहून आम्ही निघालो. देवबाग कारवारमध्ये आहे. दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही कारवारला पोहोचलो. चेकईन दुपारी बारा वाजताचे होते. आत्ता इतका वेळ काय करायचे हा प्रश्न. मला वाटले होते की कारवार बर्‍यापैकी मोठे शहर असेल. सकाळी फ्रेश होऊन आजूबाजूला काही भटकण्यासारखे असेल तर चक्कर मारू. पण कसलं काय? तिथे धड बस स्टॅंड देखील नव्हता. ब्रेकफास्ट करावा तर धड नीट हॉटेल नाही. शेवटी एक बर्‍यापैकी हॉटेल दिसले तिथे टिपिकल डोसा वैगरे खाऊन घेतला. तिथे जवळपास काही बघण्यासारखे आहे का अशी चौकशी केली तर कारवार बीच सोडून दुसरं काही ऐकू आले नाही. आत्ता इतक्या सकाळी बीचवर खो-खो खेळायला बसलेली लोकं थोडीच पाहायची होतीत?&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून सरळ देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला फोन लावला. तर त्यांनी ऑफीसला या असे सांगितले. म्हटले चला इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा सरकारी कचेरीतल्या बाकड्यावर बसून मख्ख चेहरे पाहत बसू. मग रिक्षा करून देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला गेलो. शहरापासून ५-६ किलोमीटर आहे. तिकडे पोहोचल्यापासून एक एक सुखद अनुभव यायला सुरूवात झाली. त्यांचे ऑफीस  कारवारबीच जवळ एका बंगल्यात होते. आजूबाजूला मस्त नारळ पोफळीची झाडे. आत गेलो तर सकाळ असून ऑफीसची पुरेशी लोकं होती. चौकशी केल्यावर समजलं की ते लोकं शिफ्टमध्ये काम करतात आणि ऑफीस कायम उघडे असते. आमचे वाऊचर पाहून आधी आमची आल्याची नोंद केली आणि लगेचच आम्हाला बारा वाजेपर्यंत रहाण्यासाठी त्याच बंगल्यात वरच्या मजल्यावरची एक सुसज्ज रूम दिली. चेक-ईन/चेक-आउट हे दुपारी बारा वाजता असल्याने आणि शहरातील असुविधांचा विचार करून पर्यटकांसाठी ही सोय केलेली होती. जाताना देखील दुपारपासून ते रात्री तुमची बस/ट्रेनची वेळ होईपर्यंत तुम्ही इथे आराम करू शकता. आधीच रात्री बसमध्ये झोप नीट झाली नव्हती त्यात सरकारी कचेरीतल्या बाकड्या ऐवजी बेड मिळाल्यावर आम्ही मस्त ताणून दिली. दोन-अडीज तास झोप पूर्ण केल्यानंतर आंघोळ वैगरे करून आम्ही रिसॉर्टला जायला तयार झालो. तोवर इतर लोकं देखील आली होती. मग तिथून बोटीत बसून आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट म्हणजे तसं पूर्ण बेटावर वसलेलं नाही. एका बाजूने जमिनीला जोडलेले आहे. पण शहराच्या दिशेने पाहिलं की दर्शनी भागाकडून ते पाण्यात आहे असे वाटते. त्यात बोटराइडचा आनंद मिळावा म्हणून पर्यटकांना बोटीने रिसॉर्टला घेऊन जातात. १५-२० मिनिटांच्या बोटराइड नंतर आम्ही तिकडे पोहोचलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोटीतून खाली उतरल्या उतरल्या सुरुची दाट झाडी सुरू होते. सुरुवातीलाच जंगल लॉजेस अँड रिसॉर्टचा फलक आहे. सुरूच्या बनातून एक पायवाट आत जाते. समुद्रावरचा वारा सुरुच्या झाडामधून वाट काढत सूss सूss आवाज करत जात होता. आजूबाजूचे वातावरण पाहाता सगळे अपेक्षेपेक्षा चांगले अनुभवायला मिळत होते. ८-१० वर्षा पुर्वी रत्नागिरीलादेखील भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या नारळ संशोधनकेंद्रासमोर समुद्रावरुन येणार सोसाट्याचा वारा अडावा म्हणून दाट सुरूची झाडी होती. पण तिथे येणार्‍याजाणार्‍यावर बंधन नसल्याने ती हळू हळू कमी झाली. येणारे जाणारे ह्यामध्ये सुरुबनात चाळे करायला येणार्‍या लोकांचाच जास्त भरणा होता. त्यात पावसाळ्यात वादळाने पडलेली झाडे जवळपासची लोकं जळणासाठी लाकूडफाटा म्हणून वापरु लागली. पुढे पुढे तर लोकांनी जळणासाठी झाडे तोडून देखील नेली पण पुन्हा झाडे लावण्याचे कुणाच्या मनात आलेले नाही. त्या दृष्टीने कर्नाटक सरकारने देवबागला सुरुबनाचा पर्यटनासाठी खूप चांगला वापर करून घेतला आहे. असो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०-१५ मिनिटे चालल्यानंतर कॉटेज दिसू लागली. सुरुवातीला काही चिरेबंदी कॉटेज लागली. ती बहुतेक नवीन बांधलेली दिसत होती. तिथे एकूण १५ कॉटेज आहेत. सर्व एसी. पुढे गेलो तशी पुर्वी बांधलेली, जमिनीपासून उंचावर असलेली लाकडी कॉटेज होती. प्रत्येक कॉटेजसमोर सुरूच्या झाडामध्ये बांधलेला झुला. आमच्या सुदैवाने आम्हाला वुडन फ्लोअर असलेलं लाकडी कॉटेज मिळालं. कॉटेज देखील आतमधून एकदम प्रशस्त आणि सुसज्ज. सगळी सोय बघून इथे येण्याचा खेळलेल्या जुगारातून जॅकपॉट लागल्याचे समाधान मिळाले. बरं बायकोला नेहमीप्रमाणे काहीच न सांगितले असल्याने तिच्यासाठी तर मस्त सरप्राइज होते. खरं तर मला देखील आधी काय आणि कसं असेल ह्याची काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठीसुद्धा मोठे सरप्राइजच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉटेजमध्ये फ्रेश होऊन आजुबाजूला काय काय आहे त्यावर नजर टाकतो तोच जेवणाची वर्दि घेऊन एक जण आला. अरे हो एक सांगायाचेच राहीले. इथले लोकं कोंकणी भाषा बोलतात. कन्नड पण चालते पण आम्ही सकाळपासून लोकांचे बोलणे ऐकत होतो ते यंडूगुंडू नव्हते. बर्‍यापैकी कळत होते. त्यांना पण आम्ही आपापसात काय बोलतो ते थोडे फार कळत होते. कॉटेज दाखवायला जो मुलगा आमचे सामान घेऊन आला आमच्या बरोबर आलेला तोच पुन्हा जेवाणाचा निरोप घेऊन आलेला. आम्हाला मराठीत बोलताना ऐकले असल्याने त्याने सरळ "१ वाजल्या पासून गोलघरमध्ये जेवण सुरू होते" असा शुद्ध मराठीत निरोप दिला. सुरूबनात मधोमध गोलघर आहे. नावाप्रमाणेच गोलबांधणीचे. तिथे डायनिंगची सोय आहे. सगळं बुफे पद्धतीने.  दुपारचे जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स/चहापाणी गोलघरमध्ये. स्नॅक्सनंतर समुद्रात तासाभराची बोटराइड, रात्री बार्बीक्‍यू, ड्रिंक्स आणि जेवण समुद्रकिनारी वाळूत कॅंपफायरमध्ये. भल्या सकाळी ६:३० वाजता Nature Walk आणि त्यानंतर पुन्हा गोलघरमध्ये ब्रेकफास्ट आणि दुपारी चेकआउट असा २४ तासांचा कार्यक्रम होता जो दुपारच्या जेवणापासून सुरू होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;embed type="application/x-shockwave-flash" src="http://picasaweb.google.com/s/c/bin/slideshow.swf" width="400" height="300" flashvars="host=picasaweb.google.com&amp;hl=en_US&amp;feat=flashalbum&amp;RGB=0x000000&amp;feed=http%3A%2F%2Fpicasaweb.google.com%2Fdata%2Ffeed%2Fapi%2Fuser%2Fnasatiuthathev%2Falbumid%2F5560893857338969217%3Falt%3Drss%26kind%3Dphoto%26hl%3Den_US" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer"&gt;&lt;/embed&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भुका लागल्याच होत्या. नॉनव्हेज मेनुमध्ये फिश् फ्राय आणि मटण होते. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि मंगलोर, कारवारमध्ये काही फरक नाही. फक्त मंगलोर, कारवार कर्नाटकात येत असल्याने भाषा सोडली तर जेवणाखाण्याच्या पद्धती बर्‍याचश्या सारख्या आहेत. निदान फिश्-फ्राय, माश्याचे कालवण ई प्रकार तरी अगदी रत्नागिरी सारखे.  इथली लोकं देखील तांदळाची भाकरी खातात, तांदळाच्या भाकरीला अक्की रोटी म्हणतात इतकचं. देवबाग समुद्र किनारीच मग काय मासा एकदम ताजा होता. भुकेच्या गडबडीत कॉटेज सोडताना कॅमेरा विसरलो. तसं ही मच्छी पुढयात आली की फोटो वैगरे काढायचे लक्षात राहात नाही. जेवाणात इतरही प्रकार होते पण नेटवरच्या रिव्यूप्रमाणे जेवणात (नॉनव्हेज सोडता) जरा सुधारणा करायला वाव आहे. आम्ही सगळ्याची थोडी थोडी चव घेऊन मुख्य:त फिश्-फ्राय आणि चपात्या हाणल्या. जेवण जरा जडच झाले म्हणून आजूबाजूला फेर फटका मारायला निघालो. गोल घराला लागूनच टीव्ही रूम आहे. ती देखील गोल घरासारखीच गोल. एकीकडे टीव्ही आणि समोर गोलाकार मांडलेल्या खुर्च्या. गोलघर आणि टीव्हीरूम लाकडी पुलाने जोडलेली आहे. टीव्ही पहात जेवायची सवय असेल तर जेवण घेऊन इथे बसू शकता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळच काही अंतरावर टेंट ठोकलेले दिसले. जेंव्हा कॉटेज फुल्ल होतात किंवा जे कुणी ८-१० च्या ग्रूपने येतात त्यांची सोय टेंटमध्ये केली जाते. हे टेंट देखील अगदी सुसज्ज आहेत. आतमध्ये डबल बेड, छोटे टेबल, सामान ठेवायला खण. तीन बेड असलेले देखील २-३ टेंट होते. ह्या टेंटचा दुसरा उपयोग म्हणजे दुपारी १२ वाजता चेक-आउट केल्यानंतर जर का तुम्हाला संध्याकाळपर्यंत बीचवर वेळ घालवायचा असेल तर कॉटेज मधून तुम्हाला टेंटमध्ये शिफ्ट करून देतात. तेदेखील विनामूल्य.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बीचवर काही वेळ भटकून आम्ही पुन्हा कॉटेजवर परतलो. ४ वाजता चहा घेऊन बोटराइडचा प्लान होता. तासाभराच्या बोटराइडमध्ये बीचजवळ समुद्रात आत ३ छोटी बेटे आहेत त्याला फेरी मारुन आणतात. त्या  बेटांच्या थोडं पुढे खोल समुद्रात डॉल्फिनचे दर्शन देखील होते. मधूनच पाण्यावर येणारे काही डॉल्फिन दिसायचे पण 'तो बघ', 'तिकडे बघ' असे म्हणे पर्यंत ते पटकन गायब व्हायचे. बरेचदा सूर मारल्यानंतरच्या त्यांच्या शेपट्याच दिसायच्या. बरोबर गाईड होता. तो इंग्रजी, हिंदी, कन्नड अश्या प्रत्येकाच्या सोयीनुसार सगळ्या भाषेत माहिती देत होता. जर कधी वारे जोरात वहात असतील तर ही बोटराइड दुसर्‍या दिवशी सकाळी ठेवतात किंवा रद्द देखील करतात. आमच्या नशिबाने त्या वेळी वातावरण खूप छान होते. बोटराइड वरुन परत आल्यावर आम्ही पुन्हा बीचच्या दिशेने निघालो. येणार्‍या जाणार्‍या लोकांवर निर्बंध असल्याने बीच एकदम स्वच्छ आहे. कुठे ही फोडलेल्या बाटल्या, प्लास्टिक, समुद्रातून वहात आलेला कचरा नाही. सरकारी काम असलं तरी सगळी व्यवस्था चोख होती. कॉटेज आणि गोल घर ही बांधकामे सोडली तर तिथे बाकी काही विशेष बदल केलेले नाहीत. त्यामुळे च तिथे त्या नैसर्गिक वातावरणाचा जास्त आनंद मिळतो. उगीचच उंट घोडे आणून, पाळणे लावून तिथे कमर्शियलगिरी केलेली नाही. मी समुद्र किनारीच लहानचा मोठा झाल्याने बीच वैगरे गोष्टींचे मनाला फार कौतुक वाटत नाही पण तरीदेखील व्यापारीकरणापासून अलिप्त असा तो शांत आणि स्वच्छ देवबाग बीच भावला एवढे मात्र नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२०१० च्या शेवटच्या सुर्यास्ताचा आनंद घ्यायला सगळे किनार्‍यावर जमले होते. बहुतेक सगळ्या फॅमिलीज होत्या. थोड्याच वेळाने मघाशीच फिरून आलेल्या त्या छोट्या छोट्या बेटांच्या पाठीमागे सुर्यनारायण मावळतीला आला. १०-१५ मिनिटे सूर्यास्ताच्या मस्त वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. सूर्यास्तानंतर किनार्‍यालगत एका ठिकाणी कॅम्पफायरची तयारी सुरू झाली. बाजूलाच बार्बीक्‍यूसाठी निखारे फुलू लागले होते.  दुपारचे जेवण अजुन जिरले नव्हते पण बार्बीक्‍यूची तयारी पाहून पुन्हा हाणायला तयार होण्यासाठी आम्ही त्या संधीप्रकाशात पुन्हा बीचवर भटकून घेतले. फेरफटका मारुन परत आलो तर कॅंपफायर धगधगत होते. आजुबाजूला गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. स्नॅक्स तयार होता. ज्यांना ड्रिंक्स हवीत त्यांच्यासाठी एका बाजूला वेगळी सोय होती. एकंदरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त माहौल तयार झाला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तश्या सगळ्या फॅमिलीज असल्याने ३१ डिसेंबरच्यावेळी असतो तसा फार धांगड धिंगा नव्हता. एकमेकांशी फार ओळख नसल्याने सगळेजण आपल्या आपल्या ग्रूपमध्ये होते. लवकरच मिक्स भजी, चिकन चिली, व्हेज ६५ असा रुचकर आणि अप्रतिम स्नॅक्स सर्व्ह केला गेला. हळू हळू गारठा वाढु लागला तस तसे सगळे खुर्च्या ओढून कॅम्पफायरच्या जवळ येऊ लागले. जवळच समुद्राच्या लाटांचा संथ आणि लयबद्ध आवाज येत होता. एकदम परफेक्ट अशी संध्याकाळ आम्ही अनुभवत होतो. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने तिथे काही वेगळे होते अश्यातला भाग नाही. तिथल्या कर्मचार्‍यासाठी तो रूटिनचा भाग होता. एका अर्थी सरकारी आळस किंवा निष्क्रियाता का काय ती थोडीफार जाणवली. कदाचित ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर नेहमी दिसणारा झगमगाट आणि गोंधळ तेथे नव्हता म्हणून देखील असं वाटलं असण्याची शक्यता आहे. अधून मधून ते कॅम्पफायरमध्ये लाकडे लावून जात होते. चांदणे फार नव्हते त्यामुळे कॅंप फायरच्या उजेडातच सगळे व्यवहार सुरू होते. थोड्यावेळाने काही लोकं आपापल्या कॉटेजच्या दिशेने पांगली आणि कपडे वैगरे बदलून पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी तिथेच एकत्र जमली. जेवण दुपारपेक्षा छान होते. आलू-पालक तर अप्रतिम होता. कदाचित दुपार पासून यथेच्छ नॉनव्हेज खाऊन झाले असल्याने आम्हाला तो पालक रुचकर लागला असेल. असो जेवणानंतर पुन्हा बीचवर जवळच फेर फटका मारुन नंतर कॅम्पफायरमधली लाकडे वर खाली करत शेकोटी करीत बसलो होतो. कॅम्प फायरची मज्जा लुटण्याचे खूप जुने स्वप्न पूर्ण झाले होते. कोकणातले शिमग्याचे दिवस, समुद्र, काळोख आणि घनदाट सुरूबन यावरून लहानपणीच्या भुताखेतांच्या गोष्टी असे करता करता बारा वाजले. नाही म्हणायला त्या दिवशी देवबाग बीचवर देखील थोडी आतषबाजी केली गेली. हॅपी न्यू ईअरचा नारा झाला. फोनाफोनी सुरू झाली. त्या शांततेत वेगवेगळ्या रिंगटोनचे आवाज येऊ लागले. बीचवरुन समोरच कारवार शहरातून आकाशात सोडले जाणारे फटाके दिसत होते. ती रोषणाई बघून साधारण १ च्या सुमारास आम्ही सगळे आपापल्या कॉटेजवर परतलो. सकाळी लवकर उठून सुर्योदयाबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करायचे होते नां!!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-7059940086288500655?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/7059940086288500655/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=7059940086288500655&amp;isPopup=true' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/7059940086288500655'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/7059940086288500655'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='देवबाग बीच रिसॉर्ट'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-6481263749151628297</id><published>2010-12-31T07:03:00.000-08:00</published><updated>2010-12-31T07:14:47.983-08:00</updated><title type='text'>२०१० जाता जाता...</title><content type='html'>सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचे स्वागत करायला कारवारला देवबाग बीचवर आलोय. २०१० ची सुरूवात स्कंधगिरीवरुन &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post.html"&gt;सूर्योदय &lt;/a&gt;पाहून केली होती त्यामुळे २०१० चा शेवट सूर्यास्ताने. बाकी यंदा जास्त फिरणे झाले नाही म्हणून आत्ता २०११ चा पहिला विकांत देवबाग आणि मुरुड़ेश्‍वर फिरून साजरा करणार. परतलो की पोस्ट लिहायचा विचार आहे पण ईग्रहांची महादशा अजुन संपली नसल्याने आजकाल ब्लॉगिंग पूर्णपणे थंडावले आहे. संकल्प सोडत नाही पण निदान २०११ मध्ये तरी लिखाण नियमीत सुरू व्हावे असे मनापासून वाटते. पाहू...&lt;br /&gt;&lt;br /&gt;२०१० चा निरोप घेऊन मावळलेला सुर्यनारायण... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TR3xuE6ojxI/AAAAAAAAAdQ/WNFZcRVYvzg/s1600/2010%2BSunset.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TR3xuE6ojxI/AAAAAAAAAdQ/WNFZcRVYvzg/s400/2010%2BSunset.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5556863289141006098" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता जाता नवीन वर्षासाठी म्हांराजाकं गार्‍हानं घालतायं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;रे म्हांराजा !!!!!&lt;br /&gt;बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सरत्या साला बरोबर हे भ्रष्टचारी, त्यांचे घोटाले, महागाई पण नष्ट होऊदें...&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकांच्या ईडा-पीडा त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाइतक्याच टिकूदें...&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्यांका चांगली बुद्धी आणि आरोग्य लाभूदें...&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि येता नवीन वर्ष सगळ्यांका सुखसमृद्धी आणि भरभराटीचो जावंदे...&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-6481263749151628297?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/6481263749151628297/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=6481263749151628297&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6481263749151628297'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6481263749151628297'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='२०१० जाता जाता...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TR3xuE6ojxI/AAAAAAAAAdQ/WNFZcRVYvzg/s72-c/2010%2BSunset.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-41824848864758610</id><published>2010-09-21T04:19:00.000-07:00</published><updated>2010-09-22T21:33:12.494-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इंटरनेट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महादशा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भ्रष्टाचार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बी.एस्.एन्.एल्.'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><title type='text'>ई ग्रहांची महादशा</title><content type='html'>गेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; हॅलो&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पलीकडून:&lt;/span&gt; साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; हू ईज़ धिस?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पलीकडून:&lt;/span&gt; साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पलीकडून:&lt;/span&gt; साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; हां हां मैने अप्लिकेशन किया था.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पलीकडून:&lt;/span&gt; हा करेक्ट साssssर.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; कब मिलेगा कनेक्शन?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पलीकडून:&lt;/span&gt; अब्बी. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पलीकडून:&lt;/span&gt; आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्‍या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्‍या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत  आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;श्रीनिवास :&lt;/span&gt; "साssर, केबल नही है".&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; क्या??? केबल नही? &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;श्रीनिवास :&lt;/span&gt; हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी  बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो."  कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्‍हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;पीडीत:&lt;/span&gt; हां &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग श्रीनिवासकडे वळून&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुन्हा श्रीनिवासकडे वळून&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; ठीक है ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्‍यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;श्रीनिवास:&lt;/span&gt; साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;श्रीनिवास:&lt;/span&gt; (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; तो अब क्या? मैं क्या करू?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;श्रीनिवास:&lt;/span&gt; क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मी:&lt;/span&gt; (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-41824848864758610?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/41824848864758610/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=41824848864758610&amp;isPopup=true' title='25 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/41824848864758610'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/41824848864758610'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='ई ग्रहांची महादशा'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>25</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-6107510593164877934</id><published>2010-08-25T03:24:00.001-07:00</published><updated>2011-06-07T07:01:29.320-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='श्रावण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रत्नागिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मस्त्याहार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><title type='text'>श्रावण, शाकाहार आणि आम्ही</title><content type='html'>सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;    हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्‍या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्‍या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;    यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-6107510593164877934?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/6107510593164877934/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=6107510593164877934&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6107510593164877934'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6107510593164877934'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='श्रावण, शाकाहार आणि आम्ही'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-5659090066011505191</id><published>2010-06-14T08:27:00.000-07:00</published><updated>2010-06-14T08:47:17.895-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हापूस आंबे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुट्टी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकण'/><title type='text'>सुट्टी संपली!!!</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZMhpgWTHI/AAAAAAAAAWs/h6uTAAiOvdI/s1600/IMG_0141.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZMhpgWTHI/AAAAAAAAAWs/h6uTAAiOvdI/s400/IMG_0141.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5482653737331084402" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी,  मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZOJwsvlyI/AAAAAAAAAXU/aqXHi0147hM/s1600/IMG_0323.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZOJwsvlyI/AAAAAAAAAXU/aqXHi0147hM/s400/IMG_0323.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5482655525968516898" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZOJaBj2KI/AAAAAAAAAXM/O7KO94MEIlw/s1600/IMG_0321.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZOJaBj2KI/AAAAAAAAAXM/O7KO94MEIlw/s400/IMG_0321.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5482655519881812130" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-5659090066011505191?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/5659090066011505191/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=5659090066011505191&amp;isPopup=true' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5659090066011505191'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5659090066011505191'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='सुट्टी संपली!!!'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TBZMhpgWTHI/AAAAAAAAAWs/h6uTAAiOvdI/s72-c/IMG_0141.JPG' height='72' width='72'/><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-3401501834013820985</id><published>2010-04-30T05:59:00.001-07:00</published><updated>2011-06-07T07:01:16.457-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अमेरिका'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आवडी-निवडी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><title type='text'>फसलेली खादडी</title><content type='html'>आजपर्यंत बर्‍याच खादडिच्या पोस्ट वाचल्या आणि तोंडाला पाणी सुटलं. किती ही निषेध नोंदवला गेला तरी तो निषेध म्हणजे प्रोत्साहन समजून जनतेने फोटोसकट खादडी महात्म्य सुरुच ठेवले. आज मी माझी खादडीची एक आठवण लिहितोय ज्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटले नाही पण तोंडचे पाणी पळाले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;झालं काय तर अमेरिकेत असताना दर दुपारी जेवायला बाहेर जायचो. भारतातून गेलेले आम्ही दोघे, मी आणि चंद्रु, नेहमीच दुपारी बाहेर जायचो. दररोज टॅकोबेल, चिलीज्, पिझ्झाहट, बर्गर-किंग, चिपोटले, कधी चायनीज तर कधी जापनीज अश्या ठराविक ठिकाणी आलटून पालटून भेटी दिल्या जायच्या. शुक्रवारी ऑफीसचे इतर लोक देखील घरून लंचबॉक्स न आणता बाहेरच येत असतं. अश्याच एका शुक्रवारी आमच्या बरोबर आमच्या टीम मधले ३-४ अमेरिकन निघाले जेवायला. कुठे जायचं कुठे जायचं करता करता Joe's या इटालियन रेस्तोरंटला जायचे असे ठरले. तो पर्यंत मेक्सिकन, जापनीज चाखुन झालेच होते. आम्ही पण म्हटले चला आत्ता इटालियन होऊन जाऊ दे. Joe's ला गेलो. आत गेल्या गेल्या शोले स्टाइलमध्ये कितने आदमी है वैगरे विचारून झाल्यावर आम्ही सगळे मावू असे टेबल दिलं गेलं. मी, चंद्रु आणि टॉम असे तिघे बसलो. टॉम वेगन होता. हे वेगन लोकं म्हणजे नॉनव्हेज सोडाच पण दुधापासून बनलेले पदार्थ पण खात नाहीत. फक्त नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी घासपुस आणि त्यापासून बनणारे पदार्थ खातात म्हणे. इतर अमेरिकन जसे सकाळ संद्याकाळ कॉफीचा एक मोठा मग नाहीतर कोल्डड्रिंकचा टीन घेऊन फिरताना दिसायचे तिथे हा पठ्ठ्या केवळ पाणी प्यायचा. ऑफीसपार्टीला देखील डोनट सोडून कुठल्या चीज-बर्गर अश्या पदार्थांना देखील शिवायचा नाही. आधी टॉम वेगन आहे म्हणून हे सगळं खात नाही असं मला कळलं तेंव्हा वेगन म्हणजे काहीतरी रोग असावा असं मला वाटलं होतं पण वेगन हा रोग नसून तो डाएट आहे हे मला नंतर कुणीतरी सांगितलं. त्यात विकीपिडियावर वेगनबद्दल पहिल्या ओळीतच हा काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्णपणे विरुद्ध जीवनशैलीचा प्रकार आहे हे समजताच मी ते पेज बंद केलं. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही तिथला पत्ता कशाला शोधा... असो. तर असा हा टॉम (बिच्चारा!!! व्यर्थ ते जीवन) त्याच्या ह्या वेगन डाएटमुळे म्हणे त्याचे विमान प्रवासात हाल व्हायचे आणि ह्या एकाच कारणामुळे तो कधी अमेरिकेबाहेर गेला नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर मूळ मुद्दा असा की मला आणि चंद्रुला दोघांना ही काय ऑर्डर कारायचं काहीच माहीत नव्हतं. इतर वेळी रेस्तोरंटमध्ये जायच्या आधी आम्ही &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_23.html"&gt;लिंडाला&lt;/a&gt; विचारून अमुक अमुक ठिकाणी काय मागायचं ते विचारून जायचो आणि हाणून यायचो. आज बरोबर टीममधली लोकं असल्याने आम्ही लिंडाला काही न विचारता आलेलो. त्यामुळे सहाजिकच टॉमला तूच आमच्यासाठी (काहीतरी नॉनव्हेज) ऑर्डर दे असं सांगितलं. त्याप्रमाणे टॉमने सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. साधारण १५-२० मिनिटांनी तो वेटर एका प्लेटमध्ये पालापाचोळा आणि एका परडीमध्ये बरेचसे पाव घेऊन आला. ते बघून आम्ही आधी "ह्याने काय होणार" या अर्थी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि टॉमला तू सगळ्यांसाठी एकच डिश ऑर्डर केलीस का? असे विचारले. नंतर आम्हाला कळले की इटालियन रेस्तोरंट मध्ये गेलं की हा घास पूस प्रकार येतोच. मग आम्ही आपले चीज लावून दोन दोन पाव आणि ती कोवळी पाने खाल्ली आणि उरलेली भूक मुख्य ऑर्डरसाठी राखून ठेवली. थोड्या वेळाने वेटर उरलेले पाव आणि आमच्या रिकाम्या डिश घेऊन गेला आणि दुसर्‍याने ऑर्डर प्रमाणे प्रत्येका समोर मेन मेनू आणून ठेवला. आमच्या दोघांसाठी टॉमने पास्ता ऑर्डर केला होता. चंद्रुसाठी पेन्ने रिगाते आणि माझ्यासाठी असच एक अगम्य नाव असलेली डिश. चंद्रुची डिश निदान दिसायला तरी देखणी आणि आकर्षक होती. टॉमच्या पुढयात मात्र मागाच्याच घासपूसप्रमाणेच पण जरा अधिक चांगली दिसणारी डिश होती. पण माझ्या पुढयातील प्रकार पाहण्यालायक देखील नव्हता. माझ्यासाठी टॉमने काहीतरी चिकनची डिश ऑर्डर केलेली. चरबी किंवा पातळ मऊ रबराचा शोभेल असा एक सेंटिमीटर जाडीचा कसलासा थर होता, तो चमच्याने भोसकला तर रक्त यावं तसा लाल लाल जरा जरा घट्ट असा (टोमॅटो??) सॉस बाहेर आला. आत चमच्याने ढोसून पाहिलं तर काही तुकडे असावेत असा अंदाज आला. बहुतेक तेच चिकन असावं. स्मगलिंग केल्यासारखं चिकन त्या अगम्य थराखाली लपवून ठेवलं होतं. रेस्तोरंटमध्ये शिरल्या पासून जो एक प्रकारचा आंबट वास येत होता तो त्या सॉसचाच होता ह्याची खात्री पटली. जसं दुसर्‍याची बायको चांगली दिसते (असं म्हणतात बुवा, आम्हासनी काय बी ठावं नाय) तसं मला दुसर्यांच्या पुढयातल्या डिश चांगल्या वाटू लागल्या. चंद्रुच्या डिशमध्ये पिवळ्या रंगाच्या रेघा-रेघांच्या एक दीड इंच लांबीच्या लांब नळ्या होत्या. त्या पण रबरीच दिसत होत्या. काही माणसे कशी स्वभाव कळण्या अगोदरच प्रथम दर्शनीच मनातून उतरतात तशीच माझ्या पुढयातील डिशदेखील चाखण्याआधीच माझ्या जिभेवरून उतरली होती. पहिल्या प्रथम मी तो थर फाडून बाहेर आलेला चमचा भर सॉस घेतला. जसजसा तो तोंडाजवळ नेत गेलो तसतसा त्याचा वास (दर्प) अधिकच जाणवला. जिभेवर ठेवताच डिश जशी दिसते तशीच आहे ह्याची खात्री पटली. मी चंद्रुकडे पाहिलं तर तो काट्या-चमच्यामध्ये त्या नळ्या पकडून गिळण्यात रमला होता. मला वाटलं नळ्या दिसतात त्या प्रमाणे चांगल्या असाव्या. टॉम नेहमीप्रमाणे प्रसन्न वदनाने वदनी केवळ पाला पाचोळा घेत होता. बहुतेक माझाच गेम झालाय असं मला वाटलं आणि मी पण माझं थोबाड् शक्य तितकं प्रसन्न ठेवत आणखी दोन चमचे ओरपले. गिळायला होईना. त्या सॉसचा वास तर नाकात घुमत होता. शेकडो मैल दूर असून देखील मला अचानक कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये आंबा घाट लागल्यावर मुलं ओकली की जो वास येतो तो आठवला आणि अजुन कसतरीच झालं. मग पटकन पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सॉस गिळला. मग म्हटलं चला काहीच नाही तर चिकनचे तुकडे हाणू म्हणून सॉसमध्ये चमच्याने शोधाशोध करून दोन तुकड्यामध्ये चमचा खुपसला आणि मोठ्या अपेक्षेने स्वाहा केले तर इथेही त्या तुकड्यानां लागलेला सॉस आपली चव पुन्हा उतरवून गेला. चिकन देखील चिकन नसून कसल्याश्या कंदमुळाचे उकडलेले तुकडे असावे असे वाटले. इथेही पचका. जिथे भरोश्याच्या चिकनने ऐनवेळी घात केला तिथे त्या रबरी थराकडून काडीची देखील अपेक्षा नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे ती खरी केली. बहुतेक मैद्याचा थर असावा, मला तो घास गिळल्यावर आठवडाभर दररोज १-२ किमी धावलो तरच हा थर आपल्या पोटातून निघून जाईल असे वाटले. एखाद्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात (मुंबई इंडियन्स फाइनल हारल्यावर सच्चुपण असचं म्हणाला होता) तसा माझ्या आयुष्यातला तो दिवस होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S91OINRNNEI/AAAAAAAAAVE/qeYSUR4lMnA/s1600/Penne+Rigate.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 325px; height: 288px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S91OINRNNEI/AAAAAAAAAVE/qeYSUR4lMnA/s400/Penne+Rigate.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5466611425605399618" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चंद्रुदेखील आधी आवडीने खातो आहे असं मला वाटलेलं पण तो देखील जरा थंडावला होता. पण त्याने कसं बसं का होईना बर्‍याचश्या नळ्या घश्याखाली उतरवल्या होत्या. मी त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण पण डोळे मिटून गिळून टाकु म्हणून पुन्हा माझ्या डिशकडे वळलो आणि सॉस, चिकन, रबर असे जे काय मिळेल ते एकत्र चमच्यात उचललं आणि मुखी लावलं. म्हटलं एक एक डिश खाण्याची ठराविक पद्धत असते, हे सगळं एकत्र चांगलं लागत असेल. जशी म.रा.प.म.च्या बस स्टॅंडवर सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्यावर रस्सा ओतला की कशी मिसळ बनते आणि समस्त जनता ती कशी आवडीने खाते. तिथेही जर एक एक टाकाऊ पदार्थ वेगळा खायला गेलं तर त्याला घंटादेखील चव नसते पण बाकीच्या टाकाऊ पदार्थंबरोबर कसं 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' होतं. म्हटलं तसं करून पाहू पण नाही. तिथे ही आधी सॉसचा वास, मग सॉसची चव आणि मग कंदमुळं अश्या क्रमाने पुन्हा सगळं पाण्याच्या घोटाबरोबर माझ्या पोटात गेलं. त्या रबराला रंग रूप सोडलं तर वास, चव आणि इतर काहीच गुणधर्म नव्हते. त्या क्षणी टॉमकडे पाहून मलादेखील आपण वेगन बनून पालापाचोळा खावा असे वाटून गेले. बहुतेक टॉमने लहानपणी हीच डिश खाल्ली असावी आणि त्या घटनेने त्याला आयुष्यभरासाठी वेगन डाएटची दीक्षा घेण्यास प्रवृत्त केले असावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एव्हाना आज उपाशी राहावं लागणार हे समजून चुकलं होतं. भूक तर काहीच भागलेली नव्हती. मनातून सारखं त्या वेटर ला बोलावून "अरे ते माघाचचे पाव घेऊन ये रे जरा" असे सांगावेसे वाटत होते. टॉमदेखील माझ्या डिशकडे "Sid didn't like it huh?" पाहून असं म्हणाला. मी कसबसा हसलो. कारण नाही नाही, मला आवडली, ठीक आहे असं काही म्हणणं शक्य नव्हतं. चार पाच चमचे सोडले तर ती डिश जशीच्या तशी होती. मी देखील प्रथमच असं अन्न टाकून उठनार होतो. पण काही इलाज नव्हता, मी माझ्या परीने प्रयत्न केला होता. वेटरने देखील पॅक करून देऊ का? असं विचारलं. मी नको म्हटलं आणि आम्ही बिल वैगरे भरून तीकडून बाहेर पडलो. ऑफीसला आल्यावर जवळची सगळी चिल्लर वेंडिंग मशीन मध्ये टाकून वेफर्स, कूकीज, चॉक लेट्स असं जे मिळेल ते खाल्लं आणि वरुन पाणी प्यायलो. त्या दिवसापासून संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ऑफीसच्या बॅगेत मॅगीचं एक पॅकेट ठेवू लागलो. लिंडाला देखील माझा कसा पोपट झाला ते सांगितलं पण झालं भलतचं. तिला इटालियन खूप आवडायचं आणि ती आत्ता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जाते असं म्हणाली. गेम झाला. लिंडाला नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही Joe'sच्या वारीला गेलो. ह्या वेळी मात्र भविष्यातली गुंतवणूक म्हणून मी आधीच ५-६ पाव आणि सगळा पाला पाचोळा साफ करून टाकला. मागच्या वेळी चंद्रु "इतक्या काही खास नसतात पण गिळण्यालायक असतात" असं म्हणाला होता म्हणून मी त्याच्या अनुभवावरून ह्या वेळी त्या पिवळ्या नळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्याने सांगितल्या प्रमाणे त्या नळ्या गिळण्याइतपतच बर्‍या होत्या आणि ऑफीसमध्ये मॅगीचे पॅकेट असल्याने चिंता नव्हती. पण तेंव्हापासुन कानाला खडा लावला आणि पुन्हा कधी इटालियन रेस्तोरंटचं नाव देखील काढलं नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर ही होती माझ्या फ़सलेल्या खादडीची कहाणी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(ता. क. भारतात परत येताना फ़्लाइटमध्ये एअरहोस्टेसने जेवणासाठी माझ्यापुढे पास्ता धरला त्याच वेळी माझ्या MP3 प्लेअरवर "भय इथले संपत नाही" हे गाणं सुरु झालं हा योगायोग असावा.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-3401501834013820985?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/3401501834013820985/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=3401501834013820985&amp;isPopup=true' title='15 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3401501834013820985'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3401501834013820985'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='फसलेली खादडी'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S91OINRNNEI/AAAAAAAAAVE/qeYSUR4lMnA/s72-c/Penne+Rigate.jpg' height='72' width='72'/><thr:total>15</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-8082516438916271153</id><published>2010-03-29T09:56:00.000-07:00</published><updated>2011-02-06T22:06:51.809-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='झोप'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सवय'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आळस'/><title type='text'>एक क्षण मोहाचा</title><content type='html'>गेले काही महिने रोज सकाळी हा मोहाचा क्षण येतो. रोज रात्री झोपताना न चुकता सकाळी सहा साडे-सहाचा गजर लावतो. का तर सकाळी उठून जॉगिंगला जायचे. कमरेभोवती साइकलचा टायर झालाय. म्हटलं त्याची स्कूटर आणि नंतर सुमो किंवा ट्रॅक्टरच्या टायरपर्यंत पदोन्नती व्हायच्या आत काही हालचाल करायला हवी. कोंबडी-बोकडाच्या रूपाने कॅलरी नित्यनेमाने शरीरात प्रवेश करत असतात आणि वर आम्ही निर्लजपणे दिवसभर कचेरित क्लिकक्लिकाट करीत बसलेले. त्यात शुक्रवार हा चिकन बिर्याणी आणि शोरमा रोल खाल्ल्याशिवाय जात नाही. असो ही पोस्ट खादडीवर नसून खादडीच्या दुष्परिणामांवर आहे त्यामुळे तोंड आवरतं घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की सकाळी गजर झाला की हात आपसूक ताणला जातो आणि गजर बंद करण्यात येतो. रोज वेगवेगळी कारणं असतात. गुरुवार ते रविवार "आज कुठे सोमवार पासून जाऊ", सोमवारी "वीकेंडला जागरण झालाय. झोप पूर्ण करू. आज पासून पुन्हा काम करायचं आहे". मंगळवार बुधवार मनात येईल ते काही कारण. महिन्याच्या २० तारखेनंतर "अरे आत्ता कुठे १ तारखेपासून जाऊ." तरी नशीब मी पोर्णिमा-आमावस्या बघत नाही. डिसेंबर मध्ये नवीन वर्षाचा संकल्प करू असं म्हणून टाळलं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर "आत्ता नवीन वर्षाच्या संकल्पवाल्यांची गर्दी असेल" म्हणून टाळलं. स्व:तच स्व:तला द्यायची असली तरी कारणे कशी स्व:तच्या मनाला पूर्णपणे पटतील अशी. उगीचच "आज कंटाळा आलाय", "आज नको उद्या जाऊ" अशी थातुर मातुर कारणे कधी नाही दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार? &lt;br /&gt;&lt;br /&gt;बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्‍या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्‍या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-8082516438916271153?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/8082516438916271153/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=8082516438916271153&amp;isPopup=true' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8082516438916271153'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8082516438916271153'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='एक क्षण मोहाचा'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-3889572049314511829</id><published>2010-02-24T06:04:00.001-08:00</published><updated>2011-06-07T07:00:56.235-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन तेंडुलकर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिवाळी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S4U7egpgV7I/AAAAAAAAASY/vSNk5Lg5hhQ/s1600-h/Sachin.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 288px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S4U7egpgV7I/AAAAAAAAASY/vSNk5Lg5hhQ/s400/Sachin.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5441821120093247410" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. अन्वरने हा रेकॉर्ड भारता विरुद्धच केलेला. त्यामुळे तो घाव ही अनेक वर्ष आपल्या उरावर होता. सेहवाग कधीतरी ह्या जखमेवर मलम लावेल ह्याची खात्री होती. पण आज सचिनने ते करून दाखवले. मग २०० कधी होणार? मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. चेंडू कमी कमी होऊ लागले आणि तिकडे धोणी पेटला. नुसते चौके छक्के. म्हटलं काय रे बाबा.... पण नाही शेवटी तो क्षण आला. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार हाणून धोणीने दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सचिनला स्ट्राइक दिला. सचिन १९९ नाबाद. मग वेळ न काढता, उत्कंठा न वाढवता सचिनने पुढाचाच चेंडू एका धावेसाठी तटावून एक दिवशीय क्रिकेटमध्ये २०० धावा करण्याचा विक्रम केला. नेहमीप्रमाणे हेल्मेट काढून आकाशाकडे पहात बॅट उंचावली. ऐन शिमग्यात देशभर दिवाळी सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या सचिनने एकदिवशीय क्रिकेट मध्ये प्रथम २०० धावा करण्याचा मान मिळवला. आज अगणित रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अहो फार कशाला तो एक धाव करून आउट झाला तरी ती धाव विश्व विक्रमीच असते. २०० केले त्यापेक्षा अन्वरचा रेकॉर्ड मोडला ह्याचा जास्त आनंद आहे. ह्या एका माणसाने गेली २० वर्षे जे काही केलं आहे त्याला तोड नाही. मी काय बोलणार त्याबद्दल. फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेला माणूस. परवाच्याच मॅचचं घ्या. भारत एका धावेने जिंकला आणि त्याधीच्या षटकामध्ये सचिनने जी डाइव मारुन चौकार अडवला ते पाहून १५-२० वर्षाच्या मुलांनी पण तोंडात बोटं घातली असतील. कोण म्हणतं होतं ते ३ वर्षापूर्वी की सचिन ने आत्ता रिटायर व्हायला हवे. आज या आणि बोला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला नाही वाटतं की कुणी आत्ता भारत दक्षिण आफ्रिकेची जी उरलेली मॅच सुरू आहे ती बघत असेल. न्यूज़ चॅनेल तर फक्त सचिन सचिन आणि सचिन. आजतकने तर नेहमी प्रमाणे अब्दुल कादिरला फोन करून १९८९ मध्ये सचिनने केलेल्या जखमांवरची खपली काढली. अब्दुल कादिरला पुन्हा अल्ला आठवला. जाता जाता अब्दुल कादिर सचिनला शुभेच्छा देताना म्हणाला की "यह रेकॉर्ड सिर्फ सचिन को शोभा देता है, शायद इसिलिये आज तक २०० के इतने करिब जाने के बाद भी कोई २०० को छू नही सका". खरं आहे गेला बाजार हेडन, गिलख्रिस्त आणि आत्ता सेहवाग, गेल आणि असे कितीतरी स्फोटक खेळाडू असताना २० वर्षांनंतर सचिननेच एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वप्रथम २०० धावा केल्या ह्यातच सर्व आले. ब्रायन लाराने कसोटी मध्ये सर्वप्रथम ४०० धावा केल्या त्यामुळे आत्ता कुणीही ४०० चा टप्प ओलांडला तरी लाराने पहिल्यांदा तो ओलांडला असल्याने लाराचं कौतुक कायम राहाणार. तसेच आज आपल्या सचिनने एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २०० चा टप्पा ओलांडाल्यामुळे उद्या कुणीही २०० चा टप्पा ओलांडला तरी आपला सचिनच लक्षात राहाणार. या आधीच अनेक वेळा सचिनला &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_14.html"&gt;मानाचा मुजरा&lt;/a&gt; करून झालाय.आत्ता काय काय लिहु अजुन. आज इतकं तृप्त वाटत य की काय सांगू. आज मला माझा स्वत:चाच हेवा वाटतोय की मी सचिनला २०० धावा करताना याची देही याची डोळा पाहिले. काही काही गोष्टी न मागता मिळतात. आजची ही सचिनची खेळी त्यापैकीच एक...&lt;br /&gt;&lt;br /&gt;~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~&lt;br /&gt;याच विषयी आधी &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/08/blog-post.html"&gt;नवज्योतसिंग सिद्धूची मला सर्वात भावलेली कॉमेंट&lt;/a&gt;&lt;br /&gt;~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~&lt;br /&gt;&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-3889572049314511829?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/3889572049314511829/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=3889572049314511829&amp;isPopup=true' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3889572049314511829'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3889572049314511829'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/02/blog-post_24.html' title='किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S4U7egpgV7I/AAAAAAAAASY/vSNk5Lg5hhQ/s72-c/Sachin.jpg' height='72' width='72'/><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-7869091279451796457</id><published>2010-02-13T22:01:00.000-08:00</published><updated>2010-02-13T22:02:01.919-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बंगलोर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रेम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रत्नागिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मस्त्याहार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकण'/><title type='text'>मेरा पहेला प्यार!!!</title><content type='html'>कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्‍या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल  रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्‍या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही  जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S28S9jhPRrI/AAAAAAAAASQ/tE_z91-3Aq8/s1600-h/F2.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S28S9jhPRrI/AAAAAAAAASQ/tE_z91-3Aq8/s400/F2.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5435584123975452338" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S28S9aUkyAI/AAAAAAAAASI/qWqihAR6kf4/s1600-h/F3.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 267px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S28S9aUkyAI/AAAAAAAAASI/qWqihAR6kf4/s400/F3.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5435584121506416642" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;center&gt; &lt;font size="1"&gt;फोटो सौजन्य: Forwarded Email&lt;/font&gt; &lt;/center&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-7869091279451796457?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/7869091279451796457/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=7869091279451796457&amp;isPopup=true' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/7869091279451796457'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/7869091279451796457'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='मेरा पहेला प्यार!!!'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/S28S9jhPRrI/AAAAAAAAASQ/tE_z91-3Aq8/s72-c/F2.jpg' height='72' width='72'/><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-6229686745113385725</id><published>2010-01-30T20:39:00.000-08:00</published><updated>2011-06-07T07:00:37.169-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मला भेटलेली माणसं'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मित्र'/><title type='text'>क्षत्रिय कुला"वसंत"</title><content type='html'>वसंत नावाचा माझा एक मित्र. पुण्यात असताना ह्या दिव्य व्यक्तीशी माझी ओळख झाली. एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आपल्या घराण्याचा फार अभिमान होता त्याला. कधी काळी पणजोबा खापर पणजोबांनी कुठे राजेशाही अनुभवली होती पण लौकिक अर्थाने राजेशाही गेली तरी पणजोबा खापर पणजोबांचे रक्त मात्र आज ही ह्यांच्या धमन्यांमधून वाहतं आहे. हल्लीच्या युगात देखील ह्यांच्या घरी मानपान, घराण आणि तत्सम राजेशाही थाट टिकून आहेत. पण 'राजविलासी आणि घोडे पलंगाशी' अशा पार्श्वभुमीतून डाइरेक्ट आमच्या सारख्या सामान्य मावळ्यांमध्ये येऊन पडल्यामुळे त्याची 'न घर का ना घाट का' अशी परिस्थिती झालेली. त्याचे जगण्याचे आणि जगाबाद्दलचे फंडे वेगळेच होते आणि शिक्षण संपल्यावर प्रथमच घराबाहेर पडल्यावर खरोखराच्या जगात आपले फंडे संभाळाताना त्याचे हाल झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जे लोकं आम्हा दोघांना ओळखतात आजसुद्ध मला प्रत्यक्ष किंवा फोन वर भेटल्यानंतर पहिल्यांदा "त्याची" चौकशी करतात. "तो" काय म्हणतो किंवा "त्या" चे नवीन पराक्रम (आमच्या भाषेत गेम) याबाबत विचारणा आधी होते. अर्थात "त्या"ला भेटलेला "त्या"च्या सोबत चार "गोष्टी" बोललेला, त्याचे जगावेगळे फंडे ऐकलेला माणूस त्याला विसरणे अशक्य. व्यक्तिमत्वच असे आहे. एखादी सरळ साधी गोष्ट बेकायदेशीररित्या करण्यात ह्याला परमानंद मिळतो. मग ते काही असो. आमची जेंव्हा सुरुवातीला ओळख झाली तेंव्हा माणूस मरणाचा कन्फ्यूज़ होता. विषय काही असो, ह्याचे काही ठराविक फंडे. त्याच्या चौकटीमध्ये काही बसल नाही की माणूस खचला. त्यावेळी आम्हा सगळ्यानाच जॉबची घाई होती. कधी कधी कोणा मित्राला जॉब मिळाल्याची खबर येई. मग तो कुठल्याही डोमेन मधला असो. ज्याला जॉब मिळेल त्याची लाईन चांगली. कोणाला नेटवर्किंग मध्ये जॉब मिळाला की हा सुरू झाला, "अबे तो कोर्स साही आहे. xyz ला Offer लेटर मिळाला आहे, त्याचा Format घेऊ. अमुक अमुक ठिकाणी Experience लेटर बनवून मिळतात. आपण तस करू, १-२ Fake Project टाकु. मस्त जॉब लागून जाईल." बाकी मार्कशीट, लेटरहेड आणि तत्सम प्रकार कुठे छापून मिळतात हे ह्याला माहीत. मला तर वाटते ह्याने मोठा झाल्यावर आपले २-३ फेक जन्मदाखले बनवून घेतले असतील. ना जाणो उद्या जॉब च्या वेळी वय आडवे आले तर लगेच २ वर्षानी माणूस लहान. वय, अनुभव, आणि जे काही बदलता येईल ते सगळ शक्य. कुठेही कसली डिपेंडेन्सी नाय पाहिजे. हा इंजिनियरिंग पास झाला तेंव्हा खुद्द ह्याच्या आजोबांनी "हे पोट्ट पहिल्याच फटक्यात पास झालं म्हणजे दाल मे कुछ काला है" असे कौतुकाचे उद्‌गार काढले होते. ड्यूप्लिकेट चाव्या बनवणे हा आणखी एक आवडता उद्योग. बेकायदेशीर गोष्टींचा पुरस्कर्ता. एकाचे पासपोर्टचे काम सुरू होते. सगळे व्यवस्थित पार पडले होते. ज्याचे काम होते त्याने सगळे चौकटीमध्ये केले होते. पण हे साहेब काही मान्य करायला तयार नाहीत. "अबे तू पोलिसाना काहीतरी द्यायला हवे. नाहीतर ते तुला कुठेतरी अडकवतील. तुला द्यायचे नसतील तर नको देऊ, मी देतो." जणू काही कोप होईल आणि पासपोर्ट पचणार नाही. पण नाही... अशी कामे कायदेशीर होऊच शकत नाहीत. झाली तरी मी होऊ देणार नाही. हल्ली Dual सिम कार्डचे मोबाइल मिळतात, पण ह्या सदगृहस्थाकडे ही सिस्टम ४ वर्षापूर्वी अस्तित्वात होती. कुठून काळ्या कांड्या करून ह्याने तो सिम कार्ड स्विच आपल्या मोबाइल मध्ये अक्षरश: घुसुवन बसवला होता. बर दोन वेगळे नंबर असण्याची काही गरज नव्हती, पण...&lt;br /&gt;&lt;br /&gt;झोल करायची इतकी आवड की मध्ये टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये जागा भरायच्या होत्या. चांगली मोठी पोस्ट होती. साहेबाना कुठून तरी खबर लागली. भरला फॉर्म. त्यामध्ये नेमणुकीसाठी तीन पसंतीची ठिकाणे द्यायची होती. साहेबानी पहिली पसंती बिहारला दिली. का तर तिथे बेकायदीशीर कामा शिवाय काहीच होत नाही. क्रिकेट खेळणारा माणूस जसे लॉर्ड्स वर खेळण्याचे स्वप्न पाहत असेल तसे हे बिहार मध्ये जाउन भ्रष्टाचार करायला उतावळे झालेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कला क्रीडा साहित्य ह्या विभागांमध्ये अत्यानंद. कोणाची शेपूट कोणाला लावेल ह्याचा पत्ता नाही. मध्यंतरी ब्रायन लाराने ४०० धावा करून विश्वविक्रम नोंदवला. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. साहेब पण आमच्या बरोबर होते. डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे किडे वळवळ करत होते. आमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष्य नव्हते. पण मध्येच काही तरी आपला सहभाग दाखवावा म्हणून "काय केले लारा दत्ता ने ?" असा प्रश्न टाकून दिला. उद्या अभिनव बिन्द्राने सचिन तेंडुलकरचा क्रिकेट मधला विक्रम ओलिंपिक मध्ये मोडला हे संगितल तरी तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघणार नाही, उलट हे व्यवस्थित लक्ष्यात ठेवून उद्या दुसर्‍या कोणाला तरी ठसका लावेल ह्याची खात्री आहे. तसा तो कला क्रीडा साहित्या ह्या विभागामध्ये मलाच काय पण कुणालाही नडणार नाही. कारण ह्याला साप्ताहिक/मासिक/पेपर मध्ये भविष्य आणि पेज थ्री बातम्या आणि काही आकर्षक फोटो हे सोडून बाकी कश्याशी पडलेली नसते. राजकारणात थोडेफार स्वारस्य आहे पण ते राजकारणात नसून राजकारणामुळे मिळणार्‍या गोलमाल करण्याच्या ताकदीत आहे हे वेगळं सांगायला नको.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्ता पोरीबाबत. ह्या बाबतीत ह्यानी आध्यात्मिक पातळी गाठलेली. M G रोड वर आढळणार्‍या सगळ्या पोरी xxx हा नियम. एखादी मुलगी ही मैत्रीण वैगरे असूच कशी शकते? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले म्हणजे केवळ "लफडं"च असू शकते. त्याला दुसरे नाव असूच शकत नाही. पोरी बरोबर मैत्री करून काय करणार? हा वरती भाबडा (?) प्रश्न. वरतीअमुक एक मुलगा एका मुलीबरोबर बोलतो तरी पण त्या दोघांमध्ये "तसलं" काही नाही मग काय आहे? दुसर असूच काय असु शकत? बरं आमची पण कोणी खास मैत्रीण नव्हती, त्यामुळे आम्हीही कधी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. तसही उत्तर देऊन काही फरक पडणार नाही ह्याची खात्री अजूनही आहे. नशीब माणसाने "दोस्ताना" नाही पहिलाय. आम्ही कोणी त्याला बघावा म्हणून आग्रह ही करणार नाही. ह्याची केमिस्ट्री बदलून "गे"मिस्ट्री व्हायला नको. आमचे जिणे मुश्कील होऊन जाईल. ह्याचे फंडे बदलले म्हणजे ह्याच्या समोर मित्राबरोबर जायची/फिरायाची पण चोरी होईल. रूम पार्ट्नर बरोबर पण रहता येणार नाही. हा माणूस सगळ्याना वाळीत टाकेल. अजुन एक आठवल. वळू पिक्चर बद्दल बोलणे सुरू होते. मध्येच एकाने ह्याला खोचकपणे विचारले "वळू म्हणजे काय माहीत आहे?" उत्तर: "अबे हा वळू धड बैल ही नसतो धड गाय ही नसते... मधलाच असतो... काही कामाचा नसतो मग त्याला सोडून देतात गावभर, त्याला वळू म्हणतात..." साहेबाना सर्वसामान्य स्त्रीलिंग व्यर्ज आहे. त्यांच्यासाठी तीन लिंग. पुल्लिंग, डार्लिंग आणि नपूसक लिंग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळे फंडे असून माणूस शेवटी एक दिवस प्रेमात पडला. पडला म्हणजे कोसळला. पोरीबद्दल जे फंडे होते ते विसरला. पोरगी बरोबर लफडं सोडून नुसतं प्रेम देखील करू शकतो हे साहेबाना समजले. सध्या साहेब प्रेमात गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे जरा नॉर्मलला आलेले आहेत. पण आमचे वांदे झालेत. आमच्या आयुष्यातली मज्जा निघून गेली आहे. बघू प्रकरण किती आणि कसे पुढे जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा माणूस म्हणजे आमच्या अळणी आणि बेचव आयुष्यामधले मीठ आहे. ह्याच्यामुळे कित्येकदा आम्ही मनापासून खळखळून हसलो आहोत. एकदा एकदा सगळ्याना वाटता ह्याचे फंडे समजले. आत्ता हा माणूस आपल्याला कळला पण नाही. साहेबाकडे फंडे अनलिमिटेड. ह्याच्याबद्दल लिहावं असं कधीपासून मनात होत. शेवटी लिहलं एकदाचं. काय काय आणि किती लिहावं कळतं नव्हतं. काही गोष्टी आठवल्या पण नाहीत. ह्या माणसाला कागदावर उतरवणे सोप नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~&lt;br /&gt;अशीच काही &lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_23.html"&gt;मला भेटलेली माणसं&lt;/a&gt;&lt;br /&gt;~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-6229686745113385725?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/6229686745113385725/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=6229686745113385725&amp;isPopup=true' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6229686745113385725'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6229686745113385725'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post_30.html' title='क्षत्रिय कुला&quot;वसंत&quot;'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-1244191311081357860</id><published>2010-01-09T10:05:00.000-08:00</published><updated>2011-02-06T22:03:48.546-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चोरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चोर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गूगल'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेखन'/><title type='text'>मराठी ब्लॉग विश्ववरील वाढत्या चोर्‍या</title><content type='html'>काळ दुपारी मराठी ब्लॉग विश्वला भेट दिली. पहिल्याच पानावर "कशी मुलगी पाहिजे?" ह्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. आत्ता हल्ली लग्न हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लगेचच त्या लिंक वर क्लिक करून वाचू लागलो. पहिल्या चार ओळी वाचताच हे आधी कुठेतरी वाचलय हे जाणवले. मध्यंतरी अजयने मुली, लग्न ह्या विषयांवर लिहलं होतं ते आठवलं म्हणून त्याचा ब्लॉग चाळला पण मला हवी असलेली पोस्ट त्याच्या ब्लॉग वर नाही मिळाली म्हणजे अजयच्या ब्लॉगवरुन कुणी कॉपी केलं नव्हतं. अजुन नेहमीचे काही ब्लॉग पाहिले. तिथेही काही नाही सापडलं. मग शेवटी डिटेक्टिव गूगलची मदत घेतली. गूगलमध्ये मराठी भाषा हा पर्याय निवडून "कशी मुलगी पाहिजे?" शोधलं तर मी डिसेंबरमध्ये वाचलेली लिंक मिळाली. म्हटलं चला ह्या ब्लॉगवाल्याला कळवू की तुमचा लेख चोरी झालाय पण त्याच वेळी अजुन एका लिंकने लक्ष वेधून घेतलं. तिथे जाऊन पाहिलं तर अगदी तीच पोस्ट २००७ साली पोस्ट केलेली होती. म्हटलं साला आपण डिसेंबर मध्ये जी वाचली ती देखील चोरीचीच होती. आणि आज ज्याने पोस्ट केली त्याने माहीत नाही कुठून उचलली? मूळ ब्लॉग वरुन की चोराकडून? हा दुसरा चोर म्हणजे आधुनिक श्रीकृष्णच म्हणा ना. कृष्णाने लहानपणी गोकुळात "नंदा"घरी राहून दूध-दही चोरले आणि हा कलियुगातला कृष्ण लोकांचे लेख चोरतोय. ते देखील असे लेख जे मराठी ब्लॉग विश्ववर पोस्ट करून महिना देखील झाला नाही. पहिल्याने निदान थोडं तरी डोकं वापरलं. त्याने अडीज वर्षापुर्वीची पोस्ट ब्लॉगवर टाकली पण हा तिसरा तर चोरावर मोर. आधी मला देखील वाटलं आपण हे लिहतोय खरं पण ही एकच व्यक्ती तर नसेल? जुन्या ब्लॉगवर काही प्रॉब्लेम आला असेल म्हणून नवीन ब्लॉग सुरू केला असेल आणि एक चांगली पोस्ट म्हणून "ती" पोस्ट पुन्हा प्रकाशित केली असेल. पण सगळी खात्री करून पाहिली पण मला तरी ह्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ह्याची खात्री वाटते. आत्ता कुणाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर सारखा रोग असेल आणि तो रोगी हे धंदे करत असेल तर त्याला काही इलाज नाही. पुढे सगळ्या लिंक देतोय, पहा तुम्हीच तुम्हाला काय वाटते? &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://asach-aapla.blogspot.com/2007/05/blog-post.html"&gt;मूळ लेख&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://mannmajhe.blogspot.com/2009/12/blog-post_17.html"&gt;पहिली कॉपी&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://nandkishorsblog.blogspot.com/2010/01/blog-post.html"&gt;दुसरी कॉपी&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्ता काय माहीत त्यांनी संबधित लेखकांची परवानगी घेतली देखील असेल. असं असेल तर माझे आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे मी मान्य करेन पण मला तरी तशी नोंद कुठेही आढळली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्या कॉपीवाला ब्लॉग जरा नीट बघा. २००९ मध्ये ४३४ पोस्ट केल्या आहेत. आत्ता त्यातल्या किती खर्‍या किती खोट्या कुणास ठाऊक? मी काही मराठी ब्लॉगवरचे झाडून सगळे ब्लॉग वाचत नाही पण मला त्यात &lt;a href="http://mannmajhe.blogspot.com/2009/12/blog-post_2870.html"&gt;अजुन एक पोस्ट&lt;/a&gt; आढळली जी &lt;a href="http://pankajz.com/"&gt;पंकजच्या &lt;/a&gt;ब्लॉगवर, २० जून २००९ ला पोस्ट केलेली होती, ती जशीच्या तशी उचललेली आहे. त्याने आपल्या ब्लॉगवर "मित्रानो ..तुमच्याकडे जर मराठी साहित्य असेल, तर ते मला पाठवा...मी ते ह्या ब्लॉग वर पब्लिश ...तुमच्या नावाबरोबर..मग वाट कसली बघताय ?? इथे द्या पाठवून लवकर" असे आश्वासन दिले आहे पण "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजच्या कॉपी केलेल्या पोस्टवर तरी कुणाचंच नाव दिलेलं नाही. आत्ता "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजची "मी फिदा आहे" पोस्ट ह्या दोन्ही मराठी ब्लॉग विश्ववर प्रकाशित झालेल्या आहेत. मग जो कुणी मराठी ब्लॉगवर आपले पोस्ट पब्लिश करत असेल तर एखाद्याला मेल करून पुन्हा तीच पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर कशाला पब्लिश करेल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;महेन्द्र काकांच्या ब्लॉगची एका साप्ताहिक पुरवणीने केलेल्या &lt;a href="http://kayvatelte.wordpress.com/2009/11/15/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B/"&gt;चोरीची &lt;/a&gt;घटना सगळ्यांना ठाऊक आहेच. गेल्याच आठवड्यात &lt;a href="http://harkatnay.blogspot.com/search/label/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80"&gt;हेरंबने &lt;/a&gt;देखील त्याच्या ब्लॉगवरच्या चोरीबद्दल लिहलं होतं. ब्लॉगवरचे लेख ईमेल मधून forward होणे अश्या घटना देखील सर्रास घडतात. आता ही कालची घटना असो वा आधीच्या, हे चोर जेंव्हा लेख कॉपी करतात तेंव्हा ह्यांना लेखकाचं नाव कॉपी करायला काय जातं? मी काही लेखनाचा वरदहस्त लाभलेला माणूस नव्हे. मी जेंव्हा ही माझ्या ब्लॉगवर लिहतो तेंव्हा माझे निदान दोन तीन तास तरी नक्की खर्ची होतात आणि जर कुणी ctrl+c, ctrl+v ही चार बटणं दाबून ते लिखाणं आपल्या नावावर खपवतं असेल तर ते खपवून घेणं शक्य नाही. ह्या चोर्‍या कशा थांबवाव्यात ह्यावर सध्या तरी आपल्या ब्लॉगवरुन right click-&gt;copy हा option disable करणे  हाच एक रामबाण उपाय दिसतो. त्याचबरोबर अशी चोरी आढळून आल्यास आपल्या ओळखीतल्या ब्लॉगर मित्र-मैत्रिणी आणि Twitter वरील लोकांना कळवून जास्तीत जास्त जणांमार्फत त्या चोराच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून मूळ ब्लॉगची लिंक  देणे हा एक मार्ग आहे. भले तो ती प्रतिक्रिया स्वीकारो अथवा न स्वीकारो, निदान आपली चोरी पकडली गेली, किंवा आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे हे तरी त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित अश्या चोर्‍या कमी होतील. जमल्यास पुढच्या रविवार पुण्यात होणार्‍या &lt;a href="http://sureshpethe.wordpress.com/2010/01/04/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE/"&gt;पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्या&lt;/a&gt;मध्ये हा मुद्दा देखील चर्चिला जावा. त्यातून अजुन काही उपाय सुचल्यास आपण सर्व मिळून तो अंमलात आणू शकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर गाववाल्यांनू मराठी गूगलवर जावा आणि आपली एखादी आवडीने वाचली गेलेली पोस्ट शोधून बघा, कदाचित चोरीला गेलेली असु शकते...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-1244191311081357860?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/1244191311081357860/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=1244191311081357860&amp;isPopup=true' title='41 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1244191311081357860'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1244191311081357860'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post_09.html' title='मराठी ब्लॉग विश्ववरील वाढत्या चोर्‍या'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>41</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-8507011976289228612</id><published>2010-01-04T00:37:00.001-08:00</published><updated>2011-02-06T22:03:13.543-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चोरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेखक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>३ इडियट्स!!!</title><content type='html'>दिवसाढवळ्या चोरी. इथे बरेचसे चोर आहेत हे माहीत होतं पण माझ्या गेली साडेपाच सहा वर्ष बेस्टसेलर असलेल्या पुस्तकाची कथा कुणी चोरेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माझ्या कथेवर जवळपास पूर्ण सिनेमा बनवून वर माझी कथा फक्त ३ ते ५ टक्के वापरली म्हणे. तो "लूडबूड" तर म्हणे मी पुस्तकं देखील वाचलं नाही. अरे काय? मागे एकदा नुसत्या लुकसाठी त्याने निव्वळ मिशीवर किती मेहनत घेतली होती. तो त्याच्या भूमिकेविषयी किती जागरूक असतो हे दुनियेला माहीत आहे. असा हा माणूस म्हणे मी पुस्तकं वाचलं देखील नाही. कोण विश्वास ठेवेल. खरं तर त्याचा सिनेमा असेल तर दिग्दर्शनापासून ते पब्लिसिटीपर्यंत प्रत्येक कामात हा किती लूडबूड करतो हे जगाला ठाऊक आहे. इथे तर हा केवळ सिनेमाचा नायक आहे, निर्माता/दिग्दर्शकदेखील नव्हे. कथा, पटकथा ह्याच्याशी ह्याचा काडीचा देखील संबंध नाही. ह्याने सिनेमात काम केलं त्याबद्दल ह्याला त्याचे पैसे मिळाले. ह्याला मध्ये नाक खुपसायची काही गरज नव्हती. पण लूडबूड हा नाही करेल तर मग कोण करेल? जेंव्हा मी माझ्या कथेचं श्रेय मला मिळालं नाही असं म्हटलं तर हा का पेटला? निर्माता/दिग्दर्शकांनी बोलायला हवे होते तर ते आधी काहीच बोलले नाहीत. वर म्हणे की त्यांचा जो कुणी पटकथाकार आहे तो म्हणे माझ्यासारखा प्रसिद्ध नाही म्हणून कथेचं श्रेय त्याला जायला हवं. अरे काय? इथे काय दुष्काळग्रस्तांना मदत पुरवली जातेय काय की गरजवंत पाहून कथेचं श्रेय देताय. परवा तर पत्रकार परिषदेत कहर केला ह्या लोकांनी. पत्रकार परिषदेत हे लोकं कसे बोलत होते, काय भाषा वापरात होते हे सगळ्या जगाने पाहिलं. मी माझ्या लिखाणातून देश बदलावा म्हणून बँकेतलं चांगलं करियर सोडून पूर्ण वेळं लिखाण सुरू केलं तर च्यामारी इथे माझीचं कथा चोरून ह्यांनी माझाच गेम केला. सलाम आहे इथल्या लोकांना. आत्ता तो फरहान आपल्या 3 Mistakes of My Life पुस्तकावर सिनेमा बनवतोय, त्याच्याकडे आत्तापासून लक्ष ठेवायला हवे. चला. (Give me some sun shine, Give me some rain, Give me another chance, I wanna grow up once again गाणं गुणगुणत निघून जातो) &lt;br /&gt;&lt;br /&gt;~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~&lt;br /&gt;&lt;br /&gt;चला सलग तिसर्‍या वर्षी आपण अभिनय केलेल्या चित्रपटाने आठवडाभरात १०० करोडहून अधिक गल्ला जमवला. इंडस्ट्रीने वर्षभरात कमावलेला गल्ला एकीकडे आणि आपल्या एका चित्रपटाचा गल्ला एकीकडे. सगळं कसं सुरळीत सुरू होतं आणि ह्या भगताच्या अंगात आलं. काय काय बरळू लागलाय. आपल्या बहुतेक प्रत्येक चित्रपटाच्या वेळी हे होतचं म्हणा. दोन वर्षापुर्वी त्या अमोल गुप्तेला कसा खड्यासारखा बाजूला केला. गेल्या वर्षीदेखील आपण सोडून गजिनीची बहुतेक टीम तीच होती. तो दिग्दर्शक, नायिका, खलनायक सगळे गजिनी मध्ये दुसर्‍यादा काम करत होते पण गाजावाजा फक्त आपला. आणि का होऊ नये? मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये इतका झोकून देतो. सगळं कसं मला माझ्या मनासारखं हवं असतं. तर लोकं मी दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ करतो म्हणतात. आत्ता मी काम केलेला प्रत्येक चित्रपट २५०, ३०० कोटींचा व्यवसाय करत असेल तर मी केलेली ढवळाढवळ काय वाईट आहे? आणि मी त्याचं श्रेय घेतलं तर काय बिघडलं? बाकी कुणाचे चित्रपट कमावतात का इतका पैसा? पण पोटात दुखत लोकांच्या. आत्ता ह्या भगताचंच घ्या. ह्याच्याच पुस्तकावर आधारित तो सल्लूचा चित्रपट आला होता ना? कुणी बघितला तरी का तो? तेंव्हा कुणी गेलं होतं का भगताकडे की भगत त्या पडलेल्या चित्रपटाचं श्रेय घेत फिरला? आत्तादेखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला आठवडा हा काहीच बोलला नाही. आठवड्या भरात १०० कोटींचा आकडा पार झाल्याचं पाहून ह्याला अचानक कथेचं श्रेय हवं झालं. आत्ता त्याचं म्हणण कितीही खरं असलं तरी ह्याला खोटंचं ठरवायला हवं. पण ह्या आधी आपण अशी प्रकरण पचवली असली तरी हे प्रकरण तितकं साधं नाही. हा भगत आपल्याला भारी पडणार असं दिसतं. ह्याच्यावर लिंबू-मिरचीचा साधा उतारा उपयोगी नाही, काहीतरी मजबूत तोडगा काढला पाहिजे. पाहु जे काय करायचं ते आपल्यालाचं लवकरात लवकर करायला हवं नाहीतर तो भगत डोक्यावर बसायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्थळं: राजूचं ऑफीस. VVC आणि राजू मस्तं टामकवतं सेलिब्रेट करतं होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;राजू&lt;/span&gt;: चला मुन्नाभाई नंतर बरेच दिवसांनी आपला चित्रपट मजबूत चालतोय.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;VVC&lt;/span&gt;: आणि खोर्‍याने कमावतोय देखील. चिअर्स!!!&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;राजू&lt;/span&gt;: बस्स, स्साला हे कॉपीराइटचं लफडं मध्ये उपटायला नको होतं.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;VVC&lt;/span&gt;: ते जाऊ दे रे. आपण ह्यावेळी त्या चरस्याला घेऊन मुन्ना भाई नाय बनवलाय. आपण त्या मि. परफेक्टला चित्रपटासाठी साइन केला ना तिथेचं आपलं काम संपलं. आत्ता फक्त बसून पैसे मोजायचे. जी काय लफडी उपटली आहेत ती तो खान बघून घेईल.  &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;राजू&lt;/span&gt;: हो ते पण खरं आहे. कारण ह्यावेळी मी नावालाच दिग्दर्शक होतो. सेटवर त्याचाच आवाज होता. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;VVC&lt;/span&gt;: वर आपलं पब्लिसिटीचं काम पण त्यानेचं केलं. कुणी तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली चालतं असेल तर डोळे झाकून त्याला घ्यावं. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;राजू&lt;/span&gt;: हो रे जिथे तिथे हा कडमड्त होता. म्हणून ह्याच्याबरोबर बहुतेक कुणी परत काम करायला मागत नाही. आणि हा बाहेर उगाचच मी कुणाबरोबर दुसर्यांदा काम करीत नाही म्हणून बढाया मारत फिरत असतो. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;VVC&lt;/span&gt;: सोड ना आपल्याला कुठे त्याच्या बरोबर परत काम करायचंय. आत्ता ते सगळं जाऊ दे. कुणी कशाचं किती श्रेय घ्यावं ते तो लेखक, तो मि. परफेक्ट आणि पब्लिक बघून घेतील. तेवढीच चित्रपटाची पण पब्लिसिटी होईल आणि गल्ला वाढेल. आपण लांबून मज्जा बघू. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;राजू&lt;/span&gt;: हे म्हणजे दोघांचं भांडण आणि तिसर्‍याचा लाभ म्हणतात तसं झालं. आपल्यासाठी आपला खान, तो लेखक आणि प्रेक्षक म्हणजे "३ इडियट्स" ठरले की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा हा हा... दोघं बराच वेळं हसत रहातातं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-8507011976289228612?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/8507011976289228612/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=8507011976289228612&amp;isPopup=true' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8507011976289228612'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/8507011976289228612'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post_04.html' title='३ इडियट्स!!!'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-1742205966861776301</id><published>2010-01-01T05:41:00.000-08:00</published><updated>2011-06-07T07:00:25.457-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ट्रेक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्कंधगिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नवं वर्ष'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पहाट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सूर्योदय'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भटकंती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='धुकं'/><title type='text'>नवं वर्षाची पहाट</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3_hmWUWJI/AAAAAAAAAQY/xpfJDD22sII/s1600-h/0020.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3_hmWUWJI/AAAAAAAAAQY/xpfJDD22sII/s400/0020.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421770479118866578" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पंकज भटक्‍याकडून &lt;a href="http://pankajz.com/"&gt;भटकंती &lt;/a&gt;पंथाची दीक्षा घेतल्यामुळे यंदाचे नवं वर्ष नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरची रात्र न जागवता नववर्षाचा सूर्योदय पाहून करावी असं ठरवलं होतं. आमचा स्कंधगिरीचा प्लॅन कित्येक दिवस ठरत होताच मग तो थर्टी फर्स्टच्या रात्रीच करावा असे ठरले. ग्रूपमधले कुणी "डोलकर" पार्टीतले नसल्याने पोट्टे देखील तयार झाले. काल रात्री पावणे बाराच्या दरम्यान १२ जणांनी बंगलोर सोडले. पोलिसांनी ४ निरनिराळ्या ठिकाणी थांबवून कुणी आचंमन केलेले नाही नां? ह्याची खात्री केली. जवळपास ७५ किलोमीटरचा पल्ला गाठून आम्ही २ च्या आसपास स्कंधगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;२ वाजता स्कंधगिरीची चढाई सुरू केली. मस्त पोर्णिमेचे टिपुर चांदणे होते. संध्याकाळी मुसळधार पाऊस पडून गेल्याने रस्ता जास्तचं निसरडा झाला होता. त्यामुळे हळूहळू वर चढलो. पावसामुळे थंडी आणखीनच वाढली होती. मध्येच काळोखात रस्ता चुकला, तो शोधण्यात अर्धा-पाउण तास गेला. पहाटेची वेळ जशी जवळ येऊ लागली तसे धुके वाढले आणि २ फुटांवरचे देखील  दिसेनासे झाले. स्कंधगिरीवर पोहचेपर्यंत पावणे-सहा झाले. पश्मिमेकडे पोर्णिमेचा चंद्र अस्ताला जात होता थोड्यावेळातच पूर्वेकडून सुर्य नारायणाचे आगमन होणार होते. किंचित प्रकाश पसरला तेंव्हा आजूबाजूला ढग सोडून काही दिसत नव्हते. तांबडे फुटल्यानंतर ते पूर्ण सूर्योदय होईपर्यंत जे काही अनुभवायला मिळाले त्याचे मी वर्णन करू शकत नाही. खाली फोटो देतोय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz38X2wszPI/AAAAAAAAAPg/6thJLZIrNt4/s1600-h/0002.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz38X2wszPI/AAAAAAAAAPg/6thJLZIrNt4/s400/0002.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421767013190913266" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz38ymuDDCI/AAAAAAAAAPo/Ek__bDlIyZA/s1600-h/0007.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz38ymuDDCI/AAAAAAAAAPo/Ek__bDlIyZA/s400/0007.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421767472741288994" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz38-ny-7PI/AAAAAAAAAPw/gbFDpeqtSxI/s1600-h/0004.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz38-ny-7PI/AAAAAAAAAPw/gbFDpeqtSxI/s400/0004.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421767679188856050" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz397b8X3kI/AAAAAAAAAP4/wvDeg-BT-3I/s1600-h/0014.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz397b8X3kI/AAAAAAAAAP4/wvDeg-BT-3I/s400/0014.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421768723979034178" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3-qq5OpXI/AAAAAAAAAQA/nqtWdP0aZqw/s1600-h/0018.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3-qq5OpXI/AAAAAAAAAQA/nqtWdP0aZqw/s400/0018.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421769535446230386" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz4DWNsGX_I/AAAAAAAAAQ4/ji0FUqxfXBU/s1600-h/0019.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz4DWNsGX_I/AAAAAAAAAQ4/ji0FUqxfXBU/s400/0019.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421774681567289330" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3_VGpsAzI/AAAAAAAAAQQ/y25zEt6yOFY/s1600-h/0021.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3_VGpsAzI/AAAAAAAAAQQ/y25zEt6yOFY/s400/0021.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421770264451744562" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz4Cy-jtBvI/AAAAAAAAAQw/BqMtfrKUdBY/s1600-h/0023.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 225px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz4Cy-jtBvI/AAAAAAAAAQw/BqMtfrKUdBY/s400/0023.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421774076210120434" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खाली उतरल्यानंतर स्कंधगिरीचा पायथ्याकडून काढलेला फोटो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz4HeZQ0EKI/AAAAAAAAARI/Q1BPGR7JtRo/s1600-h/DSCN1011.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz4HeZQ0EKI/AAAAAAAAARI/Q1BPGR7JtRo/s400/DSCN1011.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421779220159533218" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानपणापासून कोकणात निरनिराळ्या ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या असंख्य छटा पाहिल्या आहेत. या आधीचा आठवणीतला सूर्योदय मात्र एकदाच पॉंन्डीचेरीमध्ये अनुभवला होता आणि त्या नंतर आज. छान प्रसन्न वाटलं. आजवर जागवलेल्या थर्टी फर्स्टच्या सर्व रात्री ह्या एका पहाटेवर ओवाळून टाकाव्यात अशी ही नवं वर्षाची पहाट.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-1742205966861776301?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/1742205966861776301/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=1742205966861776301&amp;isPopup=true' title='17 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1742205966861776301'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1742205966861776301'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='नवं वर्षाची पहाट'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sz3_hmWUWJI/AAAAAAAAAQY/xpfJDD22sII/s72-c/0020.JPG' height='72' width='72'/><thr:total>17</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-438490245883134645</id><published>2009-12-31T06:34:00.000-08:00</published><updated>2009-12-31T07:51:30.879-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वगत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नवं वर्ष'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>मनोगत २००९ चे</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzzH7yW7lnI/AAAAAAAAAPY/-A7cxe_u5WU/s1600-h/2009.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 237px; height: 93px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzzH7yW7lnI/AAAAAAAAAPY/-A7cxe_u5WU/s400/2009.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5421427881391396466" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;अगदी थोडाच वेळ राहिला. मग २०१० येऊन मला भोज्जा देईल. उद्यापासून आपण एक जुने कॅलंडर म्हणून भूतकाळ बनून भिंतीवर फडकत राहाणार. बरोब्बर वर्षापूर्वी ह्याच वेळी आपण २००८ ला भोज्जा देऊन कारभार आपल्या हाती घेतला होता. लोकं आपल्याबद्दल किती आशावादी होती. आज ही २०१० बद्दल सगळे आशावादी आहेत. तसे दरवर्षी असतात. भविष्याच्या कुशीत आपल्यासाठी काय दडलं आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तरीदेखील गेल्या वर्षीचा आशावाद काही वेगळाच होता. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे जगभर नुसती वाताहात झालेली. बॅंका धडाधड बंद पडलेल्या. २००८ च्या उत्तरार्धात दिवससागणिक कंपन्या बंद पडून लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळत होती. शेअर मार्केट कोसळले होते. हे कमी की काय म्हणून २६/११ ला मुंबई बॉम्ब स्फोटांनी हादरली. आज २०१० च्या स्वागताला लोकांमध्ये उत्साह आहे. माझ्या स्वागताला देखील उत्साह होता पण कुठेतरी दुखाची आणि भीतीची किनार देखील होती. काहीश्या प्रतिकूल परिस्थितीतच माझे आगमन झालेले. परिस्थिती अशी चिघळलेली होती की त्यातून पूर्णपणे बाहेर पडणे मला एकट्याला शक्य नव्हते. २०१० ला देखील यात हातभार लावून परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी वेळ द्यावा लागेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलादेखील सत्यम घोटाळ्याने आर्थिक जगताला आणखी एक जोरदार दणका दिला. हे असचं चालू राहाणारं की काय असं वाटत असतानाचं सुदैवाने काही काळाने सगळे सुरळीत झाले. मला आनंद ह्याच गोष्टींचा आहे की माझ्या कार्यकाळात २६/११ सारखा डाग नाही लागला. मला फार मोठ्या घटनांचा किंवा सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होण्याचा बहुमान नाही मिळाला पण मी निदान २००८ सारख्या कटू आठवणी तरी सोडून नाही चाललो  ह्याचं समाधान आहे. माझ्या कारकिर्दीत मंदीतून बर्‍यापैकी उभारी आली, शेअर मार्केट स्थिरावले, सोन्याने विक्रमी किंमत गाठली. मध्यमवर्गीय माणसाचे एके काळचे स्वप्न नॅनोच्या रूपात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. परंतु दुष्काळ आणि महागाईने मात्र कहर केला. सर्वसामान्य माणसाच्या ताटातुन गरजेचे पदार्थ जवळपास गायब झाले. बाकी काही होवो न होवो मात्र २०१० मध्ये ही महागाई मात्र कमी होऊ दे. पाऊस पाणी वेळच्या वेळी पडू दे. माझ्या प्रमाणे २०१० वर सुका आणि ओला दुष्काळ पाहायची वेळ येऊ दे नको.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साधारण एखाद्या वर्ष भरात आंतरराष्ट्रीय, राजकीय, सामाजिक किंवा कलाक्रीडा क्षेत्रात जश्या बर्‍यावाईट घडामोडी घडतात तश्या माझ्या कारकिर्दीत देखील घडल्या. राज ठाकरेंचा गाजावाजा झाला तर अडवाणींसाठी मी म्हणजे कारकिर्दीचा शेवट. चित्रपट जगतात रहेमानने ऑस्कर जिंकून भारतीयांची मान उंचावली. सायना नेहवालसाठी मी सुखद ठरलो तरी टायगर वुड्समात्र माझी आठवण देखील काढणार नाही. क्रीडाक्षेत्रासाठी मात्र मी क्रांतिकारक ठरलो ऐवढ मात्र नक्की. भारताने क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन, बॉक्सिंग या प्रकारात देखील जागतिक पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली. मला निरोप देता देता कसोटी क्रिकेटमध्ये अग्रमानांकन मिळवले. क्रीडाक्षेत्रातली हीच प्रगती उत्तरोत्तर वाढून २०१० मध्ये दिल्लीत होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा व्यवस्थित पार पडो हीच सदिच्छा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी कित्येक वर्ष सरकार दरबारी खितपत पडलेले अनेक प्रश्न सालाबाद प्रमाणे मी जसे २००८ कडून उचलले तसेच २०१० च्या हवाली करणार. नुकताच तेलंगणाचा ताजा प्रश्नदेखील त्याच्याकडे सोपवून जाऊ. २००८ ने जाता जाता आपल्याकडे सोपवलेल्या कसाबला मात्र आपण पूर्ण १२ महिने पोसून शिक्षा न देता २०१० च्या हवाली करतोय ह्याचं वाईट वाटतं. त्याला शिक्षा झाली असती तर मी इतिहासात अमर झालो असतो. असो त्यात फार वाईट वाटून घेण्यासारखे नाही कारण भारतात तरी अतिरेक्यांच्या शिक्षा अंमलात आणलेल्या तारखा अंगावर मिरवण्याचे भाग्य अजुन कुणाला लाभलं नाही. २०१० ला तरी ते लाभावं असा आशावाद धरून आपण ही २०१० चं स्वागत करणार्‍या लोकांमध्ये सामील होऊ या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-438490245883134645?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/438490245883134645/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=438490245883134645&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/438490245883134645'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/438490245883134645'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_31.html' title='मनोगत २००९ चे'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzzH7yW7lnI/AAAAAAAAAPY/-A7cxe_u5WU/s72-c/2009.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-5247551980936516450</id><published>2009-12-30T08:03:00.000-08:00</published><updated>2011-06-07T07:00:13.768-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वप्न'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आवडी-निवडी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मी'/><title type='text'>हुश्श!!! माझापण टॅग...</title><content type='html'>सगळ्यांची टॅगा-टॅगी वाचून झाली होती. सगळे टॅगा-टॅगी करून मोकळे झाले होते. मला मात्र निमंत्रण मिळाले नव्हते. २४ तारखेला कोकणात जायचे होते.&lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_23.html"&gt; आठवणीतला नाताळ&lt;/a&gt; पोस्ट केले आणि प्रतिक्रियेमध्ये &lt;a href="http://www.mogaraafulalaa.com/"&gt;कांचनने &lt;/a&gt;तुला टॅगलय म्हणून सांगितले. ऑफीसमधले काम संपवून रात्रीची बस पकडायची होती. ऑफीसमधल्या लोकांची नजर चुकवून लिहायला सुरूवात केली पण कसलं काय? मनाप्रमाणे लिहिता येतं नव्हतं. म्हटलं जाऊ दे. आल्यावर पूर्ण करू. तर आज टॅगतोय. हा विषय शिळा झाला आत्ता पण काय करणार Better late than absent. आत्ता वाचा तुम्ही कारण शिक्षा आहे तुम्हाला, मला वेळेवर न टॅगण्याची :-)&lt;br /&gt; &lt;br /&gt;1. Where is your cell phone?&lt;br /&gt;पडला आहे बाजुला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;2. Your hairs?&lt;br /&gt;हल्ली गळतात अशी भिती वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;3. Your Mother?&lt;br /&gt;माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ति&lt;br /&gt;&lt;br /&gt;4.Your Father?&lt;br /&gt;माझा आदर्श &lt;br /&gt;&lt;br /&gt;5. Your favorite food? &lt;br /&gt;समुद्रात मिळणारे आणि शिजवून/तळून झाल्यावर ताटातून पोटात जाणारे काय पण. &lt;br /&gt;&lt;br /&gt;6. Your dream last night?&lt;br /&gt;मी झाडावर चढलो आहे. खुप वर आणि मला उतरता येत नाही ये. मला उंचीची भिती वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;7. Your favorite drink?&lt;br /&gt;कैरी पन्हे &lt;br /&gt;&lt;br /&gt;8. Your Dream/Goal&lt;br /&gt;काहीतरी हटके, एकदम ढासू करून दाखवायचे आहे. काय ते आत्ताच नाही सांगत.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;9. What room you are in?&lt;br /&gt; हॉल कम बेडरूम&lt;br /&gt;&lt;br /&gt;10. Your hobby?&lt;br /&gt;आत्ता पटकन सांगणे अवघड आहे पण पहिल्या पाचात खाणे, स्पोर्ट्स, वाचन, भटकणे आणि लोकांना हसवणे. वेळेनुसार क्रम बदलतो.   &lt;br /&gt;&lt;br /&gt;11. Your fear?&lt;br /&gt;आपलं स्वप्न कधीच पूर्ण नाही झालं तर?&lt;br /&gt;&lt;br /&gt;12. Where do you want to be in next 6 years?&lt;br /&gt;अशा ठिकाणी जिथे मला दर आठ्वड्याला स्टेटस रिपोर्ट विचारणारे कुणी नसेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;13. Where were you last night?&lt;br /&gt;कोल्हापूर-बंगलोर बसमध्ये, हाइवे NH4 वर&lt;br /&gt;&lt;br /&gt;14. Something you aren't diplomatic?&lt;br /&gt;कुटुंबीय &lt;br /&gt;&lt;br /&gt;15. Muffins?&lt;br /&gt;Question out of syllabus.&lt;br /&gt;&lt;br /&gt;16. Wish list item? &lt;br /&gt;खुप आहेत... सुरुवात गर्ल-फ़्रेन्डपासुन करावी का? नको गर्लफ़्रेन्डला आयटम म्हणणे योग्य नाही. :-) असो सध्या विशलिस्टमध्ये नवीन ऑफर लेटर सर्वात वरती आहे. ते मिळालं की बाकी लिस्ट आपोआप वाढेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;17. Where did you grow up?&lt;br /&gt;रत्नागिरी &lt;br /&gt;&lt;br /&gt;18. Last interesting thing you did?&lt;br /&gt;ऑफीसमधून पळालो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;19. What are you wearing?&lt;br /&gt;टी-शर्ट आणि शॉर्ट &lt;br /&gt;&lt;br /&gt;20. Your TV?&lt;br /&gt;स्पोर्ट्स, म्यूज़िक आणि बातम्या&lt;br /&gt; &lt;br /&gt;21. Your pets?&lt;br /&gt;नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;22. Friends?&lt;br /&gt;मित्र परिवार खूप आहे पण निस्वार्थी असे ४ मित्र आणि ३ मैत्रिणी आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;23. Your life?&lt;br /&gt;खूप सारी आणि अपूर्ण स्वप्न. Dreams unlimited and incomplete....&lt;br /&gt;&lt;br /&gt;24. Your mood?&lt;br /&gt;नेहमीप्रमाणे आरामात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;25. Missing someone?&lt;br /&gt;हो. कुणाला ते लिहीन कधीतरी पोस्ट मध्ये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;26. Vehicle? &lt;br /&gt;पल्सर १५० आणि मारुती अल्टो &lt;br /&gt;&lt;br /&gt;27. Something you aren't wearing?&lt;br /&gt;चष्मा, कारण अजुन तरी लागला नाही... &lt;br /&gt;&lt;br /&gt;28. Your favorite store?&lt;br /&gt;क्रॉसवर्ड &lt;br /&gt;&lt;br /&gt;29. Your favorite color?&lt;br /&gt;क्रीम कलर &lt;br /&gt;&lt;br /&gt;30. When was the last time you laughed?&lt;br /&gt;दुपारी मित्राशी फोनवर बोलताना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;31. Last time you cried?&lt;br /&gt;२६ डिसेंबर २००८ एक वर्ष होऊन गेलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;32. Your best friend?&lt;br /&gt;रोहन आणि माझा मावस भाऊ स्वप्निल &lt;br /&gt;&lt;br /&gt;33. One place you go to over and over?&lt;br /&gt;हॉटेल फिश् लँड (apart from Office and Toilet :-))&lt;br /&gt;&lt;br /&gt;34. One person who mails me regularly?&lt;br /&gt;बरेच आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;35. Favorite place to eat?&lt;br /&gt;हॉटेल फिश् लँड आणि शोरमा रोलसाठी कबाब मॅजिक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोअर झालातं ना? इलाज नाही ओ. मी &lt;a href="http://vishubhau.ranadive.net/"&gt;विशूभाऊ &lt;/a&gt;आणि &lt;a href="http://marathi-boli.blogspot.com/"&gt;फोटोग्राफर पप्पूला&lt;/a&gt; टॅगतोय.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-5247551980936516450?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/5247551980936516450/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=5247551980936516450&amp;isPopup=true' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5247551980936516450'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5247551980936516450'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_30.html' title='हुश्श!!! माझापण टॅग...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-5884020874793414892</id><published>2009-12-23T19:46:00.000-08:00</published><updated>2010-01-30T23:26:34.162-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मला भेटलेली माणसं'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अमेरिका'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऑफीस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नाताळ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><title type='text'>आठवणीतला नाताळ</title><content type='html'>गेल्या दिवाळीत अमेरिकेला गेलो होतो. जानेवारीपर्यंत तिकडेच मुक्काम होता त्यामुळे दिवाळी चुकली तरी नाताळची मज्जा अनुभवता आली. कॅलिफोर्नियाला पोहोचल्याबरोबर कॅब पकडून ऑफीस गाठलं. आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात पाउल टाकलेले. तिकडे कसे होईल, लोकं कसे असतील, काम पूर्ण होईल की नाही असे असंख्य प्रश्न मनात होते. तिथे आगमनाची वर्दि देताच आतून साधारण साठीकडे झुकलेली अमेरिकन बाई हसत मुखाने माझ्या स्वागताला बाहेर आली. लिंडा जॉनसन. "हे सिद्धार्थ यु आर लुकिंग सो हॅंडसम" पहिलाच यॉर्कर, मी क्लीन बोल्ड. आजवरच्या आयुष्यात समस्त स्त्रीवर्गा कडून आलेली अशी ही पहिलीच प्रतिक्रिया. भारतातल्या मुलींचा सेन्स चांगला नाही ह्या वर अमेरिकेत आल्या आल्या शिक्का मोर्तब झाले. किंवा बहुतेक २४ तासाहून जास्त प्रवास केल्यानंतर (पूर्ण प्रवासात मी २० तास तरी झोप काढली) कदाचित आपण हॅंडसम दिसत असु असे वाटून गेले. अशी होती माझी लिंडाशी पहिली भेट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑफीस मधून आपल्या गाडीतून ती मला माझ्या अपार्टमेंटला घेऊन गेली. तिथल्या ऑफीसमध्ये सगळ्या औपचारिक बाबी संपल्यानंतर आम्ही माझ्या अपार्टमेंट मध्ये गेलो. मस्त आलिशान २ बेडरूमची जागा. आत सगळ्या सोयी. तिथे गेल्यावर मला तिथला इलेक्ट्रिक गॅस, डिश वॉशर, वॉशिंग मशीन, हीटर आणि इतर सगळ्या गोष्टी कश्या वापरायच्या याच प्रात्यक्षिक दाखवलं. नंतर मला पोटापाण्याच्या जरूरी वस्तू घेऊन देण्यासाठी डिपार्टमेंटल स्टोरला घेऊन गेली. जाता जाता कुठे कसं जायचं, रस्त्याने किंवा पार्किंगमध्ये चालताना कुठले नियम पाळायाचे हे सगळं समजावून झालं. एव्हाना नवखेपणाची भावना आणि इथे आपलं कसं होणार ही भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. तासाभारातच मी देखील आपण लिंडाला गेली अनेक वर्षे ओळखतो इतका comfortable झालो. दुसर्‍या दिवशी देखील ऑफीसमध्ये ती ज्या प्रकारे माझी सगळ्यांशी ओळख करून देत होती तेंव्हा मला क्षणभर असे वाटले की जणू ही मला माझ्या लहानपणापासून ओळखते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आधी वाटलं की कदाचित आपण इथे नवे आहोत म्हणून आपल्याला कंफर्ट वाटण्यासाठी ही असे बोलत असेल. पण काही लोकंच अशी असतात की ते जसे वागतात तसे ते खरोखरच आहेत, उगाच आव आणत नाहीत हे कळून येते. लिंडा ही त्यातलीच एक होती. मला तरी असे लोकं फार कमी भेटले. नाहीतर आपल्याकडे HR मध्ये काम करणारी लोकं. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी जॉइन करता तेंव्हा आणि पहिले काही दिवस नुसते गुळ, साखर, मैसूर-पाक(बंगलोरमध्ये) तोंडात ठेवूनच बोलत असतात. एकदा का तुमची नवखेपणाची एक्सपाइरी डेट संपली की मग तुम्ही फाट्यावर. हा असला अनुभव गाठिशी असल्याने ही बया देखील २ दिवसांनी आपल्या कामाशी काम ठेवून राहील असे वाटले. पण नाही. तिथल्या वास्तव्यामधील प्रत्येक दिवशी गुड मॉर्निंग बरोबरच माझ्या मूड किंवा कपड्यावर एखादी तरी टीपण्णी असायचीच. फार बरं वाटायचं. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला किंवा दुसर्‍याला नकळत आनंद देऊन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरुवातीचे काही दिवस मी कॅबने ऑफीसला येत जात होतो. नंतर तिने माझ्यासाठी कार बुक केली. मग मला तिथल्या वाहतूकीच्या नियमांची सवय व्हावी म्हणून पुढचे २-३ दिवस रोज ती आणि मी लंच टाइममध्ये आणि ऑफीस सुटल्यावर ऑफीस ते अपार्टमेंट आणि आजूबाजूच्या भागात ड्राइविंग करण्यासाठी जात असु. मला तिथल्या वातावरणात व्यवस्थित कार चालवायला जमते ह्याची खात्री झाल्यानंतरच तिने मला एकट्याला कार चालवायची परवानगी दिली. खरं तर ती आमच्या ऑफीस मधली Senior Admin होती. आमच्या रहाण्याची बुकिंग करणे आणि दर आठवडा आमचे पे चेक देणे हे तिचे नेमुन दिलेले काम होते. ह्याव्यतिरिक्त आम्ही काय करतो किंवा आमचे कसे चालू आहे ह्याच्याशी तिला काही घेणे देणे नव्हते. पण तीने मला अडीअडचणीच्या वेळी गरज पडली तर तिच्या घरचा फोन नंबर, स्वत:चा मोबाइल नंबर असे सगळे नंबर देऊन ठेवले होते. माझ्यानंतर आठवड्याभरात भारतातून अजुन दोन जण तिकडे पोहोचले. त्यांना देखील हाच अनुभव आला. लिंडाशिवाय आमचे पान हलत नसे. आज जेवायला कुठे जाणार, कुठे काय छान मिळतं, कुठल्या रेस्तोरंट मध्ये काय मागवायचे? काय स्पाइसी, काय मीडियम स्पाइसी ऑर्डर करायचे हे सगळं सांगायची. आमच्या बरोबर यायला जमलं नाही तर रेस्तोरंटचा मॅप आणि काय मागवायचे ह्याची लिस्ट आम्हाला न मागता मिळत असे. &lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzLr1DGOx3I/AAAAAAAAAPI/BfgDk5uMVT4/s1600-h/Linda+and+Alton+Johnson.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 300px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzLr1DGOx3I/AAAAAAAAAPI/BfgDk5uMVT4/s400/Linda+and+Alton+Johnson.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5418652598277162866" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;वीकेंडला तिच्या घरी हमखास बोलावणे असायचे. तिच्या घरी तिच्या नवर्‍याची ऑल्टन जॉनसनशी भेट झाली. तो लिंडापेक्षा ८-९ वर्षानी मोठा. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नर्स होती आणि एका डॉक्टराबरोबर लग्न करून नुयोर्क ला स्थायिक झालेली. मुलगा टेक्सासला एका मोठ्या कंपनीचा CEO होता. हे दोघे अधून मधून तिला भेटायला जायचे. उन्हाळी सुट्टीत, नाताळमध्ये मुलगा मुलगी नातवंडांना घेऊन यायचे. अमेरिकन संस्कृती प्रमाणे लिंडा आणि ऑल्टन एकटेच राहात होते. हेच कशाला आजही ऑल्टनची ९८ वर्षांची आई नेवाडा राज्यात एकटी रहाते हे ऐकून आम्हाला धक्काच बसला होता. पण अमेरिकेत हे अगदी कॉमन आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लिंडा आणि ऑल्टनचं घरं म्हणजे आलिशान महालापेक्षा कमी नव्हतं. पूर्ण घरात गुबगुबीत गालीचा, सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी, घराबाहेर स्विम्मिंग पूल. अनेक छान छान गोष्टींनी सारे घर भरलेलं होतं. गर्भश्रीमंत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑल्टन व्यवसायाने सिव्हील इंजिनीअर होता त्याच बरोबर त्याला फोटोग्राफीचा छंद देखील होता. त्यामुळे सहाजिकच सारं घर फोटो फ्रेमनी भरलेलं होतं. आमच्या ऑफीसच्या कुठल्याही पार्टीमध्ये ऑल्टन कॅमेरामन म्हणून यायचा. त्याला पूर्ण ऑफीस ओळखायचे. लिंडा आणि ऑल्टन पूर्ण परिवाराबरोबर जवळपास पूर्ण अमेरिका आणि युरोपचा काही भाग फिरलेले.  तरुणपणी ऑल्टनचं स्वत:चं चक्क २ सीटचं छोटसं विमान होतं. आत्ता बोला. लिंडा देखील स्वत: स्काइ डाइविंग करायची. या वयातही ती आम्हाला स्काइ डाइविंगला घेऊन गेली होती. माझी तर विमानातून उडी मारताना नुसती बोबडी वळली होती. पण तो अनुभव आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव होता. Admin म्हणून काम करण्यापुर्वी लिंडा स्विमिंग ट्रेनर होती. एप्रिल-मेमध्ये पुन्हा अमेरिकेत जाणं झालं तेंव्हा वीकेंडला आम्ही त्यांच्या घरी स्विमिंगपूलमध्ये पडिक असायचो. आम्ही नदीत आणि समुद्रात पोहलेली माणसं. मग पोहताना तू किती आवाज करतोस, तुझे स्ट्रोक कसे चुकीचे आहेत अश्या प्रतिक्रिया यायच्या. तिने आम्हाला डाइविंग पॅडवरुन पाण्यात सूर मारायला देखील शिकवलं. त्याच दरम्यान त्यांच्या घरच्या बागेत एक बदक आपली पिल्ल घेऊन मुक्कामाला आलं होतं. काही दिवस स्विमिंग पूल बदकांसाठी राखीव होता. त्या पिल्लाना खाऊ घालण्यासाठी लिंडा जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. &lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzLslJwlhMI/AAAAAAAAAPQ/_Gm6r713BFA/s1600-h/Duck.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 279px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzLslJwlhMI/AAAAAAAAAPQ/_Gm6r713BFA/s400/Duck.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5418653424699147458" /&gt;&lt;/a&gt; दररोज आम्हाला त्या पिल्लाच्या गोष्टी ऐकायला मिळायाच्या. एके दिवशी पिल्ले मोठी झाल्यावर लिंडा आणि ऑल्टन त्या सगळ्या बदकाच्या कुटुंबाला जवळच्या मोठ्या तळ्यावर सोडून आले. पुढे काही दिवस रोज ती बदकांची पिल्ले कुठे दिसतात का हे पाहायला ती दोघं तळ्यावर जात होतीत. त्यांच्या घरी एक मांजर देखील होते. त्याचे देखील घरातीलच एका सदस्या प्रमाणे मजबूत लाड व्हायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एवढं सगळं ऐश्वर्य, डामडौल असूनही लिंडा आणि ऑल्टनचा स्वभाव इतका आपुलकीचा होता की आम्हाला कधीही तिथे दबून गेल्या सारखे वाटले नाही. आम्ही तिथे अक्षरशः दंगा करायचो. लिंडा आणि ऑल्टनदेखील आमच्यात सामील असायचे. अधून मधून पाहुण्यांचाही राबता असायचा. त्यावेळी देखील आम्हाला आमंत्रण असायचे. कुठेही काहीही आडपडदा नाही, भेदभाव नाही. आम्ही देखील दरवेळी मस्तपैकी वाईन आणि केक घेऊन त्यांच्या घरी पोहचायचो. आम्हाला देखील काहीतरी नवीन चाखायला मिळायचे. त्या पदार्थांच्या पाककृतीबद्दल चर्चा व्हायच्या. सुट्टीत घरी आलेल्या नातवंडांचे आजी आजोबा जसे प्रेमाने लाड करतात तसेच काहीसे आमचे देखील लाड व्हायचे. आम्ही देखील त्यांना आपला कडक, ताजा, उकळी काढलेला कटिंग चहा पाजायचो. एकदा मुर्गी पण चाखवली. त्यांना तिखट लागली पण तरी देखील त्यांनी आवडीने खाल्ली. लिंडाच्या घरी गेल्यावर आणखी एक हमखास होणारी गोष्ट म्हणजे रमी क्यूबचा डाव. हा पत्त्यांप्रमाणेच एक खेळ आहे. नियम थोडे वेगळे आणि प्लास्टिकची कार्ड. लिंडा आणि ऑल्टन रोज हा खेळ खेळायचे (फोटोत दिसत आहे तो खेळ). आम्ही गेलो की आम्ही त्यांच्यात सामील व्हायचो. ऑल्टन असो वा आम्ही, रमी क्यूब मध्ये बहुतांशी लिंडा जिंकायची. एरवी प्रेमळ आणि दुसर्‍यांसाठी मदतीला तयार असणारी लिंडा रमी क्यूबमध्ये मात्र सगळ्यांच्या विरुद्ध उभी ठाकायची. ऑल्टन लबाडी करण्यात माहीर होता. लिंडाला हरवण्यासाठी तो आम्हालाही वेगवेगळे गनिमी कावे सुचवायचा. पण लिंडाच्या बारीक नजरेतून काही सुटायाचे नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजकारणापासून ते Technology पर्यंत सगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. ऑल्टन आमच्या कामाची चौकशी करायचा, आम्ही कुठल्या प्रॉजेक्टवर, काय काम करतो ह्याची माहिती करून घ्यायचा. आम्हाला त्याची नवी जुनी उपकरणे दाखवायचा. कॅल्क्युलेटर नसताना ते जी स्केल वापरायचे (नाव विसरलो मी) ती ते कशी वापरायचे आणि त्यातून अचूक मोजमाप कसे काढायचे अश्या गप्पा रंगायच्या. त्यांना भारताबद्दल खूप आकर्षण होते. खूप प्रश्न विचारायचे. मला गर्लफ्रेंड नाही याचे लिंडाला आश्चर्य वाटायचे. :-( तुम्ही लोकं एकमेकाला ओळखत नसताना (अरेंज) मॅरेज कसे करता असा साधा प्रश्न तिला नेहमी पडे. "Look at us. I dated with Alton for 3 years then only we decided to get married. Sid you should go for love marriage." मी आपला एक उसासा सोडून गप्प. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नाताळच्या आदल्या दिवशी आम्हाला लिंडाच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी खास आमंत्रण होते. लिंडाने सगळ्यांना ख्रिसमसची काही ना काही  भेटवस्तू दिली. रात्री उशिरापर्यंत आम्ही रमी क्यूब खेळलो. त्यानंतर लिंडाने ख्रिसमसची रोषणाई दाखवण्यासाठी आम्हाला त्यांच्या भागात फिरवून आणले. फार मज्जा आली. ऑल्टन आणि लिंडा म्हणजे आमच्यासाठी संताबाबाच झाले होते. न मागता आमच्या पोतडीत त्यांनी भरभरून आनंदाचे क्षण टाकले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन्ही वेळा भारतात परत येताना लिंडा आणि ऑल्टनचा निरोप घेणे जड गेले. कोण कुठली सातासमुद्रापारची माणसं, पण मनात घर करून आहेत आणि रहातील ही आणि त्यांच्याबरोबर साजरा केलेला ख्रिसमस देखील...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-5884020874793414892?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/5884020874793414892/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=5884020874793414892&amp;isPopup=true' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5884020874793414892'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5884020874793414892'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post_23.html' title='आठवणीतला नाताळ'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SzLr1DGOx3I/AAAAAAAAAPI/BfgDk5uMVT4/s72-c/Linda+and+Alton+Johnson.jpg' height='72' width='72'/><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-1139716463276337698</id><published>2009-12-08T09:27:00.000-08:00</published><updated>2009-12-08T20:53:47.377-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महाभारत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऑफीस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='काम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='IT Industry'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='व. पु. काळे'/><title type='text'>माझा अर्जुन झालाय!!!</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sx6Rd8adsKI/AAAAAAAAAO4/N6a8S_Hd_rY/s1600-h/ASA.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 370px; height: 200px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sx6Rd8adsKI/AAAAAAAAAO4/N6a8S_Hd_rY/s400/ASA.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5412923745765273762" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;व. पु. काळ्यांचे एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". कुरुक्षेत्रावर समोर आपलीच भावंडे, सगेसोयरे आणि गुरू ह्या सर्वांना पाहून अर्जुनाची द्विधा अवस्था झाली होती. त्यांच्यावर शस्त्र उगारावं की रणभूमी सोडून मागे फिरावं असा प्रश्न त्याला पडला. प्रश्न देखील तितकाच गहन होता त्यामुळे तसे होणे सहाजिकच होते. अर्जुनानंतर इतका गहन प्रश्न बाळासाहेबांसमोर उभा ठाकला असेल, फक्त इथे त्यांना गीता सांगणारा कुणी कृष्ण नाही लाभला. हे झालं मोठ्या लोकंबाबत. आपल्यासारख्या सामान्य लोकांचादेखील दैनंदिन आयुष्यात अनेकदा अर्जुन होतोच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या माझा गेम झालाय. पूर्णपणे अर्जुन झालाय. फक्त माझी लढाई ही अर्जूनाप्रमाणे कुणा आप्त् स्वकियांबरोबर नसून स्वत:बरोबर आहे. हे करू की ते करू ह्यात मी अडकून पडलो आहे. सध्या काहीतरी बकवास काम करतो आहे. ऑफीसमध्ये कामात मन लागत नाही तरी केवळ डेडलाइन पूर्ण करण्यासाठी उशिरापर्यंत पडिक राहायचे. बर जास्त वेळ थांबून काम होईलच ह्याची खात्री नाही तरी देखील वेळेवर घरी जाणे नाही. घरी जाव की काम करत ऑफीस मध्ये बसावं ह्यात माझा रोज अर्जुन होतो. आहे त्या जॉबचा कंटाळा आलाय पण जॉब बदलून देखील परिस्थिती बदलेलं का हा विचार पुन्हा माझा अर्जुन करून टाकतो. असे बरेच प्रश्न आहेत ज्यात माझा अर्जुन होतो. काही न करता शरीर साथ देतय म्हणून धाप लागेपर्यंत देशा विदेशातल्या माणसांबरोबर कुठल्यातरी Technology च्या मागे धावत राहावं की शांत पणे गावी जाऊन आहे त्यात समाधान मानून घरच्यांबरोबर रहावं? ह्या while(1)मध्ये loop पळणार्‍या रॅट रेस मधून आपण कधी तरी बाहेर फेकले जाणार हे माहिती असून देखील त्या दिवसाची वाट पहात राहावी की स्वत:हून त्यातून बाहेर यावं? नवीन Skills शिकून, Domain बदलून Job profile जास्त flexible बनवावं की आहे त्याच domain मध्ये अनुभव वाढवून comfort zone मध्ये राहावं? मी कायम IT मध्ये काम करेन असं मला स्वत:ला तरी वाटतं नाही पण  IT नाही तर नक्की करायचं काय हे अजुन मलाच माहिती नाही. IT मध्ये रहायच तर मग काही वर्षे Onsite काम केलं पाहिजे असं एकीकडे वाटतं पण मग वर्ष-वर्ष बाहेर देखील राहायचं नाही. गौरी-गणपती, दसरा-दिवाळी, पाडवा आणि होळी हे आपल्या माणसात, आपल्या घरातच साजरे करायचे असतात. दर २-४ महिन्यांनी गावी जाऊन आपल्या माणसात राहायचं असतं. दोन्ही दगडावर पाय कसा ठेवायचा? बर भारतातच राहावं तर  बंगलोर की पुणे? तसा विचार केला तर दोन्ही घरापासून दूरच. एका बाजूला बंगलोरमधलं जीवन पुण्यापेक्षा बरं वाटत पण तरी देखील आतून कुठेतरी पुण्याची ओढ लागते. महाराष्ट्रात राहाणार्‍या प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे हे राज ठाकरेंचे विचार पटतात पण गेली काही वर्षे बंगलोरला राहून मी स्वत: मात्र कन्नड नाही शिकलो. का? कारण कन्नड नाही आलं तरी माझं इथे काहीच अडतं नाही. मग मी राज ठाकरेंच्या विचारांना पाठिंबा द्यावा की महाराष्ट्रात राहून मराठी न येणार्‍या अमराठी लोकांना? असो विषयांतर होतय पण काय करणार? वैयक्तिक गोष्टींबरोबरचं सामाजिक आणि राजकीय विचारांबाबत देखील माझा अर्जुन झालाय.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-1139716463276337698?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/1139716463276337698/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=1139716463276337698&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1139716463276337698'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/1139716463276337698'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='माझा अर्जुन झालाय!!!'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sx6Rd8adsKI/AAAAAAAAAO4/N6a8S_Hd_rY/s72-c/ASA.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-6636577850634144415</id><published>2009-11-25T19:02:00.000-08:00</published><updated>2009-11-26T01:14:46.582-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शहीद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजनीति'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दहशतवाद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पोलिस'/><title type='text'>शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...</title><content type='html'>स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन मग कारगिल दिवस आणि आत्ता २६/११. आज २६/११ ला एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभर कसाबने पाहुणचार झोडला. नुकतचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचलं की कसाबची काळजी घेण्यासाठी सरकारी तिजोरीतून वर्षभरात तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहिदांच्या घरी मात्र मदत पोहोचली नसेल. त्याचबरोबर कसाबसोबत आलेल्या इतर अतिरेक्यांचे मृतदेह अजुन ममीसारखे जपून ठेवलेले आहेत. आपण अमराठी लोकांचा थारा करणार नाही असे म्हणतो पण हजारो रुपये खर्चून कडेकोट पहार्‍यात दहशतवाद्यान्चे मृतदेह मात्र बाळगून आहोत. २६/११ नंतर गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले आर आर पाटील आज पुन्हा गृहमंत्री आहेत. हल्ल्यानंतर मंत्री बदलल्याने काय होते हे आजपर्यंत कळले नाही. अर्थात त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, आपणच निवडून दिले आहे त्यांना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;           भारताची राजनीति समजण्याला लागते&lt;br /&gt;           षंढता ही खूप, थोडी-थोडकी ना लागते  &lt;br /&gt;           खूप केला यत्न आम्ही आम्हास नाही समजली&lt;br /&gt;           ना कळो आम्हास आहे पुष्काळांना समजली&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतके वर्ष अफजल गुरूला पोसतोय आत्ता कसाबला पोसू. त्यात काय एवढे? पाकिस्तानला अधून मधून पुरावे देत राहू. कालच प्रधानमंत्री की संरक्षण मंत्र्यानी २६/११ मधल्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच असे ठामपणे सांगितले आहे. बस्स आणि काय पाहिजे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;           आता कशाची लाज आता काश्मिरही देऊ आम्ही&lt;br /&gt;           काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी&lt;br /&gt;           दिल्ली जरी गेली तरीही हार ना आम्ही म्हणू&lt;br /&gt;           उंचावूनी लुंग्या स्वत:च्या 'जय जगत्' आम्ही म्हणू&lt;br /&gt;&lt;br /&gt;२६/११ मुळे पोलिसांची सामान्य माणसाच्या मनातील प्रतिमा मात्र बदलली हे नक्की. २६/११ नंतरच्या दिवसात विजय साळस्कर, अशोक कामटे आणि  हेमंत करकरे ह्या तिघा अधिकार्‍यांबद्दल जे वाचायला मिळाले त्यावरून आपण किती मोठे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावले हे कळते. कामटेनी सोलापूर मध्ये ज्या रीतीने काम केले होते त्यावरून ते किती मोठे होते ते कळते. एका पोलिस अधिकर्‍याच्या मृत्यूमुळे लोकानी उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याचे माझ्या वाचण्यात नव्हते. एखाद्या हीरोला शोभेल असे व्यक्तिमत्व. पिळदार शरीरयष्टी. रात्री १० नंतर फटाके फोडले म्हणून आमदाराला भर रस्त्यावरून फटके मारुन पोलिस स्टेशनपर्यंत धिंड काढून नेलेला अधिकारी असा लौकिक. विजय साळस्करानी २४ वर्षाच्या कारकिर्दीत ७९ गुंडाना ढगात पोचवलेले. हेमंत करकरे ATS चीफ. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर पण पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द. सोप नाही. इंजिनियर झाल्यावर पुन्हा IPS वैगरे परीक्षा देऊन पोलिसाची नोकरी. हे सगळे नक्कीच स्पेशल होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;           ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला&lt;br /&gt;           नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला &lt;br /&gt;           जन्माला जो जो इथे तो वीर आहे जन्माला&lt;br /&gt;           अध्यात्म ही या भारताचा युद्धात आहे जन्माला&lt;br /&gt;&lt;br /&gt;           आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची&lt;br /&gt;           फक्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची&lt;br /&gt;           अरे कुठला हा पाक याचे नावही नव्हते कुठे&lt;br /&gt;           कळणारही नाही म्हणावं होता कुठे गेला कुठे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;२६/११ मध्ये बळी पडलेल्या तमाम निरपराध नागरिकांना आणि शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...&lt;br /&gt;========================================================================================&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;नोंदीमध्ये वापरलेली वरील शायरी भाऊसाहेब पाटणकर लिखीत "दोस्त हो!" ह्या पुस्तकातील आहे.&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-6636577850634144415?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/6636577850634144415/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=6636577850634144415&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6636577850634144415'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/6636577850634144415'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_25.html' title='शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-2882884321595223907</id><published>2009-11-14T21:53:00.000-08:00</published><updated>2011-07-31T22:49:57.768-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन तेंडुलकर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गजाल्या'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>मानाचा मुजरा</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sv-Ykxb846I/AAAAAAAAAOw/cdWj4HGJYC8/s1600-h/Sachin+Ramesh+Tendulkar.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 287px; height: 400px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sv-Ykxb846I/AAAAAAAAAOw/cdWj4HGJYC8/s400/Sachin+Ramesh+Tendulkar.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5404205835381171106" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेहमी प्रमाणे मास्तर, दत्त्या, गेंगण्या, बाबू तोडणकर, गंपू शेट अशी सगळी गँग मामाच्या हॉटेलमध्ये बसली होती. रविवार होता. सकाळची वेळ असली तरी बाबू नेहमी सारखा बर्‍यापैकी टूंन्न होता.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर:&lt;/span&gt; काय गंपू शेट आज हजामाती नाय वाटतं?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट:&lt;/span&gt; नाय ता काय मी आज काय दुकान उघडायचो नाय. येका कार्यक्रमाक जावचो असा.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;दत्त्या&lt;/span&gt;: खैसर जावाळ करायचो असा काय?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: नाय रे.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;बाबू&lt;/span&gt;: मेल्या रविवारचो धंदो बंद करून खै चाललोस? असो खैचो काम उपटायाचो असा तुज?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: आज क्रिकेटची मॅच असा.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;सगळे&lt;/span&gt;: क्रिकेटची मॅच?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;बाबू&lt;/span&gt;: तू काय थयसर दोनी टीमची भादरवूक जातस?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मेलो बेवडो. माका काय हजामाती सोडून बाकी काय दुसरो काम येत नाय असो वाटलो काय? माज्यासारखो अष्टपैलू खेळाडू आजुबाजूच्या गावात नव्हतो. काय समजलावं?&lt;br /&gt;&lt;br /&gt;गंपू शेट तसे १०-१२ वर्षांपूर्वी गजालवाडित आलेले असल्यामुळे लोकांना त्यांच्या तरुणपणीचे पराक्रम फार माहीत नव्हते. एकेकाळी गंपूशेट म्हणजे मधल्या फळीतले चिवट फलंदाज आणि फिरकी गोलंदाज. गंपुशेट शब्द जसे गर्रकन फिरवतात तसे चेंडू पण फिरवू शकतात हे कोणाला सांगून खरे वाटले नसते. क्रिकेटबद्दल गंपू शेटना मजबूत प्रेम. आणि सचिन तेंडुलकर म्हणजे सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणे गंपू शेटचा देव.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर&lt;/span&gt;: अहो गंपुशेट आज मध्येच हे मॅचचं कुठून काढलं नवीन?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: ओ मास्तर आज तारीख काय?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर&lt;/span&gt;: तारीख? आज १५ नोव्हेंबर. त्यात काय? तारखेचा आणि तुमच्या मॅचचा काय संबंध?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: ओ मास्तर ना तुम्ही? तरीच केलाव् काम बराबरं. पोरांना काय घंटा शिकिवनार? अहो आज तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दिला २० वर्षं झाली. त्या प्रित्यर्थ येक आत्ता अकरा वाजता सामना आयोजित केलेला आहे गावाच्या पोरांनी. तिकडंच जातोय मी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसे दुकानात सचिन तेंडुलकरची पोस्टर पाहून गंपुशेटना क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट आहे हे लोकांना माहीत होतं पण गंपुशेट इतके तेंडुलकर प्रेमी असतील ह्याची कल्पना नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मामा&lt;/span&gt;: असो नाय, मग बरा झाला दुकान बंद ठेवलास ता. नायतर ते चॅनेलवाले दिवसभर तेंडुलकरच्या बालपणापासून ते आजपर्यंत काय काय झाला ता दाखवत बसतील आणि गंपुशेट ता बघता बघता लोकांचे कान मान कापून टाकायचो.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गेंगण्या&lt;/span&gt;: नाय तर काय? येकदा गंपूशेट मॅच बघता बघता फाफ्या कदमाची दाढी करीत व्हते. तिकडे तेंडुलकरने ष्ट्रेट द्राइव्ह मारल्यानं आणि इकडे गंपुशेटनी ष्ट्रेट फाफ्याची अर्धी मिशी उडवल्यानी.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;बाबू&lt;/span&gt;: नायतर काय. अरे तिकडे तेंडुलकर ठोकूक लागलो की गंपु आपल्या हातात वस्तरा हाय हे विसरून जाता. अशीच येकदा कैचीची कट लागून गेली कानास माझ्या. तेवापासून परत कधी मॅचच्या दिवशी हजामात करुक गेलो नाय गंपू शेटकडे.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर&lt;/span&gt;: अहो त्यात काय? हेल्मेट घालून जायचं की?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मेलो बेवडो. अरे मी कट कशाक मरूक हवी. झिंगीत तुझोच मस्तक डूलत असता.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर&lt;/span&gt;: ते जाऊ दे ओ गंपुशेट. त्या तेंडुलकरच्या कारकिर्दिला २० वर्षे पूर्ण झाली त्यात काय एवढे? तुम्ही धंदा बंद करून तुम्हाला काय मिळणार?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मास्तर सोडून द्या. तुम्हांस नाय कलायचा ता. तुमची कारकीर्द २० वर्ष्याची झाली की तुम्ही शिकवलेली किती पोरा तुमची आठवन काढतात ता बघा. काय समजलावं?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मामा&lt;/span&gt;: अरे मास्तर बरोबर बोलततं. अरे तो खेळलो तरी आपण मॅच जिंकत नाय. तो खेळलो की भारत हरलोच समजायचो. तू कशाक खै कडमडूकं जातंस?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मामा काढलीस ना सोताची लायकी? ह्याच कलता ना तुला क्रिकेटमधला? बेवड्या सांग बरे सचिनची वन डे मधली शतका किती असतं?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;बाबू&lt;/span&gt;: ४५.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: आणि त्याताल्या ३२ शतकानी संघाक विजय मिळवून देलानी. मास्तरांनू काढा टक्केवारी आणि घाला मामाच्या घश्यात.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर&lt;/span&gt;: ४५ पैकी ३२ म्हणजे ७० टकक्याहून जास्त.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मंग? आत्ता बोल मामा? वाचा बसली नां तुझी? अरे मेल्यानू तो खेळला तरी बोंबलताव आणि नाय खेळला तरी बोंबलताव . आत्ता परवा येकट्यानं केलानं नां १७५. अवो सोन्याचो भाव आणि तेंडुलकरची येक येक धाव म्हंजे रोज एक नवो शिखर. दोघांनी कसो हातात हात घालून १७ हजारी टप्पा पार केल्यानी.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मामा&lt;/span&gt;: पण शेवटी झालो काय आपण मॅच हरलो नां?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गेंगण्या&lt;/span&gt;: आत्ता तो बाद झाल्यावर ढुन्गणाकडचे लोग हगले त्याला तो काय करील?&lt;br /&gt;गेंगण्याने अचानक टीम बदलली आणि गंपू शेटला जॉइन केले&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मागे येकदा मद्रासला पण पाकिस्तान बरोबरच्या कसोटीत तो बाद झाला तेंव्हा १६ रन्स हवे होते? किती १६ आणि आपले ४ जन शिल्लक होते. आणि निकाल विचारा. भारत १२ रन्स ने हरला व्हता. आत्ता तो काय फेडररसारखो एकेरी सामने नाय खेळत जो जाता येता येकट्यानं जिंकवून् देल.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गेंगण्या&lt;/span&gt;: २००३ चो वर्ल्डकप आठवा. येकट्यान काढलान सगल्या मॅची.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: मंग? विसरलाव? आज त्याची हर एक रन्स वर्ल्ड रेकॉर्ड हाय. काय समजलावं? अरे नुसती बॅटिंग करून थांबलोय काय? मोइन खानला जावन् विचारा. त्याच्या ढेन्गातून बॉल गेलो कधी नि दांडके पडले कधी त्याचो त्यालाच नाय कळलो. परवा १७५ रन करून देलान ना तोंडात रिटायर हो, रिटायर हो म्हणून बोंबलनार्‍या लोकांच्या. अरे ती शारजातली मॅच आठवा. वादाल येवन् गेल्यावर शेन वार्नची जी काय पिसा काढल्यान् व्हती की तो अजुन आठवण काढतो आणि जल्ली मामा सारखी लोका विसरतात.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;दत्त्या&lt;/span&gt;: अहो क्रिकेट जगतातले म्हातारे कोतारे पण त्याच्या पेक्षा बाकी कोण कोण श्रेष्ट हे किती वेळा बोंबलले. तो १९४ असताना आपल्याच लोकांनी डाव सोडल्यानी पण कधी कोणाकं एका शब्दानं तरी बोलल्याचो आठवताय? असो सभ्य खेळाडू दिसता कोन दुसरो तुम्हास?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गेंगण्या&lt;/span&gt;: हल्ली ताजो ताजो त्या विनोद कांबळ्यान् उगाच काय तरी बोलायचो म्हणून बोलल्यान् आणि सोताच्या तोंडाक काला फासल्यान्. आपल्या मच्छिन्द्र कांबळ्यान् जा काय नाव कमावल्यान् ता विनोद कांबळ्यान् घालवल्यान्.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;बाबू&lt;/span&gt;: "हा म्हणजे बिशन सिंग बेदीन् कमावलेलो नाव येकट्या मंदिरा बेदीन् घालवल्यान् तसलो प्रकार झालो." बाबूला बर्‍याच वेळांन किक आली.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: आज काल कोन पन ट्वेंटी ट्वेंटी खेलता पण २० वर्षे कसोटी, वन डे क्रिकेट कोण खेलेल हे सांगा? अरे लोका पुर्‍या कारकिर्दीत १०-१२ शतका झाली तरी धन्य मानतात. पण हा आपल्या कारकिर्दीत १६ वेळा नव्वदित बाद झालो. नाय तर १०० शतकांचा आकडो कधीच पार झालो असतो&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मास्तर&lt;/span&gt;: होय होय ते पण खरचं. पुर्वी पासून क्रिकेट भारतात लोकप्रिय होत पण आज क्रिकेट म्हणजे पैश्याची गंगा झालीय, लोक आपल्या मुलाला क्रिकेटर म्हणून पाहु लागली आहेत, क्रिकेट एक करियर म्हणून विचार करावा इतकं पुढे गेलय. क्रिकेट आता व्यवसाइक झालाय. ह्याच सगळ्यात जास्त श्रेय सचिनलाच जातं हे कोणीही मान्य करेल.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;मामा&lt;/span&gt;: अरे ता सगला मान्य पण वर्ल्डकपचो काय?&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;गंपू शेट&lt;/span&gt;: हा तेवडो मात्र खरां. २००३ ला त्यानं एकट्याच्या जिवावर वर्ल्ड कप आणल्यांनचं होतो पण शेवटची फाइनल फसली. नायतर आज त्याची कारकीर्द कशी झलालून दिसली असती. तेवढि येकच कमी राह्याली हाय आत्ता. त्यासाठीच मी जातय म्हांराजाकं गार्‍हानं घालूक...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;सगळे&lt;/span&gt;: आमी पण येतो. आमी पण येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;रे म्हांराजा !!!!!&lt;br /&gt;बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेंडुलकरांच्या सचिनने आज कारकिर्दीक २० वर्षे पुरी केल्यान्.&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजपर्यंत धावांचो डोंगर उभा केल्यान्.&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगातल्या सगल्या बोलर लोकांकं धडकी भरवल्यान् आनी फील्डर लोकांकं सैरभैर करून सोडल्यान् .&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता-येता विक्रम मोडल्यान्... नवीन नवीन विक्रम आपल्या नावावर केल्यान्.&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर ह्याच्या पुडे पण त्याच्या हातान् अशीच कामगिरी होत रवांदे.&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याचो खेळ असोच बहरत जावांदे.&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आनी २०११ चो विश्वकप भारतात येवांदे...&lt;br /&gt;व्हयं म्हांराजा !!!&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-2882884321595223907?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/2882884321595223907/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=2882884321595223907&amp;isPopup=true' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2882884321595223907'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2882884321595223907'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_14.html' title='मानाचा मुजरा'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sv-Ykxb846I/AAAAAAAAAOw/cdWj4HGJYC8/s72-c/Sachin+Ramesh+Tendulkar.jpg' height='72' width='72'/><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-7009424177598691883</id><published>2009-11-07T11:07:00.000-08:00</published><updated>2009-11-07T11:09:56.973-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिवाळी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रत्नागिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मस्त्याहार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खादडी'/><title type='text'>यंदाची दिवाळी - भाग २</title><content type='html'>&lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/10/blog-post_6263.html"&gt;भाग एक पासून पुढे चालू&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवाळी दिवशी साडेपाचला उठलो. घरातली मोठी माणसे कधीच ४-४ १/२ पासून उठून तयारीला लागली होतीत. मस्त नारळाच्या रसात भिजवलेल्या ऊटण्याचा छान वास येत होता. आई, बाबा, काका, काकू, भाऊ, वहिन्या ह्यांच्या आंघोळी देखील आटोपल्या होत्या. देवपूजेची तयारी सुरू होती. देवाला देखील ऊटणे लावून पूजेची सुरूवात झाली. तोवर आजूबाजूच्या मुलांनी दणके बाज फटाके फोडले. त्या आवाजाने आमच्या घरातले बाळगोपाळदेखील उठले आणि फटाके फोडण्यासाठी धावले. सगळ्यात लहान सिद्धी फटक्याच्या आवाजाने दचकून उठली आणि फुल्ल भोकाड पसरले. मी देखील ऊटणे लावून आंघोळ करून घेतली. दिवाळी दिवशी आई, काकी, आत्ये अशा सगळ्या आम्हा भावंडांना ऊटणे लावतात.&lt;a href="http://dimag-kharab.blogspot.com/2009/09/blog-post_6698.html"&gt; आमच्या वेळी असं नव्हतं &lt;/a&gt;असे म्हण्याची अजुन गोष्ट म्हणजे दिवाळीतली थंडी. लहानपणी खूप थंडी असायची. कधी एकदा सगळ्याजणी आपल्याला ऊटणे लावतात आणि कधी एकदचा गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतो असे व्हायचे. थंडी नक्की कोणत्या दिवाळीत गायब झाली आठवत नाही पण गायब झाली हे मात्र नक्की. हल्ली दिवाळी मे महिन्यात येते की काय असे वाटते. आपल्या नकळत सगळं किती भराभर बदलतं नां. आंघोळीनंतर तुळशी समोर कारेट फोडलं. ही प्रथा कुठे कुठे पाळतात हे ठाऊक नाही म्हणून लिहितो. कारेट नावाचं एक अंड्याच्या आकाराचे फळ रानात किंवा डोंगरावर मिळते. नरकचतुर्थी दिवशी नरकासूर समजून डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारेट तुळशीसमोर फोडायाचे. लहानपणी मला केवळ पायाच्या अंगठ्याने हे फोडता नाही यायचे. मग पूर्ण पाय द्यायचो आणि कारेट चपटून टाकायचो. घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर पुढच्या ओटीवर सगळे एकत्र फराळाला बसलो. देवपूजा आटोपली होती. दिवाळी दिवशी देवाला दूध पोह्याचा नेवैद्य दाखवतात. मस्त फराळ आणि दूधपोह्यावर ताव मारला. छोट्या मुलांना सतावणे वैगरे सुरू होतेच. आमचं झाल्यावर लेडीजची बॅच फराळाला बसली. नंतर शेजारच्या घरात फराळची देवाणघेवाण सुरू झाली. पप्या वाडीतल्या गँगचा म्होरक्या झालाय. हल्ली बरीचशी मुलं नोकरीशिक्षणानिमित्त घराबाहेर असल्याने पप्या आणि समस्त गँग दसरा, कोजागिरी साजरी करू शकले नव्हते. त्यामुळे दिवाळी दिवशी सगळे एकत्र येऊन सगळ्या घरात जाऊन दिवाळी शुभेच्छा देत फिरत होते. गँगचा दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर दुसर्‍या दिवशी गणपतीपुळे ट्रिपचा प्रस्ताव देखील होता. मे महिन्यानंतर झालेले वाढदिवस आणि कोजागिरी हातखंब्याजवळच्या धाब्यावर चिकन हाणून साजरे करण्याचा प्लान होता. &lt;span style="font-style:italic;"&gt;(हातखंबा हे मुंबई-गोवा हाइवे वरचे एक गाव. सुजाण वाचकांनी हात खंबा अशी शब्द फोड करू नये.)&lt;/span&gt; आत्ता मी सतत बाहेरच चिकन खात असल्याने रविवार घरीच साजरा करणार होतो. त्यामुळे पप्या आणि कंपनीचा प्रस्ताव साहजिकच धुडकावून लावला आणि मी मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडलो. दिवाळी दिवशी भल्या पहाटे मुले देखील न चुकता मंदिरात जातात ह्याचे कारण सांगायची गरज नाही. त्या दिवशी इतक्या छान छान मुली पाहायला मिळतात की काय बोलावे. मला जरा उशीरच झाला पण Better late than Absent या सदाबहार सुविचारला धरून मी हजेरी लावून आलो. पदरी अगदीच निराशा नाही पडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी सगळे लवकर उठलेले त्यामुळे जेवणं झाल्या झाल्या सगळे पटापट झोपी गेले. २-३ तासाच्या विश्रांती नंतर चहापान झाल्यावर सगळे पुन्हा फ्रेश झाले. संध्याकाळी लक्ष्मी पूजन होते. दिवेलागणी बरोबर पुन्हा एकदा कंदील, पणत्या आणि त्याचबरोबर फटाके फोडणार्‍या बाल-गोपाळ मंडळींवर लक्ष्य ठेवणे हे काम माझ्याकडे आले. मोठी माणसे लक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागली. वहिनीने पिवळ्या आणि केशरी गोंड्या च्या पाकळ्यांची छान रांगोळी काढली होती. छान प्रसन्न वातावरणात लक्ष्मी-पूजन पार पडले. गोड शिरा आणि श्रीखंड पूरीचा नेवैद्य झाला. सगळं आटपेपर्यंत साडेआठ वाजून गेले. पुन्हा थोड्या गप्पाटप्पा नंतर जेवण करून दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी रविवार. साहजिकच पुन्हा एकदा मच्छीमार्केटची वाट धरण्यात आली. रविवार चिंगळ(Prawns), कालव्,  तिसरे मुळे (एक शिंपी) यापैकी काहीतरी अशी माझी फर्माईश होती. कालव् आणि तिसरे मुळे मिळणे कठीण आहे हे माहीत होतं. प्लान के मुताबिक चिंगळ आणि जोडीला गावठी चिकन. आमच्याकडे होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलीवंदनाला कोंबडी-बोकडाचे गावजेवण असते. गावाचे लोक होळीला ईच्छेनुसार कोंबडी-बोकड किंवा नाराळाचा नवस बोलतात. हे मटण गावाचे पुरूष शिजवतात. ह्याला कसलेही वाटप किंवा स्पेशल चिकन मसाला वैगरे लावत नाहीत. फक्त नवसाचे नारळ आणि कांदा वापरुन केलेले असते. आम्ही ह्याला सुक्क मटण म्हणतो. त्या दिवशी घरी चिंगळाबरोबर तसं सुक्क चिकन शिजलं होतं. मी रेसिपी लिहून आणली आहे. एक दोन आठवड्यात करून पाहीन एखाद्या रविवारी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता अशा जेवणा नंतर पुन्हा झोप ओघानेच आली. झोपून उठल्यावर चहा वैगरे घेऊन झाल्यावर बाजारात जाऊन कागद आणि गोंद घेऊन आलो. महेंद्र्जींनी केलेला &lt;a href="http://kayvatelte.wordpress.com/2009/10/14/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/"&gt;कंदील &lt;/a&gt; पाहिल्यापासून यंदा आपण देखील कंदील करावा हे मनात आले होते. लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी दिवाळीची सुट्टी पडली की कंदील आणि मातीचा किल्ला करणे ही दोन कामे दिवाळीच्या दिवसाआधी उरकणे ही मोठी जबाबदारी असायची. मोठ्या कंदीलाबरोबर १०-१२ छोटे कंदील ही करावे लागत. शेजारच्या काकांकडून सिगारेटची रिकामी पाकिटे आणून ती मधून कापून त्यावर कागदी करंज्या आणि शेपूट लावली की झाला कंदील. आत्ता मात्रा कागदी करंज्यांचाच पण एकच मोठा कंदील करायचे ठरवले. जवळपास १४-१५ वर्षांनी कंदील करत होतो. पुतणे आणि भाचे मंडळी कुतुहलाने बघत होते. कंदीलाचा सांगाडा बनवायला ड्रेसच्या खोक्याचा पुट्ठा वापरला. दोन तासात कंदील झाला. मला कंदील करताना बघून बाबा पण मदतीला आले. बाबांनी प्रत्येक करंजीच्यामध्ये सोनेरी कागद कापून नाजूक ठिपके लावले. दिवाळीला नाही तरी भाऊबीजेआधी कंदील अंगणात लागला. ऑफीसचे बेचव काम सोडून आपल्याला अजुन काही येते ह्याचा उगाचच अभिमान वाटला. पुन्हा एकदा कॅमरा न आणल्याचा पस्तावा झाला. मला साधाच मोबाईल आवडतो पण आपल्या मोबाईल मध्ये कॅमेरा नाही ह्याच त्यावेळी पहिल्यांदा वाईट वाटलं. दादाच्या मोबाईलवर फोटो काढला पण नंतर कॉपी करायाचा राहिला. नंतर चार दिवसांनी संध्याकाळी अचानक पावसाची बर्‍यापैकी मोठी सर आली त्यात कंदीलाचा काही भाग भिजला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी भाऊबीज. त्या दिवशी दिवाळीसारखचं बहिणींनी उटण लावलं. आंघोळी नंतर ओवाळणी. मला मोठ्या बहिणीने भाऊबीजेला एक छोटी कढई दिली. माझ्याकडे इथे कढई नव्हती म्हणून मी तिला आधीच सांगून ठेवले होते. फ्रायपॅनमध्ये अंडा बुर्जी तितकीशी चांगली होतं नाही आणि शिवाय डीपफ्राय करण्यासारखं काहीच करता येत नाही. आत्ता कढई आलीय मग अंडा बुर्जी, कांदा-भजी, बेसनचा सुका झुणका, हरा-भरा कबाब हे सगळं बनवता येईल. बनवेन लवकरच. माझ्या स्वयंपाक घरातल्या करमती आणि पाक कौशल्यावर एक पोस्ट होईलच कधी तरी. पाहु लिहायला लवकरच वेळ मिळो. असो तर गोडाधोडाचं खाऊन भाऊबीज साजरी झाली. माझ्या वहिन्याचे भाऊ पण भाऊबीजे निमित्त आपल्या बहिणींकडे म्हणजे आमच्या घरी आले होते. आईला भेटायला माझा मामा देखील आलेला. त्या निमित्ताने आमची पण भेट झाली. भाऊबीज संपली. दिवाळीचे सगळे मुख्य कार्यक्रम पार पडले. आत्ता मस्त आराम. म्हणजे मी गेले चार दिवस फार काम उपसले अश्यातला भाग नव्हता. पण तरी आपलं म्हणायचं. सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय पाहिजे ते फर्मान सोडायाचे आणि हादडायचे हाच एक कलमी कार्यक्रम. अगदीच हुक्की आली तर बाजारात फेरफटका मारायचा. दोन दिवस संध्याकाळी छोटे कंपनीला घेऊन मांडवी बंदरला जाऊन आलो. वाळूत किल्ले बांधले. पुन्हा कॅमेरा नाही!!! भेळ, आइस्क्रीम, कटलेट चोपले. बाकी वडापाव, ढोकळा, मिक्स-भजी ह्या सगळ्यांचा आस्वाददेखील घेऊन झालाचं होता. भावाची छोटी मुलगी होती. तिच्या बरोबर खेळण्यात वेळ चटकन निघून जात होता. ह्या आधी तिला पहिल्यांदा पहिली तेंव्हा ती सहा महिन्यांची होती. नुकतीच बसू लागली होती. आत्ता तर ती दूडू-दूडू धावू लागली होती. वेळ किती भुर्रकन निघून जातो नाही? भाऊ, काका, मामा अशी सगळी नातेवाईक मंडळी मुंबई किंवा पुण्याला. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या भेटीगाठी आणि रत्नागिरीला येणं जाणं सुरूचं असतं. आम्ही दक्षिणेकडे जाऊन पडावं ही श्रींची इच्छा त्यामुळे मी एकटा तिकडे बंगलोरमध्ये. मुंबईला अगदी जवळचं कुणाचं लग्न असेल तरच जाणं होतं. त्यामुळे गणपती, दिवाळी किंवा मे महिन्यामध्ये जाणं झालं तरच माझी इतरांशी भेट होते. नाहीतर सहा सहा महिने दर्शन नसतं. बघू पुण्याला कधी येणं होतं? &lt;br /&gt; &lt;br /&gt;सुट्टीच्या दिवसांपैकी एक दिवस निवडणूक निकालांचा होता. पप्याचा जनसंपर्क एकदम चांगला आहे. गावात कुणाकडे ही अडल्या नडल्यावेळी हा हजर त्यामुळे तो पुण्यात गेल्या पासून त्याची उणीव हल्ली सगळ्यांनाच जाणवते. पोरगं राजकारणात शिरलं तर चांगलं नाव काढेल. तसा तो active आहे सुद्धा. निवडणुकीच्या धामधुमी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा निर्माण करून रस्त्याचे काम करून घेण्यात पप्याचा हात होता. साहजिकच निकालादिवशी पप्या सकाळपासून गायब. मतमोजणी केन्द्रावर हजर होता. रत्नागिरीतून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे उदय सामंत निवडून आले. कार्यकर्ता म्हणून साहजिकच पप्याला पार्टीला आमंत्रण होते. गुहागरला रामदास कदम, विनय नातू आणि भास्कर जाधव ह्या तीन त्रिमूर्तीची चार दिवसापासून फार चर्चा होती. निकालादिवशी भास्कर जाधवांनी बाजी मारली. गुहागर मतदारसंघ फेररचनेमुळे कुणाचं कसे नुकसान झाले, मुंबईत शिवसेनेचे कसे हाल झाले, मनसेने कसा दणका दिला ह्याचीच दोन दिवस चर्चा होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सगळ्या मौजमजेत अचानक एक दिवस उद्या आपल्याला निघायचे आहे हे आठवले. मग फराळाचे पॅकिंग सुरू झाले. काय आहे ना घरी असल्याने नॉन-व्हेज आणि बंगलोरला न मिळणार्‍या गोष्टी खाण्यावार मी भर देतो आणि फराळ वैगरे टिकाऊ पदार्थ घेऊन बंगलोरला येतो म्हणजे इथल्या इडली-वड्यापासून काही दिवस सुटका होते. ऑफीसमधल्या मित्रांसाठी भाकर-वडी आणि कोहाळे पाक घेतला. रविवारी दुपारचा मस्त्याहार करून नेहमीप्रमाणे मनात नसताना दुपारच्या कोल्हापूर गाडीने रत्नागिरी सोडले. कोल्हापूरहून पुन्हा बंगलोरची वोल्वो पकडली. पुन्हा कन्नड चित्रपट. बहुतेक क.रा.प.मंने  फक्त कन्नड चित्रपटचं लावायचे ठरवलेले दिसते. परतीच्या प्रवासाबद्दल बाकी काही फार लिहाण्यासारखं नाहीए. हा प्रवास जरा उदासवाणाच असतो. बराचसा झोपेतच जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्या प्रकारे यंदाची दिवाळी मस्त खादडण्यात आणि मौज-मजेत गेली. इतकी मोठी पोस्ट होईल असे वाटलेच नव्हते. दिवाळीपेक्षा मत्स्याहाराचीच जास्त चर्चा झाली हा भाग वेगळा. लिहायला बसलो आणि बरचं काही काही सुचतं गेलं. वाटलं तसं लिहीत गेलो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पोस्ट लिहाल्या आहेत. पहिल्या पोस्टला बर्‍यापैकी प्रतिक्रिया मिळाल्या. बरे वाटले. थोडा हुरूप आला लिहण्याचा. बोअरिंग झाले नसेल अशी आशा बाळगतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-7009424177598691883?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/7009424177598691883/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=7009424177598691883&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/7009424177598691883'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/7009424177598691883'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='यंदाची दिवाळी - भाग २'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-4665402112745322016</id><published>2009-10-31T08:39:00.001-07:00</published><updated>2009-11-01T01:57:32.000-08:00</updated><title type='text'>यंदाची दिवाळी - भाग १</title><content type='html'>गुरुवारी १५ ऑक्टोबरला ऑफीसमधून चक्क पळ काढला आणि साडेआठची कोल्हापूरला जाणारी "ऐरावत" पकडली. कर्नाटक सरकार कढून काही घेण्यासारखे असेल तर त्यांची राज्य परिवहन मंडळाची सेवा. अगदी साध्या गाड्यांपासून ते वोल्वोपर्यंत पाहिजे त्या श्रेणीत उत्तम सेवा उपलब्ध आहे. पुन्हा ड्राइवर कंडक्टर (निदान वोल्वोच्या) लोकांना आपल्या ड्राइवर कंडक्टर  सारखा माज नाही. नेहमीप्रमाणे बस वेळेवर सुटली. हलतडुलट शहरातील गर्दीतून बाहेर पडायला दोन तास गेले. सगळ सुरळीत सुरू होते आणि कंडक्टरने कधी नाही तो हिंदी ऐवजी चक्क कन्नड सिनेमा लावला. मला उगाचच कुणा एखाद्या कानड्या मुंबईमध्ये चोपला तर नाही ना असे वाटून गेले. मग गाडितला एक "मनसे"वाला पेटला. आपण स्वत: परराज्यात असल्याने त्याने अगदीच मराठीचा नाही तर हिंदीचा हट्ट धरला. पण  कंडक्टरदेखील "कनसे"चा निघाला. त्याने मनसेच्या मागणीला फाट्यावर मारून तमाम जनतेला यन्डू सिनेमा पाहायला लावला. मी म्हटले चला कळले नाही तरी निदान  नवीन सिनेमा बघायला मिळेल अशी स्वत: ची समजूत करून घेतली. मी इतका होमसीक झालेलो की मला तिथे त्या सिनेमाचा अनुवाद करून सांग असे सांगितले असते तरी मी अनुवाद केला असता. त्यामुळे ही बस कोल्हापूरला जाते आणि मला बुड टेकायाला जागा आहे ह्या दोन गोष्टीवर मी समाधानी होतो. सिनेमाची कथा समजून घेण्यात कुणाला कष्ट पडले नसावेत कारण एकदा का पडद्यावर दिसणार्‍या तमाम नमुन्यानंमधला हिरो कोण हे कळले की मग बाकी काही फारसे उरत नाही. तिथे हीरोइन, इतर पात्र, कथा अशा उगाच गोष्टींना स्थान नसते. तो so called हिरो जाता येता सगळ्याना बडवत असतो. अश्याच एका निरर्थक(?) हाणामारीनंतर सिनेमा संपतो. आत्ता आपल्याला भाषा कळतं नसल्यामुळे आपल्यासाठी तो अचानक संपतो. सुदैवाने गाडी जेवायला थांबल्यावर सिनेमा बंद करण्यात आला तो पुन्हा सुरू झाला नाही. पण मला कळलेल्या एकंदर कथेवरून मी पुढच्या घटनांचा अंदाज लावला होता आणि इथे परत आल्यावर कचेरितल्या कन्नड सहकार्‍याला माझी अंदाज कथा ऐकवली. ती ९०% बरोबर होती. असो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी साडे-आठला कोल्हापूरला पोहोचलो. सामान होते बर्‍यापैकी त्यामुळे बाबा गाडी घेऊन कोल्हापूरला न्यायला आले होते. वोल्वो मधून उतरून म.रा.प.म.च्या लाल डब्यामध्ये बसणे म्हणजे रावाचा रंक होण्यासारखा प्रकार. बंगलोर-कोल्हापूर ६००+ किलोमीटरचा प्रवास दोनदा परवडला पण कोल्हापूर-रत्नागिरी १२५ किलोमीटर नकोसा होतो. त्यामुळे सामान गाडीत टाकले आणि महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या आनंदात बटाटावडा खाऊन रत्नागिरीच्या दिशेने कूच केले. फार ट्रॅफिक नव्हते. छान गार वारा सुटला होता. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे अगदी रत्नागिरीपर्यंत नुसती शेतंच नव्हे तर माळरान देखील हिरवेगार होते. साधारण दसर्‍यानंतर ऑक्टोबर हीटमध्ये गवत सुकून जाते त्यामुळे मला दिवाळीला घरी जाताना असे हिरवेगार दृष्य कधीच दिसले नव्हते. जोन्धळ्याची गच्च भरलेली कणसे मस्त डोलत होती. दीड तासाने आंबा घाट लागला. घाटात वळणे घेताना लहानपणीच्या "आला खंडाळ्याचा घाट, तिथे गाडी झाली ताठ" ह्या मजेदार ओळी आठवल्या. आंबा घाटातलं सौंदर्य हिरवाईमुळे अजुनच खुललं होतं. नेमका ह्यावेळी मी कॅमरा घेऊन गेलो नव्हतो. खूप छान फोटो काढता आले असते. एरवी बसमधून जाताना कितीही वाटलं तरी उतरून काही बघता येत नाही. आत्ता गाडी होती तर कॅमेरा नाही. नशिबाने नेहमीप्रमाणे गेम दिलेला. म्हटलं चला पुढच्यावेळी काढू कारण आंबा घाटातनं दिसणारं दृष्य नेहमीच छान असतं फक्त जोन्धळ्याच्या कणसासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरोबर एक वाजता घरी पोहोचलो. गेल्याबरोबर पटकन आंघोळ उरकली. घरी एक बरं असतं की जर सकाळी ९-१० नंतर आंघोळ करायची झाली तर चुलीवर पाणी तापवायला लागत नाही. गच्चीवरच्या टाकीतलं पाणी बर्‍यापैकी गरम असतं. आणि तिकडच्या हवेत इतका दमटपणा आहे की गार पाण्याच्या आंघोळीला देखील ना नसते. आंघोळ झाल्याझाल्या लगेच जेवायला बसलो. रिज़र्वेशन केलं त्या दिवशीच बाबांना मला कुठले कुठले मासे आणि Sea Food खायला हवे ते सांगून ठेवले होते. सकाळी मला आणायला कोल्हापूरला जायचं म्हणून बाबांनी आदल्या दिवशीच मासे आणून ठेवले होते. बरेचसे मच्छीमार बांधव मुस्लिम असल्यामुळे शुक्रवारी बाजारात मासे कमी आणि किंमती जास्त असे वातावरण असते. त्यामुळे बाबांना गुरुवारीच मस्त ताजे मासे शुक्रवार/रविवारच्या तुलनेत निम्म्या दारात मिळाले होते. मस्तपैकी कोकेरी आणि म्हाकूल मिळाला होता. कोकेरीचं कालवण + फ्राय आणि म्हाकलाचे मटण होतं. म्हाकूल हा इतर माश्यांप्रमाणे तळून किंवा कालवण करून खाण्याचा प्रकार नाही. त्याचे चिकन सारखे छोटे छोटे तुकडे करून मटणासारखा प्रकार केला जातो. म्हाकूल सहसा मिळत देखील नाही. आणि मुबलक मिळाला तर स्थानिक बाजारात न विकता एक्सपोर्ट केला जातो. चांगली किंमत येते. मला आठवते मी शाळेत असताना माझ्या वर्गातली मच्छीमारांची मुले म्हाकूल मिळायला लागला की रात्री कंदील घेऊन मासेमारीला जायची. हा मासा कंदीलाच्या उजेडाला आत्कृष्ट होऊन येतो आणि लावलेल्या गरीला अडकतो असं ते सांगायचे. आत्ता हा कंदील कसा प्लँट केला जायचा हे माहीत नाही पण ही मुले सीज़नमध्ये म्हाकूल विकून सात-आठशे रुपये कमवायची. त्या स्व:कमाईमधून जीन्स पॅंट, टी-शर्ट अशी खरेदी व्हायची. &lt;span style="font-style:italic;"&gt;(मला त्या वेळी आपण फुकट आहोत आणि ह्या पुस्तकांच्या रगाड्यात आपला अमुल्य वेळ घालवतो आहोत असे वाटायचे. आज देखील हीच भावना ऑफीस, काम आणि अश्या अनेक निरर्थक गोष्टी बद्दल टिकून आहे. मी नक्की काय करू शकतो हे मलाच नक्की माहीत नाही त्यामुळे देश एका चांगल्या "कोणाला" तरी मुकला एवढचं सांगू शकतो)&lt;/span&gt; इतर वेळी हीच कमाई पडलेल्या कैर्‍या आंबे विकून आंब्याच्या सीज़नमध्ये देखील होते. आणि ह्या म्हाकूल/आंब्याच्या व्यवसायामध्ये स्पर्धा ही घरातच असते. आयस, बापूस आणि मुलं हे सगळे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. कदाचित त्यामुळे अंबानी-बंधू वाद वैगरे प्रकरणं हे लोक चघळत बसत नाहीत असे मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले. एकमेकांपासून लपूनछपून, कुरघोडी करून "माल" जमा करणे आणि विकणे. प्रत्येकाचे कस्टमर वेगळे. तर ही झाली म्हाकूल नामक माशाची पाककृतीपासून सुरू झालेली शिकार, शिकारी, मार्केटिंग ते विक्री अशी (उगाच लांबलेली) सुफल संपूर्ण कथा. सांगण्याचा मूळ मुद्दा हा की झक्कासपैकी भाकरी, कोकेरीचे फ्राय + कालवण, म्हाकलाचे मटण आणि भात असे स्वर्गीय भोजन हाणलं. एव्हाना प्रोजेक्ट, स्टेटस, डेडलाइन अश्या क्षुद्र आणि यश्किंचित गोष्टींचा कधीच विसर पडला होता. भ्रमण ध्वनी बंद झाला होता. पुढील १० दिवसाच्या इनिंगची ओपनिंग कोकेरी आणि म्हाकुलाच्या झणझणीत भागीदारीने झाली होती. Non-vegसाठी वखवखलेल्या जिभेला येणार्‍या दिवसात काय काय चाखायला मिळणार याची नांदी मिळाली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेवणानंतर गप्पा मारत सगळे जरा लवंडलो. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे घरी जाम धमाल असते. विशेष करून गणपतीत तर नोकरी-व्यवसाया निमित्त बाहेर गेलेले सगळे झाडून घरी असतात. २५-३० जण सहज असतात. यंदा प्रथमच मी गणपतीत घरी गेलो नव्हतो. २ दिवसासाठी कशाला जा जा आणि ये ये असं म्हटलं. बंगलोरवरुन घरी जायचं म्हणजे दीड-दीड दिवस प्रवासातच जातो. अमेरिकेतून यायचो तेंव्हा देखील जवळपास तेवढाच वेळ लागायचा. त्यात गणपतीत स्वाइन फ्लूचं प्रस्थ होतं. म्हणून तेंव्हाच दिवाळीत जाऊ चांगली लांबलच्चक सुट्टी घेऊन असे ठरवले होते. नंतर गणपतीच्या दिवसात फार चुकल्यासारखे वाटले ते वेगळे. शेवटी शिमगा, गटारी आणि गणपती ह्या सणांचा आनंद कोकणातला माणूस बाहेर करोडो रुपये खर्चून देखील साजरा करू शकत नाही. आत्ता देखील आईने ह्यापुढे २ दिवस का होईना पण ये, गणपती चुकवू नको असे बजावून ठेवले आहे आहे. संध्याकाळ तशी चकाट्या पिटण्यात गेली. शेजारचा पप्यापण हल्ली शिक्षणानिम्मित्त पुण्याला असतो. तो नुकताच घर सोडून बाहेर पडलाय. त्यामुळे तो तसा महिन्यातून २ फेर्‍या मारतोच. लहानपणापासून घरी मासे-मटण आणि बटाट्याची भाजी ह्याशिवाय काही खाल्लेले नाही. घरात रोज बाकी काही शिजल तरी  ह्याच्यासाठी बटाट्याची भाजी. अश्या "राजविलासी आणि घोडा पलंगाशी" थाटात वाढलेला थेट पुण्यात जाऊन पडला. मासे-मटण सोडाच बटाट्याची भाजी देखील दुर्मिळ अशी अवस्था. हल्ली रोज दह्या बरोबर जेवून दिवस काढतो. त्यात गणपतीनंतर मित्राला भेटायला मिरजला गेलेला. नेमकी त्याचवेळी तिकडे दंगल झाली आणि करफ्यु लागल्यानंतर साहेबांनी एक दिवस शिल्लक असलेला चिवडा आणि एक दिवस पूर्ण उपाशी असे दिवस काढले. त्याच्या ह्या सगळ्या कहाण्या ऐकण्यात मस्त टाइम पास झाला. त्या सगळ्यावर कहर म्हणून मी जाऊन काकूना "तुम्ही लहानपणापासून खाण्याच्या बाबतीत ह्याचा जरा छळ केला असतात तर आज ही वेळ आली नसती. आत्ता देखील ह्याला बटाटा सोडून बाकी भाज्या खायला घाला" असे सांगून आलो. बिचारा पप्या माझ्याकडे "साल्या तुला काय माझे चार दिवस सुखात गेलेले बघवत नाय काय" अश्या नजरेने बघत होता. संध्याकाळी मग दिवेलागणी झाल्यावर छोटे कंपनी बरोबर पणत्या वैगरे लावल्या. रात्री पुन्हा उरलेल्या माश्यांना मोक्षप्राप्ती घडवून दिवाळी दिवशी लवकर उठण्यासाठी झोपी गेलो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-4665402112745322016?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/4665402112745322016/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=4665402112745322016&amp;isPopup=true' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/4665402112745322016'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/4665402112745322016'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/10/blog-post_6263.html' title='यंदाची दिवाळी - भाग १'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-253346646313807944</id><published>2009-10-15T03:35:00.000-07:00</published><updated>2009-10-15T03:37:39.235-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शुभेच्छा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिवाळी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><title type='text'>दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Stb7LTYOBrI/AAAAAAAAACg/QRLojAz33nU/s1600-h/Dipawali.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 277px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Stb7LTYOBrI/AAAAAAAAACg/QRLojAz33nU/s400/Dipawali.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5392773775421736626" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आंतरजालावरील तमाम गाववाल्यांना ही दिवाळी सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-253346646313807944?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/253346646313807944/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=253346646313807944&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/253346646313807944'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/253346646313807944'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Stb7LTYOBrI/AAAAAAAAACg/QRLojAz33nU/s72-c/Dipawali.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-2245863228453786035</id><published>2009-09-28T10:31:00.000-07:00</published><updated>2009-09-28T10:44:14.257-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गाणे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वाढदिवस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लता मंगेशकर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारतरत्न'/><title type='text'>लतादीदीनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SsD1XjbaUUI/AAAAAAAAAB4/09VuEePc5OE/s1600-h/Lata_Mangeshkar.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 300px; height: 360px;" src="http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SsD1XjbaUUI/AAAAAAAAAB4/09VuEePc5OE/s400/Lata_Mangeshkar.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5386574939331121474" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;आज दसरा, साडेतीन मुहूर्ता पैकी एक त्याचप्रमाणे आज स्वररत्न भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस. दीदीनीं आज ८१ व्या वर्षात पाऊल टाकले. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या लतादीदीबद्दल मी काय बोलावे. नुकतीच &lt;a href="http://ibnlive.in.com/news/special-lata-at-80-a-life-in-music/102318-8.html"&gt;CNN IBN&lt;/a&gt; वर त्यांची मुलाखत पहिली. त्यानी आपल्या लहानपणीच्या, गाण्यांच्या अशा अनेक आठवणी सांगितल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दीदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या कर्तुत्वाला सलाम!!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-2245863228453786035?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/2245863228453786035/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=2245863228453786035&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2245863228453786035'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/2245863228453786035'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/09/blog-post_28.html' title='लतादीदीनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SsD1XjbaUUI/AAAAAAAAAB4/09VuEePc5OE/s72-c/Lata_Mangeshkar.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-5338247713662164552</id><published>2009-09-26T06:19:00.001-07:00</published><updated>2011-02-06T22:04:35.766-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><title type='text'>'व्हॉट्स युवर राशी'</title><content type='html'>काल रात्री आशुतोष गोवारीकरचा 'व्हॉट्स युवर राशी' पहिला. मी तसा चित्रपट वेडा नाही पण ठराविक दिग्दर्शक किंवा कलाकारांचे चित्रपट आवर्जून पाहतो. त्यातल्या त्यात आमिर खान, नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा ह्या कलाकारांचे किंवा आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज अश्या दिग्दर्शकांचे चित्रपट शक्यतो सोडत नाही. तसं चांगला असेल तर राम गोपाल वर्माचा चित्रपट देखील पाहतो, पण आमिर खान, आशुतोष गोवारीकर अश्या लोकांचे चित्रपट शक्यतो पहिल्या दिवशी पाहतो. दुनियेचा review यायच्या आधी मी आपला रिस्क घेऊन मोकळा होतो. आमिर, आशुतोषने अजुन तरी कधी फार निराशा केली नाही. गेल्या वर्षी 'गजीनी' थेटरला जाऊन पहिला, त्यानंतर गेल्या महिन्यात 'कमिने' ला गेलो होतो. आत्ता काल 'व्हॉट्स युवर राशी' ला गेलो. असो हा झाला माझा थेटर भेटिचा Algorithm. &lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sr4VFLIlebI/AAAAAAAAABo/6h3ZKm0Chng/s1600-h/WYR.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 208px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sr4VFLIlebI/AAAAAAAAABo/6h3ZKm0Chng/s400/WYR.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5385765383014021554" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;'व्हॉट्स युवर राशी' बद्दल बोलायचे झाले तर चित्रपट पाहण्यामागे आशुतोष गोवारीकर आणि प्रियांका चोप्रा ही दोन कारणे होती. हर्मन बवेजा हा रिस्क फॅक्टर होता. अपेक्षा भंग झाला की नाही हे मी अजूनही नक्की सांगू शकत नाही. मुलगी पहाणे हा बहुतेक सगळ्या लग्नाळू मुलांच्या आयुष्यातला अविभाजित घटक. (आमचे पण घोडा मैदान दूर नाही. आणि खाजगीत तुम्हाला म्हणून सांगतो मुलगी पहाणे म्हणजे काय हे जरा जवळून समजावून घेता येईल हे चित्रपट पाहण्या मागचे तिसरे कारण). अरेंज मॅरेज असो किंवा प्रेम विवाह, मुलगी पहाणे आलेच. तर असा एक नेहमीचा साधा सरळ विषय फक्त नवीन मांडणी. चित्रपट तसा हलका फुलका आणि विनोदी आहे. बारा राशीच्या बारा मुली प्रियांका चोप्राने छान उभ्या केल्या आहेत. प्रत्येकीचा लुक वेगळा. प्रियांकाची पहिलीच मेष राशी वाली एंट्री आणि त्या राशीचा लुक, मेक अप आणि अभिनय हा बाकी &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sr4VUMrHZ6I/AAAAAAAAABw/OFHj_mBqZGk/s1600-h/Aries.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 182px; height: 339px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sr4VUMrHZ6I/AAAAAAAAABw/OFHj_mBqZGk/s400/Aries.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5385765641125324706" /&gt;&lt;/a&gt; अकरा राषींच्या तुलनेत सरस. फुल्ल टाळ्या!!!&lt;br /&gt; बाकी अकरा खास नाहीत असे नाही. प्रत्येक राशीचे वेगळेपण जपलेले आहे. चित्रपट संपल्यावर देखील प्रत्येक राशीची प्रियांका तिच्या लुक सकट आठवते ह्यातच सगळे आले. अरेंज मॅरेज आणि मुलगी पहाणे ह्या प्रकारमध्ये मुलींना काय काय प्रकारांना तोंड द्यावे लागते, कशा कशाला सामोरे जावे लागते अश्या पारंपारीक रूढी आशुतोष गोवारीकरने कधी विनोदी तर कधी गंभीर पद्धतीने अश्या छान हातालळ्या आहेत. हर्मन बवेजाचे पहिले दोन्ही फ्लॉप चित्रपट मी पाहिलेले नव्हते त्यामुळे तो किती बकवास अभिनेता आहे ह्याची मला तरी कल्पना नव्हती. 'व्हॉट्स युवर राशी'मध्ये तरी तो टोकाचा बकवास वाटला नाही. त्याने बर्‍यापैकी झेपवले आहे. त्याला पाहून हृतिक रोशन आठवतो हे मात्र नक्की. इनफॅक्ट काही वेळा मला इथे हृतिक रोशन असायला हवा होता असे वाटून गेले. रणबीर कपूर पण चालला असता. असो पण हर्मन मुळे चित्रपट असह्य होत नाही हे नक्की. &lt;br /&gt;चित्रपट मध्यंतरापर्यंत मनाप्रमाणे आहे. खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो गाण्यांमुळे. पहिली मेष रास सोडली तर उरलेल्या अकरा राशीच्या अकरा मुलींचे गाणे आहे. त्यामुळे नंतर नंतर थोडा तोच तोच पणा येतो. २-३ गाणी सोडली तर बाकीची झेपवत नाहीत. ह्यामुळे पूर्ण चित्रपटाची लांबी ४०-४५ मिनिटानी वाढली आणि शेवटी कधी एकदा योगेसला (हर्मनचं चित्रपटातलं गुजराती नाव) पोरगी भेटते आणि चित्रपट संपतो असे होते. सुरुवातीला आवडलेला चित्रपट शेवटी शेवटी आशुतोष गोवारीकरने लोकांसाठी बनवला नसून प्रत्येक मुलीला एक गाणे ह्या न्यायाने तडजोड न करता स्व:त साठी बनवला की काय असे वाटून गेले. हल्ली हिंदी चित्रपट देखील सव्वादोन-अडीज तासात संपतात त्यामुळे साडेतीन तास बसायची राजश्री वाल्यांनी लावलेली जनतेची सवय मोडली आहे. तसे आशुतोष गोवारीकरचेच 'लगान' आणि 'जोधा अकबर' पण साडेतीन तास चालले पण ते अकारण लांबलेले वाटले नाहीत. 'व्हॉट्स युवर राशी' मात्र लांबलेला जाणवतो. &lt;br /&gt;तर गाववाल्यानू माका विचारलाव् तर साताट एक्स्ट्रा गाणी बघीत साडेतीन तास कळ काढलाव तर पिक्चर बघूक हरकत नाय . मनोरंजनाची ग्यारेंटी!!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-5338247713662164552?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/5338247713662164552/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=5338247713662164552&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5338247713662164552'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/5338247713662164552'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/09/blog-post_26.html' title='&apos;व्हॉट्स युवर राशी&apos;'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/Sr4VFLIlebI/AAAAAAAAABo/6h3ZKm0Chng/s72-c/WYR.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-3241964780098902684</id><published>2009-09-17T11:52:00.001-07:00</published><updated>2009-09-17T23:59:42.924-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जनरेशन गॅप'/><title type='text'>आमच्यावेळी बुवा असे नव्हते...</title><content type='html'>आमच्यावेळी बुवा असे नव्हते... साधारणपणे वडीलधारी माणसे नवीन पिढीबद्दल बोलू लागली की हे वाक्य हमखास येतेच असे म्हटले तर वावगे नाही ठरणार. मी स्व:तच्या बाबतीत पहिल्यांदा हे उदगार लहानपणी अभ्यास करताना ऐकले. घरी आईला गणिताबद्दल एखादी शंका किंवा गणित सोडवायची पद्धत विचारली की ती काही वेगळ्या पद्धतीने गणित सोडवून दाखवायची. शाळेत काही वेगळी पद्धत शिकवलेली असायची. नक्की कुठली गणिते ते आत्ता आठवत नाही. तसाहि माझा आणि गणिताचा ३६ चा आकडा. मग मी माझ्या पद्धतीने सोडवले की "आमच्या वेळी अशी पद्धत नव्हती" असे ऐकायला मिळायचे. कधी कधी अभ्यासक्रम बदलायचा. काही नवीन विषय असायचे. कधी कधी काही पाठ्यपुस्तकांमधले धडे बदलायाचे. मग ३-४ वर्षे मोठी असलेली भावंडे देखील "आमच्या वेळी असे नव्हते" असे बोलून उगाचचं आमच्यामध्ये ३-४ वर्षाची जनरेशन गॅप निर्माण करायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे आई बाबा शाळेत होते तेंव्हा सातवी पास म्हणजे मॅट्रिक आणि सातवी पास झालेल्यानां सरकारी नोकरीसाठी ओढून नेत आणि आम्ही इंजिनियर झाल्यानंतर एक वर्ष काही मिळेल ते काम करत होतो. त्यावेळी निवृत्तीला आलेल्या समस्त जनतेचे "आमच्या वेळी असे नव्हते" असे उदगार पुन्हा एकदा ऐकू आले. हल्ली कोणी पळून जाऊन लग्न केले किंवा रजिस्टर लग्न केले तरी (मानपान हुकलेली) काही टाळकी "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून नाराजी व्यक्त करतात. माझे काका इंग्रजांच्या काळात पोलिस सेवेत होते. त्यावेळी सायबाच्या कडक शिस्तीत काम केलेले. कामासाठी मैलोन मैल चालत फिरलेले. ते हल्लीच्या पोलिसांचा फिटनेस आणि कारभार पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे बरेचदा म्हणत.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKGR2kWazI/AAAAAAAAAAw/bpQUuG1v600/s1600-h/Patra.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 139px; height: 150px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKGR2kWazI/AAAAAAAAAAw/bpQUuG1v600/s320/Patra.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5382512145925040946" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;पुर्वी म्हणजे अगदी १९९५ पर्यंत म्हणा, मुंबईला असलेल्या काका आणि भावाची खुषालीची पत्रे यायची. आमच्याकडे तेंव्हा टेलिफोन ही नव्हता. तेंव्हा टेलिफोन हा ठराविक लोकांकडे किंवा पूर्ण गावात एक-दोन जाणांकडे असे. टेलिफोन म्हणजे चैनीची वस्तूचं होती. नंबर लावल्यानंतर घरी यायला काही वर्षे लागायची. &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKGc2yJePI/AAAAAAAAAA4/XXTUXxnca0c/s1600-h/Telephone+Old.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 122px; height: 81px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKGc2yJePI/AAAAAAAAAA4/XXTUXxnca0c/s320/Telephone+Old.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5382512334961473778" /&gt;&lt;/a&gt; पण आज गावी गेलो की कट्ट्यावर लोक आपापल्या मोबाइल वर रिंगटोन वाजवत नाहीतर गेम खेळत बसलेले असतात. &lt;a href="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKHRn_naWI/AAAAAAAAABI/_78hxGPCNxA/s1600-h/Old+Mobile.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 61px; height: 144px;" src="http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKHRn_naWI/AAAAAAAAABI/_78hxGPCNxA/s320/Old+Mobile.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5382513241524496738" /&gt;&lt;/a&gt;मोबाइलच्याच बाबतीत बोलायचे झाले तर एके काळी ज्या उच्चभ्रू लोकांकडे मोबाइल होता ते इनकमिंगचे देखील पैसे मोजत होते. मोबाईल असणे म्हणजे एक स्टेटस होते. आज चिंधी-चोर, सोम्या-गोम्याकडे हायएण्ड मोबाइल पाहून एकेकाळचे उच्चभ्रू लोक "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून हळहळत असतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तसही हल्ली "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणायला दोन पिढ्यांचे अंतर किंवा वयाने फार मोठे असणे जरूरी राहीले नाही. हल्लीच्या झटपट (सबकुछ ट्वेंटी-ट्वेंटी) युगात जनरेशन-गॅप देखील झपाट्याने कमी झालीय. वीस वर्षात केवळ ५२ कसोटी सामने खेळणारे सर डॉन ब्रॅडमन आज वीस वर्षात सचिन तेंडुलकरला १५९ सामने खेळताना बघून "आमच्या वेळी असे नव्हते" असे नक्कीच म्हणाले असते. हेल्मेटशिवाय विंडिजच्या तोफखान्याचा सामना केलेले सुनील गावसकर आजच्या सुविधा पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत असतील. कींबहुना कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळून आज ट्वेंटी-ट्वेंटीचा थरार पाहता सचिन, गांगूली आणि द्रविड "आमच्या वेळी असे नव्हते" असे मनातल्या मनात म्हणत असतील. फार कशाला आम्ही जेंव्हा इंजिनियरिंगच्या  पहिल्या वर्षाला होतो तेंव्हा आम्हाला सेमिस्टरला ८ असे वर्षाला १६ विषय होते. पण आम्ही शेवटच्या वर्षाला गेलो आणि अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यावर्षी १६ ऐवजी १० विषय झाले. त्यावेळी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा "आमच्या वेळी असे नव्हते" हा डायलॉग मारला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्ली सगळं वह्या-पुस्तके, दप्तर, अभ्यासक्रम, मोबाइल(आमच्यावेळी खिशात फणी असायची तसा हल्लीच्या शाळकरी मुलांकडे मोबाइल असतो), फॅशन इतक्या भराभर बदलतं की २ वर्षाचं अंतर असणार्‍या भावंडामध्ये जनरेशन गॅप दिसते. जरा मोठं भावंड दुसर्‍याकडे पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणते. मी स्व:त देखील माझ्या लहानपणी आमच्या गावात जी मज्जा केली, &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKHohD5T0I/AAAAAAAAABY/TMyCnr6ennM/s1600-h/Kaju.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 130px; height: 98px;" src="http://4.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKHohD5T0I/AAAAAAAAABY/TMyCnr6ennM/s320/Kaju.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5382513634800389954" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;काजू-कैर्‍या-करवन्दं पाडून खाल्ल्या, दिवाळीत किल्ले बांधले, तासाला १ रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन शिकलो, समुद्र किनारी वाळूत किल्ले बांधले, कुर्ल्या पकडल्या अश्या एक ना अनेक उचापती केल्या, &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKHjsjis3I/AAAAAAAAABQ/RbJBae-0tsQ/s1600-h/Raw+Mango.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 111px; height: 111px;" src="http://1.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKHjsjis3I/AAAAAAAAABQ/RbJBae-0tsQ/s320/Raw+Mango.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5382513551986570098" /&gt;&lt;/a&gt; पण माझ्यापेक्षा फार फार तर १० वर्षानी लहान भावंडानी ह्यातील निम्म्या गोष्टीचा देखील आनंद लुटला नाही कारण मधल्या १० वर्षात गाव बदलला, घरी स्व:त ची सायकल आली, काजू-कैर्‍या पुर्वी सारख्या लागेना झाल्या, समुद्र किनार्‍यावर गर्दी वाढली. हल्ली तर तिथे कोणीतरी हॉटेल बांधतोय म्हणे. उद्या माझ्या मुलांना ह्यातील किती गोष्टी चित्रात दाखवून आमच्या वेळी असं होतं असे सांगावे लागेल कुणास ठाऊक? पण हे असेच सुरू राहाणार. जनरेशन गॅप एक दिवस दिवसावर येऊन ठेपेल आणि लोक "आमच्या वेळी" ऐवजी "काल" असे नव्हते म्हणून नाक मुरडतील. तो दिवस दूर नाही कारण चार महिन्यापूर्वीचा 'मी' तूरडाळ खरेदी करताना आजच्या 'मी' ला "आमच्यावेळी असं नव्हतं" असे हळूच म्हणतो...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4532974753870610955-3241964780098902684?l=dimag-kharab.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dimag-kharab.blogspot.com/feeds/3241964780098902684/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4532974753870610955&amp;postID=3241964780098902684&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3241964780098902684'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4532974753870610955/posts/default/3241964780098902684'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dimag-kharab.blogspot.com/2009/09/blog-post_6698.html' title='आमच्यावेळी बुवा असे नव्हते...'/><author><name>सिद्धार्थ</name><uri>http://www.blogger.com/profile/03477500610365282208</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/TS1xrH7eXQI/AAAAAAAAAls/sElU3bghO9k/S220/Hapus.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_qiqHHDOJGaA/SrKGR2kWazI/AAAAAAAAAAw/bpQUuG1v600/s72-c/Patra.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4532974753870610955.post-1333361623160317130</id><published>2009-09-02T02:09:00.000-07:00</published><updated>2009-09-02T09:12:40.992-07:00</updated><title type='text'>एक उनाड दिवस</title><content type='html'>आज पहिल्यांदा ऑफीसला दांडी मारुन घरी बसलो होतो... तशी उगाच दांडी नाही मारली. काल येताना भिजून आलो. रात्री बर्‍यापैकी थंडी पण होती. रात्री कधी कोणास ठाऊक पण जरा अंग दुखु लागले. सकाळी उठावेसे वाटत नव्हते. उगाचच किंचित अशक्त झालोय असे वाटून गेले. उठून पाणी अंगावर घ्यावे असे बिलकुल वाटत नव्हते. म्हटलं जाऊ दे.... आज आराम करू. तसही कालच टेस्टटीमने वेचून काढलेला संगणक प्रणालीतला एक मोठा सूर्याजी पिसाळ(Bug) ठेचून मारला होता. मग काय ह्या आठवड्याच्या स्टेटस रिपोर्टची सोय झाली होती. पडल्या पडल्या गेल्या वर्षी पाहिलेला अशोक सराफचा "एक उनाड दिवस" चित्रपट आठवला. त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात एक दिवस वेगळे जगून बघावे, आयुष्य पाच वर्षानी (की दिवसांनी???) वाढते म्हणे. म्हटले चला मारू दांडी... आयुष्य वाढो वा न वाढो आज जरा मज्जा करू. तसाच पडून जरा टी व्ही पहिला. मग आरामात उठून बाहेर जाऊन दूध, पाव, अंडी आणि बारीक-सारिक सामान घेऊन आलो. बाहेर अजूनही पावसाळी वातावरण आणि थंडी होतीच. मस्त ओम्लेट पाव आणि हळद टाकून ग्लासभर गरमा गरम दूध असा मस्त नाश्ता झाला. टाइम्स वाचून झाल्यावर आंतर जाला वर मटा आणि लोकसत्ताचे वाचन झाले. बुधवारचा Times Ascent पण चाळून झाला. साला अजुन मार्केटमध्ये अंबूजा सिमेंट (बोले तो जान) नाही आलेली. जोपर्यंत ईंन्फोसिसची चार थोबाडं पहिल्या किंवा शेवटच्या पानावर दिसत नाहीत तोपर्यंत मार्केट काही स्थिरस्तावर होत नाही. मग मराठी ब्लॉग वर चक्कर टाकली. गेले आठवडाभर तसं सवडीने काही वाचता आलं नव्हतं. आज मस्त निवांतपणे नवे जुने ब्लॉग वाचून काढले. &lt;br /&gt;मग पुन्हा एकदा बल्लव अंगात संचारला आणि मटार भाताचा कूकर लावला. एकदाच दोन वेळा पुरेल इतकी सामुग्री कूकर मध्ये कोंबली. रात्रीच्या जेव
